Friday, August 20, 2010

किल्ले दौलतमंगळ

पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामधे आहे.
अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो.



भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामधे आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत.
पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे. दौलतमंगळ किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यातून दोन मार्ग सोयीचे आहेत. पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा गाडीरस्ता आहे. माळशिरस हे लहानसे गाव किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला आहे. दुसरा मार्ग पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत गावाकडून आहे. यवतच्या दक्षिणेला दौलतमंगळ आहे.

दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता आलेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे, बुरुजांचे अवशेष आजही आपले अस्तित्व कसेबसे टिकवून उभे राहीलेले दिसतात. किल्ल्याचा दरवाजा, पायर्यांचा मार्ग, पाण्याची टाकी असे वास्तूविशेषही पहायला मिळतात.किल्ल्याचे भग्नावशेष पाहून आपण निश्चितच खिन्न होतो. खिन्न मनाने आपण भुलेश्वरच्या मंदिरात प्रवेश करतो. मंदिर पाहिल्यावर मनाची उदासिनता कुठल्या कोठे पळून जाते आणि आपण प्रसन्न मनाने मंदिराचे शिल्पकाम न्याहळू लागतो.

मुख्य मंदिराच्या बाहेरुन भिंत बांधून मंदिराची सुरक्षितता वाढवल्याचे दिसून येते. मंदिरामधील अनेक मुर्त्यांची तोडफोड केल्याचे दिसते. वरच्या भागातील गिलाव्यामधील मुर्ती मात्र शाबुत असल्याचे पहायला मिळते.
दौलतमंगळ किल्ला पहायला अर्धा तास पुरतो. पण मंदिर निरखायला मात्र किमान तासभर तरी हाताशी पाहिजे. कलाकारांची सौंदर्यवृष्टी आणि कलाकारी मनाला भावते तसेच शिल्पांची अदाकारी ही आपल्याला थक्क करते.

भुलेश्वर परिसरातून वज्रगड, पुरंदर, सिंहगड किल्ले दिसतात तसेच जेजुरी, ढवळेश्वर आणि सपाटीवरचा विस्तृत प्रदेशही पहाता येतो.

दौलतमंगळाच्या भेटीत आपण जेजुरी अथवा ढवळेश्वरालाही भेट देवू शकतो.

Thursday, August 19, 2010

किल्ले पूर्णगड

रत्नागिरी हा कोकणातील जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला असून पूर्वेला सह्याद्रीची मुख्य रांग दक्षिणोत्तर गेलेली आहे. सह्याद्रीतून वाहत येणाऱ्या अरबी समुद्राला या डोंगर रांगा जेथे मिळतात, तेथे खाडय़ा निर्माण झाल्या. या खाडय़ामुळे कोकणचा किनारा दंतूर झालेला आहे. या दंतूर किणाऱ्यामुळे कोकणचे निसर्गसौंदर्य कैक पटीने वाढले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामधील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगड नावाचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खाणाखूणा जपत उभा आहे. पूर्णगडाच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे. लहानश्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.

मुंबई-पणजी महामार्गावर हातखंबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे. या धुरंधर सेनानायकाला नमन करून आपण पावसला येतो.

पावसच्या एस. टी. थांब्याजवळच स्वामी स्वरुपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. अनेक भाषिकांचा ओघ येथे असतो. हे स्थळ पाहून येथील निसर्ग सौंदर्य न्याहाळत आपण पूर्णगडाकडे निघतो. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.

गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे. येथे पायउतार होवून गावातील घरांच्या रांगांमधून चढणाऱ्या पायऱ्यांचा वाटेने २० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याजवळ पोहोचतो.

किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मंदिराची सध्या गावकर्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.

येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.

गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो. गडामध्ये पाण्याची सोय नाही. पूर्वी गडाबाहेरील विहीरीतून गडामध्ये पाणीपुरवठा केला जात असे.

लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड.

पूर्णगड पाहून आपण पुन्हा रत्नागिरीकडे अथवा पुढे राजापूर कडेही जावू शकतो.
मुंबई-पणजी महामार्गावर हातखंबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे. या धुरंधर सेनानायकाला नमन करून आपण पावसला येतो.

पावसच्या एस. टी. थांब्याजवळच स्वामी स्वरुपानंदाचे स्मृतीमंदिर आहे. अनेक भाषिकांचा ओघ येथे असतो. हे स्थळ पाहून येथील निसर्ग सौंदर्य न्याहाळत आपण पूर्णगडाकडे निघतो. येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.

गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे. येथे पायउतार होवून गावातील घरांच्या रांगांमधून चढणाऱ्या पायऱ्यांचा वाटेने २० मिनिटांमध्ये आपण किल्ल्याजवळ पोहोचतो.

किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे. या जुन्या मंदिराची सध्या गावकर्यांनी रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराजवळच पूर्णगडाचा दरवाजा आहे. शिवकालीन बांधकामाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे हा दरवाजा लपवलेला आहे. दरवाजावर गणेश तसेच चंद्र- सूर्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवडय़ा आहेत. येथेच दगडात कमळे कोरलेली पहायला मिळतात.

येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.

गडामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे अवशेष तसेच इतरही अवशेष पहायला मिळतात. लहानसा आयताकृती आकार असलेला पूर्णगड पहायला अर्धा तास पुरतो. गडामध्ये पाण्याची सोय नाही. पूर्वी गडाबाहेरील विहीरीतून गडामध्ये पाणीपुरवठा केला जात असे.

लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड.

पूर्णगड पाहून आपण पुन्हा रत्नागिरीकडे अथवा पुढे राजापूर कडेही जावू शकतो.

Wednesday, August 18, 2010

घोसाळगड

घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहे तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे.

मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिध्द असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मुंबई - पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही
आहे.

रोहे येथून मुरुड या सागरकिनार्‍यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक चणेरे - बिरवाडी कडून कुंडलिका नदीच्या किनार्‍याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडाकडून भालगाव मार्गे जातो. याच मार्गावर घोसाळगडाचा किल्ला आहे. चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांच्या मधे घोसाळगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो.

रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. साधारण तासाभरात आपण घोसाळगड गावात पोहोचतो. गडाच्या पायथ्याला घोसाळगड गाव आहे.

गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्‍यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यापुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरामधील गणेशमुर्ती स्वयंभु आहे. गणेशाला वंदन करुन चढाई सुरु करायची पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येऊन पोहोचतो.

कातळात कोरलेल्या पायर्‍या समोर दिसतात. यातील काही पायर्‍या तोफांच्या मार्‍यामुळे उध्वस्त झालेल्या आहेत. या पायर्‍यांवरुन वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायर्‍या लागतात. या पायर्‍या आपल्याला दरवाजापर्यंत घेऊन जातात. मात्र येथील प्रवेशव्दार पूर्णत: नष्ट झालेले आहे. त्याचे अवशेष येथे विखूरलेले आहेत. या अवशेषांमधे वाघांची चित्रे कोरलेले दगडही पहायला मिळतात. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे.

येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. एक माचीकडील तर दुसरा बालेकिल्ल्याकडील अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात. माचीच्या टोकावर पुर्वी एक तोफ पडलेली होती. माची पाहून आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करायचे बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात.

गडाच्या माथ्यावरुन तळागडाचे दर्शन मनाला सुखवून जाते. कुडे मांदाडच्या खाडीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते. शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पूर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्‍याच्या सिध्दीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळल्यावर सिध्दी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित आहे.

गडदर्शन करुन आल्यावाटेने उतरुन परतीचा मार्ग पकडता येईल. अथवा येथून चालत तीन तासांच्या पायपिटीनंतर बिरवाडीच्या किल्ल्याला जाता येते. बसने तळा किल्ला अथवा जंजिरा किल्ला ही गाठता येईल.

Tuesday, August 17, 2010

किल्ले पारगड

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रगड तालूका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो.
चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते.


चंदगडाहून निसर्गरम्य परिसरातून प्रवास करीत आपण तासाभरात पारगडाच्या पायर्यांशी पोहोचतो. तिनशे पायर्या चढून जाव्या लागतात. यात नव्याने केलेल्या पायर्यांबरोबर शिवकालीन पायर्याही आपल्याला आढळतात. गडाचा दरवाजा नष्ट झालेला आहे. गडप्रवेश करताच समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे मांडलेले दिसतात. बाजूलाच हनुमानाच्या मंदिराचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मंदिरासमोर अनामिक असे स्मारक आहे. हे घडीव दगडामध्ये बांधलेले स्मारक कोणातरी महत्वाच्या व्यक्तीचे असावे. येथून थोडे वर चढल्यावर पारगडावरील वस्ती लागते.

दुतर्फा असलेल्या वस्तीमधून रस्ता गेला आहे. या वस्तीमध्येच रस्त्याच्या डाव्या बाजूला शाळा आहे. शाळेच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पण पुर्णाकृती पुतळा चौथर्यावर बसविलेला आहे. या पुतळ्याच्या परिसरातच पुर्वी गडावरची सदर होती.


