Friday, December 10, 2010

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस
आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे.

Wednesday, November 10, 2010

असे मित्र असावेत ......

1) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे
आयुष्याचं सोनं होतं.
2) आयुष्यात
भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
3)दु:ख कवटाळत बसू नका; ते
विसरा आणि सदैव हसत रहा.
4) आयुष्यात
काही करून दाखवायचे असेल तर आपण काय
आहोत ? यापेक्षा आपण काय होऊ
शकतोयाचा विचार करायला हवा, जगात
अशक्य काहीच नसतं.
5)मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत
नाही , हे जितकं खरं तितकेच
त्या प्रगतिचामार्ग दाखवीत नाही, हे
ही खरं.
6) गंजण्यापेक्षा झिजणे
केव्हाही चांगले !यशाजवळ
पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट
नसतो .
7) आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त
एक टक्का आणि परिश्रमाचा भाग
नव्याण्णव टक्के असतो .
8) आपण
वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू.
आपला पतंग मात्र निश्चितच
नियंत्रितकरु शकतो
.9)तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ
कराल तर त्यातून तुम्हालापरमेश्वर
दिसेल .
10) थोरांचे सदगुण घेणे हीच
त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
11) थोर काय अगर सामान्य काय !
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज
ही असतेच .
12) दुर्बल व्यक्ती एखादे
उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु
लागते तेव्हा धाडस वसाहस हे गुण
तिच्यात आपोआप येतात .
13) दु:ख
विभागल्याने कमी होते आणि सुख
विभागल्याने वाढते .


असे मित्र असावेत ......

अनेक पाऊलं चालत गेलो..

अनेक पाऊलं चालत गेलो..
धुक धुकं सारं धुसर होते
मनातली कोडी सोडवत बसलो...
पुढे वळण वाढतच होते

आज मला आठवतात
ते सारे मार्ग मी चालून गेलो....
तू सोडून गेलीस अन "मी" हरवलो...
अश्याच येत्या प्रत्येक वळणांवर
त्या आठवणी अशाच साठवतात..

दिवस तास मिनीटे सेकंद
चालत जातात चालत जातात
उंच सरळ रूंद अरूंद
आयुष्यात वळणं येतच राहतात

अनेक माणसं भेटत आली...
अनेक माणसं सोडून गेली..
एकच गोष्ट सारखी होती...
मी...मीच.. अन मीच.........
त्या वळणाच्या वाटेवर

.- शशांक नवलकर

Saturday, October 2, 2010

किल्ले भोरगिरी

पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.

राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भिमा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले राजगुरूनगर आजूबाजूच्या महत्वाच्या गावांशी गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडले गेले आहे.

शिवकालामध्ये मोगलांची सरहद भिमा नदीपर्यंत भिडलेली होती. भिमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भिमा नदीच्या खोर्‍यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.

भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे. भोरगिरीला जाण्यासाठी राजगुरूनगर वरून एस.टी. बसेसची सोय आहे.

राजगुरूनगर-भोरगिरी हे साधारण अंतराला दीड एक तास लागतो. या भिमानदीच्या खोर्‍यात चास-कमानचे धरण आहे. या धरणा जवळूनच भोरगिरीचा मार्ग जातो. या खोर्‍यात आपण जसे जसे आत जातो तसा तसा निसर्ग बदलत जातो. पावसाळ्यानंतरच्या कालावधीत खळाळणारे ओढे आणि धबधबे म्हणजे नेत्रसुखाला पर्वणीच असते.




भोरगिरी गावात पायउतार झाल्यावर प्रथम परतीच्या बसची चौकशी करून घ्यावी. भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंच असला तरी पायथ्यापासून जेमतेम दिडशे मी. उंच आहे. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. डोंगर डावीकडे ठेवून वळसा मारून गडाची वाट जाते. या वाटेने गडावर जाता येते.

गडावर गडपणाचे अवशेष तुरळक आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. मात्र येथून खाली असलेल्या कोरीव गुहेकडे उतरण्यास वाट नाही. माथ्यावरून थोडे खाली उतरून आडवे चालत आल्यावर या कोरीव गुहेपाशी पोहोचता येते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला तासाभराचा अवधी पुरेसा आहे.

आल्यावाटेने उतरून भोरगिरी गावाजवळ असलेले भिमेचे पात्र गाठावे. या काठावर कोटीश्वराचे मंदिर आहे. मंदिर प्राचीन असल्याचे तेथील अवशेषांवरून दिसते. हा परिसर अतिशय रम्य आहे. येथून राजगुरूनगरला परतता येईल. अथवा दोन तास चालत गेल्यास भिमाशंकरचे मंदिरही पहाता येईल. भिमाशंकर वरूनही घोडेगाव मंचर मार्गे पुन्हा राजगुरूनगरला येता येते.

Friday, October 1, 2010

किल्ले कनकदुर्ग-गोवागड

हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्‍यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड हे होय.

हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनार्‍यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.

हर्णेच्या किनार्‍यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भुशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भुशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पुर्व बाजुला मच्छिमारांच्या असंख्य नौका दिसतात. या नौकांमधे जाण्यासाठी कनकदुर्गाला लागुनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता केलेला आहे. या रस्त्यावर चालत गेल्यावर कनकदुर्गाच्यावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्‍यांच्या बाजुलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज म्हणजे कनकदुर्ग... हा पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायर्‍यांच्या मार्गाने आपण पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचतो. गडाच्य माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्याअसून त्याभागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची मधुन मधुन चमचमनारी किनार आणि सागराची गाज आपल्या मनाला धडकी भरवत रहाते. या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडै फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपली गडफेरी १५ ते २० मिनिटांमधे आवरते.




कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग असल्याची मनाची समजूत घालून पुढे निघावे लागते. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहे.

फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्यदरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करुन आहे. हे भव्य प्रवेशव्दार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामधे किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामधे प्रवेश करावा लागतो. सध्या कोणा हॉटेल व्यवसायीकाने गडाचा ताबा घेतला आहे. त्याने दारावर चौकीही उभारली आहे. तेथील रखवालदाराची परवानगी घेवून किल्ल्यामधे जाता येते. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करुन त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमबाजुला सुवर्णदुर्गाचे दृष्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थमधे आहेत. त्यामधील एकात पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामधे महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नसल्यामुळे गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.

जर आपण संध्याकाळच्या वेळेस येथे असू तर कनकदुर्गच्या किनार्‍यावरील मासळी बाजार अवश्य पहाण्याजोगा आहे. अर्थात खवय्यासाठीतर ही सुवर्णसंधीच होय.

Thursday, September 30, 2010

पोलीस : काय हो, तुम्हाला धडक देणार्‍या त्या कारचा नंबर बघितला का किंवा तुम्ही कार मधल्या कोणाला बघितल का ?

नाही, पण मला खात्री आहे कार चालवणारी माझी सासू होती.

पोलीस : तुम्हाला असं का वाटतय ?

मी माझ्या सासूच्या हसण्याचा आवाज चांगला ओळखतो

Wednesday, September 29, 2010

एका खानावळीवर पाटी होती खानावळ "घरची आठवण "

एक दिवशी मेम्बर ओरडला " मालक. भात कच्चा व पोळी करपलेली आहे
मालक म्हणाला उगीच नाही नाव घरची आठवण ठेवले


Tuesday, September 28, 2010

राघुरावांकडचा नळ अचानक गळायला लागला.

त्यांनी प्लंबरला फोन करून लगेच यायला सांगीतले त्यावेळेस सकाळचे ११ वाजले होते.

प्लंबर यायला दुपारचे ५ वाजले. त्याच्याकडे राघुराव फारच वैतागुन बघत होते.

प्लंबर म्हणाला,"काय झाले."

"काही नाही. घरात पाणी साठले आहे, तुझी वाट बघता बघता मी पोहणे शिकून घेतले.", राघुराव म्हणाले.

Monday, September 27, 2010

सांता एके दिवशी सुट्टी बघून आपल्या कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळायला घराच्या अंगणात बसला.

त्याच्या मित्राने समोरुन जाताना सांता कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळत असल्याचे बघितले व तो त्यांचा डाव बघायला तेथे थांबला.

"सांता, माझ्या पहाण्यातला हा सर्वात हुशार कुत्रा आहे.", मित्र म्हणाला.

सांता, " नाही रे, पाच डांवां मधले तो फक्त दोनच डाव जिंकलाय."

Sunday, September 26, 2010

रजनीकांत जेव्हा पुश-अप्स काढतो...


तेव्हा तो स्वत:ला वर ढकलत नाही.... जमिनीला खाली ढकलतो!!!

Saturday, September 25, 2010

झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?

पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

झंप्या : म्हणजे?

पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.

पंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

Friday, September 24, 2010

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!

चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...

कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..

बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!
एक गृहस्थ आपल्या ४ वर्षाच्या मुलाला डॉक्टर कड़े घेउन गेला
गृहस्थ - डॉक्टर, माझ्या मुलाने चावी गिळली हो ...
डॉक्टर - त्याने चावी गिळून किती वेळ झाला?
गृहस्थ - दहा दिवस झाले असतील.
डॉक्टर - काय ? ... दहा दिवस ... इतक्या दिवसानी तुम्ही त्याला माझ्याकडे आणताय ?
गृहस्थ - इतके दिवस आमच्याकडे duplicate चावी होतीना ... पण ती आजच हरवली बघा.

Thursday, September 23, 2010

एक बाई देवाघरी गेल्या.
घरुन अंत्ययात्रा सुरु झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणार्‍या एकाला ठेच लागली व तो पडला तसेच इतर तिघांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली.
तिरडी खाली पडताच बाई उठुन बसल्या व चांगल्या दहा वर्षे जगल्या. दहा वर्षांनी परत बाईंची अंत्ययात्रा सुरु झाली.

थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणार्‍यांना सांगू लागला," बघुन चाला हं. बघा नाहीतर मागल्या सारखी कोणाला परत ठेच लागेल."

Wednesday, September 22, 2010

एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?
तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.
मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"
अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."
प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."
मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.



गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !

Tuesday, September 21, 2010

शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?



बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.

Monday, September 20, 2010

बांता सांताला : तुझा खोकला कसा आहे ?

सांता : खोकला थांबला पण अजुनही श्वास घेताना त्रास होत आहे.

बांता : काळजी नको करु, एक दिवस श्वासही थांबेल.

Saturday, September 18, 2010

भारतातील गणेश मंदिरे

गणेशोत्सव महाराष्ट्रात प्रामुख्याने साजरा होत असला तरी गणेशाची देशभरातही अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. त्या सर्वांची माहिती देणे अशक्य आहे. अनेक जैन, बौद्ध मंदिरात गणपतीची मूर्ती स्थापन केली आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या मंदिराची ही माहिती.

लुप्त गणपती क्षेत्रे
मंगळाने कठोर तपस्या करण्याच्या उद्देशाने नर्मदा किनारी एका ठिकाणी गणेशाची स्थापना केली होती. शास्त्रांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख 'पारीनेर' या नावाने केला आहे परंतु हे ठिकाण कोठे ते नेमके माहित नाही.

'बल्लाळ विनायक' या नावाने एका क्षेत्राचा उल्लेख शास्त्रात आहे. हे क्षेत्र सिंधुदेशात कोठे तरी एका ठिकाणी आहे. परंतु संपूर्ण माहिती हाती नाही.

महर्षी कश्यप यांनी आपल्या आश्रमात वक्रतुंडाची प्रतिमा स्थापन करून तप केले होते. पण हा आश्रम कोणत्या ठिकाणी आहे त्याची माहिती उपलब्ध नाही.

तेलंगणातील अनल असुराचा वध करण्यासाठी गणपतीने अवतार घेतला होता. याचा उल्लेख जरी मिळत असला तरी त्या ठिकाणाची माहिती मिळत नाही.

