ठाण्याचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या मामलेदार च्या मिसळीची कृती:साहित्य -कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,१ बोटभर आल्याचा तुकडातेल १.५वाट्या,तिखट १.५वाटी,गरम मसाला ४ चमचे१०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाणचवीनुसार मीठकृती -हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण व आले वाटून पेस्ट करावी,उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.पापडी कुटून घ्यावी व पाण्यात भिजत घालावी.


एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १.५ वाटी तिखटातील ३/४ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.पाणी घालून उकळू द्यावे.


उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात बारीक चिरलेले २ कांदे घालून परतावे,उरलेले तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हे मिश्रण वेगळे ठेवावे.


वरुन घालायसाठी कांदे बारीक चिरावे,उकडलेले बटाटे चिरावे.खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.


"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळी तर्री वरुन घ्यावी.वि.सू.१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो ,पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.नंतर ताक प्यावे.


अतिशय महत्त्वाचे:२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.

मोठया मोठ्या हाई-वे ला छोटे छोटे वलन..

मोठया मोठ्या हाई-वे ला छोटे छोटे वलन..

इट्स मी आता तरी व्हा सरल ..

प्रथम उडदाचे पापड भाजुन घ्यावे, त्याचा बारीक चुरा कारावा, त्यात तीखट, मीठ चवीप्रमाने घालावे.थोडेसे तेल घालावे, एकत्र मीसळावे.रोजच्या चपातीचे कणीक मळावे.छोटी चपाती लटावी, त्याच्या मधे तयार केलेले सारण भरावे व चपाती सारखे लाटावे.भाजताना आवडीप्रामने तेल/ तुप लावुन भाजावी.पापड पराठा तयार........


हौस आहे म्हणुन का

आठवण तुझी मी काढली ?

येणार नाही तरीही पुन्हा

परत परत वाट तुझी पहिली

पण...

कितीही समजावले मनाला

तरी ही आस उरी का उरते ?

"बर झाल तू गेलीस ते ............"

जिन्नस


  • मॅकरोनी (एल्बो अथवा कुठलाही आकार)

  • मॅकरोनी बुडून वर राहील इतके पाणी ती शिजवायला आणि चवीप्रमाणे मीठ

  • डिस्टील्ड व्हाईट विनेगार ३ चहाचे चमचे

  • मेयोनीज अर्धी वाटी

  • काळी मिरी पाउडर १ चहाचा चमचा

  • साखर चवीप्रमाणे (अगदी चिमुटभर आवडत असल्यास)

  • १ कांदा (बारीक चोकोनी चिरून)

  • १ टोमॅटो (बारीक चोकोनी चिरून)

  • १ वाटीभर हिरवी/लाल/पिवळी सिमला मिरची (बारीक चोकोनी चिरून) + मुठभर कोथिंबीर चिरून
    मार्गदर्शन

मायक्रोवेव्ह मध्ये काचेच्या वाडग्यात पाणी उकळात ठेवून त्याला उकळी आली की मॅकरोनी घालून त्यात मीठ घालून ती बोटचेपी शिजवून घ्यावी आणि चाळणीवर निथळत ठेवावी


एका वाडग्यात मेयो आणि विनेगार चांगले फेटून मग वरील (क्रमांक ५ ते ९) जिन्नस चांगले मिसळून घ्यावेत आणि त्यात शिजवलेली मॅकरोनी चांगली मिसळून फ़्रीझ मध्ये सेट करायला ठेऊन द्यावी


१ तासानी बाहेर काढून (म्हणजे सर्व भाज्या आणि ड्रेसिंग्स यांचा छान साद लागतो) हवे असल्यास मेयो घालून ढवळावी पण फार क्रिमी करायची नाही आणि खायला द्यावी.


टीपा


मेयोनीज आणि विनेगार मध्ये मीठ असते हे ध्यानात ठेवून सर्वात शेवटी गरज वाटल्यास वरून मीठ घालावे आणि फ्रीझ मध्ये सेट करावे


सोजन्य गूगल

सांता प्रवेशद्वारा जवळ बसुन परिक्षा द्यायला परवानगी का मागत होता ?

डोकं खाजवा.

कारण ती प्रवेश परिक्षा होती !

रात्री आल्यावर खातो मी भात............
रात्री आल्यावर खातो मी भात ...............
आणि देविकाला भरवताना राज चा मोडला हात .....

सांता पोलीसला फोनवर : हॅलो, पोलीस स्टेशन.हं बोला काय झाले ?
सांता : मला फोनवर धमक्या येताहेत.
कोण धमक्या देताहेत ? कोण आहेत ते ?
सांता : मला टेलिफोनवाले धमकी देताहेत.
काय ?
सांता : मला म्हणताहेत की, "बिल नही भरा तो काट देंगे.

हौसेने तरी आठवण करत जा
वाट पहायची हेच हाती आहे
येईन ना येईन मी कधी
प्रारब्धात माहीत नाही काय आहे
पण ..
ही मीणमीणती आस ऊरातच ऊरते

" बरं झालं तू गेलीस ते !"

Posted by Picasa





Posted by Picasa





Posted by Picasa




Posted by Picasa






Posted by Picasa

बरं झालं तू गेलीस ते
तुज़्या अठ्वनित जगाता येइल
माजी जाली नाहीस तरी
कधीतरी माजी होतीस
यातच समाधान मनाता येइल...

बरं झालं तू गेलीस ते
तुज़्या अठ्वनित जगाता येइल
माजी जाली नाहीस तरी
कधीतरी माजी होतीस

यातच समाधान मनाता येइल...

चंदूमामा आपल्या मुलाच्या टॉवरमधल्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभा होता. नजर खाली रस्त्यावर होती. मन वीसएक वर्षापूर्वीच्या आठवणीत गुंतलं होतं. आज एक मे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा. चंदूमामाच्या गिरणीत कामगार दिन काय उत्साहाने साजरा व्हायचा. मिलच्या चाळीत उत्सवाचं वातावरण असायचं. पुढारी यायचे, प्रभातफेऱया निघायच्या, भाषणं व्हायची.

