पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..
त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही
तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही
म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली
हं, खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही
Maharashta sathi je aahet te Marathi sathi aahet Majhya kadun Majhya ya Marathi Mansa sathi.. majhya kadun hi choti se..... mahiti kendra
Thursday, September 10, 2009
इतकी सुंदर का दिसते ती?
इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...
विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...
मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...
मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...
भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...
कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?...
मनात माझ्या का ठसते ती?...
विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...
मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...
मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...
भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...
कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?...
!! विलापिका!!
सुर्याची किरणे जेव्हा
पदतात या मातीवर
थरथरणार्या मातीचा
जीव होतो खालिवर
सुर्यची किरणे जेव्हा
तिला कवटाळू पाहतात
व्याकुळ प्रुथ्वीचे अधर
सुर्याला आतुरतात
वियोगाच्या या प्रखरतेनेच
तर आपण तगतो
प्रुथ्वीला स्पर्शण्याच्य प्रयत्नात
तर सुर्य प्रकाशतो
सुर्य-प्रुथ्वीची ही यारी
आहे आम्हा सर्वान्ना प्यारि
पण मनाला खन्त वाटुन राहते
अस्तवेळीच का त्यान्ना जवळीक मिळते
त्यान्च्या प्रेमाची फुले
अस्तासमिपच का फुलत जातात
उध्वस्थ प्रुथ्विचे अश्रु
सन्धिप्रकाशातच का विरुन जातात
-स्वप्निल
पदतात या मातीवर
थरथरणार्या मातीचा
जीव होतो खालिवर
सुर्यची किरणे जेव्हा
तिला कवटाळू पाहतात
व्याकुळ प्रुथ्वीचे अधर
सुर्याला आतुरतात
वियोगाच्या या प्रखरतेनेच
तर आपण तगतो
प्रुथ्वीला स्पर्शण्याच्य प्रयत्नात
तर सुर्य प्रकाशतो
सुर्य-प्रुथ्वीची ही यारी
आहे आम्हा सर्वान्ना प्यारि
पण मनाला खन्त वाटुन राहते
अस्तवेळीच का त्यान्ना जवळीक मिळते
त्यान्च्या प्रेमाची फुले
अस्तासमिपच का फुलत जातात
उध्वस्थ प्रुथ्विचे अश्रु
सन्धिप्रकाशातच का विरुन जातात
-स्वप्निल
"खरं" माणूस होऊन बघावं….
"खरं" माणूस होऊन बघावं….
आज म्हणलं "खरं" माणूस होऊन बघावं
दुसर्यांच्या दु:खाला समजून बघावं
कुणी वेदनेत दिसलं तर थांबून वीचारावं
दोन शब्दा प्रेमाचे अन् मायेचं मलम लावावं
कुणी दिसलं गरजू तर मदतीला जावं
आपला घास देऊन भुकेल्याचं पोट भरावं
कुणी दिसलं लाचार तर दुर्गेच रूप घ्यावं
वाट भरकटलेल्यांसाठी डोळ्यातील अंजन व्हावं
एखाद्या अनाथासाठी प्रेमाचा साथी व्हावं
म्हातार्या दुबळ्यांसाठी अधाराची काठी व्हावं
सगळे जण म्हणत फिरतात आम्ही माणूस माणूस
माणूसकीला शोभेल असं काय करतात कुणास ठाऊक
तुम्ही पण एक दिवस "खरं" माणूस होऊन जगा
शोधत असलेले सुख समाधान मिळतय की नाही बघा
आज म्हणलं "खरं" माणूस होऊन बघावं