दक्षिण भारतातील गणेश मंदिरे

मदुराई जिल्ह्यातील तिरूप्परंकुम पर्वताच्या कुशी‍त भव्य गणेश मंदिर आहे. या ठिकाणी स्वामी कार्तिकेय यांचा विवाह झाला असल्याची दंतकथा आहे. अगदी जवळच 'शर श्रवण' नावाचा प्राचीन तलाव आहे.

बारा ज्योर्तिलिंग व चार धामांपैकी रामेश्वरम् द्वादश हे एक धाम असून येथे श्रीरामाने प्रथमत: गणपती आणि नंतर रामेश्वर लिंगाची पूजा केली होती.

तिरूच्चिरापल्ली येथील ‍तीन शिखरांमधील सर्वांत उंच शिखरावर गणपतीचे अतिप्राचीन मंदिर असून हे मंदिर 'उचिपिल्लेयार' या नावाने प्रसिद्ध आहे.

पॉंडेचरीच्या समुद्रकिनारी परदेशी लोकांनी बनविलेले एक मंदिर आहे.

कन्याकुमारी येथे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हे ज्या ठिकाणी एकत्र मिळतात तेथे गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराचे दर्शन केल्यावरच कुमारिकादेवीचे दर्शन घेतले जाते.

गोकर्णात सिद्ध गणपतीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर रावणाने आघात केल्याचे चिन्ह आहे.

श्वेत विघ्नेश्वर क्षेत्र
अमृत मंथनाच्यावेळी देवांना अमृत मिळाले नाही. तेव्हा देवांनी भगवान विघ्नेश्वराची आराधना केली. त्याचा वर मिळाल्यावर देवांना अमरत्व मिळाले. दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिर्थस्थान आहे. ते कावेरी किनारी आहे.

उत्तर भारतातील गणेश मंदिरे
उज्जैनमध्ये प्रसिद्ध ज्योर्तिलिंग महाकालेश्वराचे मंदिर आहे. तसेच सहा प्राचीन विनायक मंदिरे आहेत.
१. प्रमोद विनायक २. मोद विनायक ३. दुर्मख विनायक ४. सुमुख विनायक ५. अविघ्न विनायक ६. विघ्न विनायक.

श्री लक्ष्मणाने स्थापन केलेले गणेश तीर्थही उज्जैनमध्ये आहे. अमरकंटकच्या महर्षी भृगुच्या आश्रमात सिद्धी विनायक गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे गणपतीला दोन भुजा आहेत.

जोधपूर येथील मुख्य शहराजवळील घटियाला गावात राजस्थानी शैलीचा स्तंभ आहे. या स्तभांच्या चारही बाजूने गणेशाची प्रतिमा आहे. हा स्तभ इ.स. ८८२ साली बांधलेला असल्याचे लिहिले आहे.

रणथंबोर येथील राजस्थानच्या सवाई माधोपूर जवळ असलेल्या पर्वत रांगेच्या मध्यभागी अतिप्राचीन गणेश मंदिर आहे. या मंदिरात स्थापित गणेशाला लग्नसमारंभाप्रसंगी आणि शुभ कार्यासाठी प्रथमत: निमंत्रण दिले जाते. दरवर्षी येथे हजारो लग्नपत्रिका प्राप्त होतात.

वृदांवन येथे मोठ्या गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

वाराणसी येथे वाराणसीमध्ये गणपतीची अनेक मंदिरे आहेत. ढूंढीराज गणपतीचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. याशिवाय काशीतील ५६ गणपती मंदिराचा उल्लेख पुराणात मिळतो.

महाराष्ट्रातील गणेश मंदिरे
कदंबपुर येथे इंद्राने महर्षी गौतमाच्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी येथे चिंतामणी गणेशाची स्थापना करून त्यांची आराधना केली होती. हे ठिकाण यवतमाळ जिल्ह्याजवळ आहे.

भालचंद्र गणेश क्षेत्र हे चंद्राने या ठिकाणी गणपतीची आराधना केली होती. हे ठिकाण परभणीपासून ५० किलोमीटर गोदावरी नदी किनारी आहे.

चिंतामणी गणेश क्षेत्र हे ब्रम्हदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले तेव्हा त्यामध्ये अनेक विघ्न आले. हे विघ्न दूर करण्यासाठी ब्रम्हाने गणेशाची स्थापना करून त्याचे स्तवन केले. हे मंदिर पुण्यापासून २४ किलोमीटर 'थेऊर' येथे आहे.

मणिपूर क्षेत्र हे त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शंकराने महागणपतीची आराधना केली होती. हे ठिकाण पुण्यापासून ५० किलोमीटर आहे. या ठिकाणाला 'महोत्कट' गणेशाच्या नावाने ओळखले जाते.

अमलाश्रम क्षेत्र हे यमराजाने आपल्या आईच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी श्रीगणेशाची स्थापना करून कठोर तपस्या केली होती. ही मूर्ती 'आशापूरक-गणेश' या नावाने प्रसिद्ध आहे. हे ठिकाण जालन्यापासून ३५ किलोमीटर आहे.

कवीमनातील गणेशाचे रूप

मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङमयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथात गणपतीचा असा उल्लेख येतो -


“तेया गणरायाचे उदार रूपडे
थोरपण जिंकले होडे ।

कवीस शब्दब्रह्मीची राणिव कोडे,
जेणे पाहिले तो सिंदुरे आंडंबरे ।।

गोर मेरू जसा, तयाचे ठायी सिद्धीचे सर्ग,
नानाविध वसती भोग ।

तेण आधारे अग्नेय सुखावले।।”



ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे -

ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |
जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु|
म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||

नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||

तुकोबा गणपतीला नाचत येण्याची विनंती करतात -

गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घाग-या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।

Friday, September 17, 2010

गणेशाचे रूप

म्बोदरं सुन्दरं प्रस्यन्दन्मद्गन्धलुब्धमधुपब्यालोलगण्डस्थलम्।
दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्।। (गणेशध्यानम्)

एकदंन्तं महाकायं लम्बोदरं गजाननं।
विघ्ननाशकरं देवम् हेरम्बं प्रणमाम्यहम्।। (गणेशप्रणामः)

देवेन्द्रमौलिमन्दारमकरन्दकणारुणाः।
विघ्नं हरन्तु हेरम्वचरणाम्बुजरेणबः।।
(गणेशप्रार्थना)

Thursday, September 16, 2010

लोकमान्य टिळकांचा द्रष्टेपणा !