येथून समोरच आपल्याला भवानीमातेचे मंदिर दिसते. या मंदिराचा कायापालटच करण्यात आला आहे. शिवकालीन मंदिर तसेच ठेवून त्याभोवती नविन इमारत उभी करण्यात आली आहे. बांधलेले मंदिर भव्य असून नव्याने शिखर व सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरात भवानीमातेची देखणी मुर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात शिवकालातील अनेक प्रसंग चितारलेली चित्रे लावली आहेत.

सिहंगड किल्ला माघ वद्य नवमी इ.स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला. या वेळी झालेल्या युद्धात तानाजींना मृत्यु पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. बहुदा हे १६७६ साल असावे. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता.


त्यावेळी महाराजांनी किल्लेदार आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, जो पर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा. ही आज्ञा राजाज्ञा होती. गडावरच्या मावळ्यांनी आणि किल्लेदारांनी आजतागायत पारगड जागता ठेवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार आणि त्या काळातील मावळ्यांचे वंशज आजही अनंत अडचणींना तोंड देत गडावर वास्तव्य करुन आहेत.


इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला या मावळ्यांनी दाद लागू दिली नाही.
पारगड किल्ल्याच्या गडफेरीमध्ये आपल्या दृष्टीला निसर्गाची विविध रूपे, दिसतात. गडावर अनेक तलाव, विहीरी, तटबंदी, स्मारके पहाता येतात. गडावर पोहोचण्यासाठी असलेली सुविधा, निसर्गरम्य परिसर, ऐतिहासीक महत्व, ऐतिहासीक घराणी, जेवणाची व रहाण्याची सोय यामुळे पारगडाला पुन्हा यावेसे वाटले तर नवल नाही

Monday, August 16, 2010

किल्ले सिंदोळा

पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील किल्ले आणि लेणींसाठी समृध्द आहे. पुण्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड हडसर, निमगिरी, नारायणगड, जिवधन आणि सिंदोळा हे किल्ले आहेत.

सिंदोळा किल्ला जुन्नरच्या वायव्येला आहे. मढनेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोप्यात असलेला सिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे. अहमदनगर-कल्याण हा गाडीमार्ग माळशेज घाटामधून जातो. या गाडीमार्गावर मढ गावाच्या पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर खुबी फाटा आहे. या खुबी फाट्यावर जुन्नर कडूनही येता येते. खुबी फाट्यावर उतरुन येथून उत्तरेकडील हरिश्चंद्रगडाकडे जाणारी वाट आहे.

खुबी फाट्याच्या नैऋत्येला सिंदोळा किल्ला उढावलेला दिसतो. सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून पुर्वेकडे एक डोंगर धार गेलेली आहे. या डोंगर धारे मधे एक खिंड दिसते. या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे. अर्ध्या पाऊण तासात आपण या खिंडीमधे पोहोचतो. खिंडीतून पुढे न जाता डावीकडे डोंगरदांडावर चढणारी वाट पकडून डोंगर दांडावर यावे लागते. या दांडावर आल्यावर डावीकडे खोप्याच्या पलिकडे निमगिरीचा किल्ला दिसतो. समोर सिंदोळ्यामागे उधळ्या पर्वत दिसतो तर उत्तरेकडे टोलारखिंड आणि हरिश्चंद्रगड पसरलेला दिसतो. समोरच्या सिंदोळ्या दिशेने चढाई केल्यावर आपण माथ्याच्या खाली येवून पोहोचतो. आता माथ्याच्या वरुन आलेली मोठी घळही दिसते. ही घळ उजवीकडे ठेवून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण सिंदोळ्याच्या पश्चिम अंगाला येतो. पश्चिमेकडील घळीमधूनच गडावर जाणारा मार्ग आहे. वाटेमधे तुटलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांच्या मार्गाने चढताना उधळ्या डोंगर आपल्या पाठीमागे रहातो. दरवाजाचे नाममात्र अवशेष आणि तटबंदीचे थोडेसे अवशेष आपल्याला दिसतात.


गडाच्या माथ्यावर पाण्याची काही टाकी आहेत. पाणी बारामहीने टिकत नाही. एक उघड्यावरचे मंदिर आहे. एका खडकातील खड्डयामध्ये अनेक त्रिशुळ उभे केलेले दिसतात. गडाच्या माथ्यावरुन हडसर, चावंड, शिवनेरी तसेच माळशेज घाटाखालील प्रदेश न्याहाळता येतो. गडफेरी करण्यास अर्धातास पुरतो. पुन्हा आल्यावाटेने खाली उतरावे लागते. कड्यात कोरलेल्या गणेशाला नमन करुन आपण परतीच्या वाटेवर निघतो. सिंदोळा किल्ल्याचा परिसर निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. मात्र हे सौंदर्य पावसाळ्यानंतर शतपटीने वाढते. सिंदोळ्याची भ्रमंती म्हणजे एक दुर्लक्षीत किल्ला पाहिल्याचे समाधान देवून जाते हे निश्चित.