चंदूमामा बघत होता... रस्त्यावर शुकशुकाट होता. सभा समारंभाची तयारी कुठेच दिसत नव्हती. कामगार दिनाची तर कुठे चाहूलच नव्हती. बरोबरच होतं. कामगार दिन साजरा करायला गिरणी कामगार राहिलाच कुठे होता? गिरण्या बंद होऊन दशक लोटलेलं. मिलची चाळ पाडून तिथे टॉवर्स झालेले आणि या टॉवर्समधून मराठी माणूस हद्दपार होऊन मुंबईच्या बाहेर गेलेला. गिरणगावातल्या परळची अप्पर वरळी झाली होती. कामगार दिन तरी कोण साजरा करणार आणि महाराष्ट्र दिनाचा उत्साह तरी कोणाला?
तेवढ्यात बेल वाजली. प्रकाश आला होता. चंदूमामाचा मुलगा प्रकाश. तो एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता. बायकोही त्याच कंपनीत. आयटी इंडस्ट्री की बीपीओ म्हणून काहितरी होतं. काय ते चंदूमामाला कधीच कळलं नाही, पण कळत एवढंच होतं की प्रकाश सायबाच्या कंपनीत जातो... सायबाच्या देशातल्या वेळेप्रमाणे काम करतो... चंदूमामाची बायको - चंद्राक्का प्रकाशला नेहमी विचारायची की पगार झाला का रे? पण प्रकाश कधीच पगाराचं पाकिट तिच्याकडे देत नव्हता.. कारण पाकिट होतंच कुठे? पगार थेट बँकेत जायचा. चंदूमामाला आठवलं, त्याच्या महिन्याच्या पगाराचं पाकिट घ्यायला दहा तारखेला तो किती उत्साहात असायचा. घरी येताना पोरांसाठी मिठाई, खेळणी असायचीच. तसा आता प्रकाशही मिठाई आणतो... आणि खेळणी खेळायला पोरं काय लहान आहेत? ती तर कॉम्फ्युटरवर खेळत असतातच की.
प्रकाश आणि त्याची बायको कधी फोनचं, इलेक्ट्रीकचं बिल भरायला जाताना चंदूमामाला दिसलेच नव्हते. त्याच्या वेळी कधीकधी गिरणीत खाडा करुन बिलं भरायला जायला लागायचं. रेशनच्या लाईनीत उभं राहिलं तर दिवससुद्धा जायचा. प्रकाश कॉम्प्युटरवरुनच सगळी बिलं भरतो.
विचार करता करता चंदूमामाचं मन त्याच्या वेळची तुलना आत्ताशी करायला लागलं आणि त्याला हसू फुटलं... चंदूमामा गिरणी कामगार होता... त्याचा पोरगा नॉलेज वर्कर होता... म्हणजे शेवटी वर्करच... पॉश कपड्यातला... कंठलंगोट - म्हणजे मराठीत टाय - लावलेला.
चंदूमामा सकाळी साडेपाचला उठायचा. आवरून सातला कामावर हजर व्हायचा. गिरणीच्याच चाळीत रहात होता... त्यामुळे ट्रेनची भानगड नव्हती. कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी. चंद्राक्का नोकरी करत नव्हती.. घर सांभाळायची. संध्याकाळी घरी आल्यावर दोघंही गप्पा मारायचे. फिरायला जायचे. प्रकाश दुपारी तीन वाजता निघायचा. परळहून बस-रेल्वे-बस असं करत करत नव्या मुंबईत कुठे नॉलेज सिटी का काहीतरी म्हणतात तिथं जायचा. पहाटे तीन-साडेतीनला परत यायचा. बायकोसहित सगळं घर झोपलेलं. सकाळी हा उठायच्या आधीच सगळं घर रिकामं. मुलं शाळेत, बायको सकाळच्या शिफ्टला... एकाच कंपनीत काम करत असूनही दिवसेंदिवस नवरा-बायको दोघांची भेटही व्हायची नाही. गप्पा काय मारताय?
चंदूमामा गिरणीत जाताना डबा न्यायचा. बायकोच्या हातचं जेवण. गिरणीतसुध्दा कधीकाळी भूक लागली तर वडा-पाव होताच. प्रकाशला घरच्या डब्याचं सुख कुठे? नॉलेज सिटीतल्या त्या कॅन्टीनमध्ये कधी सायबाचा वडापाव म्हणजे आपला बर्गर... कधी पिझ्झा... म्हणजे वरुन भाज्या पसरलेली आणि मग भाजलेली सायबाची भाकरी...आणि शेवटी थंडा ( मतलब ....? ) पिऊन दिवस काढायचा. चंदूमामाच्या गिरणीतही तसा थंडा मिळायचा पण स्पेशल पाव्हण्यांसाठी. चंदूमामाची बायको खरपूस तळलेली माशाची तुकडी द्यायची. प्रकाशच्या कंपनीत उकडलेला मासा मिळायचा म्हणे.
गिरणीत चंदूमामा साच्यावर काम करायचा. म्हणजे कापड विणतात त्या लूमवर. दिवसभर एकच काम.. तीच ऍक्शन, एकाच लयीत दिवसभर हात आणि शरीर हलवायचे....पण बाजूच्या कामगाराबरोबर गफ्पा चालू असायच्या. कधी एका साच्यावरुन दुसऱया साच्यावर जायचं. शरीराची हालचाल होती. गिरणीतल्या कामाने चंदूमामा स्ट्राँग बनला होता.
प्रकाश दिवसभर खुर्चीत बसायचा. समोर कॉम्फ्युटर... नजर मॉनिटरच्या स्क्रीनवर.... डोळ्यांना ताण... हात किबोर्डवर... कानांवर हेडफोनचा कबजा... समोरुन आलेल्या फोनवर दिवसभर बडबड... तोंडाला बोलून बोलून कोरड पडलेली... दिवसभर एकाच पोझमध्ये राहिल्याने शरीर आखडलेलं. सांधेदुखी सुरु झालेली... डोळ्यांना जाड भिंगाचा चश्मा... सारखं ऐकून ऐकून कान बधीर झालेले.... बाप रे बाप... केवढे प्रॉब्लेम.. मग त्यामानाने चंदूमामा सुखीच की.
एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर... सुखी कोण?
हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय... सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर - प्रकाश?
भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?... शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं.... खरंय की नाही?
चंदूमामा आणि प्रकाश ही फक्त प्रातिनिधीक उदाहरणं. पण आजच्या आयटी युगात, ऑनलाईन युगात, बीपीओ युगात, कॉलसेंटर युगात, ऑनलाईन किंवा कॉम्प्युटर हेल्थ हॅझार्डस किती आहेत याचा विचार सगळ्यांनी करायलाच हवा. नाहीतर आपली एक पिढीच्या पिढी कामातून जाईल आणि त्याला जबाबदार असू आपण... या पिढीचे पालक.

केलीस ना पारख माझी
दोनच शब्‍दात..." कापरे भरते "
उत्तर आता उरलंच नाही,
जणु नव्हतेच प्रेमास भरते !

जवळ होतेच तरी का ?
खरंच काही सांभाळलं का ?
समर्पण कळलं होतं का ?
चर्र होते नि कापरे भरते !

बरं झालं मी विरून गेले ते,
बरं झालं, हिरा नाही, काच ठरले ते !!