दुसर्यांच्या दु:खाला समजून बघावं
कुणी वेदनेत दिसलं तर थांबून वीचारावं
दोन शब्दा प्रेमाचे अन् मायेचं मलम लावावं
कुणी दिसलं गरजू तर मदतीला जावं
आपला घास देऊन भुकेल्याचं पोट भरावं
कुणी दिसलं लाचार तर दुर्गेच रूप घ्यावं
वाट भरकटलेल्यांसाठी डोळ्यातील अंजन व्हावं
एखाद्या अनाथासाठी प्रेमाचा साथी व्हावं
म्हातार्या दुबळ्यांसाठी अधाराची काठी व्हावं
सगळे जण म्हणत फिरतात आम्ही माणूस माणूस
माणूसकीला शोभेल असं काय करतात कुणास ठाऊक
तुम्ही पण एक दिवस "खरं" माणूस होऊन जगा
शोधत असलेले सुख समाधान मिळतय की नाही बघा
तू जिवनात आहेस म्हणूनचं
तू जिवनात आहेस म्हणूनचं
तू जिवनात आहेस म्हणूनचं
तुझ्या प्रेमाने ओंजळ भरतो मी
तू रोज ओवाळतेस मला
कर्तव्यास रोज वरतो मी
तू जिवनात आहेस म्हणूनचं
माझ्या असण्याला एक कारण आहे
जगाच्या नजरेत किंमत नसली, तरी
तुझ्या डोळ्यात तेज असाधारण आहे
तू जिवनात आहेस म्हणूनचं
फुलपाखरा सारखं बागडणं होतं
अलगद तुझ्या मिठीत निसंकोच
तारुण्याच्या पापणीचं उघडणं होतं
तू जिवनात आहेस म्हणूनचं
एक आधार आहे बिलगून
वादळातही पहील्या पावसाच्या
सरी समजून जातो भिजून
तू जिवनात आहेस म्हणूनचं
अवचित हास्याला भेटतो
हास्याचे ते मुखवटे मग
दु:खाच्या चेहऱ्यावर लाटतो
तू जिवनात आहेस म्हणूनचं
वास्तवाचे निखारेही उब वाटतात
त्या उबाच्या छत्रछाये खाली
मला स्वप्नांचे शहारे भेटतात
तू जिवनात आहेस म्हणूनचं
माझा प्रत्येक क्षण मोहरतो
माझ्या अवती भवतीचा निवडूंग
प्राजक्ता सारखा बहरतो
तू जिवनात आहेस म्हणूनचं
जगण्याला एक दिशा आहे
बराचसा काळोख असला तरी
एक छोटीशी तिरीपच निशा आहे
तू जिवनात आहेस म्हणूनचं
ही झोपडी ही महाल आहे
ह्या महालात तुला माझ्या
हृदयाचा स्वर्ग बहाल आहे
तू जिवनात आहेस म्हणूनचं
तुझ्या प्रेमाने ओंजळ भरतो मी
तू रोज ओवाळतेस मला
कर्तव्यास रोज वरतो मी
तू जिवनात आहेस म्हणूनचं
माझ्या असण्याला एक कारण आहे
जगाच्या नजरेत किंमत नसली, तरी
तुझ्या डोळ्यात तेज असाधारण आहे
तू जिवनात आहेस म्हणूनचं
फुलपाखरा सारखं बागडणं होतं
अलगद तुझ्या मिठीत निसंकोच
तारुण्याच्या पापणीचं उघडणं होतं
तू जिवनात आहेस म्हणूनचं
एक आधार आहे बिलगून
वादळातही पहील्या पावसाच्या
सरी समजून जातो भिजून
तू जिवनात आहेस म्हणूनचं
अवचित हास्याला भेटतो
हास्याचे ते मुखवटे मग
दु:खाच्या चेहऱ्यावर लाटतो
तू जिवनात आहेस म्हणूनचं
वास्तवाचे निखारेही उब वाटतात
त्या उबाच्या छत्रछाये खाली
मला स्वप्नांचे शहारे भेटतात
तू जिवनात आहेस म्हणूनचं
माझा प्रत्येक क्षण मोहरतो
माझ्या अवती भवतीचा निवडूंग
प्राजक्ता सारखा बहरतो
तू जिवनात आहेस म्हणूनचं
जगण्याला एक दिशा आहे
बराचसा काळोख असला तरी
एक छोटीशी तिरीपच निशा आहे
तू जिवनात आहेस म्हणूनचं
ही झोपडी ही महाल आहे
ह्या महालात तुला माझ्या
हृदयाचा स्वर्ग बहाल आहे
इसापचे चरित्र
इसापनीती लिहिणारा इसाप हा इसवीसनापूर्वी सहाव्या शतकात होऊन गेला. 'फ्रिजिआ' नावाच्या
देशातील आमोरियम या गावी तो जन्मला, त्याचे आईबाप गुलाम असल्यामुळे तो जन्मतःच
गुलाम होता. तो रूपाने अत्यंत कुरूप असून रंगाने काळा होता. त्यामुळे त्याला बघून बायका-मुले
घाबरत असत. त्या कारणाने त्याच्या मालकाने त्याला आपल्या घरात न ठेवता दूर शेतात
राखणीच्या कामास पाठवले.