Sunday, August 15, 2010

किल्ले सलोटा

बेलाग सालोटा किल्ला

नाशिक जिल्ह्यातील सटाणे तालुक्यामध्ये असलेल्या साल्हेर किल्ल्याच्या शेजारीच सालोट्याचा किल्ला आहे. साल्हेर गडाचा सोबती आणि उपदुर्ग असलेला सालोटा किल्ला दुर्गम आणि बेलाग आहे. सालोटा किल्ल्याचा उल्लेख काही ठिकाणी सालुता असाही करतात.

साल्हेर किल्ल्याच्या भटकंती दरम्यान याही किल्ल्याला भेट देणे सोयीचे ठरते. सालोट्याला जाण्यासाठी सटाणे-तिळवण मार्गे महारजर या छोट्याशा वाडीजवळ पायउतार व्हावे लागते. अथवा सटाणे ताहराबाद-मुल्हेरमार्गे वाघांबे गाठून साल्हेर-सालोट्याच्या खिंडीमध्ये यावे लागते.


महारजर गावाकडून साल्हेर-सालोट्याच्या मधील खिंड दिसते. मधल्या नाळेच्या वाटेने या खिंडीपर्यंत पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. या मार्गावर पाणी नसल्याने पाणी तसेच खाण्याचे पदार्थ सोबत असणे गरजेचे ठरते.

खिंडीतून पश्चिमेकडे साल्हेर गडावर जाणारा धोपटमार्ग आहे. सरळ उत्तरेकडे जाणारी वाट वाघांबे गावाकडे जाते. सालोटा किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे किल्ल्याची वाट फारशी रुळलेली नसते. साल्हेर-सालोटा खिंडीमधून सालोटा किल्ल्याचा माथा डावीकडे ठेवून आपण पूर्वेकडे आडवे चालत निघतो. साधारण अर्धामाथा ओलांडल्यावर थांबून माथ्याचे निरीक्षण केल्यावर डावीकडे कातळामध्ये याचा दरवाजा दिसतो. दरवाजाच्या पुढे काही अंतरावरुन कातळात कोरलेल्या काही पायर्‍या दिसतात. याच मार्गाने आपल्याला गडावर चढायचे आहे. या पायर्‍यांच्या खालच्या भागातील पायर्‍या मातीने बुजतात तसेच तिथपर्यंत जाण्याचा मार्गही घसार्‍याचा असल्याने काळजीपूर्वक चढाई करावी लागते.

या पायर्‍यावरुन आपण कसरत करीतच कातळकड्यामध्ये पोहोचतो. आता कातळकडा उजवीकडे तर दरी डावीकडे राहते. समोरच दरवाजा दिसतो. बुलंदपणे उभा असलेला साल्हेर समोरुन खुणावत असतो. दारातून पुढे येवून आपण डावीकडे वळाल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. या दरवाजाच्या आतल्या बाजूला माळा केलेला आहे. आपल्या घरातील माळ्यासारखा हा माळा आहे. दरवाजाला माळा असणे अशी रचना दुर्मिळच आहे. या माळ्यावर दोन चार लोकांना मुक्कामही करता येइल. येथून दहा पंधरा मिनिटांमध्ये गडाचा माथा गाठता येतो. सालोट्यावर पाणी मुबलक आहे. कातळात तसेच कपारीत पाणी आहे.

गडाच्या माथ्यावर घरांची जोती पहायला मिळतात. सालोट्यावरुन आजुबाजूचा मोठा परिसर पहायला मिळतो. गुजराथमधील डांगचा परिसरही दिसतो. डांगमधील पिंडवलचा किल्ला तसेच विलासन हिलवरील छत्रीही स्वच्छ वातावरणामध्ये पहायला मिळते. अर्थात साल्हेरचे रौद्ररुप मात्र मनाचा ठाव गाठते यात शंका नाही.

Friday, August 13, 2010

घोसाळगड

घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहे तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे.

मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेले आहे. शिवकालापासून प्रसिध्द असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. मुंबई - पणजी महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या रोहे येथे जाण्यासाठी महामार्गावरील नागोठेणे तसेच कोलाड येथून फाटे आहेत. तसेच रोहे हे कोकण रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानकही आहे.

रोहे येथून मुरुड या सागरकिनार्‍यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक चणेरे - बिरवाडी कडून कुंडलिका नदीच्या किनार्‍याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडाकडून भालगाव मार्गे जातो. याच मार्गावर घोसाळगडाचा किल्ला आहे. चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांच्या मधे घोसाळगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो.