छत्रपती संभाजी महाराज
संभाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
छत्रपती संभाजी भोसले
अधिकारकाळ जानेवारी, १६८१ - मार्च ११, १६८९
राज्याभिषेक जानेवारी, १६८१

राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत

आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून

दक्षिण भारतात तंजावर पर्यंत

राजधानी रायगड

पूर्ण नाव संभाजी शिवाजीराजे भोसले

जन्म १४ मे, १६५७

पुरंदर किल्ला, पुणे

मृत्यू ११ मार्च, १६८९

वढु(पुणे)

उत्तराधिकारी राजाराम

वडील शिवाजीराजे भोसले

आई सईबाई

पत्नी येसूबाई

संतती शाहू महाराज

राजघराणे भोसले

चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)

लहानपण

संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

तरुणपण व राजकारण्यांशी मतभेद

१६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.

सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील भाऊबंदकीपुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.

मोगल सरदार

या सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला. पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष दूर होते.

संभाजीराजांचे स्वराज्य सोडून जाणे शिवाजी महाराजांना जिव्हारी लागले. त्यांनी त्यांची पन्हाळगडावर भेट घेतली. त्यांनी संभाजीराजांना शिक्षा केली नाही. संभाजीराजांची त्यांनी स्वतः समजूत काढली. मात्र संभाजीराजांच्या स्वराज्य सोडून जाण्यामुळे त्यांच्यात आणि सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि इतर मानकर्‍यांमधील दरी अजूनच रूंदावली. सोयराबाईंनी संभाजीराजांना राजारामच्या विवाहासाठी रायगडावर बोलावले नाही. शिवाजी महाराजांचे राजारामच्या विवाहानंतर काही दिवसात निधन झाले. ही बातमी सोयराबाईंनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कळवलीच नाही.

सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करायचा हुकूम पन्हाळ्याचा किल्लेदारास सोडला. त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा त्यांचा डाव होता. या अवघड प्रसंगी सरनोबत हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली. वास्तविक हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. पण संभाजीराजे हे गादीचे हक्काचे वारसदार होते. तसेच शिवाजी महाराजांच्या अखेरच्या दिवसात लवकरच औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी स्वराज्यावर हल्ला करणार अश्या बातम्या येत होत्या. अशा प्रसंगी संभाजीराजांसारखा खंबीर राजा गादीवर असणे गरजेचे होते. राजारामासारखा अननुभवी राजा अशावेळी असणे दौलतीसाठी हानिकारक ठरेल याची हंबीररावांना जाणीव होती. हंबीररावांनी सैन्याच्या मदतीने कट उधळून लावला आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना कैद केले. मोरोपंत पेशव्यांना त्यांच्या इच्छेविरूद्ध सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी कटात सहभागी केले होते.

छत्रपती

१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.

औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

१६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के, महादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.

दगाफटका

१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.

शारीरिक छळ व मृत्यु

त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास आणि धर्मांतर करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

मार्च ११, १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने स्वधर्म आणि स्वराज्यासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल त्यांना धर्मवीर ही सार्थ उपाधी दिली.

तानाजी मालुसरे.
कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती.जेंव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेंव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नात होते. त्यानी ते लग्न अर्धे सोडले आणि ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. निघण्यापूर्वी त्यानी जे शब्द बोलले ते मराठ्यांसाठी बोधवाक्य आहे, "आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे."

ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाणा किल्याचा किल्लेदार एक शूर माणूस होता. त्याच्या सोबतीला हाशमी फौज होती. कोंढाणा किल्यावरच्या तुकडीला कळू न देता चढणे दिवसासुध्दा अशक्य होते. तानजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता.मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करुन त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले.तिथे झालेल्या अतीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली.हे समजल्यावर महाराजांना खूप दुःख झाले. महाराज म्हणाले "गड आला पण सिह गेला". तानाजी मालुसरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.
राज्याभिषेक
शिवाजी महाराजांची राजमुद्रा६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.
दक्षिण दिग्विजय
साहित्यात व कलाकृतींमध्ये
शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, कलाकार, शाहिर यांच्या स्फुर्तीचे स्त्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. केवळ मराठीतच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. यातील बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे. तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतीपर लिखाणे विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात.
शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती.

पुरंदराचा तह
इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमूळे स्वराज्या धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडनचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदारला वेढा घातला.
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.
यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नवे अशी,
१. किल्ले पुरंदर
२. रुद्रमाळ
३. कोंढाणा (सिंहगड)
४. रोहिडा
५. लोहगड
६. विसापूर
७. तुंग
८. तिकोना
९. प्रबळगड - मुरंजन
१०. माहुलीगड
११. मनरंजन
१२. कोहोज
१३. कर्नाळा
१४. सोनगड
१५. पळसगड
१६. भंडारगड
१७. नरदुर्ग
१८. मार्गगड
१९. वसंतगड
२०. नंगगड
२१. अंकोला
२२. खिरदुर्ग (सागरगड)
२३. मानगड

शिवकालीन अष्टप्रधानमंडळ
शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत.
राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.

पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.
पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ. मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्‍या येणार्‍य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत अस
पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे..
मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली जाई. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रीपद देण्यास महाराजांचा विरोध होता.
सर्वत्र विजयी घोडदौड
शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले.

घोडखिंडीतली लढाई
पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वत: लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

मुघल साम्राज्याशी संघर्ष
मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य होते आणि औरंगझेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता. औरंगझेबकालीन मुघल साम्राज्यासंबाधीची माहिती देणारा वेगळा लेख आहे.
शाहिस्तेखान प्रकरण
मुघल साम्राज्याचा नर्मदा नदी पलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगझेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या प्रकरणामुळे मुघल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली. जे राजे मुघल आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले. आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजीराजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा. अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रुसैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
सुरतेची पहिली लूट
इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित होते. मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
मिर्झाराजे जयसिंह प्रकरण
इ.स. १६६५. औरंगझेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वत: आग्रा (तत्कालीन मुघल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगझेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
आग्र्याहून सुटका
शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात दैवत मानतातइ.स. १६६६ साली औरंगझेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत सहा वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्‍न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले होते. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगझेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्वाची लढाई मानली जाते. ही लढाई १३ जुलै, १६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड अथवा घोडखिंड येथे झाली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडाकडॆ कूच करत होते पर्ंतु आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजीच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग चालू ज़ाला. जेव्हा शिवाजी व त्यांचे साथिदार घोडखिंडीत पोहोचले त्यावेळेस बाजी प्रभूदेशपांडे या सरदाराने शिवाजींना विनंतीवजा आदेश् दिला की शिवाजी महाराजांनी पुढे गडावर जावे व जोवर शिवाजी महाराज गडावर पोचत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवतील व शत्रुला तिथेच रोखून धरतील. अशी लढाई युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानली जाते.