एकदा आपल्या शेताची काय परिस्थिती आहे ती बघण्यासाठी मालक शेतावर गेला. तेव्हा त्याच्या
कुळांनी त्याला चांगले अंजीर भेट दिले. त्याने ते आपल्या नोकरांजवळ देऊन तो स्नान करावयास
गेला. ते पिकलेले अंजीर पाहून नोकराच्या तोंडास पाणी सुटले. त्यांनी मागला पुढला विचार न
करता ते सर्व खाऊन टाकले. पण नंतर मालक परत आल्यावर त्याला काय सांगायचे हा त्यांना
प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी संगनमत करुन इसापने अंजीर खाल्याचे सांगायचे ठरवले. त्याप्रमाणे
मालक परत येताच त्यांनी इसापला पुढे करून त्यानेच अंजीर खाल्ल्याचे सांगायचे. त्याबरोबर
मालक खूप संतापला. त्याने इसापला कडक शिक्षा करावयाचे ठरवले. त्यावर इसाप क्षणभर
शांत उभा राहिला. नंतर मालकाच्या पायावर लोटांगण घालून तो म्हणाला, 'मालक मी जर खरंच
अपराध केला अशी आपली खात्री पटली तर मला जरूर शिक्षा करा. पण त्यापूर्वी आपण जर
मला अर्ध्या तासाची मुदत दिलीत तर मी माझा निरपराधीपणा सिद्ध करून दाखवीन.
मालकाने त्याची विनंती मान्य केली. तेव्हा इसापने गरम पाण्यात मीठ टाकून तो ते प्याला.
नंतर घशात बोटे घालून ओकारी काढली. तेव्हा ओकलेल्या पदार्थात अंजीराचा मागमुसही नव्हता
ते पाहून मालकाला त्याच्या निरपराधीपणाबद्दल खात्री पटली. हे काम आपल्या लबाड नोकरांचेच
असले पाहिजे हे त्याच्या लक्षात आले. त्याने नोकरांना, इतरांनाही इसापचे अनुकरण करायला
सांगितले. तेव्हा आपले कृत्य उघडकीस येऊन आपली फजिती होणार असे दिसताच त्या लबाड
नोकरांनी आपला गुन्हा कबूल केला.
त्याप्रसंगी इसापने दाखवलेली समयसूचकता व चातुर्य पाहून मालक त्याच्यावर खूष झाला. त्याने
इसापला परत नेऊन आपल्या घरी ठेवले. पुढे एकदा मालकाला पैशाची फारच अडचण निर्माण
झाली तेव्हा नाइलाजाने त्याने इसापला एका गुलामांच्या व्यापार्याला विकले. तो व्यापारी
गुलामांच्या डोक्यावर मोठमोठे बोजे देऊन त्यांना गावोगाव हिंडवत असे. एक दिवस बोजे
उचलण्याची वेळ आली तेव्हा इतर गुलामांनी पटापट जे बोजे हलके होते ते उचलून घेतले.