रोहे एस.टी. स्थानकावरून घोसाळगडाला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. साधारण तासाभरात आपण घोसाळगड गावात पोहोचतो. गडाच्या पायथ्याला घोसाळगड गाव आहे.



गावातूनच गडावर जाणारा रस्ता आहे. रस्ता संपल्यावर पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्‍यांच्या मार्गावर भवानी मातेचे मंदिर असून त्यापुढे गणपतीचे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरामधील गणेशमुर्ती स्वयंभु आहे. गणेशाला वंदन करुन चढाई सुरु करायची पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीजवळ येऊन पोहोचतो.

कातळात कोरलेल्या पायर्‍या समोर दिसतात. यातील काही पायर्‍या तोफांच्या मार्‍यामुळे उध्वस्त झालेल्या आहेत. या पायर्‍यांवरुन वर पोहोचल्यावर मधेच काही चांगल्या पायर्‍या लागतात. या पायर्‍या आपल्याला दरवाजापर्यंत घेऊन जातात. मात्र येथील प्रवेशव्दार पूर्णत: नष्ट झालेले आहे. त्याचे अवशेष येथे विखूरलेले आहेत. या अवशेषांमधे वाघांची चित्रे कोरलेले दगडही पहायला मिळतात. येथून थोडे वर दारूगोळ्याचे कोठार म्हणून जागा आहे.

येथून पुढे गेल्यावर गडाचे दोन भाग पडतात. एक माचीकडील तर दुसरा बालेकिल्ल्याकडील अरुंद असलेल्या डोंगर सोंडेवर तटबंदी बांधून ही माची तयार केलेली आहे. तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍या आहेत. या तटबंदीमधे त्याकाळातील शौचकूप पहायला मिळतात. माचीच्या टोकावर पुर्वी एक तोफ पडलेली होती. माची पाहून आपण बालेकिल्ल्याकडे प्रस्थान करायचे बालेकिल्ल्याच्या उंचवटय़ावर पाण्याच्या कोरीव टाक्या, घरांचे अवशेष, माथ्यावर किल्लेदाराचा वाडा असल्याच्या खुणा आढळतात.

गडाच्या माथ्यावरुन तळागडाचे दर्शन मनाला सुखवून जाते. कुडे मांदाडच्या खाडीचे दृष्य आपल्याला खिळवून ठेवते. शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पूर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर्‍याच्या सिध्दीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळल्यावर सिध्दी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोगलांना दिला नाही. तो आपल्याकडेच राखला. असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित आहे.

गडदर्शन करुन आल्यावाटेने उतरुन परतीचा मार्ग पकडता येईल. अथवा येथून चालत तीन तासांच्या पायपिटीनंतर बिरवाडीच्या किल्ल्याला जाता येते. बसने तळा किल्ला अथवा जंजिरा किल्ला ही गाठता येईल.

Thursday, August 12, 2010

बाप

बापावर एक कविता लिहतो
माझ्या मनात विचार आला
माझाच बाप नजरेसमोर
कधी नव्हे तो मी धरला
माझा बापच नेहमी मला
माझा कट्टर शत्रु वाटला
म्हणून त्याच्या स्तुतीत एकही
शब्द कधी सहज नाही लिहला
माझा बापच इतरांच्याही
बापांचाही एक आदर्श ठरला
बाप असावा तसाच माझा
बाप नजरेत माझ्या झाला
बाप फक्त बाप सदाच असतो
म्हणून आपण कमी लेखला
आई पुढेच महानतेला
त्याच्या आपण कमी तोलला
बापच सदैव उपेक्षित तो
साहित्यातही कसा राहिला
झालेळ्यांना बाप कदाचित
बापच अजुन नाही कळला
कवी
निलेश बामणे

Wednesday, August 11, 2010

राख माझ्या प्रेताची .......

तुला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले होते...
तू नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...

झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...

आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...

राख़ अजूनही गरम होती
'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...
अश्रु दोन गालुन
मागच्या मागे वलुन गेले ....

मग... भल्या पहाटे
कुणीतरी तिच्या स्पर्शासम उब देत होत्तं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं...

आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ...

नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी ...

नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...


अर्चित...