पार्श्वभूमी
शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील भल्या भल्या सेनापतींना पराभवाची चव चाखायला लावली. अफझखानासारख्या मोठ्या सेनापतीचा वध केला. या सर्वांचा परिणाम म्हणून आदिलशाहीने विजापूरहून सिद्दी जौहरला सर्व शक्तीनीशी शिवाजींवर हल्ला करण्यास सांगितले. तसेच त्यावेळेस आदिलशाहीने मुघलांशी संगनमत करून शिवाजींवर आक्रमण करण्यास विनंती केली. सिद्दी जौहरने शिवाजीं महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिला व महाराजांची स्थिती बिकट केली. प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले. परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऎवजी त्यांनी जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत बनवला व नव्या दमाने दुसर्‍या किल्ल्यावरुन (विशाळगडावरुन्) जौहरचा सामना करायचे ठरले.
लढाई
आदिलशाही फौजेचे नेतृत्त्व सिद्दी जौहर कडे होते, त्याला सिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती. जौहरची एकूण फौज १५,००० ची होती तर शिवाजींचे फ़क्त ३०० ते ६०० मावळे होते. लढाईच्या दिवशी रात्री शिवाजींनी पोर्णिमेच्या रात्री गडावरुन उतरून वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केली. एका आख्यायिकेप्रमाणे शिवाजींनी आपल्यासारख्याच दिसणार्‍या शिवा काशिद नावाच्या नाव्ह्याला शिवाजी म्हणून जौहरकडे बोलणींसाठी पाठवले होते. व या भेटी दरम्यानच्या काळातच शिवाजींनी पन्हाळ्यावरून पलायन केले. जेव्हा जौहरला शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत असे सुगावा लागला तेव्हा सिद्दी मसूदला शिवाजींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. काही वेळाने शिवाजी व साथिदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव ज़ाली व काही वेळातच ते गाठतील व शिवाजींना व इतरांना पकडतील असा अंदाज होता. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. बाजीप्रभूने शिवाजींना स्थिती समजावून विशाळगडावर प्रस्थान करायचा विनंतीवजा आदेश दिला व जो पर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असा विश्वास महाराजांना दिला. शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले.
खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगड गोट्यांची बरसात चालू केली. अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व मारले जात अश्या प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली. बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, बांदल ह्यांनी आपपल्या कमानीतून मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभूच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली. मसूदने बंदूकधार्‍यांना कड्यावर चढून बाजीप्रभूवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. तसे आदेश त्यांनी पार पाडले. बाजीप्रभू जखमी झाला तरी त्याने सैनिकांना कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका असा आदेश दिला. काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले व त्यांनी तोफांचा गजर दिला. इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा गजर ऎकल्यानंतरच त्याने कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला.मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० जण कामी आले पण मसूदचे प्रचंड नुकसान झाले जवळपास ३००० सैनिक मारले गेले.
इकडे शिवाजींनी पण विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला. विशाळगडाचा किल्लेदार रंगो नारायण सरपोतदार याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.
लढाईनंतर
बाजीप्रभू व इतर मराठे सैनिकांचे बलिदानामुळे ही जागा पावन झाली म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले असे म्हटले जाते. शिवाजींनी या लढाईत बलिदान देणार्‍यांचे यथोचित सत्कार केले. स्वता: बाजीप्रभूंच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांच्या मुलांना पालखीचा मान देण्यात आला. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत समावण्यात आले.

अफझलखान प्रकरण
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या [ [महाबळेश्वर]] जवळ असलेल्याप्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले.

शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलाखानने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करुन त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापूरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.
प्रतापगडाची लढाई
प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करुन परतवून लावले.
पार्श्वभूमी
शिवाजींनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग अदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधू संभाजी याचा वध केला होता तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला. वाटेत येताना इस्लामच्या प्रथे प्रमाणे तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. शिवाजींनी खान येत आहे ही बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती.
सैन्यबळ
अफजलखानाच्य सैन्यात अनेक स्रदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान तसेच काही मराठे सरदार पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे इत्यादी जे आदिलशाहीत चाकरीला होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या. अफजलखानाने जंजिर्‍याच्या सिद्दीशी हातमि़ळ्वणी करुन कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले.
शिवाजी-अफजलखान भेट व द्वंद
शिवाजींनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्धकरायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले पण शिवाजींनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्या बाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ १० नोव्हेंबर इ.स. १६५९ रोजी ठरली.
भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती त्यामुळे त्यांनी अंगरख्या खाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो वा जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. वाटेत शिवाजींना खानाचा वकिल कृष्णाजी भास्कर यांनी अडवले परंतु शिवाजींनी त्यांना ठार मारले. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्‍या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले.शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले.
प्रतापगड
लढाई
मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने बंदूकधार्‍यांवर आक्रमण केले. दुसर्‍या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्य सैन्याची वाताहत झाली. नेताजी पालकर यांच्या नेतृत्वा खाली मराठी घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली.
लढाईनंतर
आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुक्सान झाले. शिवाजींनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बर्‍याच जणांना परत विजापूर ला पाठवण्यात आले.
पुढील १५ दिवसातच शिवाजी महाराजांनी शिवाजीमहाराजांनी यानंतर सातारा, कोल्हापूर व कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली. अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे शिवाजींचा भारतभर लष्करी दरारा वाढला.
साहित्यात व चित्रपटात
शिवाजींच्या जीवनावर आधारीत प्रत्येक चित्रपटात ही लढाई खासकरून शिवाजींचे अफजलखानाबरोबरचे द्वंद्व दाखवतातच. लेखक रणजित देसाई यांची लक्ष्यवेध ही या लढाईवर आधारित कादंबरी प्रसिद्ध आहे
सिद्दी जौहरचे आक्रमण
अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.

शिवाजी महाराजांचे सरसेनापती
नेताजी पालकर
नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.[स्रोत- वरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखक- बाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखक- शिवाजी सावंत) या दोन ग्रंथानमधून घेतलेली आहे.]
प्रतापराव गुजर
हंबीरराव मोहिते
लढाऊ आयुष्य
शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत.
सुरूवातीचा लढा
पहिली स्वारी - तोरणगडावर विजय
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
शहाजीराजांना अटक
शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍यांनी बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.
शिवाजीराजांनी मुघल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
जावळी प्रकारण
आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
पश्चिम घाटावर नियंत्रण
इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ल्यांवर विजय मिळविला होता.