"वर्षानुवर्षे मुसलमानांच्या धार्मिक उत्सवांत हिंदूंनी मनापासून सहभागी होऊनही आणि सर्व प्रकारे त्यांच्याशी गुण्यागोविंदाने राहूनही हिंदूंची मानखंडना करण्याची एकही संधी मुसलमान सोडत नाहीत, हे लक्षात आल्यामुळे श्री गजाननाच्या आराधनेला आपण व्यापक राष्ट्रीय आणि सामाजिक अधिष्ठान देत आहोत," अशा शब्दांत लोकमान्यांनी केसरीतून लोकांशी सुसंवाद साधला होता. गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी मुसलमानांना चिडवण्याकरता सुरू केला नव्हता, तर हिंदु- मुसलमान वादात हिंदु समाज एकजीव कसा होईल आणि मुसलमानांना न भीता तो आपले हक्क कसे प्रस्थापित करील, हे शिकवण्याचा त्यांचा हेतू होता.

१८९४ साली प्रथम लोकमान्य टिळकांनी विंचूरकर वाड्यात स्वत: गणपती बसविला व सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली.

गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी तत्कालीन समाजाबाबतचे लोकमान्य टिळकांचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे होते -
१. हिंदु लोक धर्माबद्दल उदासीन आहेत.
२. हिंदु समाज विस्कळीत आहे.
३. पाश्चात्त्यांच्या श्रेष्ठत्वाने भारतीय जनता दिपून गेली आहे.
४. भारतीय जनतेमध्ये असलेले अभिजात सामर्थ्य परिस्थितीमुळे सुप्‍त आहे.

उद्देश
१. कार्यक्रमांद्वारे हिंदूंमध्ये जागृती करणे.
२. हिंदूंमधील सुप्‍त सामर्थ्याची जाणीव त्यांना करून देणे.
३. समाजातील दुजाभाव नष्ट करणे.
४. समाजात लोकांच्या अधिकारांचा व कर्तव्याचा प्रसार करणे.
५. चांगल्या धार्मिक कल्पनांचे पुनरुज्जीवन करणे.
६. आधुनिक युगात आवश्यक अशा चळवळी करणे.
७. जनतेतील अंगभूत व परंपरेने निर्माण होणार्‍या शक्‍तींना कार्यान्वित करणे.

टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवातील कार्यक्रम
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्या वेळी श्री गणेशाची पूजाअर्चा करण्याबरोबरच भजन, कीर्तन, पोवाडे, शास्त्रीय गायन यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असे. यामुळे भारतीय संस्कृतीच्या विविध अंगोपांगांचा परिचय युवा पिढीला होत असे.

समाजप्रबोधन व लोकशिक्षण यांसाठी तत्कालीन समस्यांवर विद्वानांची व्याख्याने ठेवण्यात येत असत, तसेच या समस्यांवर विविध मान्यवरांचे परिसंवादही घडवून आणण्यात येत असत.

उत्सवकाळात रात्री 'मेळा' हा कार्यक्रम आयोजित केला जात असे. या मेळयात अनेक लहान मुले-मुली व तरुण एकत्र येऊन राष्ट्रीय गीते वगैरे सादर करत असत. सामाजिक व धार्मिक सुधारण करण्याचे, तसेच राष्ट्रभावना प्रखर करण्याचे कार्य या मेळयातून केले जाई.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाचे फलित म्हणजे तत्कालीन समाज धर्म व राष्ट्र यांबद्दल जागृत होऊ लागला. या उत्सवातून स्फूर्ति घेऊन कित्येकांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.

Wednesday, September 15, 2010

आली गौरी सोन्याच्या पावली


गौरी आगमनाचा आजचा दिवस महिलांच्या खास आनंदाचा.

श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर गौरींचे आगमन होते. घरात आनंदाचे वातावरण नांदू लागते.
आजकाल कुटुंबे दूरदूर गेली. दुरावा वाढलाय. पण या सण-उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारा.
माहेराला जाण्याचे हे पारंपारिक निमित्त.

कोकणात तर हा सण मोठ्या दणक्यात साजरा होता. आपल्या प्राचिन परंपरा जपून तिथ त्या सांभाळल्या ,पाळल्या जातात.

आनेक नाती एकत्र येतात. सुखाचा , मायेचा शिडकवा मिळतो. माहेरवाशिण आपल्या आई-वडीलांच्या घरी माहेरपणाला येते. थोडी चिंता बाजू ठेऊन सारे जण हा आनंदाचा ठेवा साठवत , गाणी म्हणत नाती सांधतात.

विविध ठिकाणच्या प्रथेप्रमाणे गौरींचे आगमन होते. कुठे खड्याच्या. कुणाकडे उभ्या हाताच्या. तर कुणाघरी उभ्याच पण मुखवटच्या गौरींचे आगमन होते. कुणी मुखवटे दरवर्षी नविन आणतात. तर काहीजणांकडे पितळ्याचे कायमचे मुखवटे बसवून गौर सजविली जाते.

घराला उत्साह देणारे हे वातावरण गौरीमुळे अधिक जाणवते. गौर म्हणजे महालक्ष्मी . त्यांची गाणी म्हटली जातात.आठवणींच्या कुपीत साठलेली गाठोडी सोडून मनेही मोकळी होतात.अखेरीस या सा-या सण-उत्साहाचे सार एकत्र येण्यातच आहे. दूरावलेली नाती दृढ होतात. आजकाल विभक्त कुटुंबामुळे दूर गेलेला संवादाचा झरा पुन्हा पाझरतो.

