काही गोष्टिंच असच असत
मनात अठवनिंच जाळ असत
त्यात काहींना विसरायच असत
पण विसरण मात्र जमत नसत

आमच्या आयुष्यातून त्यांना जायचच असत
आणि त्यांच्या आठवणीना आम्हाला छळआयाच असत

अठवनिंच कस असत
रात्रि लुकलुकनाऱ्या ताऱ्यासारखं असत
लांब असले तरी पण मनात जवळच स्थान असत

अठवनिंच कस असत
पावसाच्या टोचनाऱ्या थेम्बानसारख असत
भिजन आपण सोडत नाही कारण टोचन ही आपल्याला हवहवसच असत
आठवणीना चित्रात रेखाटायच असत
तर कधी कवितेत कोरयाच असत
गर्दी मध्ये एकट्या जगनाऱ्या माझ्यासाठी
हे नातं अधाराचच असत

अठवनिंच महत्व तुम्हाला काय कळनार
त्यांना विचारा
ज्यांना आठवणीच्या आधारावर
आयुष्यभर जगायच असत

मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी!

प्रेम होतं किंवा केलं जातं
यावर पुर्वी पासुन वाद आहे
पण एक मात्र नक्की,
जो प्रेमात पडला...
तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!

प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!

तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!

तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!

प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!

शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीसी अपेक्षा होती!

चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

कौलेजच्या कट्ट्यावर मुलींना छेडणं
हा जणु काही आमचा खेळ होता
परीक्षेच्या दिवसातही ह्या गोष्टींसाठी
प्रेत्येकाकडे बराच वेळ होता!

प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे,
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे!

कारण शेवटी मी एक.....
आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
A\C Coneference roomsमध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी, कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो-तो projectमध्ये बिझी ज़ालाय
भुला भटका missed call आता महाग झालाय
forwards आणि chain mailsमध्ये खुषालीची मैल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलेब्रेशन्स,पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतो
vegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो
पण pocket moneyसाठवून केलेल्या partyची मजा ह्यात शोधत आहे
कारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
कारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक Softwareप्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
officeमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक.....

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात .
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात .

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
टॉम अँड जेरी पाहिल पाहिजे .

आंघोळ फ़क्त दहा मिनीटे?
एखाद्या दिवशी तास द्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आल पाहिजे .

भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे ,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचणंसुद्धा जमलं पाहिजे.


गीतेचा रस्ता योग्यच आहे .
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
"बेवॉच" सुद्धा एन्जॉय करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेतसुद्धा फ़िरलं पाहिजे .
'फ़ुलपाखरांच्या' सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.

द्यायला कोणी नसलं
म्हणुन काय झालं ?
एक गजरा विकत घ्या
ओंजळभरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.


रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुंदर जगण्यासाठी
नुसतं थॅंक्स तरी म्हणा!



आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं
अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो
Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो
Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत
आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती
चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो
खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं………….

पत्थर सुलग रहे थे कोई नक्शे - पा न था
हम जिस तरफ चले थे , उधर रास्ता न था ----१
( चोहिकडे वणवा पेटला होता आणि मी त्या वणव्यात वाटाद्याचे पदचिन्ह शोधत होतो. खर तर जिथ मी शोधत होतो, ती पायवाट नव्हतीच मुळी.)

परछाइओं के शहर की तनहाइयां न पूंछ
अपना शरीके-गम कोई अपने सिवा न था ----२
( सावाल्यांच एक शहर होत, भयानक शांतता होती आणि त्या एकांतात मी होतो आणि माजे दुक्ख समजुन घेणारी माजी सावली होती.)

पत्तों के टूटने की सदा घुट के रह गयी
जंगल में दूर दूर हवा का पता न था ----३
( त्या अरण्यात स्मशान शांतता होती, पाण्याचा एवं वारयाचा आवाज नव्हता, पाने गलून पडायची, तिसुद्धा मुकाट !)

किसे सुनाते गली में तेरी ग़ज़ल
उसके मकान का कोई दरीचा खुला न था ----४
( मित्रा, तुजी ही कविता मी तिला कशी ऐकवू ? घराच्या खिडक्या तर सोडाच, हृदयाची कवाडे पण तिने घट्ट बंद केली आहेत.)

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

कुणीतरी हव असत......
कुणीतरी हव असत......
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनारहातात हात घेउन ,
शब्दान्शिवाय बोलनार्....

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्......

कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी, मायेन समज़ावनार........

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार........

कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार......

कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार.........

कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार....

कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार...........

कुणीतरी हव असत,मला समजुन् घेनार,
आयुष्याच्या वाटेवर साथ देशील क विचारणार............

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार

एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत

हार मानली की सारंच संपलं
जिंकण्यासाठी लढायलाच हवं
मरण तर काय क्षणाचा खेळ
जगण्यासाठी झगडायलाच हवं

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल...

