आज हसवायच म्हणशिल तर..
ते तितकसं सोप्प नाही.
वेदना रुतून राहीली आहे..
कुठे तरी..अशी मिटायची नाही..
आज उसवायच म्हणशिल तर..
ते तितकसं सोप्प नाही.
गाठ पडून गेली आहे.. कधी तरी..
अशी सुटायची नाही.
आज चकवायच म्हणशील तर..
ते तितकस सोप्प नाही.
भास गळून गेला आहे.. केव्हा तरी..
अशी भुलचढायची नाही.
आज उसकवायच म्हणशिल तर..
ते तितकस सोप्प नाही.
वेळ टळून गेली आहे.. कधी तरी..
अशी परतायची नाही.
===================
स्वाती फडणीस ..... १६-०४-२००९
No comments:
Post a Comment