पण त्यांच्या आधीच इसापने त्या सर्वांच्या जेवणाच्या साहित्याचा जड बोजा उचलून घेतला.
आधीच अशक्त असतांना त्याने सर्वात जड बोजा डोक्यावर घेतल्याबद्दल इतर गुलाम इसापला
हसू लागले. त्यावेळी इसाप काही बोलला नाही. उचललेला जड बोजा डोक्यावर घेउन तो कसाबसा
चालू लागला. पण दर दिवशी त्याच्या बोजातले खाण्याचे पदार्थ कमी कमी होऊ लागल्याने
मुक्कामावर पोहोचण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर देण्यास काहीच शिल्लक राहिले नाही. इतरांचे बोजे
कायमच होते. ते पाहून सर्वांनी इसापच्या चातुर्याची फार तारीफ केली. त्यानंतर दरवेळी इसापनेच
जेवणाच्या साहित्याचा बोजा घ्यायचा असे मालकाने ठरवून टाकले.
काही दिवसांनी त्या मालकाला दोनतीन गुलाम विकण्याची वेळ आली. तेव्हा त्याने दोन चांगले
धट्टेकट्टे गुलाम आणि तिसरा अशक्त इसाप असे तीन गुलाम विकायला काढले. इसाप हा कुरूप
व अशक्त असल्यामुळे त्याला कोणी विकत घेणार नाही असे मालकाला वाटले. म्हणून त्याने
इसापला त्या दोघांच्यामध्ये उभे केले. त्याच्या अशक्तपणामुळे दुसर्या दोघांचा सशक्तपणा लोकांच्या
नजरेस येईल आणि ते दोन गुलाम तरी लवकर विकले जातील अशी मालकाची कल्पना होती.
थोड्या वेळाने झांथस नावाचा एक तत्त्ववेत्ता तेथे गुलाम विकत घेण्यासाठी आला. या तीन
गुलामांपैकी दोघे धट्टेकट्टे असलेले पाहून त्यांना झांथसने विचारले, 'अरे तुम्हाला काय काय
कामं येतात?' त्यावर त्या दोघांनी उत्तर दिले, 'आम्हाला सर्वकाही करता येतं !
तेव्हा झांथसने इसापकडे पाहून त्याला विनोदाने विचारले, 'अन् तुला रे? तुला काय काय
करता येत?' त्यावर इसाप म्हणाला, 'माझ्या या सोबत्यांनीच सगळी कामं करून टाकल्यावर
माझ्यासाठी काय शिल्लक राहणार? तरी पण आपण जे काही काम मला द्याल ते मी मनापासून
करीन. निदान मला तुम्ही विकत घेतले तर मुलांना बाऊ दाखवून भीती घालण्यासाठी तुम्हाला
दुसर्या कशाची जरूरी पडणार नाही.'इसापचे चतुराईचे उत्तर ऐकून झांथस खूष झाला. तो गुणी
माणसांचा चाहता होता. त्याने ओळखले की, इसाप काही सामान्य नाही. तो फार हुशार आहे.
त्याने इसापला विकत घेऊन आपल्या घरी नेले.
घरी गेल्यावर झांथसला घरातल्या लोकांची थट्टा करण्याची लहर आली. त्याने इसापला बाहेर उभे
राहण्यास सांगितले. स्वतः घरात जाऊन त्याने घरातल्या माणसांना म्हटले, 'आज मी एक फार
सुंदर गुलाम विकत आणला आहे.'ते ऐकून सगळेजण मोठ्या आतुरतेने इसापला बघण्यासाठी
बाहेर आले. पण जेव्हा इसापचा काळा रंग अन् त्याचे वेडेविद्रे रूप त्यांच्या नजरेस पडले तेव्हा
ते सगळेजण घाबरून पळत सुटले.
