तुझे वेड लाउनी गेले ते क्षण 
मनाला भुलवून गेले ते क्षण ,
स्वतःला फसवून , जगाला चुकवून 
नकळत कुठे पळून गेले ते क्षण .....

चमकत्या गहिऱ्या डोळ्यांत गहिवरून गेलो मी 
निस्वार्थ प्रेमजाळ्यात पूर्णत: अडकून गेलो मी ,
अंतरंगास हळुवार स्पर्शून गेले ते क्षण  
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....

अवखळ पाऊस अंग अंग भिजवत होता 
खट्याळ वारा मनात प्रेमरंग उधळीत होता ,
हव्याहव्याशा  सहवासात जागीच स्तब्ध झाले ते क्षण 
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण ....

तू आली सळसळणार्या वाऱ्यासारखी आयुष्यात 
तू बहरली आंब्याच्या मोहरासारखी आयुष्यात ,
हृदयाच्या वेलीवर सहस्त्र पुष्प फुलवून गेले ते क्षण
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .... 

अचानक उमटली तुझी पाऊले एकदा दारी 
कानाकोपऱ्यात नांदली जशी लक्ष्मी माझ्या घरी ,
पाऊलखुणा हृदयात साठवून गेले ते क्षण 
तुझे वेड लाउनी गेले ते क्षण .....

तुझे वेड लाउनी गेले ते क्षण 
जीवनवाट तुझसंगे चालुनी गेले ते क्षण ,
तुझी साथ देईन , फक्त तुझाच बनून राहीन 
जन्मभर हे वचन निभवून गेले ते क्षण .....

Composed by...
SONALI 

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

ती मुलगी होती की जादू , हेच नाही कधी कळले
नजरेतून सुटलेले तीर तिच्या , हृदय माझे चिरत गेले
एकांतातील तिचं बोलण , जेव्हा कानांमध्ये गुंजत
दिवस-रात्रीचा माझ्या चैनच हिरावून नेत
कधी तिचं हसण , कधी लटक रागावण
कधी लाजून तिचं माझ्या मिठीत सामावण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

होत कधी असंही , जेव्हा आठवण तिची येते
नजरेतील भाव तिच्या , डोळ्यात माझ्या साठवून जाते
आठवणीने तिच्या , मनाला वेदना अशा होतात
शरीरातून जणू प्राणच माझे घेऊन जातात
आपल्याच धुंदीत चालण , अचानक घाबरून थांबण
कधी फुलांची माला बनून , गळ्यात माझ्या पडण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

कधीतरी मला तीच रडवेल , स्वप्नातही नव्हत वाटलेलं
दु:खावर माझ्या हसताना , आभाळ होत फाटलेल
हृदय जिला मी अर्पण केलं , दगडाचं तिचं काळीज असेल
देवदूत समजलो ज्याला , तोच माझा खुनी असेल
तिचं ते रुसण , मी तिला समजावण
निघुनी गेला तो जमाना , होऊनी एकाच क्षण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!


..............वैभव आलीम (०३/११/१०)

का कुणास ठाउक ??????
का कुणास ठाउक ??????
कधी न भेटलेले
कधी न पाहिलेले
चेहरे कधी समोर आले !!!!!!
आणि .... नकळत तेच माझे मित्रही झाले
सुखात आणि दू:खात माझ्या
ते देखिल सहभागी झाले
आयुष्याचे प्रत्येक क्षण त्यानी वाटुन घेतले
जाता जाता .... विसरणार नाही तुला ......
असेही मला सांगुन गेले
पण ........ का कुणास ठाउक ?????
आज तेच चेहरे , तेच मित्र
माझ्यापासून खूप दूर-दूर गेले
का कुणास ठाउक ???
का कुणास ठाउक ?

........ वैभव आलीम (२९-०७-०९)

कोणीतरी असावं आपलं
भरकटलेल्या वाटेवरून
हात धरून मागे आणणारं

कोणीतरी असावं आपलं
ओघळणाऱ्या अश्रुनाही
हळुवारपणे पुसणारं

कोणीतरी असावं आपलं
सुखात माझ्या सहभागी होणारं
दु:खातही मायेने सांत्वन करणारं

कोणीतरी असावं आपलं
आंधळ्या झालेल्या नेत्रांनाही
डोळसपणे मार्ग दाखवणारं

कोणीतरी असावं आपलं
अंधारातही आपल्यामागे
ज्योती बनून वावरणार

पण ..............

