मला पुन्हा लहान व्हायचंय
लोकांवर निस्सीम प्रेम करायला
निर्मळ, श्वेत मेघ बनायचंय
सुसाट वार्‍याशी झुंजायला

रंगीत छानसा पक्षी व्हायचंय
आकाशात उंच भरारी घ्यायला
मला जलाचा साठा व्हायचंय
तहानलेल्यांची तहान भागवायला

मला एक छान "मन" व्हायचंय
दुसर्‍या चांगल्या मनांशी बोलायला
मला एक छान "सुर" व्हायचंय
सर्वांच्या मनात उमटायला

मला मोठा वेडा व्हायचंय
वेड्या "शहाण्यांन्ना" लाजवायला
शक्य नसले काही जरी
निदान एक चांगला माणूस व्हायचंय....... निदान एक चांगला माणूस व्हायचंय......


~ ~ ~ ~ ~ ~ सुरज ~ ~ ~ ~ ~ ~

परमेश्वराने मानवाची निर्मिती केली. मानवाने अनेक गोष्टींची निर्मिती केली.प्रत्येक गोष्टीचा जन्म ठराविक वेळी झाला व ती वेळ बहुतांश लोकांना माहित असते. तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण दररोजच्या आयुष्यात नियमीत वापरतो परंतु त्या गोष्टींच्या उगमाचा आपल्याला जराही थांगपत्त नसतो. उदाहरणार्थ फक्त एकच पण मजेदार 'नाम' आणि ते म्हणजे "शिवी".



दचकू नाका हो! खरंतेच लिहितोय. तुम्हीही कधी ना कधी आपला राग व्यक्त करताना या "मोहिनीचा" आधार घेतलाच असणार. "मोहिनी" यासाठी म्हणतोय की कितीही मनावर ताबा ठेवला तरी कधी ना कधी तिचे नामःस्मरण केल्याशिवाय चैनच पडत नाही. शिवीचा भक्तगण नाही, असा मनुष्य लाखातच काय पण करोडोतसुद्धा क्वचितच आढळतो.
अशा व्यक्तिंन्ना माझा कोटी-कोटी प्रणाम कारण मी त्यांच्यातला नाही.



शिवीचा जन्म कधी झाला, कोणामुळे झाला, कुठे झाला याचा काडीमात्र पुरावा नाही. तरीही आजच्या युगात जेवढ्या झपाट्याने शिक्षणाचा प्रसार होत नाहीये, तेवढा प्रसार "ही"चा होतोय."मनुष्य" हे एक कोडेच आहे, कारण शिवी हे माध्यम एकच परंतु त्याचा प्रचार, प्रचारक विविध मार्गांन्ने करतात. कोणी आप्तेष्टांचा उद्धार करुन प्रचार करतो तर कोणी स्वतंत्र "ईस्टाईलमध्ये" करतो.

या आधुनीक युगात संस्कारांचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे, परंतु शिव्यांचा अभाव मुळीच जाणवणार नाही. शास्त्रज्ञ जेवढा वेळ एखाद्या वस्तुच्या संशोधनास लावतात, तेवढ्याच वेळात आजचे युवक (+ युवती) २०-२५ शिव्यांचे संशोधन करून भावी आयुष्यात सर्रास वापरून मोकळे पण होतात. घरी जर आई-वडिलच शिव्या देत असतील, तर तीच प्रथा पुढे त्यांची मुलेपण चालवितात. वडिलोपार्जित संपत्ती नाही मिळाली तरी वडिलोपार्जित "शिव्या" मुले आरामात, काहीही कष्ट न करता आत्मसात करतात.





प्रत्येक मनुष्य या जगात येतो आणि जातो आणि मागे उरतात त्या फक्त त्याच्या . . . . . . . . आठवणी .... आठवणी नाही हो, फक्त शिव्या.