मला नाही म्हणून तू स्वतःला विसरलीस का?
मला दूर करून तू आणि जवळ आलीस का?
त्याच्यावर प्रेम करून तू माझ्यात गुंतलीस का?
मला खोटंच फसवून तू स्वतःवरच रुसलीस का?
बोलायचं बंद करून तू माझी वाट पाहीलीस का?
सोडून माझा हात तू माझ्या दारात थांबलीस का?
खोट्या बहाण्याने तू माझ्यासाठी जागलीस का?
मी बोलावं म्हणून तू असं काही वागलीस का?
माझी नवी कविता तू न सांगता वाचलीस का?
मूक माझी वेदना तू हळूच उराशी जपलीस का?
माझ्या नसण्याची तू काळजी थोडी केलीस का?
माझ्या प्रोफईलला तू मागून भेट दिलीस का?
जग चालून सारं तू आत तरी उरलीस का?
वजा करून मला तू तुला तरी पुरलीस का?
शहाणं करून मला तू अशी वेडी झालीस का?
शोधत होती तुला तू माझ्या घरी आलीस का?

किमंतुआनंदऋतू प्रकाशन३०/०१/२००९

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
आपल्या दोघांची तीपहीलीच भेट..
तु केसात माळलेल्या
गुलाबाच्या फुलाच ते देठ..

आपल्या दोघांच ते
तासन तास गप्पा मारण...
विषय संपलेला असतांनाही
त्याच्यावरतीच ते कीस पाडण...

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
तु पाडव्याला नेसलेली
ती नऊवारी साडी...
तिथेच तु तुझ्या खिडकीत,
ऊभारलेली ती साखरेची गुढी..

तुझ्या-माझ्यात झालेल
ते पहीलच भांडण...
तुझा राग जाण्यासाठी तुझ्या हाताच
मी घेतलेल ते वरवरच चुंबन...

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
चेह-यावरच तुझ तेअलगद लाजुन हसण..
आणि लाजता लाजताच हळुचते माझ्याकडे बघण....
ते माझ्याकडे बघण....

आपली शेवटची
ती संध्याकाळ...
आपण दोघोच होतो फ़क्त
आणि पुढे तो भयंकर काळ...

कांचाचा ढीग, रक्त्ताचा सडा, तुझी शेवटची आरोळी...
संपलच सगळ एका क्षणार्धात...
मी मात्र वाचलो त्या अपघातात,तुला मात्र दोन महीने झाले आता..
तशीच निपचित पडुन आहेस तु आयसीयुतल्या त्या खाटेवरती...

म्हणुनच... ऎक ग.. तु जरा माझ..
ऊघडशील ना..... तु तुझे डोळे??
कारण.... एकदाच....
मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय.


मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी मलाच हरवून बसलो
हात तुझा हातातून सुटताना
एक आधार गमावून बसलो

मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तसं मी मनातही आणलं नव्हतं
वाटलं तू तरी ओळखशील मला
माझं दु:ख कोणीचं जाणलं नव्हतं

मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुझा आरोप मला मान्य नाही
परीस्थितीने दगा दिला, नाहीतर
माझं प्रेम इतकं सामान्य नाही

मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
मी इतका नाही गं अर्धवट
तुझं आयुष्य पुढे सुखी व्हावं
म्हणून केली ती सारी खटपट

मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
एकनिष्ट मलाही रहायच होतं
पण नीयतीला कुठे आपल्याला
असं फुललेलं पहायच होतं

मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
तुला दु:खां पासून दूर नेलेलं
पुढच्याच वळणावर
मी मलाच उद्धवस्त केलेलं

मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
परीस्थितीच अस्पृश्य होती
तुझ्या माझ्या मिलनाची
हातावरची रेषाच अदृश्य होती

मी सोडलं नाही तुला अर्ध्यावर
नात्यात कधीच बहर नव्हता
एकमेकांसाठी तळमळण्याची
भावनेत कधीच कहर नव्हता

@सनिल

ते क्षण आठव एकदातरी
भेटलो होतो आपण पहिल्यांदा
बोललो होतो आपण दोघे छान
त्या वेळीही अन् नंतरही कितींदा

ते क्षण आठव एकदातरी
पाण्यात पाय टाकुन किती वेळ
बसलो होतो आपण किनाऱ्याला
त्या वेळीही अन् नंतरही कितींदा

ते क्षण आठव एकदातरी
रेतीत नाव कोरले पहिल्यांदा
बसलो होतो त्याकड़े पाहत

त्या वेळीही अन् नंतरही कितींदा

ते क्षण आठव एकदातरी
हातात हात गुम्फ़ले होते पहिल्यांदा
सुकावलो होतो फ़क्त सोबतीने
त्या वेळीही अन् नंतरही कितींदा

स्मिता

समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,

बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.

चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,

घर जवळ येताच पुढे निघून जावी.

आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,

दिसलो की गालवर छान खळी पडावी.

कधी हसता हसताच ती रडावी,

कधी रडता रडताच खुद्कन हसावी.

हक्काने आपल्यावर रागवावी,

मग कही न बोलताच निघून जावी.

नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,

आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.

सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,

निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.

लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,

वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.

ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,

नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.सुखात सगळ्यांना सामिल करावी,

व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.

बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,

आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.

परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,

"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.

थोडा वेळ मग ती शांत रहावी,

पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.

ती बरोबर असली की आधार वाटावी,

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!