झांथसच्या घरी असतांना इसाप आपल्या अंगच्या चातुर्यामुळे प्रसिद्धीस आला. त्या काळातल्या
त्याच्या चातुर्याच्या अनेक कथा इसापनीतीमध्ये आल्या आहेत. पण त्यात न आलेल्या दोन गोष्टी
पुढे देत आहे.
एकदा झांथसचे आणि त्याच्या बायकोचे भांडण झाले. झांथसची बायको त्याच्याशी बोलेनाशी
झाली. तेव्हा झांथसने इसापला भांडण मिटवण्याचा उपाय विचारला त्यावर इसापने त्याला एक
युक्ती सांगितली.
त्याने सांगितल्याप्रमाणे जेवणाच्या वेळी झांथस इसापला म्हणाला, 'माझ्या खर्या हितचिंतक
आणि विश्वासू मित्राला घेऊन ये !' त्याबरोबर इसापने झांथसच्या कुत्र्याला समोर आणून
उभे केले. ते पाहून झांथसची बायको संतापली.
'मूर्खा', ती इसापवर ओरडली, 'याचं हित पाहणारा विश्वासू मित्र काय कुत्रा आहे?
अन् मी कोणीच नाही का?'
इसाप शांतपणे म्हणाला, 'बाईसाहेब आपण जर मालकांच्या खर्या हितचिंतक स्नेही असता
तर एवढ्या तेवढया गोष्टीवरून त्यांच्याशी भांडून पंधरापंधरा दिवस अबोला धरला नसता !
ते ऐकून बायकोला आपली चूक कळून आली, त्यानंतर पुन्हा कधीच ती नवर्याशी भांडली नाही.
एकदा त्यांच्या गावात गावकर्यांची सभा भरली होती. तेवढ्यात एका गरुड पक्ष्याने गुलामाच्या
पायातला वाळा ऐन सभेच्या मध्यभागी आणुन टाकला. सर्वांना तो अपशकून वाटला. पण त्याचा
अर्थ काय ते उमगेना. झांथसच्या विद्वत्तेबद्दल सर्वांना आदर असल्याने त्यांनी झांथसला त्याचा
अर्थ विचारला. तेव्हा तोही विचारात पडला. शेवटी, 'उद्याला मी याचा अर्थ सांगतो.' असे म्हणून
तो घरी गेला.
घरी आल्यावर. इसापला त्याने घडलेली हकीगत सांगितली. आणि त्या घटनेचा अर्थ काय
असावा असे विचारले. त्यावर इसाप म्हणाला, 'आपण जर मला गुलामगिरीतून मुक्त कराल
सांगतो.'
झांथसने त्याची अट मान्य केली.तेव्हा इसापने त्याला सांगितले, 'कोणी तरी राजा आपल्या
गावावर चाल करून येत असून गावातील सर्व लोकांना गुलाम करण्याचा त्याचा हेतू आहे असा
त्या गरुडाच्या कृत्याचा अर्थ आहे. तरी सर्व गावकर्यांना सावध राहायला सांगा !'
झांथसने त्याप्रमाणे गावकर्यांना सांगितले.
थोड्याच दिवसात खरोखरच 'लिडिआ' देशाचा राजा क्रिसस याने झांथसच्या गावकर्यास निरोप
पाठवला की, 'तुम्ही मला मुकाट्याने अमुक एक रक्कम खंडणी म्हणून द्या नाहीतर मी स्वारी
करून तुमचा गाव लुटीन !'तेव्हा गावकरी फार काळजीत पडले. त्यांनी सभा भरवली. इसापची
गुलामगिरीतून सुटका झाल्यामुळे तोही सभेत एक नागरिक म्हणून उपस्थित होता.इसापने
गावकर्यांना सांगितले, 'मित्रहो ! खंडणी देऊन आपली मानहानी करून घेऊ नका !'यावेळी
जर आपण माघार घेऊन त्याची मागणी मान्य केली तर क्रिसस आपल्याला कायमच त्रास देत
राहील. त्यासाठी वेळ आल्यास त्याच्याशी दोन हात करण्याच्या तयारीत आपण राहून आपलं
स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्न करणं हाच मार्ग योग्य आहे असं मला वाटतं !'
