Showing posts with label मराठी कवीता Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label मराठी कवीता Marathi Kavita. Show all posts


तुझे वेड लाउनी गेले ते क्षण 
मनाला भुलवून गेले ते क्षण ,
स्वतःला फसवून , जगाला चुकवून 
नकळत कुठे पळून गेले ते क्षण .....

चमकत्या गहिऱ्या डोळ्यांत गहिवरून गेलो मी 
निस्वार्थ प्रेमजाळ्यात पूर्णत: अडकून गेलो मी ,
अंतरंगास हळुवार स्पर्शून गेले ते क्षण  
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....

अवखळ पाऊस अंग अंग भिजवत होता 
खट्याळ वारा मनात प्रेमरंग उधळीत होता ,
हव्याहव्याशा  सहवासात जागीच स्तब्ध झाले ते क्षण 
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण ....

तू आली सळसळणार्या वाऱ्यासारखी आयुष्यात 
तू बहरली आंब्याच्या मोहरासारखी आयुष्यात ,
हृदयाच्या वेलीवर सहस्त्र पुष्प फुलवून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .... 

अचानक उमटली तुझी पाऊले एकदा दारी 
कानाकोपऱ्यात नांदली जशी लक्ष्मी माझ्या घरी ,
पाऊलखुणा हृदयात साठवून गेले ते क्षण 
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....

तुझे वेड लाउनी गेले ते क्षण 
जीवनवाट तुझसंगे चालुनी गेले ते क्षण ,
तुझी साथ देईन , फक्त तुझाच बनून राहीन 
जन्मभर हे वचन निभवून गेले ते क्षण .....

Composed by...
SONALI 

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

ती मुलगी होती की जादू , हेच नाही कधी कळले
नजरेतून सुटलेले तीर तिच्या , हृदय माझे चिरत गेले
एकांतातील तिचं बोलण , जेव्हा कानांमध्ये गुंजत
दिवस-रात्रीचा माझ्या चैनच हिरावून नेत
कधी तिचं हसण , कधी लटक रागावण
कधी लाजून तिचं माझ्या मिठीत सामावण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

होत कधी असंही , जेव्हा आठवण तिची येते
नजरेतील भाव तिच्या , डोळ्यात माझ्या साठवून जाते
आठवणीने तिच्या , मनाला वेदना अशा होतात
शरीरातून जणू प्राणच माझे घेऊन जातात
आपल्याच धुंदीत चालण , अचानक घाबरून थांबण
कधी फुलांची माला बनून , गळ्यात माझ्या पडण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

कधीतरी मला तीच रडवेल , स्वप्नातही नव्हत वाटलेलं
दु:खावर माझ्या हसताना , आभाळ होत फाटलेल
हृदय जिला मी अर्पण केलं , दगडाचं तिचं काळीज असेल
देवदूत समजलो ज्याला , तोच माझा खुनी असेल
तिचं ते रुसण , मी तिला समजावण
निघुनी गेला तो जमाना , होऊनी एकाच क्षण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!


..............वैभव आलीम (०३/११/१०)

का कुणास ठाउक ??????
का कुणास ठाउक ??????
कधी न भेटलेले
कधी न पाहिलेले
चेहरे कधी समोर आले !!!!!!
आणि .... नकळत तेच माझे मित्रही झाले
सुखात आणि दू:खात माझ्या
ते देखिल सहभागी झाले
आयुष्याचे प्रत्येक क्षण त्यानी वाटुन घेतले
जाता जाता .... विसरणार नाही तुला ......
असेही मला सांगुन गेले
पण ........ का कुणास ठाउक ?????
आज तेच चेहरे , तेच मित्र
माझ्यापासून खूप दूर-दूर गेले
का कुणास ठाउक ???
का कुणास ठाउक ?

........ वैभव आलीम (२९-०७-०९)

कोणीतरी असावं आपलं
भरकटलेल्या वाटेवरून
हात धरून मागे आणणारं

कोणीतरी असावं आपलं
ओघळणाऱ्या अश्रुनाही
हळुवारपणे पुसणारं

कोणीतरी असावं आपलं
सुखात माझ्या सहभागी होणारं
दु:खातही मायेने सांत्वन करणारं

कोणीतरी असावं आपलं
आंधळ्या झालेल्या नेत्रांनाही
डोळसपणे मार्ग दाखवणारं

कोणीतरी असावं आपलं
अंधारातही आपल्यामागे
ज्योती बनून वावरणार

पण ..............