इथे प्रत्येक घर आपापल्या ऐपतीप्रमाणे उत्सव साजरा करतो. संस्कृतीवर घाला घालणा-या संस्कृतीरक्षकांनी तोंडात बोटे घालावीत असा हा उत्साहाचा सोहळा गुण्यागोविंदाने नांदत आहे. कुणाच्याही वक्र दृष्टीला भीक न घालता गणपती बाप्पाचा गजर करीत सारे लोक आनंद घेत आहेत.

दगडूशेठ आणि मंडईचा गणपती



तुम्ही कितीही म्हणा. पण पुण्यात येणारा प्रत्येक भक्त दगडूशेठ गणपती आणि मंडईचा गणपती पाहल्याशिवाय जात नाही हे नक्की. खरे म्हणाल तर पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती. आणि देवी म्हणजे जोगेश्र्वरी. कुठल्याही कार्याचा आरंभ या दोन देवळातल्या मूर्तिंना आमंत्रित करूनच होतो.


मात्र गणपती उत्सवात कसबा आणि जोगेश्र्वरीच्या गणपतीला मान आहे. पण सजावट आणि भव्यता यांचे दिपवून टाकणारे वैभव अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने सातत्याने कायम ठेवले आहे.

म्हणूनच हे दोन्ही गणेशाचे दर्शन घेऊनच भक्त कृतार्थ झाल्याची भावना कायम मनात ठेवतात.



एवढेच काय तुम्ही पुण्याची वृत्तपत्रे पाहिली तर पुण्याच्या मानाच्या गणपतीच्या बातम्यांप्रमाणेच दगडूशेठ आणि मंडईच्या गणपतींच्या प्रतिष्ठापनेची स्वतंत्र बातमी करून छापतात. ही दोन्ही गणपतीमंडळे सामाजिक कार्य वर्षभर करण्यावरही तेवढाच भर देतात.

मिरवणूकीच्या मार्गावरचा दोन्ही मंडळांचा मान आजही राखला जातो. त्यांच्या सजावटी पहाण्यासाठी भक्त गर्दीतून वाट काढून दुतर्फा उभे असतात. श्रींच्या दर्शनाचे भाग्य लाभावे यासाठी अवघा महाराष्ट्र इथे येण्याचा संकल्प करीत असतो.

मंगलमूर्ती मोरया.. गणपती बाप्पा मोरया

हिरवा गार श्रावण सरून चैतन्याच्या लाटेवर आरुढ होऊन, उल्हासाचे रंग उधळीत भाद्रपद येतो. त्याच्या मंगल पावलांसाठी सृष्टी जणू अधीर झालेली असते. घरी दारी सजावट सुरु होते; तोरणे सजतात आणि वाजत गाजत मंगलमूर्तीचे आगमन होते.

दर वर्षी भाद्रपद शुध्द चतुर्थीच्या मंगल दिवशी उत्साहाचा, आनंदाचा जल्लोष सुरु होतो. ''मंगलमूर्ती मोरया.. गणपती बाप्पा मोरया.." अशा गजरात शहरातील रस्ते फुलून जातात. मिरवणुकीत तल्लीन झालेले नागरिक आपल्या लाडक्या दैवताची प्रतिष्ठापना करतात.

गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा स्वामी विघ्नहर्ता गणेश. मुंबईतील सुमारे साडेपाच हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. सुमारे लाख दीड लाख घरगुती गणपती मोठ्या थाटामाटात घरोघरी विराजमान होतात आणि मुंबई - पुण्यासारख्या शहरांमधील लोकांचे अवघे जीवनच गणपती व्यापून टाकतो. पूजा, आरत्या, नैवद्याच्या तयारीत सर्व लोक रंगून जातात.

तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता,
तूच कर्ता आणि करविता

अशी देवाची प्रार्थना करीत आकाशात नवरंग उधळीत आरत्यांचा गजर स्वर्गात पोचतो. पाण्याची टंचाई, दुष्काळाचे सावट स्वाईन फ्लूचा भयानक प्रादुर्भाव, ही संकटे वेढा घालून बसलेली असता त्यांची तमा बाळगता गणपतीच्या दर्शनाला लोक रांगा लावतात. स्वाईन फ्लूपासून बचाव व्हावा म्हणून मास्क घालणार्या पोलिसांचे ठिकठिकाणी दर्शन होते. मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आदल्या रात्रीपासूनच भाविक गर्दी करतात.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. .. १८९३ मध्ये केशवजी नाईकांच्या चाळीत लोकमान्यांनी पहिला सार्वजनिक गणपती स्थापन केला आणि ती परंपरा आजही अखंडितपणे चालू आहे हयाचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो. गणेशोत्सवामुळे लोकांची श्रध्दा अतूट झालेली दिसते. मुंबईत आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या वाढताना दिसते.

प्रभादेवीचा सिध्दीविनायक आणि गिरगावातील फडके मंदिर ही दोन्ही मंदिरे गर्दीने ओसंडून वाहत असतात. मुंबईत गणपतीची किती मंदिरे आहेत, याची यादी केली, तर भली मोठी नोंद होईल. केवळ गणपतीची मंदिरे नव्हे, तर प्रत्येक मंदिरात गणपती हा असतोच! सुवर्णालंकारांनी झगमगणार्या गणपतीच्या दर्शनाला भाविकांच्या लांबचलांब रांगा लागतात.

पुण्याच्या सारसबागेत पेशव्यांनी बाग वसवली. तलाव खोदून त्यात पाणी सोडले, मधोमध एक बेटवजा जागा ठेवून त्यात बाग फुलवली. श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांनी श्री सिध्दिविनायकाची स्थापना केली आणि सारसबागेच्या सौंदर्याला पावित्र्याची किनार लाभली.

पेशवे घराण्यातील नानासाहेब, थोरले माधवराव, आणि अम्रुतराव हे तिघे गणपतीचे उपासक होते. शनिवारवाडयात गणपती पूजनाची, उत्सवाची, सुरुवात नानासाहेब पेशवे यांनी केली. तेव्हाचा गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात होत असे. पेशवाई संपुष्टात आल्यानंतर ओघानेच उत्सवाची प्रथा बंद पडली.