कोणीतरी असण्यासाठी
आपणही त्याचे कोणीतरी असावं

......... वैभव आलीम (०८-०४-१०)

तुझही नि माझही प्रीत
आयुष्यास्याच्या नागमोडी
वळणावर एक
सुरेख सुंदर सफारी

सुख दुख म्हणजे
उंन पावशाचा खेळ
त्यात प्रेम म्हणजे
 umalanaara     इंद्रधनू 
ह्यांची तर्हा चा न्यारी

कधी हसन ,कधी रागावन्न

थोडा तुझ्हा थोडा माझह
कधी लटका राग
कधी खूप खूप प्रेम
अशी एका प्रेमाची कथा सारी

सुंदर चेहऱ्यावर
हास्याचा दागिना
शालीन्तेला जोड म्हणून
सौज्याण्याचा खजिना
वरउन  तारुण्याची बहारी [3]

प्रेमाची गंध नास्रारा
स्वतात  गुंतून स्वतालाच शोधणारा
झाला कुणासाठी अधीर आज
गाऊ लागतो आज प्रेमाचा नजराणा
हि प्रेमाचीच किमया सारी [४]

आता सगळं सगळं आठवतयं........................
चंद्राचा उजेड देहाच्या ओंजळीत पडल्यामूळे बेभान चालण्यार् या दोन साउल्या.........एक तुझी नी एक माझी......खरं तर त्या दिवशी सिनेमेला जाण्याच ठरवलं होत पण रस्त्याच्या परद्या वर आपल्या साउल्यांनी असा काही खेळ मांडला की शेवट तो चन्द्र सुद्धा कंटाळून निघून गेला आणि उषाच्या हाती घरी जाण्याचा निरोप पाठवला.........

कॉलेजमधे नेहमी गैरहाजर असणारे समीर आणि सलील दोघेही त्या दिवशी नेमके before the time आले होते. समीर तुझ्या केसांना अगदी अलगद जोपाऴया वर बसवून झुलवत होता आणि सलील दिवसभर तुझ्या चेहऱ्यावर पडलेल्या भास्करच्या नजरेची खबर घेत होता ...........

त्याच दिवशी मी माझ्या ह्या 5 फूट 7 इंची देहाला तुझ्या त्या 200 सेन्टीमीटरच्या ह्रुदयात प्रवेश मिऴविण्याची परवानगी मागितली होती. पण भौतिकशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून तू एवढेच उत्तर दिले की " सेन्टीमीटर कुठे आणि फूट कुठे?????????"............................................

आता आम्ही राहिलो भावनेच्या शाळेचे भोळे विद्यार्थी!!!!!!!!!!!!!!!!! ही अशी unit match करण्याची सवय कुठे असते ग आम्हाला????? mood झाला तर कधी चंद्राला पण गिळतो तर कधी सूर्यावर जाउन क्षणात पुन्हा धरतीवर फिरतो.

एकदा तूच बोलली होती देह हा electrons , protons वगैरे वगैरे नी बनलेला असतो. म्हणून मग अस केलं की माझ्या जिवाला electrons मधे ओतला आणि नंतर मग माझे ते प्रेमाचे electrons तुझ्या त्या गुलाबी ओठां पासून एक इंच डावीकडे नी दीढ इंच खाली असलेल्या 1 मिलीमीटर diameter च्या काळ्या तिळावर थडकावले आणि तुमच्या भौतिकशास्त्रा प्रमाणे माझी " प्रेम energy " तुझ्या त्या तिळात transfer झाली..

आणि तेव्हा कुठे हा 5 फूट 7 इंची देहाला माझा 0.01 सेन्टीमीटर चा मित्र उचलून त्या तुझ्या 200 सेन्टीमीटर च्या हृदयात ठेवून आला...........

आता हे सगळं सगळं आठवतयं........................

--आमोद कुलकर्णी ( स्वरचित )

फुलांचा उखाणा
चाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मी चाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मीचाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मी फुलांचा उखाणा
(अनुपमा मुंजे.- ४.१२.२०११) 

घोटाले घोटाले घोटाले घोटाले
काहो करता घोटाले
स्वार्थी लोकान्नो कारे
करता देशाचे वाटोले

टीच भर पोटा साठी
नका लागु भ्रष्टाचा राच्या पाठी
एवढ करता कोना साठी
काय लागत जगण्या साठी
पापाचे पापाचे पापाचे नका भरू गाठोडे
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले

आपला देश आहे महान
जगात त्याला मान
गाउया त्याच गान
नका करू अशी घान
नका रे नका रे नकारे करू अस वाटोले
का रे करता तुम्ही असे घान घोटाले

भल्या मोठ्या विश्वा साने निवडून आम्ही देतो
गोड गोड तुमचे गाने मुखाने आम्ही गातो
स्वच्छ संस्कृतीचे स्वप्न आम्ही पहातो
नकारे नकारे नकारे जाऊ देऊ असे तडे
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले
घोटाले घोटाले घोटाले कारे करता घोटाले
कारे करता तुम्ही असे देशाचे वाटोले

.......भारत माता की जय ........
"तरुणाननो एक जूट व्हारे
बंद करुया भ्रष्टाचाराचे वारे "
विनोद शिंदे - vinoda shinde @yahoo.co.in
दिनांक -३/११/२०११

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।। प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।। समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।। भारत माता की जय ।।

किल्ले रायगड मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये एक खास ओळख धरुरू आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १७व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवण्याचे निश्चित केले. महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला.अफ़झलखानाच्या स्वारीच्या काही महिने अगोदर त्यांनी रायरीचा किल्ला यशवंतराव मोरे याच्या कडून जिंकून घेतला आणि रायरीची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेउन येथे बुलंद किल्ला बांधावा असे मनी घेतले. महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा."

महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज व दोन-नाणे(नाना)दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच. गडावर जाण्यासाठी सध्या रोप वे ची सोय आहे.




पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा "नाचणटेपाची गुहा!' नवे ट्रेकर्स या गुहेला "गन्स ऑफ पाचाड' असे म्हणू लागले आहेत.



जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.



या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणार्या थंड वार्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण येथे भेट देणार्याला पडते.




शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायर्या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे.

अंजनवेल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावानेपण ओळखला जातो.


माहिती

हा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला अंजनवेल गावाच्या सीमेवर आहे.


इतिहास

हा किल्ला सोळाव्या शतकात विजापूर च्या राजाने बांधला व इ.स. १६६० च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले. या ठिकाणी सापडणार्या एका दगडावर मात्र इ.स. १७०७ हे वर्ष व बांधणार्याचे नाव सिद्दि साट असे लिहिलेले आढळते.

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस
आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे.

1) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे
आयुष्याचं सोनं होतं.
2) आयुष्यात
भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
3)दु:ख कवटाळत बसू नका; ते
विसरा आणि सदैव हसत रहा.
4) आयुष्यात
काही करून दाखवायचे असेल तर आपण काय
आहोत ? यापेक्षा आपण काय होऊ
शकतोयाचा विचार करायला हवा, जगात
अशक्य काहीच नसतं.
5)मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत
नाही , हे जितकं खरं तितकेच
त्या प्रगतिचामार्ग दाखवीत नाही, हे
ही खरं.
6) गंजण्यापेक्षा झिजणे
केव्हाही चांगले !यशाजवळ
पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट
नसतो .
7) आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त
एक टक्का आणि परिश्रमाचा भाग
नव्याण्णव टक्के असतो .
8) आपण
वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू.
आपला पतंग मात्र निश्चितच
नियंत्रितकरु शकतो
.9)तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ
कराल तर त्यातून तुम्हालापरमेश्वर
दिसेल .
10) थोरांचे सदगुण घेणे हीच
त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
11) थोर काय अगर सामान्य काय !
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज
ही असतेच .
12) दुर्बल व्यक्ती एखादे
उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु
लागते तेव्हा धाडस वसाहस हे गुण
तिच्यात आपोआप येतात .
13) दु:ख
विभागल्याने कमी होते आणि सुख
विभागल्याने वाढते .



असे मित्र असावेत ......

अनेक पाऊलं चालत गेलो..
धुक धुकं सारं धुसर होते
मनातली कोडी सोडवत बसलो...
पुढे वळण वाढतच होते

आज मला आठवतात
ते सारे मार्ग मी चालून गेलो....
तू सोडून गेलीस अन "मी" हरवलो...
अश्याच येत्या प्रत्येक वळणांवर
त्या आठवणी अशाच साठवतात..

दिवस तास मिनीटे सेकंद
चालत जातात चालत जातात
उंच सरळ रूंद अरूंद
आयुष्यात वळणं येतच राहतात

अनेक माणसं भेटत आली...
अनेक माणसं सोडून गेली..
एकच गोष्ट सारखी होती...
मी...मीच.. अन मीच.........
त्या वळणाच्या वाटेवर

.- शशांक नवलकर

पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. पुण्याच्या उत्तर भागात असलेल्या खेड तालुक्याचे मुख्य गाव म्हणजे राजगुरूनगर. क्रांतिकारक राजगुरू यांचा जन्म येथे झाल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ खेडचे नाव बदलून राजगुरूनगर असे ठेवण्यात आले.

राजगुरूनगर हे तालुक्याचे गाव असून ते पुणे-नाशिक या महामार्गावार वसलेले आहे. भिमा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले राजगुरूनगर आजूबाजूच्या महत्वाच्या गावांशी गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडले गेले आहे.

शिवकालामध्ये मोगलांची सरहद भिमा नदीपर्यंत भिडलेली होती. भिमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भिमाशंकर जवळ होतो. तेथून ती वहात राजगुरूनगर येथे येते. या भिमा नदीच्या खोर्‍यामध्ये एक दुर्गरत्न विसावलेले आहे. हे दुर्गरत्न म्हणजे किल्ले भंवरगिरी उर्फ भोरगिरी.

भोरगिरी नावानेच परिचित असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला भोरगिरी नावाचे लहानसे गाव आहे. राजगुरूनगर पासून साधारण ५५ कि.मी. अंतरावर भोरगिरी आहे. भोरगिरीला जाण्यासाठी राजगुरूनगर वरून एस.टी. बसेसची सोय आहे.

राजगुरूनगर-भोरगिरी हे साधारण अंतराला दीड एक तास लागतो. या भिमानदीच्या खोर्‍यात चास-कमानचे धरण आहे. या धरणा जवळूनच भोरगिरीचा मार्ग जातो. या खोर्‍यात आपण जसे जसे आत जातो तसा तसा निसर्ग बदलत जातो. पावसाळ्यानंतरच्या कालावधीत खळाळणारे ओढे आणि धबधबे म्हणजे नेत्रसुखाला पर्वणीच असते.




भोरगिरी गावात पायउतार झाल्यावर प्रथम परतीच्या बसची चौकशी करून घ्यावी. भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून ६८६ मी. उंच असला तरी पायथ्यापासून जेमतेम दिडशे मी. उंच आहे. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. डोंगर डावीकडे ठेवून वळसा मारून गडाची वाट जाते. या वाटेने गडावर जाता येते.

गडावर गडपणाचे अवशेष तुरळक आहेत. गडाच्या दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. गडाच्या माथ्यावर पाण्याची टाकी आहेत. मात्र येथून खाली असलेल्या कोरीव गुहेकडे उतरण्यास वाट नाही. माथ्यावरून थोडे खाली उतरून आडवे चालत आल्यावर या कोरीव गुहेपाशी पोहोचता येते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला तासाभराचा अवधी पुरेसा आहे.

आल्यावाटेने उतरून भोरगिरी गावाजवळ असलेले भिमेचे पात्र गाठावे. या काठावर कोटीश्वराचे मंदिर आहे. मंदिर प्राचीन असल्याचे तेथील अवशेषांवरून दिसते. हा परिसर अतिशय रम्य आहे. येथून राजगुरूनगरला परतता येईल. अथवा दोन तास चालत गेल्यास भिमाशंकरचे मंदिरही पहाता येईल. भिमाशंकर वरूनही घोडेगाव मंचर मार्गे पुन्हा राजगुरूनगरला येता येते.

हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनार्‍यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड हे होय.

हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनार्‍यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते.