Tuesday, August 10, 2010

प्रेमभंग

होता गुलाब हाती
तुजलाच द्यावयाला
पण हात मात्र माझा
रक्तात माखलेला


काटाच ना फुलाचा
मजला दुखवून गेला
तुजलाच पारखा मी
दुनियेत दुर्लक्षिलेला


होती मनात आशा
उरल्या उण्या सुखांची
वारा तुझ्या स्म्रुतींचा
तिजला उधळून गेला


फुलबाग तुझ्या स्मरणांची
मनी माझ्या जपली होती
अश्रूंचा सागर माझ्या
फुलबागही बुडवून गेला


जरी उरलो होतो आता
बघण्या तव सुखयात्रा
तरी वणवा तव दुःखाचा
मजलापण जाळून गेला


झालीच ना कधीही
ईच्छा पुरी मनाची
परी अंतही माझा मजला
निमिषातच फसवून गेला


----------प्राजक्ता कुलकर्णी

Monday, August 9, 2010

नजर

माझ्याकडे वळलेली तुझी एकाच नजर
माझ ह्दय चोरुन गेली
कधीही भ्रमित न होणारी माझी
बुध्दी भ्रमित करुन गेली
तू माझी नसतानाही माझी आहेस
अशी जाणीव करुन गेली
मनात नसतानाही माझ्या कवितेची सहज
प्रेरणा ती होऊन गेली
माझ्यात कोठेतरी दडलेल्या माझ्याच ती
प्रतिभेला जन्म देऊन गेली
कवी
निलेश बामणे

Sunday, August 8, 2010

का सुचत नाही काही .

का सुचत नाही काही
काय करावे ना कळेना
का अवस्था आज मनीची
काय व्यथा ना समजेना

का लिहिण्या येथ बसलो
काय शब्द तो आठवेना
का खरडतो लेखणी उगीच
काय अक्षर ना उमटेना

का ऐकतो एकटवून जीव
काय सूर तो सापडेना
का धरावा ताल येथे
काय स्वर ना फुटेना

का घुटमळतो आणि फिरतो
काय भिंतीत मन रमेना
का विणतो पाश मोहाचे
काय गुंतलो ना सोडवेना

का निघालो एकटाच उगीच
काय सोडले मागे स्मरेना
का उरलो रिता इथे
काय कमावले ना मोजवेना

का दमलो आणि थांबलो
काय अंतर कमी होईना
का चालायचे निरर्थक असेच
काय वाट ना संपेना

का संपल्या इच्छा मनातल्या
काय विरक्ती हि सोसवेना
का न राहिले हेतू जगण्याचे
काय जोडली नाळ तुटेना

..... रुपेश सावंत

Saturday, August 7, 2010

म्हणजे सगळं संपलं असं का?

PART II

नाही, आता आयुष्य सुरु झालं...
गेलेल्या त्या पाउलाणा परत आणण्यासाठी ...
गहाण ठेवलेलं नाव परत मिळविण्यासाठी...

जिद्द असू दे तुझ्या जीवनात
मोडलेलं बाबाचं आयुष्य ,
पुन्हा नव्यानं जोडण्यासाठी...

मोठं तर जीवनात तुला खूप व्हायचंय
पण लक्षात असू दे
बाबांच्या अगांच पडलेलं पाणी,
आणायला तुला खूप दूर जायचंय...

आई-बाबासारखे देव घरात असताना,
कुठलं रे बाहेर मंदिर तू शोधतोय...
आदरपूर्व त्यांना नमस्कार कर,
बघ,
तुझं स्वप्न कसं तुझ्या पायात येऊन पडतं.....

- मयुर वाकचौरे

Friday, August 6, 2010

म्हणजे सगळं संपलं असं का?

PART I

आई-बाबांनी शाळेच्या गेटपरियंत सोडून...
पाठमोऱ्या तुझ्याकडे बघून,
छोटसं एक स्वप्न पाहिलं.
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझ्या शाळेच्या फी-साठी
बाबांनी अगाचं पाणी-पाणी केलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी
स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातानेच मोडलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझ्या नको त्या हट्टा-पायी
स्वतःचं नाव सुद्धा गहाण टाकलं ...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझा सुखी संसार जोडून
त्यांनी मात्र ,
त्यांच्याच घरातून पाऊल बाहेर काढलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

Thursday, August 5, 2010

याच्या कवितेची दादा Speed लई भारी,

याच्या कवितेची दादा Speed लई भारी,
वाचक शोधायची याची Idea सुद्धा न्यारी.
Friend List पहा भली मोठी आहे,
मिसिसिपी नावाची ती मैत्रीण खोटी आहे.
पुन्हा पुन्हा Scrap Book मध्ये Link फेकतो आहे ,
थांबवा हो .... कवी चुकतो आहे ....!

याची कविता खाली तर त्याची कविता वर,
चाले नुसती रस्सीखेच Reply च्या नावावर.
याच्या प्रत्येक Game चा Fanda नवा आहे,
याला Reply च्या बदल्यात Reply हवा आहे.
पहा आज पुन्हा तो कवित्व विकतो आहे ,
आवरारे दादानो .... कवी चुकतो आहे ....!