पेशवाईतील गणेशोत्सवाच्या राजवैभवाला पुढे १९ व्या शतकात लोकमान्य टिळकांनी पुन्हा वैभव प्राप्त करुन दिले. मधल्या कालखंडात गणेशोत्सवाचे सार्वजनिक रुप नाहीसे झाले. तरी जनमानसातील गणेशाचे स्थान अढळच होते.

१९९६ मध्ये जगभरातील गणेशमूर्ती एक प्रदर्शन सोहळा या ठिकाणी झाला आणि एक गणेश संग्रहालय इथे निर्माण झाले. हे गणेश संग्रहालय म्हणजे गोविंदराव मदाने आणि पांडुरंग जोगे यांच्या छंदातून निर्माण झालेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक असे देऊळ होय. या ठिकाणी साडेतीनशेहून अधिक गणेशमूर्ती आहेत आणि .पां. आपटे यांनी निर्माण केलेली २३ गणेश चित्रांची सृष्टी अत्यंत प्रेक्षणीय आहे.

प्राचीन आणि अर्वाचीन गणेशमूर्ती येथे आहेत. अगदी तळहातावर ठेवता येईल एवढया गणेशापासून ते पुरुषभर उंचीच्या महागणपतीपर्यंत आकाराच्या मूर्ती आहेत. माती, दगड, काष्ठशिल्प, तांबे, पितळ, पंचधातू आणि चंदन, शिंपला, काच, कागद अशा असंख्य वस्तूंपासून साकारलेल्या मूर्तींचे विलोभनीय दर्शन येथे घडते. पुण्याच्या पेशवाईतील लंबोदरापासून ते मुस्लिम बहुल काबुलमधील काळयाभोर गणेशशिल्पाचा हा गणेश दर्शन सोहळा पाहताना अध्यात्माच्या पलीकडे, शास्त्र, मूर्तीविज्ञान, देशोदेशीच्या गणेश संकल्पना असे मोठे विश्व आपल्याला दर्शन देऊ लागते.

जपानमध्ये आजही गणेश हा लोकप्रिय देव आहे. आणि तेथे त्याची पूजा होते. तो सुखाचा, भाग्याचा देव समजला जातो. त्याच्या उजव्या हातात लाडू आणि डाव्या हातात मुळा असतो. "होजांझी", येथे द्विदेही गणेशाचे मंदिर आहे.

भारतापासून तब्बल आठ हजार किलो मिटर अंतरावर अटलांटिक महासागरात वसलेल्या आयर्लेंडनामक बेटावरही विघ्नहर्त्याचे दर्शन घडते हे आश्चर्यकारक नाही काय? येथे तब्बल २२ एकरांचा परिसर व्यापून राहिलेले उद्यान (ईंडियन स्कल्पचर्स पार्क) आहे. तेथील विस्तीर्ण हिरव्यागार मैदानावर अनेक गणेशमूर्ती मोठ्या चित्राकर्षक आहेत. काळ्या ग्रॅनाईण्टमध्ये कोरलेल्या सहा ते नऊ फूट उंचीच्या अशा नऊ मूर्ती या पार्कमध्ये आहेत. ग्रंथवाचक करणारा, वीणावादन, तबलावादन, बासरिइ वादन करणारा गणेश इथे भेटतो. एका मूर्तीमध्ये मूषक लॅपटॉप वापरतो आहे, तर एका मूर्तीमध्ये तो नागापुढे पुंगी वाजवत आहे. देशोदेशीच्या अशा गणेशमूर्ती पाहून आपण गणेशाच्या ॐकार स्वरुपात दंग होऊन जातो आणि सर्वांना सुख लाभावे अशीच प्रार्थना करतो.

मंगलमूर्ती मोरया|
गणपतीबाप्पा मोरया

लोकगीतातील गणपती

गणपती संतवाङमय व शास्त्रपुराणांबाहेर पडून लोकसंस्कृतीतही अनेक ठिकाणी आला आहे. तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो.

पठ्ठे बापूराव आपल्या कवनात म्हणतात -

तुम्ही गौरीच्या नंदना ।
विघ्न कंदना ।
या नाचत रमणी । जी जी जी ||

कोकणातील गणपतीच्या नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील बाल्यांचा गणपतीचा नाच दमदार व लक्षवेधी असतो. बाल्यांचे गणपतीचे एक गाणे असे -

यावे नाचत गौरीबाळा ।
हाती घेऊनी पुष्पांच्या माळा ।
सर्वे ठायी वंदितो तुला |
यावे नाचत गौरीबाळा।

लोकगीतामध्येही गणपतीचे वर्णन येते. कार्तिकेय-गणपती भावांचा झगडा, शंकरपार्वतीचे बालकौतुक असे अनेक विषय यात आहेत. एका लोकगीतातले वर्णन असे -

हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।
आमी जातो आमी जातो, सोनारू साळा ।।
सोनारीन बाई ग सोनारू दादा ।।
बाळाचं पैजण झालं का न्हाई ?
फिरून येजा फिरून येजा गवराबाई गवराबाई ।।
हिथं बस तिथं बस, गणू माज्या बाळा ।।

गवराबाईने म्हणजे गणपतीच्या आईने (गौरीने) गणेशबाळासाठी सोनाराकडे पैंजण करायला टाकले आहेत आणि सोनाराने ते अजून दिले नाहीत असे वर्णन या गाण्यात आहे.

गणपतीचे रूपभेद व अवतार


गणपतीचे रूपभेद

भारतात व बाहेर गणपतीच्या रूपात अनेक फरक दिसतो. रूपभेदानुसार ध्यान व पूजाविधी बदलतो. गुप्तयुगातील गणेशमूर्ती अष्ट ते दशभूज आहेत. तंत्रमार्गी ग्रंथ तंत्रसारात, काश्मीरात, नेपाळमध्ये व अफगाणिस्तानमध्ये आढळणार्‍या मूर्तींमध्ये गणपतीचे वाहन सिंह दाखवले आहे. येथील गणपती नेहमीप्रमाणेच प्रसन्न रूपात आहे. पण प्राणतोषिनी तंत्र - या तांत्रिक ग्रंथात उल्लेखित चौरगणेश साधनाचे फळ चोरतो असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे विघ्नगणेश विघ्न घडवितो व लक्ष्मीगणेश लक्ष्मीस आलिंगन देउन असतो असा उल्लेख आहे.