ओळख
मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

छत्रपती शिवाजीराजे भोसले
अधिकारकाळ जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक जून ६, १६७४
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
हंबीरराव मोहिते रायगड
पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्या गोब्राह्मणप्रतिपालक
जन्म फेब्रुवारी १९१, १६३०
शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू एप्रिल ३, १६८०
रायगड
उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील शहाजीराजे भोसले
आई जिजाबाई
पत्नी सईबाई,
सोयराबाई,
पुतळाबाई,
काशीबाई,
सकवारबाई
संतती छत्रपती संभाजीराजे भोसले
छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणे भोसले
राजब्रीदवाक्य 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या प्रथम पत्‍नी. शिवाजीमहाराजांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इ.स. १९ फेब्रुवारी १६२७ (फाल्गुन कृष्ण तृतीया) रोजी पुण्यापासून ४० मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शहाजीराजे
शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
जिजाबाई
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी दादोजी कोंडदेव ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
मार्गदर्शक
लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, राजकारभाराचे दादोजी कोंडदेवांकडून तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते. समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.
मावळ प्रांत
सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला "मावळ" म्हणतात. पुण्याखाली १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.
बारा मावळ
पवन मावळ
आंदर मावळ
कानद मावळ
मुठाखोरे
गुंजण मावळ
हिरडस मावळ
पौड मावळ
रोहिड खोरे
शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी
बाजी पासलकर
कान्होजी जेधे
तानाजी मालुसरे
बाजी प्रभू देशपांडे
मुरारबाजी
नेताजी पालकर
हंबीरराव मोहिते

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेसेवेचा वापर दररोज ६५ ते ७० लाख लोक करत असतात. गदीर्च्या वेळी ताशी ३ लाख ५० हजार लोक रेल्वेगाड्यांतून प्रवास करत असले तरी सध्याची रेल्वेगाड्यांची क्षमता फक्त १ लाख ६० हजार इतकीच आहे. म्हणजेच क्षमतेपेक्षा तब्बल २ लाख प्रवासी जास्त आहेत. रस्त्यांवरही दिवसभरात ४५ लाख प्रवासी नेणाऱ्या बेस्ट बसगाड्या गदीर्च्या वेळी प्रमाणाबाहेर भरलेल्या असतातच, यामुळे, तसेच कमी दराने कर्ज मिळण्याची सोय असल्यामुळे खासगी वाहने सतत वाढत आहेत.एमयूटीपी आणि एमयूआयपी यांच्या अंतर्गत ज्या उपाययोजना अपेक्षित आहेत, त्या प्रत्यक्षात आल्यानंतर गरजेच्या फक्त १० टक्के उपचार होतील. याचाच अर्थ असा की, मुंबईच्या सार्वजनिक परिवहन सेेवेची क्षमता ताशी किमान १ लाख ७० हजार प्रवासी इतकी वाढवली पाहिजे.

मुंबई मेट्रो १४६.५ कि. मी. धावणार आहे. मेट्रोची क्षमता सुरुवातीला ताशी २४ हजार प्रवासी असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ती ताशी ७२ हजार होईल. मुंबई मेट्रो प्रकल्प १६ वर्षांच्या अवधीत पूर्ण करायचा असला तरी सध्याची गती पाहता त्याला सहज २० ते २५ वषेर् लागू शकतील. या प्रकल्पाला सुमारे ६० हजार कोटींहून अधिक भांडवल उभे करणे ही अवघड बाब आहे.
या पार्श्वभूमीवर बीआरटीएस हा उत्तम पर्याय ठरू शकतो. केवळ तीन ते पाच वर्षांत प्रत्यक्षात येऊ शकणाऱ्या,२०० कि. मी. लांबीच्या बीआरटीएसवर फक्त ३ हजार कोटी रुपये इतकाच खर्च होईल. या बसमधूनही मोठ्या संख्येने प्रवासी जाऊ शकतात. या सोयीला बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम म्हणजेच बीआरटीएस म्हणतात. अशी बस किती लोकांना घेऊन जाणार हे तिच्या क्षमतेवर व ताशी ती किती फेऱ्या करते यांवर ठरते. बीआरटीएसमध्ये समजा दर मिनिटाला ७० प्रवाशांना नेणारी एक बसगाडी जात असेल, तर याचा अर्थ या वाहतूक व्यवस्थेत ताशी ४ हजार २०० प्रवासी नेण्याची क्षमता असेल. याच गाड्या मिनिटाला तीन केल्या तर प्रवासीसंख्या १२ हजार ६०० वर जाईल. प्रत्येक आटिर्क्युलेटेड आणि बाय-आटिर्क्युलेटेड बस गाडीची क्षमता जवळजवळ १६५ आणि २७० असते. ताशी १८० गाड्या म्हणजे म्हणजे मिनिटाला तीन गाड्या चालत असल्या तर ताशी जवळ जवळ ३० हजार आणि ४८ हजार लोकांना नेण्याची क्षमता बीआरटीएस ठेवते.
डेपिक्टेड मार्ग म्हणजे विशिष्ट मागिर्का. मुंबईचे पूर्व आणि पश्चिम हायवे हे प्रत्येकी पाच मागिर्का असलेले रस्ते आहेत. त्यातील एक मागिर्का म्हणजेच डेपिक्टेड लेन बीआरटीएससाठी राखून ठेवता येईल. हळू चालणाऱ्या आणि वेगाने चालणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या मागिर्केतून चालल्या की रस्त्याचा थ्रुपुट वाढतो, आणि हेच बीआरटीएसचे तत्त्व आहे. मुंबईची गरज आणि उपलब्ध रस्ते पाहता आपण चार रस्त्यांवर ४५ हजार क्षमतेची, पाच रस्त्यांवर ३६ हजार क्षमतेची किंवा दोन रस्त्यांवर ४५ हजार आणि तीन रस्त्यांवर ३० हजार क्षमतेची बीआरटीएस चालवू शकतो. सध्याची लेन कटिंगची समस्याही यामुळे कमी होईल, अपघातही कमी होतील. शहरातील जीवन सुरळीत राहण्यासाठी अशा विविध पर्यायांचा विचार आपल्याला करावाच लागेल.
(लेखक परिवहन विश्लेषक आणि आय.आय.टी. येथे सिव्हिल इंजिनीयरिंग विभागात आहेत.)

आज आपण प्रगतीच्या एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत. विज्ञान-तंत्रज्ञानात आज होत असलेल्या प्रगतीचा झंझावात पाहता पुढील दहा वर्षांत आपण कुठे पोहोचू हे
निश्चित सांगता येत नाही. दूरसंचार, वैद्यकशास्त्र, कम्प्युटर सायन्स, खगोलशास्त्र, रॉकेटविज्ञान, आटिर्फिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, जैव-तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान अशी विविध क्षेत्रे आज वायुवेगाने प्रगत होत आहेत.