त्या सभेत क्रिससचा वकीलही हजर होता. त्याने ही हकीगत क्रिससला सांगितली.
'इसाप जोपर्यंत तिथे आहे' वकील क्रिससला म्हणाला, 'तोपर्यंत तो गाव आपल्या हाती
लागणं अशक्य आहे !'
तेव्हा क्रिससने झांथसच्या गावकर्यांना निरोप पाठविला की, 'तुमच्या गावात इसाप नावाचा
जो गृहस्थ आहे त्याला माझ्याकडे पाठवून द्या.'तेव्हा खंडणीच्या ऐवजी इसापला पाठविण्याची
अट गावकर्यांना पसंत पडली. ते राजाची अट कबूल करण्याच्या विचारात असलेले पाहून इसापने
त्यांना एक गोष्ट सांगितली.
'जोपर्यंत मेंढयाच्या कळपाबरोबर कुत्रे आहेत तोपर्यंत मेंढ्या आपल्या हाती लागणार नाहीत हे
पाहून लांडगा मेंढ्यांकडे तह करायला आला. त्याने त्यांच्याकडे त्यांच्यावर हल्ला न करण्याच्या
बदल्यात कुत्र्याची मागणी केली. मेंढ्यांनी खूष होऊन त्याची मागणी मान्य केली. अन् कुत्र्याचं
संरक्षण नाहीसं होताच लांडग्याने एका पाठोपाठ एक सर्व मेंढ्यांना मारून खाल्लं.'
ही गोष्ट ऐकून लोकांना आपली चूक कळून आली.
तरी इसाप पुढे त्यांना म्हणाला, 'असं असलं तरीही मी क्रिससच्या दरबारात जाणं हेच तुमच्या
हिताच आहे !
त्याप्रमाणे इसाप क्रिससच्या दरबारात गेला. तिथे त्याच्या चातुर्याची फार तारीफ झाली. तिथे
असतानाच त्याने इसापनीतीतल्या बहुतेक गोष्टी रचल्या. पुढे क्रिससच्या आज्ञेवरुन डेल्फी येथील
उपाध्यायांना दक्षिणा देण्यासाठी इसाप गेला असताना त्या उपाध्यायांचे वाईट वर्तन पाहून त्याने
'देणग्या घेण्याची तुमची लायकी नसल्याने मी तुम्हाला एक कवडीही देणार नाही !' असे त्यांना
स्पष्ट सांगितले. त्यावर चिडून जाऊन उपाध्यायांनी इसापवर हल्ला करून त्याला ठार केले.
त्यापूर्वी त्यांची समजूत घालण्यासाठी इसापने त्यांना पुष्कळ नीतिकथा सांगितल्या. पण त्यांचा
काही उपयोग झाला नाही.
मरताना इसापने उपाध्यायांना सांगितले,'तुम्हाला या दुष्कृत्याचं प्रायश्चित्त लवकरच भोगावं लागेल
त्याचे हे भविष्य लवकरच खरे झाले. डेल्फी येथील लोकांवर अनेक मोठमोठी संकटे येऊन; त्यांनी
इसापला मारून त्याच्याकडून घेतलेल्या पैशाच्या हजारपट दंड त्यांना भोगावा लागला.
इसापच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्याने लग्न केले होते. पण
त्यास संतती झाली नाही. पुढे त्याने एक मुलगा दत्तक घेतला. पण तो दुष्ट आणि कृतघ्न निघाला
असा उल्लेख एके ठिकाणी आला आहे.