* महागणपती – महागणपती हे गणपतीचे एक तंत्रमार्गी रूप आहे. यात गणपतीसोबत शक्ती विराजमान असते व एकमेकांस उपस्थ स्पर्श केलेला असतो.

* हेरंब-गणपतीहेरंब-गणपती तंत्रसार ग्रंथात उल्लेखित आहे. हे रूप पंचानन (पाच तोंडी) असते. त्यातील मधले एक मुख ऊर्ध्वदिशी (आकाशाकडे तोंड केलेले) असते. अभयवर, मोदक, निजदन्त, मुण्डमाला, अंकुश व त्रिशूल असतो. हेरम्ब म्हणजे दीन पालक होय. वाहन सिंह. नेपाळमध्ये हेरम्ब-गणपतीचे वाहन उंदिरही असते.

* नृत्यगणेश – नृत्यगणेश आठहाताचा व नृत्यरत असतो. हाती शस्त्र नसते. मुद्रा नाचाची असते.

* विनायक गणेश – विनायक गणेशाचा उल्लेख अग्निपुराण ग्रंथात आहे. याची पाच भिन्न रूपे आहेत - चिंतामणी विनायक, कपर्दी विनायक, आशा विनायक, गजविनायक व सिद्धिविनायक. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक एकच असून तो अम्बिकापुत्र आहे.

* बौद्ध गणेश – बौद्ध गणेशाचा उल्लेख बौद्ध साधनमाला-ग्रंथात मिळतो. तो द्बादशभूज (बारहाती) आहे. त्याचे कपाळ रक्तपूर्ण असून हाती मांस असते.

इसवीसनाच्या पहिल्या शतकात बनलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीनतम गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभूज दगडी गणेशमूर्ती पाहायला मिळते. इसवीसनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणा-या गणपतीची मूर्ती मिळालेली आहे. सर्वसाधारणपणे तीन प्रकारच्या गणेशमूर्ती पाहायला मिळतात - आसनस्थ, नृत्यरत व उभ्या. यात बसलेल्या मूर्तींची संख्या सर्वाधिक आहे. जबलपूर येथे हतीमुख असलेल्या देवीची मूर्ती मिळाली आहे. तंत्रमार्गात उल्लेखित गणेशपत्नी - गणेशाणी हीच असावी असा अंदाज आहे.

गणेश चतुर्थी
भाद्रपद व माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. हिंदूश्रद्धेनुसार हा गणपतीचा जन्म दिन होय. गणेश चतुर्थीची प्रचलित कथा येणेप्रमाणे आहे - एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून जात होता. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला. यामुळे गणपती उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला. यावर गणपतीने संतापून चंद्राला शाप दिला की, ''तुझे चतुर्थीस कोणी दर्शन करणार नाही.''

गणपतीचे अवतार
उपपुराण मानल्या जाणा-या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.

गणेश पुराण – गणेश पुराणात- उल्लेखित गणपतीचे चार अवतार सत्य, त्रेता, द्बापर व कलीयुगात अवतीर्ण झाले. हे होते -

महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप व अदिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असूर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
मयूरेश्वर – हा षडभूज व श्वेतवर्णी अवतार आहे. वाहन मोर. त्रेता युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस मोर भाऊ कार्तिकेय यास दान केला. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.

गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.

धूम्रकेतु
– द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलीयुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.

मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात - गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे -
वक्रतुण्ड – प्रथम अवतार. वाहन सिंह. मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध केला.
एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक. मूषकवाहन. अवताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध।
महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक. वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
विघ्नराज – विष्णूचे प्रतीक. ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचा उद्देश्य.
धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा. अभिमानासुराचा नाश केला.



ओंकार स्वरूप गणेश

दरवर्षीप्रमाणे गौरीशंकर गणपती दहा दिवसासाठी विराजमान असतील. हा पाहुणा सर्वांच्या घरात वेगेवेगळ्या रूपात येतो. एखाद्या मूर्तीच्या हातात लाडू तर दुसरीने पगडी परिधान केलेली असते. काही मूर्ती उंदरावर बसलेल्या तर काही आरामात मांडी घालून बसलेल्या असतात. गणपती बाप्पाच्या येण्याने लहान-थोरांचा उत्साह द्विगुणित झालेला असतो. अनेक नावे धारण केलेल्या गणपतीची पूजा प्रत्येक शुभकार्याच्या अगोदर केली जाते. हे असे आराध्यदैवत आहे की त्याच्याशिवाय कोणत्याही कार्याचा प्रारंभ होऊ शकत नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणेशाचे पिता असलेल्या शिवशंकराचे सोळा सोमवारचे व्रत गणपतीची स्थापना झाल्यावरच संपन्न होते. एवढेच नाही तर कलियुगातील श्री सत्यनारायण व्रत कथा महापूजेच्या सुरवातीला विनायकाची पूजा केली जाते. गणपतीचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे तो विघ्न विनाशक आहे. आजचे जग सौंदर्याच्या मागे धावणारे आहे. गणपती त्यात कुठेही बसणारा नाही. हत्तीचे तोंड घेऊन उंदरावर जाणारा तुंदीलतनू तरीही आपला वाटतो. त्यात एक नैसर्गिक सौंदर्य आहे. अशी ही मंगलमूर्ती विघ्नविनाशक आहे. त्याचे तोंड वाकडे असल्यामुळे तो वक्रतुंड आहे. पोट मोठे असल्यामुळे लंबोदर आहे. एक दात असल्यामुळे तो एकदंत आहे.

