एक मनुष्य खापरात चणे भाजत होता. तेव्हा ते चणे फडफड करून उड्या मारू लागले. ते पाहून
तिथे असलेला एक मठ्ठ डोक्याचा मुलगा, 'काय मूर्ख आहेत ते चणे. यांचं अंग भाजतं आहे
आणि त्यांना गाणं सुचतं आहे
अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य हास्यास्पदच ठरतो.
Showing posts with label इसापनीती कथा १ ते ५०. Show all posts
Showing posts with label इसापनीती कथा १ ते ५०. Show all posts
|
0
comments
]
|
0
comments
]
एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले.
तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे.
म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले,
'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?
सांगितले, 'मी मुंबईचा?'<
पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे'
आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले,
'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'
मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले.
त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.
तात्पर्य - खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच.
|
0
comments
]
एकदा एका मेंढ्यांच्या कळपातून एक कोकरू मागे राहिले होते. ते पाहून एक लांडगा त्याच्या पाठीमागे लागला.
याच्या हातून आपण सुटत नाही असे लक्षात येताच कोकरू लांडग्याला हसत म्हणाले,
'अरे, तू मला ठार मारणार हे मला माहितच आहे पण निदान आनंदानं तरी मरावं असं मला वाटतं.
तेव्हा तू जर मुरली मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल.' ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला.
त्याने आपली मुरली वाजविण्यास प्रारंभ केला. मुरलीच्या सुरावर कोकरू नाचू लागले. मुरलीचा आवाज ऐकताच जवळच
असलेले कुत्रे धावत आले.त्याला पाहताच लांडगा घाबरून पळू लागला. पळता पळता तो मनाशीच म्हणाला,
'आपला धंदा सोडून भलत्याच धंद्यात पडल्याने असं झालं.
खाटकाचा धंदा सोडून मी वाजंत्र्याचं काम करीत बसलो हा माझा केवढा मूर्खपणा !'
तात्पर्य - नादी मनुष्याला, चतुर लोक सहज फसवू शकतात.
|
0
comments
]
एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने आपल्याबरोबर
येण्याची विनंती केली.
कुत्रा म्हणाला,'देवीला तुझा इतका कंटाळा आहे की, तू दिलेल्या वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.
कावळा म्हणाला, 'अरे, यासाठीच तर मी तिला वस्तू भेट देण्याचं ठरविलं आहे.
तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.
तात्पर्य - देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खूप असतात. खर्या भक्तिभावाने देवाला पूजणारे थोडेच.
|
0
comments
]
समुद्रातील एक खेकडा एकदा सहज समुद्रकिनार्यावर आला. तेवढ्यात एका कोल्हाने त्याला पकडले आणि
तो खेकड्याला मारून खाऊ लागला.तेव्हा मरता मरता तो खेकडा स्वतःशीच म्हणाला,
'मीच मूर्ख ! आरामात समुद्रात राहायचं सोडून जमिनीवर यायची उठाउठेव कोणी सांगितली होती ?
नको ती गोष्ट केल्याने मला जीव गमावण्याची वेळ आली आहे !
तात्पर्य - ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही, त्यात पडले म्हणजे मनुष्य संकटात सापडतो.
|
0
comments
]
एका माणसाची बायको फार भांडखोर होती. कर्कश आवाजात आरडाओरडा करून ती सतत नवर्याशी भांडत असे.
एकदा ती माहेरी गेली होती.तेथून परत आल्यावर नवर्याने तिला विचारले. 'तू तिथे मजेत होतीस ना ?
बायको म्हणाली, 'माझ्या माहेरी मी आल्याने कुणालाच आनंद झाला नाही.
तिथली गडीमाणसं सुद्धा मला कंटाळली होती, असं त्याच्या चेहेर्यावरून वाटत होतं
तिचा नवरा म्हणाला, 'आता तूच पहा, की, सगळा दिवस बाहेर कामात घालवणार्या
गडीमाणसांनासुद्धा तुझा कंटाळा आला तर सगळा काळ तुझ्याच सहवासात काढणारा
मी तुझ्या स्वभावाला किती बरं कंटाळत असेन ?
तात्पर्य - आपण जेव्हा सगळ्यांना अप्रिय होतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचाच दोष असला
पाहिजे असे समजून आपला स्वभाव बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
|
0
comments
]
एका अतिशय भुकेलेल्या डोमकावळ्याने, एका सापाला झडप घालून पकडले आणि आता त्याला मारून खाणार,
तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेटोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा प्राण घेतला.
तेव्हा तो डोमकावळा म्हणाला, 'दुसर्यांना मारून स्वतःची भूक शांत करणार्याला हीच शिक्षा योग्य आहे.
तात्पर्य - जो पदार्थ आपणास मिळणे शक्य नाही तो मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणे होय.
|
0
comments
]
एका धनगरास एक लांडग्याचे पिल्लू सापडले. तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबर ठेवले.
धनगराची मेंढरं चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिलू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवीत होते.
परंतु, ते काम झाल्यावर मात्र ते स्वतःच एखाद्या चुकार मेंढराला बाजूला नेऊन, मारून खात असे.
बर्याच दिवसांनी ही गोष्ट एकदा धनगराच्या लक्षात आली व त्याने त्यास झाडाला टांगून मारून टाकले.
तात्पर्य - प्राण्यांचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही.
|
0
comments
]
एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत,
पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते.
या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो.
त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं.
हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले,
'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?'<
कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो.
कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.
ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.
तात्पर्य< - दुसर्याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.
|
0
comments
]
एक लहानसा ससा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी
एका कोल्ह्याला बसलेले पाहिले,तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे.
त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.
, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले.
हे काही बरे नाही असे त्याला वाटले.थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले
आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले.ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर
झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.
मरता ससा म्हणाला,
तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.
तात्पर्य -एकमेकांशी सतत भांडणार्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.