तात्पर्य: अन्न, वारा आणि निवारा यांप्रमाणे "शिवी" ही माणसाची आज एक मूलभूत गरज बनली आहे.



````````` ` सुरज ` ```````````````

मृत्यु निघाला रे आज
गीत स्वस्तुतीचे गात
देण्या माझ्याशी टक्कर
आहे कोण या जगात

असो राजा किंवा रंक
सारे माझ्यापुढे फ़िके
जन्मलेल्या प्रत्येकाला
वेढे मरणाचे धूके


धुक्यातून मरणाच्या
नसे सुटका कोणाची
गाथा मग का ती गावी
अशाश्वत जीवनाची

प्रेम शतदा करता
जीवनावर ज्या तुम्ही
जिवनाची त्या बैठक
क्षणातच उधळे मी

क्षणभंगूर जीवन
मृत्यू हेच एक सत्य
सामर्थ्यापुढे माझिया
बाकी सारे सारे मिथ्य

आहे यादीमध्ये आज
आजी एक नव्वदीची
खूप जगली आयुष्य
वाट आता परतीची

अंधुकशी दृष्टी तिची
त्वचा सुरकूतलेली
भार वाहून वयाचा
आजी आता थकलेली

आजी बसलेली खिन्न
तिची नजर शून्यात
मृत्यू ठाकला समोर
परी तिच्या न ध्यानात

मृत्यू झेपावला पुढे
गुंडाळण्या गळा फ़ास
दचकले जिवनही
आता शेवटचा श्वास

परी कोणाचे हे हास्य
कानी आले आकस्मात
नाद मधूर ऐकता
थांबे मृत्यूचाही हात

आले कसे खळाळत
दीड वर्षाचे तान्हुले
चालत नि लुटूलुटू
आजीकडे झेपावले

खदाखदा हास्य त्याचे
काय हासण्याचा डौल
हासण्यात त्या खळाळे
लक्ष जिवनांचे बळ

गेली खिन्नता पळून
आजी खळाळून हसे
हासण्यात तिच्या आता
बळ जिवनाचे दिसे

बिचकून मृत्यू मागे
दोन पाउले सरला
बळ हास्याचे कळता
अहंकारही जिरला

मृत्यू पाही यादी पुन्हा
आता तिचे नाव नाही
जिवनाच्या बळाने या
थांबविले काळालाही

लपे हर्षात जीवन
आणि हर्ष जिवनात
अशा जिवनाचे बळ
करी मृत्यूवर मात

आज इथे एकटाच
मृत्यू फ़िरला माघारी
जन्म हेच एक सत्य
हाच भाव दाटे उरी

"अळवावरच्या पाण्यात मी
आताच न्हाऊन आलोय
आठवणींचा गाळ मी
आताच जाळून आलोय

खरचं,
शब्द हे मुके असतात
डोळे हे अधु असतात
तु असलीस नसलीस तरी
पापण्या मात्र रडत असतात

एकच गोष्ट आता मी
तुझ्याकडून शिकलो
जाळलेल्या आठवणींवर
जगायला शिकलो

मात्र आता खूप झाले
तुझ्यासाठी झुरणे
आसवांच्या नदीमध्ये
पुन्हा पुन्हा डुंबणे

ठरवलयं,
आता एकच गोष्ट करणार
समोर तुझ्या असाच जगणार
पाहू नको तेव्हा तू
माझ्या डोळ्यामध्ये
अधू ते नक्कीच असतील
"पाऊलखुणांमध्ये"

समोर कधी आलीस तरी
खंबीर उभा राहीन
चुकुनच जर बोललीस तर
हसून दाद देईन

"पण,"
यापुढे मात्र मला आठवू नकोस
स्वतःसाठी मला तू साठवू नकोस
कारण,
मीच नसेन तेव्हा
तुझ्या कश्यासाठीही
एकच फक्त असेल तेव्हा
"तुझ्या जीवामधूनी"

अळवावरच्या पाण्यात तेव्हा
तू न्हाऊन येशील
आठवणींचा गाळ तेव्हा
तू जाळून येशील."

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामान्च्या अभन्गाचा अर्थ
आता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार ...
माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय ...
मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?


या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...
मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...

मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...
आणि आपले रोजच ...
कुढत कुढत मरायचे ...

जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असत कुणीतरी...
दिवे सगळे विझल्यावर जळत असत कुणीतरी...
त्याच खिडकित चन्द्र होउन टप टपण्यात मजा आहे ...
कुणीतरी ऐकत असत म्हनूच गाण्यात मजा आहे...

मैफील सारी जमुन येते समईवरती दाद येते
कैवल्याच्या शिखराला गवयाची साद येते
अशाचवेळी पन्ख फुटून उडून जाण्यात मजा आहे
कुणीतरी ऐकत असत म्हनूच गाण्यात मजा आहे...

कुणीतरी वाट पाहत असत म्हणुनच जाण्यात मजा आह
