मी माघार घ्यायला शिकलोय
पिउन तुझ्या आठवानिना
या डोळ्यातल्या आश्रुना
जागा देऊन शकलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
ह्रुदयाचे झाले तुकडे
प्रेमाच्या वलवंटात इकडे
ते वेचायला कंटाळलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
हजारदा येउदे समुद्र लाटा
त्याचीच एक झालोय छटा
कण कण आता विराघळलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
झगडत नहीं कलोकाशी
स्वतहाला त्याच्या कुशी
सामावून जायला निघालोय

मी माघार घ्यायला शिकलोय
तोडून आनायाचे होते तारे
आकाश झाले रीते सारे
एक टक बघत बसलोय


मी माघार घ्यायला शिकलोय
सारीपाट हा जीवनाचा
कस काय मोडायचा
आठवनिना तुझ्या मुकलोय

मी माघार घ्यायला शिकलोय.........

--------- @/\/\it

एक सरळ आणि साधासूधा मुंबईकर

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे


राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची

स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची

परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी

स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी

वंदे त्वामहं यशोयुतां वंदे


गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली

स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली

तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची

स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची

वंदे त्वामहं यशोयुतां वंदे


मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती

स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते

स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते

वंदे त्वामहं यशोयुतां वंदे


हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते '

तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण

तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते

वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

बरं झालं

तुझा विचार होता म्हणून सार केल

घोर अंधारातून तुला बाजूला नेल

माझ काय दुःख वाटेत होत ते

तुझ्या वाटणीच नव्हत

बर झाल तू गेलीस ते....

अजुनही माझ्या श्वासात तु अडकलास

माझ्या गात्रात तुच बरसतोय

पाउस बनुन...

थेम्बथेम्बात तुच हसतोस

अश्रु बनुन...

दुरावा तर नाहीच अजून

तरी म्हणतोस

"बर झाल तू गेलीस ते "


कल्पी जोशी १३/०५/२००९

माझ्या मनी स्वप्नांचे आभाळ सांडलेले

पदरात चन्र्द तिच्या , वांझोटी रात्र गेली !


आक्रंद फोडतो हा छातीतला नगारा

छद्मी ते हासले रे, करपून रात्र गेली !


पालखीत आल्या घरी या जळजळीत लाटा

फुलला तो सूर्य त्यांचा ,पहाटेच रात्र मेली !!


"बर झाल ती गेली "


oceanheal

उपाय नाही म्हणुन मनाला समजावतो

तू परत येणार नाहीस हे स्वतालाच बजावतो

माज्या चूका शोधत राहतो

अन्तरमुख होउन मनाशी म्हणतो

"बर झाल तू गेलीस ते".......


वेदनेच्या मी छेडून तारा ,आळविल्या यातना जेव्हा...

दाद देऊन दर्दी म्हणाले ..".व्वा! काय सुरेल गीत आहे!"

वरातीत तिच्या बेधुंद नाचून , मी निर्जीव परतलो घरी...


सजीव होऊन अंगण हळहळले... "त्यागातच खरी प्रीत आहे!''



हरलो जरी प्रत्येक डाव, ह्या रडव्या जगाबरोबरचा...


अखेरपर्यंत खेळलो खऱ्या दमाने ...ह्यातच माझी जीत आहे!



बहराबरोबर थिरकत्या दुनियेच्या, सापडलो मी पायदळी...


हरकत नाही!पालवी सुकली की पाचोळा म्हणण्याची रीत आहे!



निघताना म्हणालीस तू..." पुढच्या जन्मी नक्की भेटू..."


हा जन्मच वाया मग ! आता मरणातच माझे हीत आहे!



बधीरतेवर फीदा होऊन माझ्या, मद्यही पडले फिके...


निराशेच्या भरात ,आजकाल मदीराच मला पीत आहे!



कैफियत मी ,माझी ,मलाच सांगतो सराईतपणे...


इथे जगही तटस्थ , अन स्वतः 'देव' तिराईत आहे!!!



गौरी सावंत .





नवीन पहाटे ....



सरलेले दिवसाही...

इतिहास जमा होतात।

उश्ाहाकालेच्या उंभारट्यावर्ती॥

डोळेही नवीन स्वप्ना पाहतात॥



विरालेल्या सुरा नंतर...

शब्द तेच रहातात॥

मनालाही जसे॥

नवीन सूर गावस्तात॥



स्मृतींच्या धुरात विस्म्ृत होऊन॥

मनाच्या भटकंती ही कधी॥

चालता चालता॥

नवीन पायवाट शोधतात॥



नव्हते जे आपले कधी॥

त्याच्या गमवण्याचे दुखही॥

उरलेल्या क्षणानाच॥

आपले मानतात॥



होते ती नवी पहाटे॥

मिळतात विरालेले सूरही॥

परत होता मन ओलेचिम्ब

भिजून स्वप्नांच्या धुंद पावसात...

प्रियंका

ह्रदयाच्या ठोक्यांची धडपड

त्याला जगविण्याचा प्रयत्न करत होती...,

मात्र ह्रदयात सलणारी तिची वेदना

त्या ठोक्यांची तक्रार करत होती...



मनात दडून बसलियेस तू,

म्हणूनच हृदययंत्र चालतय.


तुझे खरच प्रेम आहे,


म्हणूनच ते ही धडधडतय.


© अमोल भारंबे (२००८).


सुखणार आहे हे फुल

देताना ही माला माहित होते

तरी ही तुला ते दिले

कारण माझ्या प्रेमाचे ते गीत होते

गीत

तुझे आपल बर आहे

स्व:ताशीच लपंडाव खेळतोस

वेडा झालास की आठवण येते

आठवण आली की वेडा होतोस



का तू असा स्व:तालाच फसवतोस

बोलायला पुन्हा मोकळाच



"बर झाल तू गेलीस ते "

kadambari