आपली प्रत्येक कविता वाचावी हा याचा घाट असतो,
पण प्रत्येक जाणकार वाचक म्हणजे निव्वळ भाट नसतो.
याच्या प्रेम कवितेला मध्येच भरती येते,
तेंव्हा जुनीच कविता पुन्हा वरती येते.
शिळीच कधी वाढून हा तुम्हास ठकतो आहे,
सावरा ताईनो .... कवी (दादा) चुकतो आहे ...

किल्ले बल्लारपूर

चंद्रपूर हा विदर्भामधील एक जिल्हा आहे. पूर्वी चांदा म्हणूनही हा जिल्हा ओळखला जात असे. वर्धा नावाची नदी या जिल्ह्यामध्ये साधारण उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. चंद्रपूरच्या दक्षिणेकडे बल्लारपूर स्टेशन आहे. तसेच बल्लारपूर गाडीमार्गानेही उत्तमपैकी जोडले गेले आहे.

चंद्रपूरकडून राजूरा अथवा अलापल्लीकडे जाणारा गाडीरस्ता बल्लारपूरमधून जातो. वर्धा नदीच्या काठावर वसलेले बल्लारपूर शहर कोळसा खाणीमुळेही प्रसिद्ध आहे. इतिहास प्रसिद्ध असलेल्या बल्लारपूर मधे वर्धा नदीच्या काठावर भुईकोट प्रकारचा किल्ला आहे.


शहरामधील वस्तीच्या एका बाजुला असलेला किल्ला मुख्य रस्त्यापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याचे प्रवेश पूर्व दिशेला आहे. प्रवेशद्वारापासून जवळच केशवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेली पण मूळ शिशाची असलेली केशवनाथाची मुर्ती होती. इ. स. १८१८ च्या वेळी झालेल्या युद्धाच्या धामधुमीमध्ये ही मुर्ती चोरीला गेली. तेव्हा भोसल्यांनी तेथे नेमलेल्या कमाविसदार पुंजपाटील मोरे यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करुन नवीन दगडी मुर्ती बसवली.

बल्लारपूर किल्ल्याच्या पहिल्या दारातून आत शिरल्यावर दुसरा दरवाजा लागतो. या दरवाजावर कमळ तसेच सिंहांची शिल्पे आहेत. या दरवाजामधून आत गेल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या मार्गाने दरवाजाच्या वरही जाता येते. येथील तटबंदीचे बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे.

साधारण चौकोनी आकाराच्या या किल्ल्यामधील मुख्य वाड्याची वास्तू इंग्रजांनी पाडून टाकली असल्यामुळे हा भाग मातीच्या ढिगार्‍यामधे लुप्त झाला होता. तोही सध्या साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. या ढिगार्‍यामधे काही तळघरे दिसतात. तसेच नदीकाठाकडील बांधकाम सुस्थितीमधे असून नदीकडे जाणार्‍या दरवाजात पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्‍यांनी नदीच्या पात्रापर्यंत जाता येते. या बाजुने तटबंदीची भक्कम बांधणी पहायला मिळते.

बल्लारपूरच्या किल्ल्याला तीन बाजुंना प्रवेश मार्ग आहेत. किल्ल्यामध्ये राजवाड्याचे अवशेष, तळघरे, भुयारे, तसेच निरीक्षणासाठी सज्जा अशा वास्तू पहायला मिळतात.

बल्लारपूरचा किल्ला आदिया उर्फ अंड्या बल्लाळसिंह या गौड राजाने बांधला. त्याने शिरपूरवरुन आपली राजधानी बल्लारपूर येथे आणल्याचा इतिहास आहे.


माता ज्याची थोर जिजाऊ



माता ज्याची थोर जिजाऊ
शहाजी ज्याचे पिता
तो लढला ज्यासाठी जन्मभरती
होती ती मराठी अस्मिता ||
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी
तो संतापून पेटून उठला
जो किल्ला त्याने चढला
तेथे भगवा नेहमीच फडफडला ||
तरुणांच्या हाती देऊनी समशेर
घडविला त्याने मावळा
स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी
सोसल्या लाखो कळा ||
धोक्यात आहे आज पुन्हा मराठी
काढूनी टाका सुरांतून नाराजी
उठा अन् शोधा स्वता:तच
तोच मावळा अन् तोच शिवाजी ||

तीर्थक्षेत्र -अक्कलकोट

सोलापूर जिल्ह्यात हे लहानसे गाव आहे. सोलापूरपासून ४५ कि. मी. अंतरावर हे स्थान असून श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले ते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

अक्कलकोट हे पूर्वी संस्थान होते व ते राजधानीचे नगर होते. येथील राजे मालोजीराजे भोसले श्री स्वामी समर्थांचे अनन्य भक्त होते. अक्कलकोटच्या परिसरात श्री स्वामी समर्थांनी अनंत चमत्कार केले. विदेही अवस्था व संपूर्णतया मुक्त संचार यामुळे श्री स्वामी समर्थांच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारची गूढता असे. असे असूनही हजारो भक्त त्यांच्या दर्शनार्थ अक्कलकोटला गर्दी करीत असत.