!!!!!!!!!!!!!!!!!

माझ्या वाचनातील एक कविता..


डोळ्यात समुद्र दाटलेला,
आजूबाजूला विहीरी आटलेल्या
हाती फक्त प्रतिक्षा,तरीही जगणे आहेच..

शेतात नाही पीक
शाश्वत फक्त भूक
तरीही जगणं आहेच

कधी जातात औषधाविना,
तर कधी चुकीच्या औषधामुळे,
घराघरातील कोवळी मुलं
तरीही जगणं आहेच

गरीबाई, महागाई, भ्रष्टाचार,
यामुळे खचले फार
झालो जरी उदास फार
तरीही जगणं आहेच


माणूस करतोय माणुसकीवर वार
सैतान झालाय मनावर स्वार
आणि नाती म्हणजे निव्वळ व्यवहार,
तरीही जगणं आहेच

जगणं झालं महाग
मरण जरी स्वस्त,
हे जरी असलं सत्य
तरीही जगणं आहेच,
तरीही जगणं आहेच............

कासवाने मान खसकन आत ओढून घेतली
तेव्हा पहिल्यांदाच मला जाणवलं त्याचं अभेध्य कवच
स्वत्वाला कवटाळून बसणारं,
इतरांना दाद न देणारं,
स्वतः केलेल्या गुन्ह्याना पाठिशी घालणारं,
इतरांकडे पाठ फ़िरवणारं
आणि स्वसंरक्षणासाठी टक्कर देणारं
माझी तलवार आता निरुपयोगी होती
कासवाने मान बाहेर काढेपर्यंत

पिंजरा तोडून
मुक्त झालेला तो पक्षी
जखमी पंखातील रक्ताने
हिरव्या भूमीवर
लाल नागमोड उमटवीत
उडतो आहे आपल्या घरट्याकडे,
कदाचित आपल्या म्रुत्युकडेही.
पण
त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशही
हिरावून घेऊ शकत नाही
रक्तात माखलेला
त्याचा आनंद ... अभिमान...
पिंजरा तोडल्याचा.
- कुसुमाग्रज

डोलणारी झाडे गाती झोक्यामध्ये
पावसाच्या थेऎम्बात चिम्ब म उ म उ धुक्यामध्ये

थन्ड हवेचे आल्हाद रुप , आणि दवान्चे पिसारे
आवाज ट्प ट्प खळाळत्या , पाण्याचे अन्कुरे

वीज पळत खो देते ढगान्ना,
गुद गुली करीते पाणी छ्परान्ना

झिर पत पाणी वाहे मातीतून,
ढगही हसतो सदाफूलीतून

हिर वळीचे हिर वे गवत गोन्जरे दवान्ना
पावसाचे कारन्ज तुशार देतान्ना


डोलणारी झाडे गाती झोक्यामध्ये
पावसाच्या थेऎम्बात चिम्ब म उ म उ धुक्यामध्ये
म्रुणाल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी
हे चन्द्र-सूर्य-तारे होते तिच्याचपाठी;
आम्हीही त्यात होतो, खोटे कशास बोला
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी......

विन्दा करन्दीकर.

नको आयुष्यात थारा त्याला, ज्याला म्हणतात 'SORROW'
भूतकाळातील चुकांकडून, शहाणपण करा 'BORROW'

नाती-गोती हवीत अशी, ज्यामध्ये नकोत 'FURROW'
चाड राखा त्याची, जे तयार करतं 'MARROW'

करा मनोव्रुत्ती विशाल, नको ती 'NARROW'
शब्द वापरा जपून, कारण ते असतात 'ARROW'

पहाटे ऐका चिवचिवाट, जी करतात छोटे 'SPARROW'
सुखद आठवणींने भरीव असू दे, ह्रुदयाचा 'BURROW'


~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~

वॅलेन्टाईन्स डेनं क्येलं आमाले खडबडून जागे
जाताना रस्त्यानं "आर्चीस"मदि लै लोकं दिसल्ये
म्हनुन आमिबि पल्यांदा गुमानशान आत शिर्लो
येग-येग्ल्या वस्तु अन झगमग पगुन आमी थतंच हरीवलो

येक तास झाल पन कोनतीच वस्तु न्हाय घ्येतली
मंग येक चिमत्कार झाला,म्हाज्या डोळ्यापुढं "ती"आली
तिच्या सुंदर मुखड्यापर्मानं येक झकास कार्ड घ्येतलं
थतुन मंग क्वालिजात जायला आम्ही भायेर पड्लं

क्वलिजात आमच्या चश्म्यानं तिला लै शोधलं
भितीपोटी हातातलं कार्ड घामानं वलं-वलं झालं
अचानक "ती"माका दिसली,पन फटफटीवर येका पोरासंगं
चश्मा माझा बोलला,असलं कायबी वंगाल बगु नगं

रंग आमच्या कार्डाचा,त्या फटफटीसमुर फिका ठरला
ईचार कार्डाचा धा तुकडं करन्याचा,आमच्या मनात आला
पन अशी चूक पुन्यांदा करायची न्हाय म्हनून त्यो ईचार मनातुन काढून टाकला
आज भित्ताडावर लटकवल्येलं "ते"कार्डं बगुन त्यो खराब वॅलेन्टाईन्स डे आठिवला....त्यो खराब वॅलेन्टाईन्स डे आठिवला.....