गणेशाचे येणे शुभ मानले जाते. या दिवसातील वातावरण उत्साहाचे असते. सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते. सर्व देवता फूलांनी प्रसन्न होतात तेथे गजानन दुर्वा आणि केवड्याने प्रसन्न होतात. त्यांचे आवडते खाद्य म्हणजे मोदक आणि लाडू आहेत. चतुर्थीच्या दिवशी उपवास करणार्‍या भक्तांनी चंद्रदर्शन केल्याशिवाय उपवास सोडणे वर्ज्य मानले जाते.

चतुर्थीचे एकवीस निरंकार व्रत ठेवल्यास एकवीस मोदक तयार केले जातात. त्यापैकी वीस गोड आणि एक खारट असतो. दिवसभर उपावास केल्यावर संध्याकाळी हे मोदक खाऊन उपवास सोडला जातो. मोदक खाता खाता जेव्हा मिठाचा मोदक खाल्ला जाईल तेव्हाच पाणी पिऊन उरलेले मोदक तसेच सोडून द्यावे लागतात. कधी कधी पहिलाच मोदक मिठाचा लागू शकतो. अशा प्रकारे या ओंकार स्वरूपाचे कठीण व्रत आहे.

खरोखरच अशा विलोभनीय विनायकाचे दहा दिवसानंतर विसर्जन होताना मन उदास होते. आजही गणपती काही कुटूंबात गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीबरोबर गुळ-तांदूळ आणि दुध-पोह्यांची शिदोरी देण्याची परंपरा आहे. कारण ते आपल्यापासून कितीही दिवस दूर राहीले तरी उपाशी राहू नयेत हा उद्देश असतो. विसर्जनानंतर वाटल्या डाळीचा प्रसाद वाटण्याची प्रथा सुद्धा आहे. 'गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या' या वचनाप्रमाणे ते पुन्हा एकदा आपल्यात वाजत गाजत आले आहेत. आपण त्यांची मनोभावाने पू्जा करा आणि त्याला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा.

पुण्यातील मानाचे गणपती


श्री कसबा गणपती
कसबा हे पुण्याचे ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळाएवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे, असे मानतात. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत. गणेशोत्सवात श्रींची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढली जाते. या गणपतीपासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता आहे. हा मानाचा दुसरा गणपती आहे. येथील गणेशोत्सवाला १८९३ पासून प्रारंभ झाला. या गणपतीच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. विसर्जन मिरवणुकीत श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये असते.


गुरुजी तालीम मंडळाचा गणपती

गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा मानाचा तिसरा गणपती आहे. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जात असे. सध्या तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा गणपती आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा या मंडळाकडून गुलालाची उधळण केली जाते.


श्री तुळशीबाग गणपती

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंडळाच्या श्रींची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.


केसरी गणपती
केसरी संस्थेचा गणपती १८९४ पासून बसू लागला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. या गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते. १९९८ मध्ये श्रींची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आहे.


पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पुणे शहरात अनंतचतुर्दशीच्या दिवशी काढण्यात येते. यात पुणे शहर व आसपासच्या भागातील सार्वजनिक गणपती मंडळे भाग घेतात. प्रत्येक मंडळाचे सदस्य आपआपल्या गणपतीची पूजनमूर्ती व उत्सवमूर्ती घेऊन विवक्षित ठिकाणापासून ठरवलेल्या मार्गाने चालत (किंवा हळू चालणार्‍या वाहनातून) मुठा नदीच्या तीरावर येतात व पूजनमूर्तीचे विसर्जन करुन उत्सवमूर्ती घेऊन परत जातात.

अनंतचतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरू होणारी ही मिरवणूक जवळपास ३० तास चालू असते व दुसर्‍या दिवशी मध्याह्नापर्यंत चालते. ही मिरवणूक पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा परमोच्च बिंदू समजली जाते.

Friday, August 20, 2010

किल्ले दौलतमंगळ

पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामधे आहे.
अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो.



भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामधे आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत.
पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे. दौलतमंगळ किल्ल्याला जाण्यासाठी पुण्यातून दोन मार्ग सोयीचे आहेत. पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा गाडीरस्ता आहे. माळशिरस हे लहानसे गाव किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला आहे. दुसरा मार्ग पुणे-सोलापूर रस्त्यावरील यवत गावाकडून आहे. यवतच्या दक्षिणेला दौलतमंगळ आहे.

दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता आलेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीचे, बुरुजांचे अवशेष आजही आपले अस्तित्व कसेबसे टिकवून उभे राहीलेले दिसतात. किल्ल्याचा दरवाजा, पायर्यांचा मार्ग, पाण्याची टाकी असे वास्तूविशेषही पहायला मिळतात.किल्ल्याचे भग्नावशेष पाहून आपण निश्चितच खिन्न होतो. खिन्न मनाने आपण भुलेश्वरच्या मंदिरात प्रवेश करतो. मंदिर पाहिल्यावर मनाची उदासिनता कुठल्या कोठे पळून जाते आणि आपण प्रसन्न मनाने मंदिराचे शिल्पकाम न्याहळू लागतो.

मुख्य मंदिराच्या बाहेरुन भिंत बांधून मंदिराची सुरक्षितता वाढवल्याचे दिसून येते. मंदिरामधील अनेक मुर्त्यांची तोडफोड केल्याचे दिसते. वरच्या भागातील गिलाव्यामधील मुर्ती मात्र शाबुत असल्याचे पहायला मिळते.
दौलतमंगळ किल्ला पहायला अर्धा तास पुरतो. पण मंदिर निरखायला मात्र किमान तासभर तरी हाताशी पाहिजे. कलाकारांची सौंदर्यवृष्टी आणि कलाकारी मनाला भावते तसेच शिल्पांची अदाकारी ही आपल्याला थक्क करते.

भुलेश्वर परिसरातून वज्रगड, पुरंदर, सिंहगड किल्ले दिसतात तसेच जेजुरी, ढवळेश्वर आणि सपाटीवरचा विस्तृत प्रदेशही पहाता येतो.

दौलतमंगळाच्या भेटीत आपण जेजुरी अथवा ढवळेश्वरालाही भेट देवू शकतो.