महाराष्ट्राला १९६०साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. या वषीर् आपला महाराष्ट्र ५०व्या वर्षांत पदार्पण करेल. आज भारतातील एक प्रगत राज्यम्हणून महाराष्ट्राने नाव मिळविले आहे. मुंबईसारखे देशाच्या आथिर्क राजधानीचे शहर, पुण्यासारखे सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर महाराष्ट्राचे वैभव वृद्धिंगत करीत आहेत. भविष्यातील महाराष्ट्र विज्ञान-तंत्रज्ञानाची कास अधिकच घट्ट धरून ठेवेल असे संकेत आज तरी दिसत आहेत
वाढता वाढे...दूरसंचाराचे जाळे
उद्याचे विश्व हे बिनतारी संदेशवहनाचे आहे. ब्रॉडबँड इंटरनेटचे आहे. ऑप्टिकल फायरबरचे आहे. मोबाइल उपकरणांचे आहे. आपली आजची भूक आहे ती अधिकाधिक वेगवान संदेशवहनाची आणि जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी-बँड वापरण्याची. उद्याच्या विश्वात आपण अधिकाधिक 'इंटेलिजन्ट' उपकरणे वापरावर भर देणार आहोत आणि तीसुद्धा पूर्णपणे 'वायरलेस' तंत्रज्ञानावर आधारित.आज महाराष्ट्रातील आयआयटी संस्था, 'आईईई'ची मुंबई-पुणे शाखा, या विषयात संशोधन करीत आहेत. जगात त्यांच्या संशोधनाला मान्यता प्राप्त झालेली आहे. उद्याच्या इंटरनेटचा वेग १,०००,००० बिट्स प्रति सेकंद असणार यात काही शंका उरलेली नाही. 'वाय-मॅक्स'सारखे तंत्रज्ञान आज महाराष्ट्रात मूळ धरीत आहे. उद्या त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होईल. उद्याचे मोबाइल फक्त फोन असणार नाहीत तर ते 'लिटील जिनी' असतील. तुम्ही सांगाल ती कामे ते लीलया करतील. तीही क्षणार्धात...कुठलाही 'बाऊ' न करता.
मायाजाल रोबोटिक्स आणि
व्हर्चुअल रिअॅलिटीचे
आज पुण्याच्या 'एमआयटी'सारख्या संस्था रोबोटिक्सवर जागतिक स्तरावर स्पर्धा घेत आहेत. रोबोटिक्स हा फार व्पापक विषय आहे. त्यात सुमारे २५ उपशाखांचा समावेश होतो. व्हर्चुअल रिअॅलिटी, आटिर्फिशियल इंटेलिजन्स, अँड्रॉईड विज्ञान, कम्प्युटर व्हिजन अशा अनेक प्रकारे रोबोटिक्स आज सर्वसामान्यांच्या जीवनात प्रवेश करीत आहे. मानसिक रोगांवर इलाज, विविध विषयांतील शिक्षण, कारखान्यात उपयोग, दुर्गम भागात संशोधन, लहानांसाठी खेळ, आजी-आजोबांना आधार, अपंग व्यक्तींना मदत अशा शेकडो प्रकारे हे तंत्रज्ञान मानवाला उपयोगी ठरत आहे.मुंबईच्या टीआयएफआर, बीएआरसी आणि आयआयटी संस्था, पुण्याच्या सीडॅक या विषयांत विशेष संशोधन करीत आहेत, ही प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. सुपर कम्प्युटरच्या दुनियेत तर सीडॅकचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे... परम ८०००, परम दशसहस अशा एकापेक्षा एक वरचढ सुपर कम्प्युटर बनवून आणि प्रगत देशांना ते विकून सीडॅकने आपली उच्च पातळी क्रित्येक वेळा सिद्ध केलेली आहे.
रॉकेटविज्ञानात इसोची घोडदौड सर्व जगाने आज मान्य केलेली आहे. येत्या नजीकच्या भविष्यात चंदावर मानव पाठविण्याचे स्वप्न आपण साकार करू यात दुमत नाही... किंबहुना आज प्राथमिक शाळेत शिकणारी आपली मुले उद्याचे अंतराळवीर असतील. इसोच्या रॉकेट्स बांधणीमध्ये महाराष्ट्रातील कित्येक वैज्ञानिकांचा समावेश आहे. टीआयएफआर, बीएआरसीमधील शास्त्रज्ञांची अनेक पथके आज या रॉकेट्सवर काम करीत आहेतयाशिवाय आयुका, एनसीआरएसारख्या मातब्बर संस्था विश्वाची रहस्ये उलगडण्यात मग्न आहेत. पुण्याजवळ खेडद या खेडेगावात जीएमआरटीसारखी जगातील सर्वात मोठी रेडिओ दुबीर्ण आज पूर्णपणे कार्यरत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून कित्येक शास्त्रज्ञ या खेडेगावात राहण्यास येतात! आपापली निरीक्षणे करून मायदेशी परततात. अवकाशातील अत्यंत आश्चर्यकारक अशा कित्येक 'पल्सार' ताऱ्यंाचा शोध या दुबिर्णीमुळे महाराष्ट्रातून लागलेला आहे. भविष्यात अनेक नवे प्रयोग करण्यात येणार आहेत. या 'विश्वमंथना'तून कुठली दिव्य रत्ने आपल्या हाती लागतील हे तो काळच सांगू शकेल
उद्याचा महाराष्ट्र जास्त प्रगल्भ आहे हे निश्चित. विज्ञान-तंत्रज्ञानात तो अग्रेसर असणारच आहे. पण कलेच्या क्षेत्रातही तो तितक्याच ताकदीने प्रगती करेल असे संकेत आहेत.
पराग महाजनी
(लेखक खगोलशास्त्राचे संशोधक आहेत)

मी..


मीच माझ्या शत्रूपरी

आज भासतो आहे

हार माझी पाहूनी

मीच हासतो आहे


माझ्या मनाचे वागणे

विपरीत चाललेले

जिथे जिथे मी हासलो

तेथे उदास तो आहे..


मीच माझ्या शत्रूपरी

आज भासतो आहे...


भास...

तूला पाहतो मी

असे भास होती

मलाही कळेना

कसे भास होती


आता जीव घेतो

तूझा हा दुरावा

प्रिये तूच माझा

जणू श्वास होती..


तूला पाहतो मी, असे भास होती

मलाही कळेना , कसे भास होती...


  • जनतेच्या जीवितास व मालमत्तेच्या दृष्टीने घातक असा माल बाजारात विकला जाऊ नये यासाठी संरक्षण.

  • बाजार पेठेतील मालाची गुणवत्ता, वजन, क्षमता, शुध्दता, दर्जानुसार किंमत जाणून घेणे

  • दुकानात अथवा बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तू व त्याच्या विविध किंमती पहाण्याच्या, हवी ती पसंतीस पडलेली वस्तू विकत घेणे.

  • ग्राहक मंचासमोर बाजू मांडणे, चर्चा करणे, मार्गदर्शन घेणे, ग्राहक हितासाठी लक्ष देणे.

  • व्यापार्‍यांकडून होणार्‍या ग्राहकांची पिळवणूकीसंदर्भात दाद मागणे.

  • ग्राहक मंचच्या कायद्यासंदर्भातील शिक्षण घेणे.

Contd.....
तक्रार केव्हा कराल?

  • खरेदी केलेला माल खराब असल्यास ...
  • खरेदी केलेल्या मालाच्या किंमतीपेक्षा व्यापार्‍याने अधिक किंमत घेतली असल्यास
  • जीवितास किंवा सुरक्षिततेस घातक ठरणारा माल (वस्तू) दुकानात ठेवला असेल अथवा विक्री केला असल्यास...
  • विकलेल्या वस्तुचे वजन आणि प्रत्यक्षात छापील असलेले वजन यात फरक आढळल्यास ...