~~~~~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~~~

पाहुनी सौंदर्य तुझे, झालो मी 'BEDAZZLED'
काळीज माझे तुझ्याकडे,'GONE IN 60 SECONDS'

तू नसतेस तेव्हा,रक्ताचं वाढतं 'SPEED'
मिळविणे तुला म्हणजे, आहे 'MISSION IMPOSSIBLE'

रूसवा तुझा दूर करण्यास, जातो माझा 'RUSH HOUR'
दे होकार मलाच, नाहितर होशिल तू 'UNFAITHFUL'

प्रेमात नको बनूस,तू माझी 'TERMINATOR'
फेकून दे ते द्वेशाचे, खोटार्डे 'THE MASK'

वाटेत आपल्या प्रेमाच्या, येइल का तुझी 'THE MUMMY'
की उभे ठाकतिल पिताश्री तुझे,बनूनि वेडे 'RAMBO'

भेटताना तुला वाटे, जणु 'ENTER THE DRAGON'
प्रेमाची आपुल्या करू नकोस, ती दयनिय 'TITANIC'

दोघेच असू आपण, नको प्रेमामध्ये 'TRAFFIC'
वाट पाहीन तुझी मी, कारण 'TOMMOROW NEVER DIES'

होशील का माझी तू, प्रेमळ 'Mrs.DOUBTFIRE'
कारण तुझ्यासारखी दुसरी,नाही कोणी 'PRETTY WOMAN'

~~~~~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~~

जवा ग्येलो होतु पगायला, म्हाज्या गंगुला,
ईचारान्नी क्येलं होत हैरान, आमच्या डोसक्याला,
पन गंगु समोर येताच, लागली ग्वाड लाजायला,
आमचं नरम कालीज, लागलं बिगी-बिगी पागळायला.

अंबाबाईच्या साक्षीनं, क्येलं आम्ही लगीन,
म्हनलं झकासमंदी आता, आवुक्षं घालविन,
गंगु म्हनली, रोज झुनका-भाकर चारीन,
सांच्याला व्हरांड्यात, तुमची वाट बगत बशीन.

पन कसली झूनका-भाकर अन कसलं काय,
रातच्याला, आम्हीच च्येपतुया तिचं हात-पाय,
कधी म्हनलं, पुरन-पोळी करून द्येतीस काय,
तर म्हनती, ह्ये हातातलं लाटनं बगितलं काय.

सकाळच्याला, म्हशिचं दूध म्या काढतु,
गनप्याचं शेंबडं नाकबी, म्याच पुसतु,
तिचं नौवारी लुगडं, म्या धुतु,
अन शेतामंदीबी, म्या येकटाच राबतू.

सपान म्या कंदी, बगत न्हाय,
थतंबी धुपाटनं घिऊन, गंगु हूबी हाय,
आता आठिवत्यो, माझा बा आन माय,
हिला बगायला ग्येलो तवा, डोसकं श्येन खात व्हतं काय.

दोस्ताला म्हनलं, ह्यो समदा परिनाम कशाचा,
म्हनला, ल्येका, ह्योच तर हाय फोबिया प्रेमाचा.... ह्योच तर हाय फोबिया प्रेमाचा....

~~~~~~~~~~~~~ सुरज ~~~~~~~~~~~~~~~

येकलेपनाची कास सोडू नगं
पिरेमाची वाट बाळा धरू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

नुसतं रुपावर भाळू नगं
येड्या भवर्‍यापरमानं भुलु नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

नजर कुनाशी कदी भिडवू नगं
भिडलीच कदी तर येडा होऊ नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

काळ्या क्येसांच्या जाळ्यात अडकू नगं
पान्याविना असलेल्या ह्या तळ्यात पवू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पिरेमपतर कदी कुनाला ल्हिऊ नगं
कागूद अन शाई वाया घालवू नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पोरीसाठी तुजं BP वाडवू नगं
सपनातला त्यो वाडा सजवु नगं
पिरेम कराया ल्येका धजवु नगं

पन आता मरायचंच हाय की ओ कवातरी
मंग दगडापरिस ही ईटंच बरी
म्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....म्हनुन पिरेम कराया कदी ईसरू नगं.....

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ सुरज ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

तु असताना तुझाशी,
खुप खुप बोलायचं ठरवतो,
मुक्या भावनांना,
शब्दात बसवायचं ठरवतो,
चार ओळी जोडुन
कवीता करायची ठरवतो,
पण तु आलीस की,
शब्द अबोल होतात,
मन मात्र बोलयला लागत
तु नसताना मात्र
मुक्या भावनांनचे शब्द होतात,
आपसुक चार ओळींची कविता होते,
एक गोष्ट मात्र नक्की
तुझ्या असण्यापेक्शा तुझ्या,
नसण्यातच मी जास्त जगतो.......
........ नागेश

जोगेश्वरी उपनगराच्या मधोमध वसली आहे जोगेश्वरी देवी. महाकाली गुंफेत या देवीचं अतिशय संुदर असं प्राचीन मंदिर आहे. चहुबाजूंनी नवीन बांधकामाचा विळखा पडला असला तरी या मंदिराचं सौदर्यं अबाधित आहे. या मंदिरात प्रवेश करताच क्षणी पावित्र्य आणि मांगल्याने भारलेल्या वास्तूत प्रवेश केल्याचा अनुभव येतो. हजारो वर्षांपूवीर्च्या या गुंफांचं बांधकाम म्हणजे भारतीय भारतीय वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या गुंफेत जोगेश्वरी महाकाली देवीप्रमाणेच भगवान शंकर आणि श्रीगणेशाचीही मंदिरं आहेत. मंदिराच्या आत प्राचीन कोरीवकाम पाहायला मिळतं. न दुभंगणारी शांतता , प्रसन्न वातावरण अंतर्मुख करतं. भल्या मोठ्या कातळात ही गुंफा खोदलेली असल्यामुळे गुंफेच्या आत बारा महिने गारवा असतो. नवरात्रीच्या काळात या देवळात भक्तगणांची पहाटेपासून रीघ लागलेली असते. सुंदर नक्षीदार भव्य खांबावर तोललेलं हे देऊळ प्रेक्षणीय तर आहेच पण त्याचबरोबर ही देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे अशी श्रद्धा आहे. अशाप्रकारची प्राचीन मंदिरं मुंबईत आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उरली असल्याने जोगेश्वरीच्या या देवळाचं महत्त्व वेगळं आहे. सिमेंटचं जंगल वाढत चाललेलं असताना या मंदिराचं पुरातन सौंदर्यं जपणं मुंबईकरांचं कर्तव्यच आहे.