हर्णेच्या किनार्‍यावर दक्षिणेकडे टेकडीवजा एक भुशिर घुसलेले आहे. या लहानश्या टेकडीवजा भुशिरावर कनकदुर्गचा किल्ला उभा आहे. कनकदुर्गाच्या पुर्व बाजुला मच्छिमारांच्या असंख्य नौका दिसतात. या नौकांमधे जाण्यासाठी कनकदुर्गाला लागुनच धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर जाण्यासाठी पुलासारखा रस्ता केलेला आहे. या रस्त्यावर चालत गेल्यावर कनकदुर्गाच्यावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍यांचा मार्ग आहे. या पायर्‍यांच्या बाजुलाच भक्कम बांधणीचा बुरुज आहे. काळ्या पाषाणातील हा बुरुज म्हणजे कनकदुर्ग... हा पुर्वी किल्ला होता याचा साक्षीदार आहे. पायर्‍यांच्या मार्गाने आपण पाचच मिनिटांमधे कनकदुर्गावर पोहोचतो. गडाच्य माथ्यावरच्या इमारती आता नष्ट झाल्याअसून त्याभागात दिपगृह उभे असलेले दिसते. कनकदुर्गावरुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंतचा सागरकिनारा दिसतो. पश्चिमेकडे अथांग सागराची मधुन मधुन चमचमनारी किनार आणि सागराची गाज आपल्या मनाला धडकी भरवत रहाते. या पार्श्वभूमीवर दिमाखात उभा असलेला फुलपाखराच्या आकाराचा सुवर्णदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडै फत्तेदुर्गाची टेकडी मच्छिमारांच्या वस्तीने पुर्णपणे घेरलेली दिसते. कनकदुर्गावरील गडपणाचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे आपली गडफेरी १५ ते २० मिनिटांमधे आवरते.




कनकदुर्गाकडून परत फिरल्यावर डावीकडील टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग असल्याची मनाची समजूत घालून पुढे निघावे लागते. मच्छिमारांच्या वस्तीने व्यापलेल्या फत्तेदुर्गावरचे अवशेष केव्हाच लुप्त झालेले आहे.

फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्यदरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करुन आहे. हे भव्य प्रवेशव्दार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरुन आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरुन डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशव्दार आहे. हे प्रवेशव्दार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशव्दाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामधे किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा रस्त्यावर येवून नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामधे प्रवेश करावा लागतो. सध्या कोणा हॉटेल व्यवसायीकाने गडाचा ताबा घेतला आहे. त्याने दारावर चौकीही उभारली आहे. तेथील रखवालदाराची परवानगी घेवून किल्ल्यामधे जाता येते. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करुन त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमबाजुला सुवर्णदुर्गाचे दृष्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थमधे आहेत. त्यामधील एकात पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामधे महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नसल्यामुळे गड पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो.

जर आपण संध्याकाळच्या वेळेस येथे असू तर कनकदुर्गच्या किनार्‍यावरील मासळी बाजार अवश्य पहाण्याजोगा आहे. अर्थात खवय्यासाठीतर ही सुवर्णसंधीच होय.

पोलीस : काय हो, तुम्हाला धडक देणार्‍या त्या कारचा नंबर बघितला का किंवा तुम्ही कार मधल्या कोणाला बघितल का ?

नाही, पण मला खात्री आहे कार चालवणारी माझी सासू होती.

पोलीस : तुम्हाला असं का वाटतय ?

मी माझ्या सासूच्या हसण्याचा आवाज चांगला ओळखतो

एका खानावळीवर पाटी होती खानावळ "घरची आठवण "

एक दिवशी मेम्बर ओरडला " मालक. भात कच्चा व पोळी करपलेली आहे
मालक म्हणाला उगीच नाही नाव घरची आठवण ठेवले


राघुरावांकडचा नळ अचानक गळायला लागला.

त्यांनी प्लंबरला फोन करून लगेच यायला सांगीतले त्यावेळेस सकाळचे ११ वाजले होते.

प्लंबर यायला दुपारचे ५ वाजले. त्याच्याकडे राघुराव फारच वैतागुन बघत होते.

प्लंबर म्हणाला,"काय झाले."

"काही नाही. घरात पाणी साठले आहे, तुझी वाट बघता बघता मी पोहणे शिकून घेतले.", राघुराव म्हणाले.

सांता एके दिवशी सुट्टी बघून आपल्या कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळायला घराच्या अंगणात बसला.

त्याच्या मित्राने समोरुन जाताना सांता कुत्र्यासोबत बुद्धिबळ खेळत असल्याचे बघितले व तो त्यांचा डाव बघायला तेथे थांबला.

"सांता, माझ्या पहाण्यातला हा सर्वात हुशार कुत्रा आहे.", मित्र म्हणाला.

सांता, " नाही रे, पाच डांवां मधले तो फक्त दोनच डाव जिंकलाय."