  • जुना अथवा खराब माल नवीन वेष्टनात आकर्षक पध्दतीने ठेवून, ग्राहकांना उत्तम दर्जाचा माल असल्याचे सांगून फसवणूक केल्यास ...

  • मालाची विक्री करताना योग्य चाचणी न घेतलेला माल अन्य मालाच्या तुलनेत स्वस्त दरात देऊन ग्राहकांची दिशाभूल करीत असल्यास ...

  • मालाच्या वस्तुस्थिती संदर्भात वेष्टनावरील माहिती खाडाखोड केल्यास, चिकटपट्टी लावल्यास व त्या ठिकाणी चुकीची माहिती छापल्यास उदा.मुदत बाह्य तारखेत खाडाखोड करणे, वजनाच्या ठिकाणी जादा वजन दर्शवणे, किंमतीत खाडाखोड करणे.

  • स्वत:चा माल खपविण्यासाठी ग्राहकाला खोटी आश्वासने देऊन सातत्याने प्रचार व प्रसार केल्यास.

  • मालाचा साठा करुन तो विक्री न केल्यास अथवा भाववाढ होण्याची वाट पाहून नंतर विक्री केल्यास ...

  • आपला खराब माल जास्तीत जास्त खपावा म्हणून वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे अथवा अन्य जाहिरात माध्यमातून प्रसिध्दी करुन ग्राहकांना विकल्यास व तसे पुरावे असल्यास...

  • ग्राहकांसाठी भेटवस्तू, बक्षिसे किंवा इतर मोफत वस्तू देण्याच्या योजनेत सहभागी करुन घेऊन नंतर योजनात फेरफार केल्यास, निकाल लावण्यास टाळाटाळ केल्यास ...
    कोणाविरुध्द तक्रार करावी ?

  • किराणा माल विक्रेता ...

  • औषध विक्रेता ...

  • शीतपेय विक्रेता ...

  • ट्रव्हल एजंट ...

  • सर्व प्रकारचे व्यापारी ...

  • शेतीची बियाणे, औषधे तसेच अवजारे विक्रेता ...

  • हॉस्पिटलमधील डॉक्टर्स ...

  • पोस्ट खाते किंवा कुरिअर तसेच बँक सेवा ...

  • दूरध्वनी, पाणी, गॉस संदर्भातील कार्यालय ...

  • वीज कनेक्शन आणि रस्ते संबंधित कार्यालय ...

  • विमा, शेअर किंवा कर्जरोख्यांची खरेदी विक्री ...

  • एसटी, रेल्वे तसेच अन्य वाहन विक्रेते ...

  • शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे ...

  • फ्लॉट अथवा प्लॉट विक्रेता ...

  • जाहिराती सादर करणार्‍या संस्था, मॉडेल्स ...

  • पोस्टर्सवरील मजकूर आणि जाहिरात प्रसिध्द करणार्‍या संस्था ...

  • वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे ...

तक्रार कशी कराल?

  • मालासंदर्भात काही दोष आढळून आल्यास जिल्हा ग्राहकमंच्याकडे साध्या कागदावर अथवा टंकलिखित तक्रार सहा प्रतीत सादर करावी. एकापेक्षा अनेक ग्राहकांच्या तक्रारी असतील तर जिल्हा ग्राहक मंचाच्या परवानगीने एक किंवा अधिक ग्राहक तक्रार करु शकतात.
  • तक्रार दाखल करताना मुद्देसुद माहिती द्यावी तसेच दोषपूर्ण मालाचे नमुने सोबत सादर करणे आवश्यक आहे. पुरावे सादर करतांना माल खरेदी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे. त्या पावतीवर खरेदी केलेल्या वस्तूचे नाव, विवरण, उत्पादक कंपनीचे नाव, हमी कालावधी आदी नेंदी घ्याव्यात.
  • तक्रारदाराने प्रादेशिक भाषेतील अर्जाबरोबरच इंग्रजी भाषेत अर्ज व तपशील दिला तर ग्राहक मंच तसेच आयोगाला कार्यवाही करणे सुलभ होते.
  • तक्रार दाखल करतांना फक्त पीडित ग्राहकालाच नव्हे तर त्याच्या वतीने दुसर्‍यांनाही तक्रार करता येते.

तक्रारीची कार्यवाही

  • अ.क्र- तक्रारीचे स्वरुप कार्यवाही
  • १.-तक्रार दाखल केल्यानंतर-६ महिन्यात कार्यवाही
  • २.-मालाची प्रयोगशाळेत तपासणी-४५ दिवसांचा कालावधी
  • ३.-२० लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-जिल्हा ग्राहक मंचाकडे सुनावणी
  • ४.-१ कोटी रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-राज्य आयोगाकडे सुनावणी
  • ५.-१ कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई-राष्ट्रीय आयोगाकडे सुनावणी

तक्रार दाखल करतांना घ्यावयाची काळजी

  • तक्रारदाराचे नाव व पत्ता :
  • विरुध्द पक्षाचे नाव व पत्ता :
  • तक्रारीचा विषय :
  • तक्रारीबाबतचे पुरावे, दस्तऐवज :
  • तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई :
  • ठिकाण, दिनांक व सही

तक्रार दाखल करतांना येणारा खर्च

अ.क्र-नुकसानीची रक्कम-भरावयाची रक्कम

१.-१ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास १०० रुपये

२.-१ ते ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास २०० रुपये

३.-५ ते १० लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास ४०० रुपये

राज्य आयोगाकडे अपील का? व कसे करावे?

  • जिल्हा न्यायालयाचा निकाल असमाधानकारक वाटल्यास संबंधित व्यक्ती राज्य आयोगाकडे ३० दिवसांच्या आत अपील करु शकते.
  • जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाने ग्राहकाला कोणतीही रक्कम भरावयाची असेल तर, अपील करणार्‍या अशा व्यक्तीने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा २५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल अशा रकमेचा भरणा केल्याशिवाय राज्य आयोग अशा अपिलाची दखल घेणार नाही.
  • राज्य आयोगाकडे तक्रार करतांना संपूर्ण तक्रारीचे स्वरुप सुस्पष्ट लिहावे. पुरावे सादर करावेत.
  • अपील स्वीकार केल्याच्या दिनांकापासून राज्य आयोग ९० दिवसाच्या आत अपिलाची सुनावणी करतो.
  • अपीलकर्त्यांने अपील अर्जासोबत राज्य आयोगाच्या कार्यालयीन प्रयोजनासाठी तक्रार अर्जाच्या सहा प्रती जोडणे आवश्यक आहे.
  • अपिलाच्या सुनावणी काळात अपीलकर्त्याला स्वत: आयोगासमोर उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. जर अपीलकर्ता अनुपस्थित राहिला तर आयोग एकतर्फी निकाल देतो.
  • अपीलाच्या संदर्भात राष्ट्रीय आयोगाचे आदेश पक्षकारांना मोफत देण्याची तरतूद या कायद्यात आहे.

राष्ट्रीय आयोगाकडे अपील का? व कसे करावे?

  • राज्य आयोगाचा निकाल असमाधानकारक वाटल्यास संबंधित व्यक्ती ३० दिवसांच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे अपील करु शकते.
  • राज्य आयोगाच्या आदेशान्वये कोणती रक्कम भरणे असेल तर अपील करण्यार्‍या ग्राहकाने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा ३५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल, अशा रकमेचा भरणा केल्याशिवाय राष्ट्रीय आयोग अशा व्यक्तिंच्या अपीलाची दखल घेणार नाही.
  • राष्ट्रीय आयोगाकडे ग्राहकाने अपील दाखल केल्यानंतर अपीलाची सुनावणी, अपील स्वीकार केल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत केली जाते.
  • अपिलकर्ता किंवा पक्षकाराचे विरुध्द राष्ट्रीय आयोगाने एकतर्फी निकाल दिल्यास बाधित पक्षकाराला आयोगाकडे आदेश रद्द ठरविण्यासाठी अर्ज करता येतो.
  • अपीलकर्त्यांच्या अर्जावरुन किंवा राष्ट्रीय आयोगाला स्वत:हून कोणत्याही वेळी, न्यायाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यास, राज्यातील कोणत्याही जिल्हा ग्राहक मंचाकडील प्रलंबित प्रकरण दुसर्‍या जिल्हा मंचाकडे किंवा एका राज्य आयोगामधून दुसर्‍या राज्य आयोगाकडे वर्ग करण्याचा अधिकार आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडे अपील का? कसे करावे?

  • राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या आदेशामुळे पीडित झालेल्या व्यक्तीला असा आदेश मिळाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते.
  • राष्ट्रीय आयोगाच्या आदेशान्वये रक्कम भरणे असेल तर, अपील करणार्‍या व्यक्तीने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा ५० हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती भरल्याशिवाय न्यायालयात अपील करता येणार नाही.
  • जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्या आदेशाविरुध्द संबंधिताने अपील न केल्यास आदेश अंतिम समजला जातो.

आदेशाचे अनुपालन न केल्यास दंड व कारावास

  • जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्यासमोर दाखल करण्यात आलेली तक्रार निरर्थक असल्याचे आढळल्यास मंच किंवा आयोग लेखी कारणे नोंदवून अशी तक्रार फेटाळतात. तसेच पक्षकाराला १० हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल एवढ्या खर्चाची रक्कम देण्याबाबत आदेश देतात.
  • ज्यांच्याविरुध्द तक्रार करण्यात आली, असा कोणताही व्यापारी किंवा राष्ट्रीय आयोग यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर करीत असेल तर किंवा अनुपालन करण्यास चुकत असेल अशा बाबतीत संबंधितास कारावास आणि दंडाची शिक्षा आहे. त्यामध्ये एक महिन्यापेक्षा कमी नसलेल्या परंतु तीन वर्षापर्यंत वाढवता येण्याजोग्या मुदतीच्या कारावासाची आणि दोन हजार रुपयांपेक्षा कमी नसलेल्या परंतु १० हजार रुपयापर्यंत वाढविता येण्याजोग्या दंडाची किंवा दोन्हींची शिक्षा दिल्या जाण्यास पात्र असेल. अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.

राज्य ग्राहक आयोगाचा पत्ता :

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग,

प्रशासकीय महाविद्यालय, कक्ष क्र.१ व २, हजारीमल सोमाणी मार्ग, मुंबई - ४०० ००१.


प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

ती म्हणाली होती प्रेम आहे माझे तुझ्यावर

नाही उमजला अर्थ तेव्हा तिच्या बोलण्याचा


माझ्याजवळं ती नाही, आता प्रत्येक आठवण सांधतो आहे

न कळलेल्या प्रेमाचा अर्थ बांधतो आहे


कदाचीत प्रेम म्हणजे आपुलकीच्या बोलांसाठी आतुर्लेले कान

पावसात शब्दांच्या चिंबं विसरतातं देह्भान


कदाचीत प्रेम म्हणजे भेटीच्या ओढीत झुरणारी ती

का फक्त एका कटाक्ष्यासाठी त्याने ओवळून टाकलेला जीव

कदाचीत प्रेम म्हणजे पाणीदार बोलके डोळे

शब्द नको तिला उसने, ती डोळ्यातूनच बोले


कदाचीत प्रेम म्हणजे प्रत्येक क्षणाला तीचा विचार पहिला

आजही त्याने अर्धा घास तिच्यासाठी ठेवला


कदाचीत प्रेम म्हणजे पापण्यांमधे जपलेला सागर

ठेचं लागतच त्याला, तीला फुटलेला अश्रुंचा पाझर


कदाचीत प्रेम म्हणजे आठवणींचे धूके दाटलेले

ती निघून गेल्यावर अश्रूंच्या दवबिंदूसंगे मला वेढ


आता मात्र शब्धही लागतात अपुरे पडू

भावनांची गर्दी कशी कागदावर उतरवू ?


पण आता कळतयं....

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे

आपले विसरून दुसर्‍याच्या विश्वात रमंणे


प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

प्रेम म्हणजे दूसर्‍यासाठी जगणे...

विरह आणि प्रेमाचे अतुट नाते असते

म्हणून ते जरा जपून करायचे असते

होत नाहि प्रत्येकाचा शेवट गोड , म्हणून

पहिल्यापासुन मन खंबीर करायचे असते.


पसा भर पाउस पाटीभर ढग...

गरीबाच्या झोपडीला पावसाचा राग ..


रिमझिम सरी सोसाट वारा ...

पुरांपेक्षा आपला दुष्काळ बरा ...


ओसाड माळ भरलेले नभ ...

जातीवंतांच्या पोटी इरसाल नग..


काळीभोर माती पिकलेले शेत

गरिबांना असत कुठे आपल हो मत..


ग्रीष्म

एकमेकांना अखेरचं

बघण्यासाठी आलो होतो,

तुटण्याआधी दोन घटका

जगण्यासाठी आलो होतो…

तुला बघून डोळ्यांमधलं

आभाळ भरुन आलं होतं

खरं आभाळसुद्धा मग

ओलं चिंब झालं होतं…

तुला वाटलं …

वीज चमकली म्हणून

आभाळ चकाकलं होतं

मला कोसळताना पाहून खरं तर

त्याचं काळीज लकाकलं होतं…

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता

वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,

खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे

परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता


खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली

पथ शोधित आली रानातून अकेली,

नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट

तीरावर तुरळक परि अंकुरती वेली


नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,

होईल सावली कुणा, कुणास कहाली,

तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,

"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"


समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,


कवी - कुसुमाग्रज