कोणीतरी असण्यासाठी
आपणही त्याचे कोणीतरी असावं

......... वैभव आलीम (०८-०४-१०)

तुझही नि माझही प्रीत
आयुष्यास्याच्या नागमोडी
वळणावर एक
सुरेख सुंदर सफारी

सुख दुख म्हणजे
उंन पावशाचा खेळ
त्यात प्रेम म्हणजे
 umalanaara     इंद्रधनू 
ह्यांची तर्हा चा न्यारी

कधी हसन ,कधी रागावन्न

थोडा तुझ्हा थोडा माझह
कधी लटका राग
कधी खूप खूप प्रेम
अशी एका प्रेमाची कथा सारी

सुंदर चेहऱ्यावर
हास्याचा दागिना
शालीन्तेला जोड म्हणून
सौज्याण्याचा खजिना
वरउन  तारुण्याची बहारी [3]

प्रेमाची गंध नास्रारा
स्वतात  गुंतून स्वतालाच शोधणारा
झाला कुणासाठी अधीर आज
गाऊ लागतो आज प्रेमाचा नजराणा
हि प्रेमाचीच किमया सारी [४]

घोटाले घोटाले घोटाले घोटाले
काहो करता घोटाले
स्वार्थी लोकान्नो कारे
करता देशाचे वाटोले

टीच भर पोटा साठी
नका लागु भ्रष्टाचा राच्या पाठी
एवढ करता कोना साठी
काय लागत जगण्या साठी
पापाचे पापाचे पापाचे नका भरू गाठोडे
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले

आपला देश आहे महान
जगात त्याला मान
गाउया त्याच गान
नका करू अशी घान
नका रे नका रे नकारे करू अस वाटोले
का रे करता तुम्ही असे घान घोटाले

भल्या मोठ्या विश्वा साने निवडून आम्ही देतो
गोड गोड तुमचे गाने मुखाने आम्ही गातो
स्वच्छ संस्कृतीचे स्वप्न आम्ही पहातो
नकारे नकारे नकारे जाऊ देऊ असे तडे
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले
घोटाले घोटाले घोटाले कारे करता घोटाले
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले

.......भारत माता की जय ........
"तरुणाननो एक जूट व्हारे
बंद करुया भ्रष्टाचाराचे वारे "
विनोद शिंदे - vinoda shinde @yahoo.co.in
दिनांक -३/११/२०११

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस
आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे.

अनेक पाऊलं चालत गेलो..
धुक धुकं सारं धुसर होते
मनातली कोडी सोडवत बसलो...
पुढे वळण वाढतच होते

आज मला आठवतात
ते सारे मार्ग मी चालून गेलो....
तू सोडून गेलीस अन "मी" हरवलो...
अश्याच येत्या प्रत्येक वळणांवर
त्या आठवणी अशाच साठवतात..

दिवस तास मिनीटे सेकंद
चालत जातात चालत जातात
उंच सरळ रूंद अरूंद
आयुष्यात वळणं येतच राहतात

अनेक माणसं भेटत आली...
अनेक माणसं सोडून गेली..
एकच गोष्ट सारखी होती...
मी...मीच.. अन मीच.........
त्या वळणाच्या वाटेवर

.- शशांक नवलकर

बापावर एक कविता लिहतो
माझ्या मनात विचार आला
माझाच बाप नजरेसमोर
कधी नव्हे तो मी धरला
माझा बापच नेहमी मला
माझा कट्टर शत्रु वाटला
म्हणून त्याच्या स्तुतीत एकही
शब्द कधी सहज नाही लिहला
माझा बापच इतरांच्याही
बापांचाही एक आदर्श ठरला
बाप असावा तसाच माझा
बाप नजरेत माझ्या झाला
बाप फक्त बाप सदाच असतो
म्हणून आपण कमी लेखला
आई पुढेच महानतेला
त्याच्या आपण कमी तोलला
बापच सदैव उपेक्षित तो
साहित्यातही कसा राहिला
झालेळ्यांना बाप कदाचित
बापच अजुन नाही कळला
कवी
निलेश बामणे

तुला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले होते...
तू नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...

झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...

आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...

राख़ अजूनही गरम होती
'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...
अश्रु दोन गालुन
मागच्या मागे वलुन गेले ....

मग... भल्या पहाटे
कुणीतरी तिच्या स्पर्शासम उब देत होत्तं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं...

आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ...

नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी ...

नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...


अर्चित...

होता गुलाब हाती
तुजलाच द्यावयाला
पण हात मात्र माझा
रक्तात माखलेला


काटाच ना फुलाचा
मजला दुखवून गेला
तुजलाच पारखा मी
दुनियेत दुर्लक्षिलेला


होती मनात आशा
उरल्या उण्या सुखांची
वारा तुझ्या स्म्रुतींचा
तिजला उधळून गेला


फुलबाग तुझ्या स्मरणांची
मनी माझ्या जपली होती
अश्रूंचा सागर माझ्या
फुलबागही बुडवून गेला


जरी उरलो होतो आता
बघण्या तव सुखयात्रा
तरी वणवा तव दुःखाचा
मजलापण जाळून गेला


झालीच ना कधीही
ईच्छा पुरी मनाची
परी अंतही माझा मजला
निमिषातच फसवून गेला


----------प्राजक्ता कुलकर्णी

माझ्याकडे वळलेली तुझी एकाच नजर
माझ ह्दय चोरुन गेली
कधीही भ्रमित न होणारी माझी
बुध्दी भ्रमित करुन गेली
तू माझी नसतानाही माझी आहेस
अशी जाणीव करुन गेली
मनात नसतानाही माझ्या कवितेची सहज
प्रेरणा ती होऊन गेली
माझ्यात कोठेतरी दडलेल्या माझ्याच ती
प्रतिभेला जन्म देऊन गेली
कवी
निलेश बामणे

का सुचत नाही काही
काय करावे ना कळेना
का अवस्था आज मनीची
काय व्यथा ना समजेना

का लिहिण्या येथ बसलो
काय शब्द तो आठवेना
का खरडतो लेखणी उगीच
काय अक्षर ना उमटेना

का ऐकतो एकटवून जीव
काय सूर तो सापडेना
का धरावा ताल येथे
काय स्वर ना फुटेना

का घुटमळतो आणि फिरतो
काय भिंतीत मन रमेना
का विणतो पाश मोहाचे
काय गुंतलो ना सोडवेना

का निघालो एकटाच उगीच
काय सोडले मागे स्मरेना
का उरलो रिता इथे
काय कमावले ना मोजवेना

का दमलो आणि थांबलो
काय अंतर कमी होईना
का चालायचे निरर्थक असेच
काय वाट ना संपेना

का संपल्या इच्छा मनातल्या
काय विरक्ती हि सोसवेना
का न राहिले हेतू जगण्याचे
काय जोडली नाळ तुटेना

..... रुपेश सावंत

PART II

नाही, आता आयुष्य सुरु झालं...
गेलेल्या त्या पाउलाणा परत आणण्यासाठी ...
गहाण ठेवलेलं नाव परत मिळविण्यासाठी...

जिद्द असू दे तुझ्या जीवनात
मोडलेलं बाबाचं आयुष्य ,
पुन्हा नव्यानं जोडण्यासाठी...

मोठं तर जीवनात तुला खूप व्हायचंय
पण लक्षात असू दे
बाबांच्या अगांच पडलेलं पाणी,
आणायला तुला खूप दूर जायचंय...

आई-बाबासारखे देव घरात असताना,
कुठलं रे बाहेर मंदिर तू शोधतोय...
आदरपूर्व त्यांना नमस्कार कर,
बघ,
तुझं स्वप्न कसं तुझ्या पायात येऊन पडतं.....

- मयुर वाकचौरे

PART I

आई-बाबांनी शाळेच्या गेटपरियंत सोडून...
पाठमोऱ्या तुझ्याकडे बघून,
छोटसं एक स्वप्न पाहिलं.
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझ्या शाळेच्या फी-साठी
बाबांनी अगाचं पाणी-पाणी केलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी
स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातानेच मोडलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझ्या नको त्या हट्टा-पायी
स्वतःचं नाव सुद्धा गहाण टाकलं ...
म्हणजे सगळं संपलं असं का?

