Wednesday, November 10, 2010

अनेक पाऊलं चालत गेलो..

अनेक पाऊलं चालत गेलो..
धुक धुकं सारं धुसर होते
मनातली कोडी सोडवत बसलो...
पुढे वळण वाढतच होते

आज मला आठवतात
ते सारे मार्ग मी चालून गेलो....
तू सोडून गेलीस अन "मी" हरवलो...
अश्याच येत्या प्रत्येक वळणांवर
त्या आठवणी अशाच साठवतात..

दिवस तास मिनीटे सेकंद
चालत जातात चालत जातात
उंच सरळ रूंद अरूंद
आयुष्यात वळणं येतच राहतात

अनेक माणसं भेटत आली...
अनेक माणसं सोडून गेली..
एकच गोष्ट सारखी होती...
मी...मीच.. अन मीच.........
त्या वळणाच्या वाटेवर

.- शशांक नवलकर

No comments:

Post a Comment