आपल्या देशात प्रत्येक गाव हा देवीमातेचाच एक अवतार मानला जातो. देवीच्या या अवताराला उत्तरेकडे ' माताजी ' म्हणतात तर दक्षिणेत ' अम्मा '. आपल्याकडे ही देवी येते ' गावदेवी ' होऊन. या देवीच्या मूर्त स्वरुपात म्हणूनच बहुदा फक्त मुखवटा आणि हात दिसतात. अवघे गाव हे तिचे बाकीचे शरीर असते. म्हणूनच गावाला नाव मिळते ते त्या देवीचेच. जसे , चंडीवरून चंडीगड , कालीमातेवरून कोलकाता , श्यामलादेवीवरून शिमला , नैनादेवीवरून नैनीताल आणि ' मुंबादेवी ' वरून मुंबई!

गावाने या ग्रामदेवतेचा योग्य मान राखला नाही की ती ' मरीआई ' चा भयावह अवतार धारण करते. रोगराई आणते , मृत्यूचे तांडव मांडते , दुष्काळाने ग्रासते. ' जरी ' च्या अवतारात ती लहान मुलांना कांजिण्याच्या तापाने ग्रासते. मग देवीचा कोप थांबावा यासाठी गावातील पुरुष क्षमायाचना करतात , स्वत:ला शिक्षा करून घेतात. स्त्रिया देवीला शांत करण्यासाठी दही वाहतात. तिला बांगड्या , फुलांचे हार अशी सौभाग्यलेणी अर्पण करतात. देवी जेव्हा शांत होते तेव्हा तिला ' शितलादेवी ' म्हणतात.

देवीच्या ' जरी-मरी ' अवताराचे पुराणात वर्णन आढळते ते हे असे. पण मुंबईतील प्रमुख ' जरी-मरी ' मंदिरं मात्र या पुराणकथेशी नातं सांगताना दिसत नाहीत.
.................................
जरी मरी माता मंदिर , एस.व्ही. रोड , वांदे पश्चिम

वांद्याला एस.व्ही. रोडवरून लिकिंग रोडकडे जाताना तलावाच्या अगदी समोरच असलेले हे मंदिर सहज लक्ष वेधून घेते. मंदिरावरची ' जरी-मरी माता मंदिर ' पाटी दूरूनच वाचता येईल अशी. मंदिराने १९९६ सालीच त्रिशताब्दी महोत्सव साजरा केला आहे. म्हणजे मंदिर तब्बल ३१० वषेर् येथे उभे असून ' क्षत्रिय मराठा परीट ज्ञाति मंडळा ' च्या ताब्यात आहे. सध्या या मंडळाच्या श्ाी जरीमरी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षस्थानी रमाकांत नारायण पुरारकर आहेत.

ट्रस्टच्या कार्यर्कत्यांनी दिलेल्या माहितीनुसार , तीनशेहून अधिक वर्षांपूवीर् वांद्याच्या या परिसरात परिटांची मोठ्या प्रमाणात वस्ती होती. मंदिराच्या समोर आजही तलाव आहेच. पूवीर् मंदिराच्या मागील भागातही असाच तलाव होता. पण काळाच्या ओघात त्यात भराव घालण्यात येऊन आज तिथे इमारती उभ्या आहेत.

मंदिराची दंतकथा अशी सांगितली जाते की , तेथील एका शिळेवर एक गाय रोज पान्हा सोडायची. तिथेच मग गावकऱ्यांनी ' जरी-मरी ' चे अर्थात ' जगवणाऱ्या-तारणाऱ्या ' मातेचे मंदिर उभारले. ही ' जरी-मरी ' देवी ही वसोर्व्या नजीकच्या मढगावच्या हरबादेवी व हरडादेवी यांची धाकटी बहीण मानली जाते. त्यामुळेच आषाढात हरबादेवीच्या यात्रेनंतर आठ दिवसांनी जरी-मरीची यात्रा असते. नवरात्रातही येथे नऊ दिवस जागरण-भजनकीर्तन , हळदीकुंकु आदी कार्यक्रम चालतात. गाडगेमहाराज पुण्यतिथीलाही येथे कार्यक्रम असतो. मार्गशीर्ष महिन्यात देवीची पालखी निघते. संपूर्ण वांदे परिसरात निघणाऱ्या या मिरवणुकीत दहा हजाराच्या आसपास लोक सहभागी होतात.

' जरी-मरी ' चे हे देवस्थान स्वयंभू व जागृत मानले जात असल्याने मोठ्या संख्येने येथे लोक नवस बोलण्यासाठी वा सुपारीचा कौल लावण्यासाठी येतात. पश्चिम उपनगरांच्या वाटेवर हे मंदिर असल्याने सिंधी , पंजाब्यांचीही इथे मोठी गदीर् दिसते.

जिच्या नावातच ' शितल ' ता आहे , ती ही शितलादेवी! शितलादेवी कोळी बांधवांच्या घरात होणाऱ्या प्रत्येक शुभकार्याची साक्षीदार आहे. नवरा-नवरीला हळद शितलादेवीच्या मंदिरात लागते. मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीच्या पाण्याने गोवर , कांजिण्या झालेल्या मुलाला आंघोळ घातल्यानंतर त्या पुन्हा येत नाहीत , असा समज आहे. येथे शांतादुगेर्चे व त्याचबरोबर खोकलादेवीचेही मंदिर आहे. खोकल्याच्या रुग्णांचे आजार खोकलादेवीच्या कृपाप्रसादाने बरे होतात , असा एक समज आहे. मंदिरात अष्टमीला होमहवनाचा मोठा कार्यक्रम असतो , असे मंडळाचे विश्वस्त कमलेश शेटये यांनी सांगितले.

एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ..!
तिकडून आली बस...
बसमध्ये बसलं,
तिकीट नाही काढलं....
तिकीटचेकरने पाहीलं,
चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!

भंगली ती प्रीत आता
संपले संदर्भही;
थांबलेली तू तिथेच
आणि मी मात्र प्रवाही...

वेगळाळल्या आज वाटा
आता एकटीच पाऊली
संग सुटे सकलांचा
हरवलेली सावली...

सुगंध जपला तुझ्याचसाठी
झाले फूलच त्याला पारखे
मृत भावना या मनाला
आता उन-पाऊस सारखे...

वचन देते मी तुला रे
भंगलेला शब्द तो
बंध जरी तो मोडलेला
पण वेदना मी साहतो...

आज डोळ्यांत अश्रु आले
पुसून टाकल्या खूणा
जिंकण्यासाठी सिद्ध झालो
जरी एकटा मी पुन्हा...


- श्रेयस

तिच्या बाहुपाशात मला आहे सामायचं
जगुन झाल्यावर पुन्हा एकदा, तिच्यासमवेत जगायचं,
आकाशाच्या खिडक्यांतुन, खाली डोकावुन पहायचंय
मृत्यु समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

निरोप घेऊनी शेवटचा, दूर निघुनी जायचंय
जीवनातील सुख-दुःखांना, पृथ्विवरच विसरायचं,
मृत्युच्या रम्यनगरीत, मला आहे हरवायचं
"तो" समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

मी निघून गेल्यावर मात्र, कोणी नाही रडायचं
पीडा दूर झाली म्हणून, मनसोक्त हसायचं,
आठवण आल्यास माझी, हळुच आकाशाकडे पहायचं
मरण समोर येताच, त्याला आहे बिलगायचं

