मनाचा लगाम जरी,

असे बुद्धीच्या हाती...

बुद्धीस छळत राही,

मन हे महाप्रतापी...

निश्चयाला सिद्धीस,

मन जाऊ देत नाही...

मन, ह्रदयाची मैत्री
बुद्धीची त्याला हरकत
मी सापडले कात्रित
देह सोडून जाइन
म्हणतय मला मझ मन!!
@रजनी.. १८.३.०९ पाचोळी!!!

असून मी नसल्यासारखा,
अश्रुविना मी रडल्यासारखा.

जेंव्हा हसतेस तू मला ज़ुरताना पाहून,
तेंव्हा वाटत,काश असतो मी तुज़यसारखा.

डोळ्यात तुज़या खूप प्रश्ना दडलेले,
नि मी मालाच विचारलेल्या एका प्रश्णासारखा.

नोचले अंगा नि अंगा प्रत्येकानी माज़े.
सांग ना,आता का वागू मी माणसासारखा.

त्या मिराने केले ते प्रेम आज कुठे,
नाही मी मीरा आहे आणि नाही मी कृष्णसारखा.

तू समजू शकणार नाहीस कधीच मला,
पार जाळून ज़ल्यावर मी थोडासा विज़ल्यसारखा.

निशब्द(देव)

एक अनोळखी मुलगा येईल, तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भाळुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्य आहे, तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील....

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखय म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नास मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवनभराच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील....

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण..........एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील....

निशब्द(देव)

मन उदास उदास
होते माझे , तुझवीण
मन व्याकुळ व्याकुळ
होते माझे , तुझवीण
मन अकांत अकांत
करते माझे , तुझवीण
मन हुर हुर
हुरहुरते माझे , तुझवीण
मन ढसा ढसा रडते
अड़ते माझे , तुझवीण
मन एकटे एकटे
असते माझे , तुझवीण
मन बेधुंद बेधुंद
रहाते माझे , तुझवीण
मन क्षण क्षण
तरसते माझे , तुझवीण
====गीत १३/४/०९ ====

संपली शेवटची आश्या
तुझ्या येण्याची
वेळ झालिये आता
माझ्या जाण्याची
एकच इच्छा आता
एकदाच जाणवावी
कदर तुला माझ्या प्रेमाची
आणि थोडी फार जाणीव व्हावी तुला
माझ्या वाट पाहण्याची

gєєт 6/3/09

प्रतेकाच्या मनात एक मस्तानी असते,

अरे हऴु ही गोष्ट फक्त स्वतःशी बोलायची असते.

लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते,

आपली मस्तानी कोनालाच सांगायची नसते.

लोक म्ह्ननतात हा व्याभीचार आहे,

जानुन बुजुन केलेला एक अवीचर आहे,

बोलनारे लोक खोटारडे असतात्.

स्वतः पासुन सुद्धा काही तरी लपवत असतात्,

करतील तरी काय़ सगऴेच बाजीराव नसतात्.

लोक नेहमी असेच वागतात,

बाजीरावाचे प्रेम ग्रेट म्ह्ननतात,

तुमच्या आमच्या चरीत्र्यावर शींतोडे उडवतात्,

येता जता नैतीकतेचे डोस पाजतात्.

प्रतेकाला ठाऊक असतं मस्तानी आपली होनार नाही,

सगळ्यांचेच नशीब काही तेवढे थोर नाही,

तरीही आपली मस्तानी जपायची असते,

मनाच्या कपप्यात खोल खोल दडवायची असते.

आज आता गाव हे सोडू कसा?
राहते जे अंतरी मोडू कसा?
वाहलेल्या भावनांचे नीर झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

खीडाकीला टेकून बसतांना ज़रा
वाहता वारा अडवलेला बरा
सोडला नि:श्वास आता खूप झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

गायचे जे स्वप्न ते गाणे जुने
मोजले मी सप्तकाचे स्वर उणे
सावळ्या नेत्रात माझ्या पूर आले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले..

जे मला घडवायाचे आहे पुन्हा
जे मनी रुजवायाचे आहे पुन्हा
ते जुने संस्कार आता दूर झाले
विंधलेल्या काळजाचे सूर झाले...

("विंधलेल्या काळजाचे सूर झाले..." ही ओळ माझी नाही. क्षमस्व !!)
: अम्बरीष देशपांडे

रोजचंच रुटीन,
सारी तीच कामं,
तेच ऑफ़िस,
तीच सारीजणं...तरिसुद्धा,
आज दिवस एकटा वाटतोय...

एकटं असलं ना की,
विचारांना तेवढंच फ़ावतं..
न बोलावताही,
येतात आगांतुकासारखे
आणी
घर करून बसतात,
मनात...विचारांच्या ह्या चक्रात असतांनाच
केला त्याला फोन..
"कसा आहेस?आज कुठला शर्ट घातलाय?"मी म्हणाले..
"अगं वेडी का खुळी तू..
सोबतच राहतो ना दिवस-रात्र,मग असं का विचारतेय??"आश्चर्याने तो बोलला..
मी म्हणाले,
"बरं,मग तू सांग मला तुझा आवडीचा तो पिंक ड्रेस मी कधी घातला होता?
"जरा थबकला,बोलताना एक मोठा श्वास,
"नाहि गं आठवत,
बहुतेक कामाच्या नादात विसरलो असेन मी.."
अश्या रोजच्याच कितीतरी साध्या गोष्टी सुद्धा,
एकमेकांच्या एकमेकांना माहित नसतात...

