एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ..!
तिकडून आली बस...
बसमध्ये बसलं,
तिकीट नाही काढलं....
तिकीटचेकरने पाहीलं,
चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!

भंगली ती प्रीत आता
संपले संदर्भही;
थांबलेली तू तिथेच
आणि मी मात्र प्रवाही...

वेगळाळल्या आज वाटा
आता एकटीच पाऊली
संग सुटे सकलांचा
हरवलेली सावली...

सुगंध जपला तुझ्याचसाठी
झाले फूलच त्याला पारखे
मृत भावना या मनाला
आता उन-पाऊस सारखे...

वचन देते मी तुला रे
भंगलेला शब्द तो
बंध जरी तो मोडलेला
पण वेदना मी साहतो...

आज डोळ्यांत अश्रु आले
पुसून टाकल्या खूणा
जिंकण्यासाठी सिद्ध झालो
जरी एकटा मी पुन्हा...


- श्रेयस

तिच्या बाहुपाशात मला आहे सामायचं
जगुन झाल्यावर पुन्हा एकदा, तिच्यासमवेत जगायचं,
आकाशाच्या खिडक्यांतुन, खाली डोकावुन पहायचंय
मृत्यु समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

निरोप घेऊनी शेवटचा, दूर निघुनी जायचंय
जीवनातील सुख-दुःखांना, पृथ्विवरच विसरायचं,
मृत्युच्या रम्यनगरीत, मला आहे हरवायचं
"तो" समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

मी निघून गेल्यावर मात्र, कोणी नाही रडायचं
पीडा दूर झाली म्हणून, मनसोक्त हसायचं,
आठवण आल्यास माझी, हळुच आकाशाकडे पहायचं
मरण समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