पण मलाही अजून, थोडं जीवन जगायचयं
सुख कुठे असतं का, हे नीट तपासायचयं
ज्याला मी हवा असेन, असं मन शोधायचयं
मृत्यु समोर येताच, त्याला थोडा वेळ थांबवायचयं..... त्याला थोडा वेळ थांबवायचयं....

~~~ ~~~ ~~~ सुरज ~~~ ~~~ ~~~

प्रभावती देवीची बहीण मानल्या जाणाऱ्या जाखादेवीचे मंदिर प्रभादेवीपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथील स्थानिक रहिवासी अनंत विठ्ठल कवळी यांनी जवळपास १०० वर्षांपूवी या देवीचे मंदिर बांधले. ते राहत असलेल्या कवळी वाडीतील एका तळ्यात ही मूतीर् सापडली. काहीशा भग्न अवस्थेत असल्याने वेगळ्या संगमरवरी मूतीर्ची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली. ही मूतीर् ज्या बंदिस्त चौथऱ्यावर आहे , तेथे मूळ स्वयंभू मूतीर्ही आहे. या देवीचाही पौष पौणिर्मेला सात दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.

बाराव्या शतकातील बिंबिसार राजाची कुलस्वामिनी असलेल्या प्रभावती देवीचे मूळ मंदिर गुजरातमध्ये होते. मुघलांच्या मूतिर्भंजनापासून देवीला सुरक्षित ठेवण्यासाठी कर्नाटकात आणि तेथून माहीमच्या खाडीत आणून ठेवण्यात आले असे मंदिराचे पुजारी जयवंत जोशी सांगतात. शाम नायक या पाठारे प्रभु जातीतील व्यक्तीने १७१४ मध्ये हे मंदिर बांधले. मंदिरासमोरील विहिरीत नायक यांना ही मूतीर् सापडली. प्रभावतीच्या एका बाजूला चंडिका आणि दुसऱ्या बाजूला कालिका देवीची मूर्ती आहे. संवत्सर १७७१ मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा करतेवेळी कोरण्यात आलेला मोडी लिपीतील पुरातन शिलालेख मंदिराच्या प्राचीनतेची ग्वाही देतो. पौष पौणिर्मेला सात दिवस चालणारा सप्ताह हा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव! मंदिर परिसरातील दीपस्तंभ यावेळी प्रज्वलित केला जातो. येथे भरणारी मोठी जत्रा आणि तेथे मिळणारा मालवणी खाजा हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.

वरळी कोळीवाड्यातील प्रमुख देवस्थान म्हणजे गोलफादेवी! उंच टेकडीवर असलेले हे मंदिर १२ व्या शतकात बिंबराजाने बांधल्याची आख्यायिका आहे. गोलफादेवी , साकबादेवी आणि हरबादेवी अशा तीन मूर्ती मंदिरात आहेत. सौम्य रूप असलेल्या गोलफादेवीचा उल्लेख पुराणांमध्येही आढळतो. पौष शाकंबरी पौणिर्मेला भरणारी देवीची यात्रा , चैत्र शुद्ध अष्टमीचा भवानी उत्पत्ती महोत्सव आणि अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत चालणारा शारदीय नवरात्र हे देवस्थानातील तीन महत्त्वाचे उत्सव! कोळी , भंडारी आणि ईस्ट इंडियन या जमाती देवीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिराचा जीणोर्ध्दार सुरू असून लवकरच ते नव्या वास्तूत दर्शनासाठी खुले होईल असे जीणोर्द्धार समितीचे अध्यक्ष विलास वरळीकर यांनी सांगितले.

एकाच शिळेतून कोरण्यात आलेली तुळजाभवानीची मूर्ती हे वैशिष्ट्य असलेल्या पाचपाखाडीतील तुळजाभवानीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज शिवेंदराजे भोसले यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. सन १६५८ मध्ये तुळजापूरला भवानीदेवीची घटस्थापना दुपारी सूर्य माथ्यावर बारा वाजता तुळजापूराता केली होती. तोच योग ठाण्यातील प्रती तुळजापूर मंदिरात साधण्यात आला.

या दोन देवळांच्या शेजारीच अंबामातेचं देऊळ आहे. ही देवी ' व्याघ्रेश्वरी ' म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. पूर्वी मध्यरात्री नित्यनेमाने एक वाघ या देवळात येत असे अशी आख्यायिका आहे. इथेही अश्विन महिन्यात विजयादशमीपर्यंत मोठी जत्रा भरते. अष्टमीला इथे मोठा होम केला जातो.

एक मनुष्य खापरात चणे भाजत होता. तेव्हा ते चणे फडफड करून उड्या मारू लागले. ते पाहून
तिथे असलेला एक मठ्ठ डोक्याचा मुलगा, 'काय मूर्ख आहेत ते चणे. यांचं अंग भाजतं आहे
आणि त्यांना गाणं सुचतं आहे

अवेळी कोणतीही गोष्ट करणारा मनुष्य हास्यास्पदच ठरतो.

परळगावातून शिवडीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना डोंगर फोडावा लागला होता. तो फोडत असताना ९ ऑक्टोबर १९३१ रोजी १० फुटी शिळा सापडली. हीच शिळा पुढे ' बारादेवी ' या नावाने प्रसिद्ध झाली. वास्तविक ही सहाव्या शतकातली शिवाच्या दुमिर्ळ मूर्तींपैकी एक मूर्ती आहे. यात शिवाच्या एकूण सात प्रतिमा असून त्याभोवती पाच ' गण ' असून ते वाद्य वाजवताना दाखवण्यात आले आहेत. तरीही ग्रामस्थांनी याला ' बारादेवी ' असं नाव दिलं. कालांतराने चंडिका देवीच्या मंदिराच्या बाजूलाच एक मंदिर बनवून त्यात या मूतीर्ची स्थापना करण्यात आली. नवरात्रादरम्यान ' चंडिकादेवी ' च्या देवळात होमहवन व इतर पूजाअर्चा केली जाते. ' बारादेवी ' ची फक्त पूजाच केली जाते.

चंडिकादेवी ही सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञातीची ग्रामदेवता आहे. चंडिकादेवीची स्थापना सुमारे १५० वर्षांपूवीर् करण्यात आली. ब्रिटिशांच्या काळात मुंबईच्या गव्हर्नरचं निवासस्थान याच परिसरात होतं. (आता त्या इमारतीमध्ये हाफकिन इन्स्टिट्युट आहे) गव्हर्नरनेही या देवळाच्या देखभालीसाठी ग्रामस्थांना काही निधी व जमीन देऊ केली. तिथे आज संस्थानचं कार्यालय व धर्मशाळा आहे. या सर्व मालमत्तेला ' श्री चंडिका संस्थान ' असं नाव प्राप्त झालं असं या देवस्थानचे एक विश्वस्त मनोहर नारायण पाटील सांगतात. ' नवसाला पावणारी देवी ' असा चंडिकादेवीचा लौकिक असल्याने चैत्र व अश्विानात उत्सवांदरम्यान इथे भाविकांची रीघ लागते