मी बोलले,"विसरलास की वेळच मिळाला नाही बघायला??काल तर मी तो घातलेला...
नवरा-बायको आहोतपण,
कितीसा वेळ देऊ शकतोय आता आपण.."

लग्नाआधी सोबत नव्ह्तो म्हणून,
सहवास कमी वाटायचा...
लग्नानंतर,
कौटुंबिक जवाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता..अश्यात,
सोबत असून सुद्धा,
रोज बघितल्याचं देखील आठवत नाही...
पुढे मुलांमधेच इतके गुंतुन जाणार
कि एकमेकात गुंतायचं भान सुद्धा नाही उरणार...
म्हातारपणी,
सगळी आपल्याच दुखण्यांची ग्लानी..
स्वप्न बघायची तरी कधी,[?]
एकमेकांच्या सहवासाची..
दूर दूर पायी फ़िरतांना,
हाथ हातात घेऊन,
खूप खूप गप्पा मारण्याची..
ह्म्म..
आता तर अश्या स्वप्नांची ही
स्वप्नेच बघते मी...
--अवंती..

येण्यास वेळ नव्हता पाच वर्षे तुमच्याकडे
येतील नेते दारात आता, करुन रस्ते वाकडे

विझल्या साऱ्या मशाली आगही नाही कुठे
उरल्यात फ़क्त पणत्या, उरलेत काही काकडे

पाच वर्षांनी पुन्हा भरणार बाजार आता
आश्वासनांची भीक वाटत येतील ती माकडे

हात जोडुन शरण जा असतात नेते सर्वशक्ती
देव तुमचा हात जोडुन घालील त्यांना साकडे

कळतो व्यवहार त्यांना गणितही असतेच पक्के
प्रेतही मोजेल त्यांचे सरणातली लाकडे

होऊ दे अश्रू पुन्हा
डोळ्यातून तुझ्या रडू दे
ओझरता थेंब तो ओंजळीत
क्षणभर पापण्यात नडू दे..

वाटेत सुखांच्या मी
दुखांना कुरुवाळीत गेलो
अस्तीर त्या धूख्याना
आता तरी गळू दे...

वेडाचे भस्म माथी
होवोनी फकीर हिंडलो
पींड तुझ्या हाताने
झोळीत माझ्या पडू दे....

शेळ्या कोम्बळ्याची झुंज
हर्षे पहिली मे सारी
यातना भोगावयास माझ्या
माझे मलाच लढू दे...

उदयास सुर्य येईल
एक दिवस तो सुजाण
आहुती होऊनी आता
सरणावर एकटाच जळू दे...

भय कोणा नको निशेचे
कोन्डत त्या स्मशाणात
वेली बकूळ फुलांची
थडग्यावर माझ्या दरवळू दे...

ओझरता थेंब तो ओंजळीत
क्षणभर पापण्यात नडू दे...

- अगस्ती (13/04/2009)

एक आवर्त , कधीच न उमगणारे एक सत्य कधीच न उलगडलेले
एक किनारा थांग न सापड़णारा
एक अन्याय कधीच न थांबणारा
एक माणूस सतत लढणारा
एक कोळी सतत झुंज देणारा
एक राधेय स्वत्व अन् अस्तित्व विसरणारा !

प्रसाद जोशी. १४.०४.2009

एक चक्र, अविरत फ़िरणारं,
असंख्य आयामी, हळूच डोकावणारं...एक चक्र....

एक चक्र, माधवाच्या बोटावरचं,
एक चक्र, स्रूष्टीच्या नियमांवरचं,
एक चक्र, समुद्राच्या लाटांवरचं,
एक चक्र, वाहणा-या वा-यावरचं,
आणि एक चक्र, या बेटावरचं.....एक चक्र..

फ़िर-फ़िर फ़िरत राहतं,
पिर-पिर करत राहतं..
चक्राची गती गोल गोल..
विचारांची मूळं, खोल-खोल.. असं एक चक्र..

वाळूत रूतवणं पाय,जमलंच सगळ्यांना,
दगडातही रुतून राहीलं,असं एक चक्र...

हर्षदा विनया..

मी लोकांना सांगतो
"माझं आहे निवडूंगासारखं...
त्याच्यासारखी वेगवेगळी अंगे"

काहीही नसेल तरी....उगवीन मी
पाणी कमी असेल तरी....जगीन मी
कोणाचं लक्ष नसेल तरी....वाढीन मी
दुर असाल तर....हिरवा दिसीन मी
फार जवळ आलात तर....काट्यासारखं बोचीन मी
बोचून घ्यायला तयार असाल तर....जवळ घेईन मी
कुठल्याही परिस्थितीत....रंग बदलणार नाही मी
फुलं माझ्याकडे नसली तरी....हिरवागार राहीन मी
फळं दिली नाहीत तरी....प्रत्येक वाटेवर असीन मी
आणि कोणात नसलो तरी....स्वत:त नक्की असीन मी