तुझा सुखी संसार जोडून
त्यांनी मात्र ,
त्यांच्याच घरातून पाऊल बाहेर काढलं...
म्हणजे सगळं संपलं असं का?

याच्या कवितेची दादा Speed लई भारी,
वाचक शोधायची याची Idea सुद्धा न्यारी.
Friend List पहा भली मोठी आहे,
मिसिसिपी नावाची ती मैत्रीण खोटी आहे.
पुन्हा पुन्हा Scrap Book मध्ये Link फेकतो आहे ,
थांबवा हो .... कवी चुकतो आहे ....!

याची कविता खाली तर त्याची कविता वर,
चाले नुसती रस्सीखेच Reply च्या नावावर.
याच्या प्रत्येक Game चा Fanda नवा आहे,
याला Reply च्या बदल्यात Reply हवा आहे.
पहा आज पुन्हा तो कवित्व विकतो आहे ,
आवरारे दादानो .... कवी चुकतो आहे ....!

आपली प्रत्येक कविता वाचावी हा याचा घाट असतो,
पण प्रत्येक जाणकार वाचक म्हणजे निव्वळ भाट नसतो.
याच्या प्रेम कवितेला मध्येच भरती येते,
तेंव्हा जुनीच कविता पुन्हा वरती येते.
शिळीच कधी वाढून हा तुम्हास ठकतो आहे,
सावरा ताईनो .... कवी (दादा) चुकतो आहे ...



माता ज्याची थोर जिजाऊ
शहाजी ज्याचे पिता
तो लढला ज्यासाठी जन्मभरती
होती ती मराठी अस्मिता ||
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी
तो संतापून पेटून उठला
जो किल्ला त्याने चढला
तेथे भगवा नेहमीच फडफडला ||
तरुणांच्या हाती देऊनी समशेर
घडविला त्याने मावळा
स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी
सोसल्या लाखो कळा ||
धोक्यात आहे आज पुन्हा मराठी
काढूनी टाका सुरांतून नाराजी
उठा अन् शोधा स्वता:तच
तोच मावळा अन् तोच शिवाजी ||

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस

आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे
7/6/09

प्रेम करतो तुझ्यावर...
तू पण माझ्यावर करशील ना...?

मी विचारलेल्या प्रश्नाचं....
होकारात उत्तर देशील ना...?

स्वप्न पूर्ण करताना..
हात तुझा देशील ना...?

नको करूस प्रेम....
मैत्री तरी करशील ना...?

मैत्री नुसती करू नकोस...
शेवट पर्यंत निभावशील ना...?

मैत्री कधी तोडू नकोस..
ह्या वेड्याचा जिव जाईल ना...!!

मैत्री तोडल्यावर..
मला विसरणार तर नाहीस ना...?

कधी चुकून भेटलो तर....
नुसती ओळख तरी देशील ना..?

मी मेल्यानंतर....
दोन थेम्ब अश्रु तरी काढशील ना...?

तुला काय वाटल....................
तुला काय वाटल,
मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,
तू जशी रागावून गेलीस,
तसा काय मी रागावू शकत नाही!!

तुझ्या आठवणीत डोळे माझे
नेहमीच रडतात,
पण मी कधीच रडत नाही,
तुझ्या आठवणीत मन
नुसत घुसमटत असत,
पण मी कधीच नाही,
तू सुखी आहेस,
तसा मीही जिवन्त आहे,कारण..
मी तुझ्याशिवाय जगू शकतो,
हे विष मी आता सहज पिऊ शकतो!!

तू नेहमीच बरोबर होतीस,
माझच नेहमी चुकल,
इतक्या वर्षान्च प्रेम आपल,
एका भाण्ड्णात आटल,
दु:खी असलो तरी आशेवर जीवन आहे,कारण..
देव माझ्याशी नेहमीच चान्गला वागतो,
आणि आपण परत एकत्र येऊ शकतो!!

लिहिण्यासारखे एवढेच होते,
बाकीचे तू समजून घ्यायचे,
इतके जुने नाते आपले,
तोडून नाही तुटायचे,
माझ्या भावना तुझ्यापर्यन्त पोहोचल्याच असतील एव्हाना,कारण..
मीही तुझ्यावर अगदी जिवापाड प्रेम करतो,
जशी तू मला,तसा मीही तुला खूप miss करतो!!