इसापच्या मृत्युनंतर दोनशे वर्षांनी ग्रीसमधील अथेन्स शहरातील लोकांनी इसापचा एक उत्तम
पुतळा तयार करवून शहरातील प्रमुख चौकात उभारला.
इसापने रचलेल्या नीतीकथांमुळे तो जगभर प्रसिद्ध झाला. त्या गोष्टी त्याने जरी प्राण्यांवर रचल्या
तरी त्यातून त्याने माणसांना नीती शिकवली. जगात कसे वागावे हे शिकवले. पण असे असूनही
त्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक पद्धतीने रचल्या असल्याने त्यांना जागतिक
लोकप्रियता मिळाली. जगातील सर्व प्रमुख भाषांतून' इसापनीती' ची भाषांतरे झाली आहेत.
उज्ज्वल भवितव्यासाठी
एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यात उच्च तंत्रज्ञान घेऊन आलेल्या एका इंजिनीयरची नेमणूक केली.
त्याने आल्यावर महिन्याभरातच सार्या मशिन्स ठाकठीक केल्या. मशिन्सची काळजी कशी घ्यायची
याचेही प्रशिक्षण त्याने कामगारांना दिले. दोन - तीन महिने झाले. त्याला काही कामच नव्हते. तो
मालकाला भेटला. म्हणाला, सर ! मला तुम्ही मला फुकट पगार का देता ? सर्व मशिन्स
व्यवस्थित सुरु आहेत. आता मी नसलो, तरी कारखाना ठिक चालेल. मालक म्हणाले, ते सर्व ठिक
आहे. आज कारखान्यातली यंत्रं व्यवस्थित आहेत पण उद्या यातलं एखादं जरी मशिन बिघडलं, तरी
माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्यावेळी मी तुला कुठे शोधू ? म्हणूनच उद्या बिघडणार्या
मशिन्सच्या दुरुस्तीसाठी मी तुझी आजच व्यवस्था करुन ठेवली आहे. मी काय मूर्ख आहे, तुला
पैसा फुकट द्यायला
मदत
अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना. रस्त्याच्या कडेने जात असताना लष्कराची गाडी अडचणीच्या
जागेत अडकली होती. आतील शिपाई उतरुन तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागले.
त्यांच्यावरचा अंमलदार फक्त हुकूम देत होता.
मदत केली असती तर गाडी नक्की निघाली असती पण तो होता साहेब ! फक्त हुकूम
देत उभे राहणेच त्याने पसंत केले. तेवढ्यात तिकडून एक गाडी आली.
गाडीतून एक सज्जन उतरला. त्याने सैनिकांना प्रत्यक्ष हातभार लावला. गाडी अडचणीतून
बाहेर पडली. दुसर्या गाडीतून आलेला तो सज्जन अंमलदार साहेबाला म्हणाला, पुन्हा गरज
पडली तर मला बोलवत जा आणि त्याने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आपला पत्ता
असलेले कार्ड बाहेर काढले व त्या अंमलदारला दिले.
त्याने ते सहज म्हणून वाचले. त्याला दरदरुन घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो
सज्जन अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता.
विश्वासाचा सुगंध
चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत.
म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव
महाराज तर धर्माची,ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी
संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र
मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन
यांना विचारलेच,भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ?
आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?
म्हणाले, ' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे
माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ
विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे
समजून घ्यायला मला आवडते.
महापुरुष
आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट
अशी की, आपले म्हणणे दुसर्यांना न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा
हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला,
महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे.
मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या
मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसर्या
दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ?
पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः
आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय,
पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड
आहे ? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने
डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले
होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला,
विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ?
हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले,
ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस.
दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल.
हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा
निश्चय केला.
नैतिकतेचा आदर्श
आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च
दर्या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात
उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी
पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास
धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य
त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस
अर्पण करु ?
महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या
मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद
व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.
ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने
आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा
आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या
शेतकर्याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले.