परमेश्वराने मानवाची निर्मिती केली. मानवाने अनेक गोष्टींची निर्मिती केली.प्रत्येक गोष्टीचा जन्म ठराविक वेळी झाला व ती वेळ बहुतांश लोकांना माहित असते. तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण दररोजच्या आयुष्यात नियमीत वापरतो परंतु त्या गोष्टींच्या उगमाचा आपल्याला जराही थांगपत्त नसतो. उदाहरणार्थ फक्त एकच पण मजेदार 'नाम' आणि ते म्हणजे "शिवी".
दचकू नाका हो! खरंतेच लिहितोय. तुम्हीही कधी ना कधी आपला राग व्यक्त करताना या "मोहिनीचा" आधार घेतलाच असणार. "मोहिनी" यासाठी म्हणतोय की कितीही मनावर ताबा ठेवला तरी कधी ना कधी तिचे नामःस्मरण केल्याशिवाय चैनच पडत नाही. शिवीचा भक्तगण नाही, असा मनुष्य लाखातच काय पण करोडोतसुद्धा क्वचितच आढळतो.
अशा व्यक्तिंन्ना माझा कोटी-कोटी प्रणाम कारण मी त्यांच्यातला नाही.
शिवीचा जन्म कधी झाला, कोणामुळे झाला, कुठे झाला याचा काडीमात्र पुरावा नाही. तरीही आजच्या युगात जेवढ्या झपाट्याने शिक्षणाचा प्रसार होत नाहीये, तेवढा प्रसार "ही"चा होतोय."मनुष्य" हे एक कोडेच आहे, कारण शिवी हे माध्यम एकच परंतु त्याचा प्रचार, प्रचारक विविध मार्गांन्ने करतात. कोणी आप्तेष्टांचा उद्धार करुन प्रचार करतो तर कोणी स्वतंत्र "ईस्टाईलमध्ये" करतो.
या आधुनीक युगात संस्कारांचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे, परंतु शिव्यांचा अभाव मुळीच जाणवणार नाही. शास्त्रज्ञ जेवढा वेळ एखाद्या वस्तुच्या संशोधनास लावतात, तेवढ्याच वेळात आजचे युवक (+ युवती) २०-२५ शिव्यांचे संशोधन करून भावी आयुष्यात सर्रास वापरून मोकळे पण होतात. घरी जर आई-वडिलच शिव्या देत असतील, तर तीच प्रथा पुढे त्यांची मुलेपण चालवितात. वडिलोपार्जित संपत्ती नाही मिळाली तरी वडिलोपार्जित "शिव्या" मुले आरामात, काहीही कष्ट न करता आत्मसात करतात.
प्रत्येक मनुष्य या जगात येतो आणि जातो आणि मागे उरतात त्या फक्त त्याच्या . . . . . . . . आठवणी .... आठवणी नाही हो, फक्त शिव्या.
तात्पर्य: अन्न, वारा आणि निवारा यांप्रमाणे "शिवी" ही माणसाची आज एक मूलभूत गरज बनली आहे.
````````` ` सुरज ` ```````````````
निश्चित सांगता येत नाही. दूरसंचार, वैद्यकशास्त्र, कम्प्युटर सायन्स, खगोलशास्त्र, रॉकेटविज्ञान, आटिर्फिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, जैव-तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान अशी विविध क्षेत्रे आज वायुवेगाने प्रगत होत आहेत.
विक्रेत्यांच्या या काटेकोरपणामुळे आणि माझ्या मुखदुर्बळपणामुळे बूट खरेदी करायला गेलेला मी बुटाबरोबर चपलाची जोडी पण खरेदी करून दुकानाबाहेर पडलो आहे असे होण्या ऐवजी विक्रेत्याने दाखवलेल्या कमीतकमी बुटांच्या जोडीमधूनच आपल्याला खरेदी करणे भाग आहे या कल्पनेने एकादी डगळ बुटांची जोडी गळ्यात पडल्याने त्यात कागदाचे पॅकिंग घालून आणि तरीही बूट पायातून निसटतात की काय या भीतीने हळूहळू चालणे किंवा फार घट्ट बूट गळ्यात पडल्यास ते घालून लंगडत चालणे किंवा ते बूट चावल्यामुळे झालेल्या जखमांमुळे अनवाणीच चालावयास लागणे अशाही संकटात सापडलो होतो।
लग्नानंतर अर्थातच खरेदीचे खाते माझ्यावर सोपवण्यात आले नाही कारण त्यामुळे हव्या त्या वस्तु हव्या त्या वेळी घरात येणार नाहीत याविषयी गृहखात्याची खात्रीच असावी।त्यामुळे मी माझी नेहमीचीच दुय्यम सहाय्यकाची भूमिका इमाने इतबारे बजावत असतो। मात्र त्यामुळे एक महत्वाचा तोटा असा होतो की कधी कधी गृहखात्याने एकाद्या वस्तूच्या खरेदीविषयी असमर्थता व्यक्त केल्यास खरेदीसाठी तज्ञ व्यक्तीची नेमणूक करणे भाग पडते.घरगुती तज्ञ माझ्या शत्रुपक्षातले म्हणजे बायकोचे नातेवाईक असतात पण त्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर असते. हा प्रकार कालिदासासारखे आपण झाडाच्या ज्या फांदीवर बसलो ती आपल्याच हाताने कापणे (तेही अगदी समजून उमजून) त्यातलाच प्रकार !
या तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याविषयी माझा अनुभव काही फार उत्साहवर्धक नाही।त्या/तिच्या सल्ल्याने खरेदी करण्यात आलेली वस्तु हमखास खराब निघते किंवा बिघडते. पण तज्ञ व्यक्तीची नेमणूक ती वस्तू का बिघडली किंवा ती बिघडण्यामागे आमचाच कसा हात आहे याचे विश्लेषण करण्यासाठीच असल्यामुळे त्यांच्यावर टीका करणेही शक्य नसल्याने मीरेप्रमाणे हसत हसत हा विषाचा प्याला प्यावा लागतो. त्यामुळे झालेला गोंधळ जरी मला निस्तरावा लागला नाही तरी होणारे नुकसान मात्र घरंदाज घराण्यातील सुनेसारखे ( ही वस्तु दूरदर्शन मालिकात मुबलक प्रमाणात दिसू लागली आहे)निमूटपणे सोसावे
लागते
मात्र ज्या पुण्याने माझ्या खरेदीतील अरुचीला जास्तीत जास्त खतपाणी घातले त्याच पुण्यात आज परिस्थिती बरीच सुधारलेली दिसते। कौंटरवर कापडाचे शेकडो तागे किंवा साड्या पडल्या आहेत तरीही समोरील पुरंध्री स्वत:च्या चेहऱ्याची घडी अजिबात बिघडू देत नाही पण त्यामुळे नाउमेद न होता पहिल्यापेक्षाही अधिक उत्साहाने आणखी तागे अथवा साड्यांचे ढीग हसतमुखाने काढणारा किंवा काढलेल्या ढिगातील खालून दुसरी किंवा तिसरी (हे या स्त्रियांच्या बरोबर कसे लक्षात रहाते हे त्यांचा निर्माताच जाणे ) साडी परत एकदा दाखवा या विनंतीला मान देताना तिची मानच चिरून टाकावी अशी मनातील तीव्र इच्छा लपवून ती आपल्याला एकादा गौरव पुरस्कारच देत असल्यासारखा चेहरा करून त्या ढिगात हात खुपसून बरोबर तीच साडी बाहेर काढणारा विक्रेता आपल्याला स्वप्नातच पहायला मिळेल असे मला वाटायचे पण ते आता प्रत्यक्षात उतरलेले दिसते.
आता तर सगळीकडे अगदी मॉलामॉल झाल्यामुळे स्वत:च दुकानात हिंडून हव्या त्या वस्तु हातगाडीत टाकून बाहेर पडताना त्याची किंमत चुकती करण्याची पद्धत आपल्याकडेही बरीच रुजायला लागली आहे. त्यात हवी ती वस्तु न सापडण्याची एक किरकोळ अडचण असते पण त्यासाठीही त्यांचे सहाय्यक तत्परतेने मदत करायला तयार असतातच.हे लोक तर तुम्हाला खरेदी करायला लावण्याचा चंग बांधूनच बाजारात उतरले आहेत त्यामुळे एकावर एक (किंवा दोनसुद्धा )फुकट हा प्रकार इथेही रूढ झालेला आहे.इतक्या प्रलोभनामुळे तरी मी खरेदीचा आळस सोडेन असे वाटण्याचा काळ मात्र आता केव्हाचाच गेला आहे.मात्र याची पूर्ण कल्पना इतराना असल्याने "धाडू नको मज बाजारी " असे म्हणण्याची पाळी मात्र क्वचितच माझ्यावर येते.
त्याकाळात पुण्यातील बाजारपेठेत व्यापार म्हणजे अगदी नाइलाजाने करावयाची गोष्ट असे मानणाऱ्या दुकानदारांचाच जास्त भरणा होता।त्यामुळे पुण्यातल्या बाजारपेठेतील विक्रेते ग्राहकावर आपला कमीतकमी वेळ कसा जाईल याबाबतीत इतकी दक्षता घेताना दिसत की वेळ आणि हालचाल (time and motion)याचा अभ्यासक गिलब्रेथ याने पुण्याच्या बाजारपेठेचा फेरफटका मारला असता तर आपल्या एक डझन मुलांना वेळेचा जास्तीतजास्त कसा सदुपयोग करावा याचे धडॅ देण्यात आपला वेळ आपण उगीचच वाया घालवला त्याऐवजी त्यांना पुण्याच्या बाजारात पाठवून द्यायला हवे होते असे त्याला वाटले असते .
टिळक आगरकरांची तत्वपालनाविषयीची आग्रही वृत्तीही विक्रेत्यांच्या अंगी पूर्णपणे बाणली असल्यामुळे आपल्याला काय हवे याची ग्राहकाला पूर्ण कल्पना असायला हवी असा त्यांचा आग्रह असे। त्यामुळे साडीच्या दुकानात गेल्यावर ग्राहकाने नुसते " साडी दाखवा " म्हटले तर हमखास "कसली हवी ?" हा प्रश्न विक्रेता
विचारणारच। कारण याविषयी ग्राहकाने पूर्ण विचार करूनच आपल्या दुकानात पाऊल टाकायला हवे अशी त्याची इच्छा असे. आपल्याला हव्या असणाऱ्या साडीचा रंग,पोत,काठाची आणि पदराची नक्षी याची किंवा छापील म्हणजे प्रिंटेड साडी हवी असेल तर छपाईत कोणते रंग, किती फुले,किती पाने प्रति चौरस सेंमी मध्ये असावीत याची पूर्ण कल्पना ग्राहकाला असायलाच हवी किंवा शर्ट किंवा पॅंटसाठी कापड हवे असेल त्यावर डिझाइन कशा प्रकारचे व रंगाचे हवे त्याचे साद्यंत वर्णन ग्राहकाने करावे आणि आपला बहुमूल्य वेळ वाचवावा अशी दुकानदाराची अपेक्षा असे. यामागे साड्या किंवा कापडाचे तागे काढण्या आणि परत ठेवण्यात वाया जाणारा बहुमोल वेळ वाचवणे हाच साधा हिशोब असे.
या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग हे दुकानदार सामाजिक कार्यात म्हणजे भारताचे आर्थिक धोरण आणि त्याचे जगावरील परिणाम किंवा जागतिक मंदी आणि त्याचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम किंवा सामाजिक क्रांती अशा गहन विषयावर चऱ्चा करण्यासाठी करत आणि या चर्चेमध्ये ते इतके रंगत की कापड मोजतानाही ती चर्चा बंद करणे त्याना मानवत नसे त्यामुळे ते आपल्याला हवे तेच आणि तेवढेच कापड देतात की नाही यावर आपल्यालाच डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागे.कापड फाडताना त्यांचा आवेश आपण प्रतिपक्षाच्या मताच्याच चिंधड्या चिंधड्या करत आहोत असा असे.
प्रेषक कुशाग्र (रवि।, १७/०५/२००९ - १२:१७)
खरेदीचा तिटकारा हा गुण माझ्या आईकडून माझ्या रक्तात उतरला असावा।दारावर येणाऱ्या मोळीविक्याकडून बरीच घासाघीस करून मोळी किंवा बोहारणीकडून आमचे जुने कपडे देऊन एकादेदुसरे भांडे घेण्यापलिकडे काही बिचारीच्या खरेदीची मजल गेली नाही.त्यातही पैसे मोजून घेण्याचे किंवा देण्याचे काम आम्हा भावंडांनाच करावे लागे.त्यालाही एक कारण होते.त्या काळी मुलींच्या हातावर पैसा पडणे ही गोष्ट अशक्य कोटीतीलच ! एकदा जन्माच्या कर्मी बिचारीला तिच्या आजीने बक्षीस म्हणून दिलेली पावली म्हणजे आजचे पंचवीस पैश्यांचे नाणे घेऊन ती सगळा बाजार फिरली आणि काय घ्यावे याचा निर्णय करता न करता आल्यामुळे तिन ती आपल्या नऊवारी लुगड्याच्या कडोसरीला लपवून ठेवली आणि ती अगदी अचूकपणे माझ्या विधवा आत्याच्या नजरेस पडली.ही आत्या म्हणजे वडिलांची मोठी बहीण,तिच्यासमोर बोलण्याची त्यांचीही प्राज्ञा नसे मग आईला तर तो विचारही करणे अशक्य,अशात तिचा हा अपराध , मग काय विचारता,"आता काय अनुसया (माझी आई)स्वत:कारभार करू लागली ती आता आम्हाला काय विचारणार " असा इतका त्रागा आत्याने केला की त्यापुढे शाहूमहाराजानी स्वतंत्र कारभार सुरू केल्याबद्दल ताराबाई राणीसाहेबांनी केलेला त्रागाही फिका पडाबा.त्यामुळे संत तुकारामानीसुद्धा निदान दुकान चालवण्यासाठी तरी पैशाला हात लावला असेल ( हा उल्लेख समस्त वारकरी परिवाराची क्षमा मागून) पण त्या माउलीन मात्र त्यानंतर पैशाला कधी हात लावण्याचा आणि कसल्याही खरेदीचा व्यवहार करण्याचा अपराध केला नाही.
माझ्या बाबतीत मात्र असे काहीही न घडताच खरेदीविषयी असलेले माझे वैराग्य हा कदाचित माझ्या आळशी स्वभावाचाच भाग असावा।आमच्या गावात जो आठवडी बाजार भरायचा त्यातसुद्धा बाजारात मोकळ्या पिशव्या घेऊन जाणे आणि आमच्या व्यवहारचतुर भगिनींनी त्या भरून दिल्या की "फोडिले भांडार धन्याचाच माल मी तो हमाल भारवाही"अशा नि:संग वृत्तीने त्या खांद्यावरून घरी आणून देणे आणि आईच्या ताब्यात देणे एवढीच आमची म्हणजे माझी आणि माझ्या धाकट्या भावाची-( त्यानेही अगदी लक्ष्मणासारखा वडील भावाचाच आदर्श समोर ठेवला होता) भूमिका असे.आपण काय आणि कोणत्या भावाने आणतो याविषयी आम्ही इतके अनभिज्ञ असायचो की.त्यामानाने कापूस आणि मीठ पाठीवरून वहाणारी इसापाची गाढवही जरा जास्त जाणीवपूर्वक माल वहात असतील.पण त्यामुळे आम्हाला काहीही वस्तु खरेदी करून आणायला सांगण्याचे धाडस कोणी करत नसे. नाही म्हणायला वडिलांना दिवसातून एकवेळा लागणारे भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या उंटछाप विडीचे एक बंडल आणि त्याच्याकडे अधून मधून येणाऱ्या मित्रासाठी पिवळा हत्ती सिगारेट पाकीट या दोन वस्तूंची खरेदी मात्र करायला वडिलांना आमच्यापैकी कोणीही चालत असे.सुदैवाने त्या खरेदीचा चोरून उपभोग घेण्याचा मोह आम्हाला कधीच झाला नाही त्याचेही कारण खरेदी केलेली वस्तू ज्याच्यासाठी असेल त्याला एकदाची देऊन मोकळे होण्याची आमची वृत्तीच !
मध्यंतरीच्या काळात महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात एकटा राहू लागल्यावर खरेदीतील हा माझा अनुशेष भरून काढण्याची संधी जरी मला प्राप्त झाली होती.तरी त्यासाठी लागणाऱ्या दामाजीपंतांची मेहेरनजर आमच्यावर नसल्यामुळे आणि तशाही अवस्थेत जी काही आवश्यक खरेदी असे तीही पुण्यासारख्या शहरात करायची पाळी आल्यामुळे "आधीच उल्हास तशात फाल्गुनमास" अशीच परिस्थिती होती.आज पुण्याच्या बाजारपेठेत फिरणाऱ्यांना मी ज्याकाळचे वर्णन करत आहे त्यावेळच्या अतिउच्चसंस्कारित विक्रय तज्ञांची कल्पना करता येणेही जरा कठीणच आहे.आताही त्याचे काही सन्माननीय अवशेष पहायला मिळतात पण ते बरेच दुर्मीळ झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.
भारतीय टपालखात्याच्या अजबगजब कारभारामुळे कुणा वाचकाने लोकसत्तेस पाठविलेले पत्र चुकून आमच्या पत्त्यावर आले. आता लोकसत्तेस रोज एवढी पोतेभर पत्रे येतात. (आणि यात अतिशयोक्ती नाही! अन्य पत्रांनी वाईट वाटून घेऊ नये.) त्यात या पत्राची दखल घेतली जाईलच असे नाही, असे वाटल्याने आम्हीच ते येथे प्रसिद्ध करीत आहोत. कारण की पत्र मोठेच उद््बोधक आहे!! अलीकडेच रा. रा. बापू आत्रंगे यांनी लोकसत्तेच्या मुखपृष्ठाच्या किरकोळीकरणाबद्दल लिहिले होते. त्या वाक्याच्या स्मृतींना हे वाचकपत्र धादांत अर्पण…
——————————————
प्रिय संपादक, लोकसत्ता, मुंबई
विषय - लोकमानस या सदराकरीता लेख.
महोदय,मी आपल्या पेपरचा खूप वर्षांपासूनचा वाचक आहे. आमच्या नगरसेविकेने आमच्या वॉर्डात एक पेपरचे वाचनालय सुरू केले आहे. ते आता बंद पडले. पण तेथील सगळे पेपर आता शाखेत पडतात. मी तेथे जाऊन तुमचा पेपर रोज वाचतो. मला तुमचे सगळे लेख खूप आवडतात. मी पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंतचे सगळे अग्रलेख आवडीने वाचतो. बातम्यासुद्धा वाचतो.
तुमचा पेपर वाचून आम्हांस खूप नवीन नवीन माहिती मिळते. ती माहिती खूप उपयोगी असते. काही दिवसांपूर्वी तुम्ही सारेगमची हेडलाईन छापली होती. ती आम्हांला खूप आवडली कारण की आम्हांला ती मालिका खूप आवडते. आमच्या घरातील सगळेच जण ती मालिका पाहतात. गायिका लता मंगेशकर यांनी मुलांना आर्शिवाद दिला ते आम्हांला खूप आवडले. कारण की लता मंगेशकर यांच्या कॅसेटी आम्ही आवडीने ऐकतो व त्यांची गाणीसुद्धा ऐकतो. आम्हांला लता मंगेशकरांचे बाबा आणि बाळ हे सुद्धा आवडतात. त्या लहान लहान गायकांना भेटल्या ही बातमी खूप महत्वाची आहे, असे आमच्या खात्यात सगळेच म्हणाले. मी गोदरेज कंपनीत शिक्युरिटीत आहे. माझ्या कुटुंबाने सारेगमला आरया आंबेकरला चार एसेमेस पाठविले आहेत. तसेच आजची बिग बॉसची बातमीपण आम्हांला खूप आवडली. आम्ही ती मालिकापण पाहतो. पण त्याच्यापेक्षा आम्हाला चार दिवस सासूचे ही मालिका खूप आवडते. तिची हेडलाईन तुम्ही कधी छापणार याची वाट आम्ही पाहतो आहोत.
बिग बॉसच्या घरातील भाडेकरू पळून गेले हा सिक्युरिटीला मोठा धक्का आहे. सिक्युरिटी टाईट पायजे होती. आमच्या कंपनीत सिक्युरिटी एकदम कडक आहे. (कृपया हे वाक्य काटू नका. महत्वाचे आहे.)संपूर्ण देशातील सिक्युरिटीचे कसे बारा वाजले आहेत, हे तुमच्या बातमीमुळे सगळ्यांना कळले. देशाला दहशतवादाचा धोका आहे, हे पण बिग बॉसच्या बातमीमुळे कळले. याच्यावर तुम्ही एक सणसणीत अग्रलेख लिहा. काहीकाही मालिका लई लांबवित्यात. त्याच्यावरपण बातमी करायला जमली तर पाहा, कारण की त्याच्यामुळे मालिकांतला इंटरेस संपून जातो. हे समाजासाठी चांगले नाही.
चार दिवस सासूचेमधील मुख्यमंत्री कसे पण वागतात. एकदा त्यांचीपण बातमी छापा. तसेच असंभव सुलेखाला अटक झाल्यावर तिची नार्को चाचणी करण्याची गरज आहे, अशीपण बातमी छापा. ते फार महत्वाचे आहे. त्यामुळे अनेक खुन उघडकीस येतील.
मला तुमचे अग्रलेख खूप आवडतात. म्हणून कृपया माझे हे पत्र पहिल्या पानावर ठळक बातमी म्हणून छापणे, ही विनंती.चुकलं माकलं माफ करा. थोडं लिहिलं जास्त समजा.
कळावे,तुमचा नम्र वाचक.
(Thanks to चांगदेव पाटील,(Baatmidar Blog), दि. १८ नोव्हेंबर २००८)
श्री. प्रमोद मुतालिक यांची सुटका केल्यानंतर `सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधलेला संवाद…
प्रतिनिधी : पबमध्ये हल्ला केल्याने काय परिणाम झाला ?
श्री. प्रमोद मुतालिक :
१. असभ्य व गैरवर्तन करणार्या हिंदु मुलींना चाप बसला. आता त्या पबमध्ये जाण्यास व असभ्य वर्तन करण्यास घाबरतील. संस्कृती रक्षणाचे हे कार्य संपूर्णपणे यशस्वी झाले. मुलींचे पबमध्ये जाणे थांबवले पाहिजे, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सौ. निर्मिला व्यंकटेश यांनी स्वत: म्हटले होते.
२. आतापर्यंत आमचे कार्य कर्नाटकपर्यंत सीमित होते. आता या संस्कृतीच्या अभिमानी कृतीमुळे आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. माझ्या अटकेमुळे उत्तरप्रदेश, दिल्ली, कोलकाता, विजयवाडा, भोपाळ येथे सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. श्रीरामसेनेला राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रभर याविषयी चर्चा सुरू झाली.
३. कर्नाटकचे मुख्यमंत्री व राजस्थानचे मुख्यमंत्री यांना पबसंस्कृतीच्या विरोधात प्रतिपादन करावे लागले.
४. मंगळुरूच्या या घटनेने हिंदु संस्कृती वाचवण्याविषयी चर्चा सुरू झाली.
प्रतिनिधी : कर्नल पुरोहित व तुमचे काय संबंध आहेत का ?
श्री. प्रमोद मुतालिक : कर्नल पुरोहित व मालेगाव बाँबस्फोट यांच्याशी काहीएक संबंध नाही.
प्रतिनिधी : पुढचे नियोजन काय ?
श्री. प्रमोद मुतालिक : संघटनेचे राष्ट्रीयकरण करणे, सर्व हिंदु संघटनांना संघटित करणे व हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हेच कार्य आम्ही आगामी काळात जोराने करणार आहोत.
प्रतिनिधी : तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे का ?
श्री. प्रमोद मुतालिक : भाजपचे माजी उपाध्यक्ष व राजकारणातून काही वर्षांपूर्वी संन्यास घेतलेले श्री. गोविंदाचार्य व त्यांची संघटना आमच्या पाठिशी आहे. पुणे येथील हिंदुत्ववादी संघटनाही आमच्या संपर्कात आहेत.
प्रतिनिधी : कर्नाटक पोलिसांनी अटक केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती ?श्री. प्रमोद मुतालिक : कर्नाटक पोलिसांनी माझ्यावर हजार खटले भरले, तरी हिंदुत्वाचा लढा आम्ही थांबवणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसवरील नाराजी तसेच मराठ्यांचे आरक्षण अशा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या भेटीगाठीतील नेमका तपशील कळू शकला नसला तरी, भविष्यात शिवसेनेची राज्यात सत्ता आणण्यासाठी भुजबळांना गळाला लावण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून झाल्याचे कळते.रात्री नऊच्या सुमारास भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गाड्या नियोजित भेटीनुसार 'मातोश्री'वर धडकल्या. शिवसेना सोडल्यानंतर सुमारे १६ वर्षांनंतर भुजबळांचे 'मातोश्री'ला पाय लागले. त्यांच्यासोबत पुत्र पंकज, पुतण्या समीर आणि इतर कुटुंबातील सदस्य होते. भुजबळ कुटुंबियांचे स्वागत उद्धव, रश्मी ठाकरे यांनी केल्यानंतर भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. याआधी बऱ्याचदा फोनवरून बोलणे झाले असले तरी शिवसेना सोडल्यानंतर प्रथमच भुजबळ मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटले. यावेळी भुजबळांनी पुष्पगुच्छ देवून बाळासाहेबांचे आशिर्वाद घेतले. यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजळा मिळाला. राष्ट्रवादीतील भुजबळ यांच्या सध्याच्या स्थानाविषयीही चर्चा झाली. तेलगी प्रकरणानंतर भुजबळांना राष्ट्रवादीने वळचणीत टाकले होते. मात्र मधल्या काळात 'मातोश्री'शी सख्य वाढल्याने त्यांना पुन्हा पक्षात वरचे स्थान मिळाल्याविषयी यावेळी चर्चा झाली. मराठ्यांचे आरक्षण ओबीसींच्या कसे मुळावर येणार आहे, याचा पाढा भुजबळ यांनी यावेळी वाचला. राणे यांचे नेमके काय होऊ शकते याविषयी देखील भुजबळ यांचे आडाखे बाळासाहेेबांनी यावेळी जाणून घेतले. लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला फारशी ताकदीची गरज नसली तरी विधानसभा निवडणूकांच्या आधी भुजबळ सेनेत आले तर काय होईल याविषयी देखील चर्चा झाल्याचे कळते. अर्थात भुजबळ यांनी यावेळी स्वत:कडून कोणताही शब्द दिला नसल्याचे कळते.शिवसेना नेते अंधारात!शुक्रवारी रात्री खासदार मनोहर जोशी यांच्या 'ओशियाना'तील घरी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि जोशी अशी एक बैठक झाली. मात्र भुजबळ भेटीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. शनिवारी सकाळी 'मातोश्री'वर संजय राऊत, सुभाष देसाई आणि उद्धव ठाकरे अशी एक बैठक झाली. मात्र यावेळी देखील या नेत्यांना रात्री भुजबळ घरी येणार असल्याचा थांगपत्ता लागू दिला नव्हता.
गेले सहा महिने अवघ्या महाराष्ट्राच्या कानांचे प्राण बनलेल्या 'सारेगमप लिटल चॅम्प्स'च्या रविवारी सायंकाळी रंगलेल्या महाअंतिम फेरीत पाच ताऱ्यांमधून आळंदीच्या कातिर्की गायकवाड हिने महागायिका बनण्याचा किताब मिळविला.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तमाम रसिकजनांच्या मनातले ताइत ठरलेल्या या 'पंचम' स्वरांमधून 'झी'च्या सारेगमप स्पधेर्तील महागायकाची निवड ही महाकठीण गोष्ट होती. अखेर महाअंतिम फेरीतून परीक्षकांनी एकमताने कातिर्कीच्या गळ्यात महागायिकेची माळ घातली. या पाच ताऱ्यांवरील रसिकजनांच्या अलोट प्रेमाची एसएमएसरूपी मोजदाद जाहीर न करण्याचे औचित्य आयोजकांनी दाखविले. कातिर्कीबरोबरच प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि आर्या आंबेकर या चौघांनीही महाअंतिम फेरीची लज्जत उत्तरोत्तर वाढतच ठेवली.गोरेगावच्या एसआरपी ग्राऊंडवर रंगलेल्या या सोहळ्यासाठी रसिकांनी तुडुंब गदीर् केली होती. या पाचही गायकांची निवड करणारे, गाण्याची लज्जत अनुभवणारे दिग्गज कलाकार, संगीतकार, अभिनेते यांची मांदियाळीच जमली होती. कातिर्कीला दोन लाख रुपयांचे बक्षिस मिळाले. तर अन्य चौघा महागायकांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या बक्षिसाने गौरविण्यात आले. परीक्षक अवधूत गुप्ते व वैशाली सामंत यांच्या हस्ते ट्रॉफी व राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांच्या स्वरूपातील बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले. 'झी'तफेर् संगीत शिक्षणासाठी प्रत्येकास दोन लाख रुपये इतकी रक्कमही यावेळी देण्यात आली.आशा खाडिलकर, संजीव अभ्यंकर, देवकी पंडित, श्ाीधर फडके, सुरेश वाडकर या मान्यवर परीक्षकांची पारख आणि ५० टक्के एसएमएसचा कौल यांच्यावर या महाअंतिम विजेते ठरले. सहा महिन्यांच्या या सूरमयी प्रवासाचे ऑडिओ-व्हिडिओ सीडी संच तसेच 'पंचरत्न' हा आल्बम रसिकांसाठी येणार आहे........आम्ही पाचही विजेते...' या यशावरच थांबू नका, असे सांगत शास्त्रीय संगीताचा पाया मजबूत करण्याचा सल्ला श्रीनिवास खळे यांनी दिला. कातिर्कीनेही 'विजेती मी एकटी नाही. आम्ही पाचही जण विजेते आहोत', असे म्हणत स्पधेर्त वेळोवेळी व्यक्त झालेल्या भावनेचाच पुनरुच्चार केला.