अक्कलकोटला येण्यांपूर्वी श्री स्वामी समर्थांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केलेली असल्यामुळे त्यांचा जन्म आणि पूर्वायुष्याबद्दल अनेक तर्क आहेत.

इ.स. १८७८ मध्ये त्यांनी अक्कलकोट येथेच समाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय ५०० वर्षाहूनही अधिक होते असं मानलं जातं.
नंतरच्या काळात सिद्धपुरूष म्हणून परिचित असलेले श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यामुळेही अक्कलकोट हे भाविकांचं श्रद्धास्थान झालं आहे. अलिकडेच श्रीगजानन महाराजांनी समाधी घेतली. अक्कलकोट हे या दोन तपस्वी पुरूषांच्या वास्तव्याने पुनीत झालेले शहर आहे.

अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे नाथ पंथीय घोर तप करणारे स्वामी. त्यांनी वेगवेगळे जन्म घेतले आणि ते समाधी घेऊन आजही वेगळ्या रूपात आहेत, असे भाविक मानतात. समाधी स्थळ, शिवपुरी आश्रम ही येथील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. शिवपुरी आश्रमात सातत्याने अग्नी तेवत ठेवण्याचे शास्त्र - अग्निहोत्र- जतन केले आहे.

Wednesday, August 4, 2010

घरापासून दूर ........

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस

आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे
7/6/09

Tuesday, August 3, 2010

प्रेम करतो तुझ्यावर.

प्रेम करतो तुझ्यावर...
तू पण माझ्यावर करशील ना...?

मी विचारलेल्या प्रश्नाचं....
होकारात उत्तर देशील ना...?

स्वप्न पूर्ण करताना..
हात तुझा देशील ना...?

नको करूस प्रेम....
मैत्री तरी करशील ना...?

मैत्री नुसती करू नकोस...
शेवट पर्यंत निभावशील ना...?

मैत्री कधी तोडू नकोस..
ह्या वेड्याचा जिव जाईल ना...!!

मैत्री तोडल्यावर..
मला विसरणार तर नाहीस ना...?

कधी चुकून भेटलो तर....
नुसती ओळख तरी देशील ना..?

मी मेल्यानंतर....
दोन थेम्ब अश्रु तरी काढशील ना...?

Monday, August 2, 2010

तुला काय वाटल...................

तुला काय वाटल....................
तुला काय वाटल,
मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,
तसा काय मी रागावू शकत नाही!!

तुझ्या आठवणीत डोळे माझे
नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,
तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,
पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस,
तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!

तू नेहमीच बरोबर होतीस,
माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,
एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!

लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,
तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप miss करतो!!

आज माझ्या सोबत नाहीस

आज माझ्या सोबत नाहीस
मला खुप दुःख होतय
तुझ्या दूर जाण्यान मला
खुप भरून येतय
प्रतेक वेळी तू माझ्या
सोबत असायचीस
कधीच मला सोडून
दूर नाही रहाय चीस
तू सोबत असल्यावर
मला खुप लोक.. पहायची
तुज्या सौंदर्याची स्तुती
आई, नेहमी सर्वांसमोर करायची
अहो माझी ताई तर एकदा
कॉलेज मधे घेउन गेली
आणि सग्ल्याना माझ्या दादाची
चोइस आहे सांगुन आली
सगल्या कॉलेज मधे
तिची खुप स्तुती होत होती
तिचा डोळा चुकउन
मी सगली गम्मत टिपली होती
मला तिचा खुप अभिमान
वाटायचा
तिचा सहवास मला खुप
हवा हवा सा वाटायचा
आज .....
अचानकच ती गायब झाली होती
माझी भर पावसात खुप दैना झाली होती
सगल डोक आणि अंग भिजतय
माझी आई खुप रागवतेय
कृपया माझी छत्री आणून दया ना
नाहीतर तुम्हाला पाप लागेल
विनोद शिंदे ९८३३००३०५९
vinodashinde@yahoo.co.in
date - 29/7/2010