पण मलाही अजून, थोडं जीवन जगायचयं
सुख कुठे असतं का, हे नीट तपासायचयं
ज्याला मी हवा असेन, असं मन शोधायचयं
मृत्यु समोर येताच, त्याला थोडा वेळ थांबवायचयं..... त्याला थोडा वेळ थांबवायचयं....

~~~ ~~~ ~~~ सुरज ~~~ ~~~ ~~~

प्रभावती देवीची बहीण मानल्या जाणाऱ्या जाखादेवीचे मंदिर प्रभादेवीपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथील स्थानिक रहिवासी अनंत विठ्ठल कवळी यांनी जवळपास १०० वर्षांपूवी या देवीचे मंदिर बांधले. ते राहत असलेल्या कवळी वाडीतील एका तळ्यात ही मूतीर् सापडली. काहीशा भग्न अवस्थेत असल्याने वेगळ्या संगमरवरी मूतीर्ची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली. ही मूतीर् ज्या बंदिस्त चौथऱ्यावर आहे , तेथे मूळ स्वयंभू मूतीर्ही आहे. या देवीचाही पौष पौणिर्मेला सात दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.

बाराव्या शतकातील बिंबिसार राजाची कुलस्वामिनी असलेल्या प्रभावती देवीचे मूळ मंदिर गुजरातमध्ये होते. मुघलांच्या मूतिर्भंजनापासून देवीला सुरक्षित ठेवण्यासाठी कर्नाटकात आणि तेथून माहीमच्या खाडीत आणून ठेवण्यात आले असे मंदिराचे पुजारी जयवंत जोशी सांगतात. शाम नायक या पाठारे प्रभु जातीतील व्यक्तीने १७१४ मध्ये हे मंदिर बांधले. मंदिरासमोरील विहिरीत नायक यांना ही मूतीर् सापडली. प्रभावतीच्या एका बाजूला चंडिका आणि दुसऱ्या बाजूला कालिका देवीची मूर्ती आहे. संवत्सर १७७१ मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा करतेवेळी कोरण्यात आलेला मोडी लिपीतील पुरातन शिलालेख मंदिराच्या प्राचीनतेची ग्वाही देतो. पौष पौणिर्मेला सात दिवस चालणारा सप्ताह हा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव! मंदिर परिसरातील दीपस्तंभ यावेळी प्रज्वलित केला जातो. येथे भरणारी मोठी जत्रा आणि तेथे मिळणारा मालवणी खाजा हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.

वरळी कोळीवाड्यातील प्रमुख देवस्थान म्हणजे गोलफादेवी! उंच टेकडीवर असलेले हे मंदिर १२ व्या शतकात बिंबराजाने बांधल्याची आख्यायिका आहे. गोलफादेवी , साकबादेवी आणि हरबादेवी अशा तीन मूर्ती मंदिरात आहेत. सौम्य रूप असलेल्या गोलफादेवीचा उल्लेख पुराणांमध्येही आढळतो. पौष शाकंबरी पौणिर्मेला भरणारी देवीची यात्रा , चैत्र शुद्ध अष्टमीचा भवानी उत्पत्ती महोत्सव आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत चालणारा शारदीय नवरात्र हे देवस्थानातील तीन महत्त्वाचे उत्सव! कोळी , भंडारी आणि ईस्ट इंडियन या जमाती देवीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिराचा जीणोर्ध्दार सुरू असून लवकरच ते नव्या वास्तूत दर्शनासाठी खुले होईल असे जीणोर्द्धार समितीचे अध्यक्ष विलास वरळीकर यांनी सांगितले.

एकाच शिळेतून कोरण्यात आलेली तुळजाभवानीची मूर्ती हे वैशिष्ट्य असलेल्या पाचपाखाडीतील तुळजाभवानीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज शिवेंदराजे भोसले यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. सन १६५८ मध्ये तुळजापूरला भवानीदेवीची घटस्थापना दुपारी सूर्य माथ्यावर बारा वाजता तुळजापूराता केली होती. तोच योग ठाण्यातील प्रती तुळजापूर मंदिरात साधण्यात आला.

या दोन देवळांच्या शेजारीच अंबामातेचं देऊळ आहे. ही देवी ' व्याघ्रेश्वरी ' म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. पूर्वी मध्यरात्री नित्यनेमाने एक वाघ या देवळात येत असे अशी आख्यायिका आहे. इथेही अश्विन महिन्यात विजयादशमीपर्यंत मोठी जत्रा भरते. अष्टमीला इथे मोठा होम केला जातो.

एक मनुष्य खापरात चणे भाजत होता. तेव्हा ते चणे फडफड करून उड्या मारू लागले. ते पाहून
तिथे असलेला एक मठ्ठ डोक्याचा मुलगा, 'काय मूर्ख आहेत ते चणे. यांचं अंग भाजतं आहे
आणि त्यांना गाणं सुचतं आहे

अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य हास्यास्पदच ठरतो.

परळगावातून शिवडीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना डोंगर फोडावा लागला होता. तो फोडत असताना ९ ऑक्टोबर १९३१ रोजी १० फुटी शिळा सापडली. हीच शिळा पुढे ' बारादेवी ' या नावाने प्रसिद्ध झाली. वास्तविक ही सहाव्या शतकातली शिवाच्या दुमिर्ळ मूर्तींपैकी एक मूर्ती आहे. यात शिवाच्या एकूण सात प्रतिमा असून त्याभोवती पाच ' गण ' असून ते वाद्य वाजवताना दाखवण्यात आले आहेत. तरीही ग्रामस्थांनी याला ' बारादेवी ' असं नाव दिलं. कालांतराने चंडिका देवीच्या मंदिराच्या बाजूलाच एक मंदिर बनवून त्यात या मूतीर्ची स्थापना करण्यात आली. नवरात्रादरम्यान ' चंडिकादेवी ' च्या देवळात होमहवन व इतर पूजाअर्चा केली जाते. ' बारादेवी ' ची फक्त पूजाच केली जाते.