ग्रँटरोड परिसरातील गावदेवीचं देऊळ २५० वर्षांपूवीर्चं आहे. सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञातिबांधवांची ही उपास्य देवता आहे. गावदेवीचं लीलावती असं दुसरं नाव आहे. १८२१ पर्यंत गावदेवीची ही स्वयंभू मूतीर् अरक्षित राहिली. जुनं मंंदिर १८६५ साली तर सध्याचं मंदिर १९६७ साली बांधण्यात आलं. या देवळात गणपतीच्या मूतीर्च्या एका बाजूला गाढव वाहन असलेली शितलादेवीची मूर्ती आणि दूसऱ्या बाजूला गावदेवीची मूर्ती आहे.

मुंबईचं महालक्ष्मी मंदिर प्रसिध्द आहे. इथे महालक्ष्मी , महाकाली आणि महासरस्वती या तीन रूपांत दुर्गामाता प्रकटली असं सांगितल जातं. १७२० पर्यंत हे देऊळ वरळी गावात होतं , परकी आक्रमणांमुळे अनेक देवळातील मुतीर् सुरक्षित ठिकाणी लपवण्यात किंवा विसजिर्त करण्यात आल्या होत्या , त्याप्रमाणे ही मूर्ती समुदात विसजिर्त करण्यात आली होती. काही काळानंतर एका कोळयाच्या जाळयात ही मूर्ती मिळाली. तर काहीजण सांगतात की , जेव्हा इंग्रजांनी मुंबईच्या सात बेटांना जोडण्याचं ठरवलं तेव्हा या कामाचा ठेका दिलेल्या शिवाजी प्रभू नावाच्या ठेकेदाराला अजब गोष्टीचा सामना करावा लागला. समुदात जेवढा भराव घातला जायचा तेवढा पाण्याखाली जायचा. इंग्रजसुध्दा या गोष्टीने हैराण झाले. तेव्हा त्या ठेकेदाराला दृष्टान्त देऊन देवीने सांगितलं की , ' माझी समुदात विसजिर्त केली गेलेली मूर्ती बाहेर काढा , तुमचं काम सोपं होईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूर्ती बाहेर काढल्यानंतर समुद शांत झाला. मग इंग्रजांनीही देवीचं देऊळ बांधायला जागा दिली.

जिच्या नावे या शहराला मुंबई म्हटलं जातं ती मुंबादेवी! साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी या देवळाची स्थापना आत्ताच्या सी.एस.टी विभागात झाली. इंग्रज सरकारने तिथे स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजसेवक पांडूशेठ सोनार यांच्या प्रयत्नाने १७३७ साली आजचं देऊळ बांधण्यात आलं. मुंबादेवीच्या उजव्या बाजूला अन्नापूर्णा देवीची मूतीर् आहे. प्रामुख्याने कोळी , पाचकळशी समाजातील नवविवाहित जोडपी देवीच्या दर्शनाला येतात. मंुगा या कोळी जातीच्या जमातीवरून या देवीला मंुगादेवी असं म्हणत त्याचाच पुढे अपभ्रंश मुंबादेवी असा झाला. पुराणकथेनुसार मंुबारक या विशालकाय प्राण्याचा संहार करण्यासाठी शंकर आणि विष्णू यांच्या तेजापासून या देवीचा जन्म झाला. मंुबारकाचा संहार केल्यानंतर त्याने देवीची क्षमा मागितली आणि तिचा आशीर्वाद मागितला. तेव्हा देवीने त्याच्या नावारून स्वत:चं मुंबादेवी हे नाव घेतलं.

साहित्य - बटाटे , साखर , वेलची पावडर , केशर , दुध , बदामाचे पाटळ काप , तूप

कृती - बटाटे उकडून त्यांची साले काढून टाकावी व जाड किसणावर किसून घ्या. थोड्या दुधात केशर भिजत घाला. पातेल्यात तूप गरम करुन त्यावर बटाट्याचा किस टाकून ते मिश्रण परतून घ्या. छान तांबूस रंग येऊन रवाळ होईपर्यंत भाजून घ्या. एक वाटी बटाट्याच्या रव्याला एक वाटी दूध घाला. वेलची पावडर , बदामाचे काप , केशरचे दूध घालून चांगली वाफ येऊ द्या.

साहित्य - एक वाटी साबुदाणा , दोन वा़टी ताक , दीड वा़टी गोड दही , दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे , तूप , जिरे , मीठ , साखर

कृती - साबुदाणा कढईत भाजून घ्या. त्यावर ताक ओतून दोन तास भिजत ठेवावा. वाढायच्या आधी तूप गरम करुन जीरे , मिरच्यांची फोडणी करा. साबुदाण्यामध्ये दही घालून त्यावर फोडणी द्या. चवीनुसार मीठ व साखर घाला. मिश्रणा व्यवस्थित एकजीव करुन घ्या. हा दह्यातला साबुदाणा चवीला छान लागतो.

साहित्य - सुरण , आंबट ताक , मिरच्या , आल्याचा तुकडा , मीठ , दाण्याचा कूट , राजगि-याचे पीठ , साखर , तेल किंवा तूप

कृती - सुरणाची सालं काढून त्याचा कीस करुन घ्यावा. कीस ताकात थोडा वेळ भिजत टाकावा व नंतर गाळून घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार वरील सर्व साहित्य घाला. आलं मिरच्य़ांची पेस्ट करुन त्यात घाला. कबाब करता येतील इतपत राजगि-याचे पीठ घाला. त्यानंतर गोल किंवा लांबट आकाराचे कबाब तयार करुन ते तेलात लालसर तळावेत. छान कुरकुरीत कबाब चटणीबरोबर द्यावे.

साहित्य- दोन वाट्या व-याचे तांदूळ , दोन वाट्या साखर , बेदाणा , काजू तुकडा , बदामाचे काप , तूप , वेलची पावडर

कृती- तांदूळ धुवून , निथळत ठेवा. पाव वाटी तूपावर तांदूळ परतून घ्या. नंतर त्यात चार वाटी पाणी उकळून घाला व किंचित मीठ घालून झाकण ठेवा. पाणी आटलं की साखर , वेलची पावडर , काजू , बदाम , बेदाणा घालून थोडंसं साजूक तूप घालून सांजा परता. एक वाफ आणा सांजा तयार.

साहित्य- दोन वाट्या व-याच्या तांदळाचे पीठ , एक वाटी साखर , दोन टी स्पून साजूक तूप , मीठ , दूध , खोवलेला नारळ अर्धी वाटी , दोन केळीची पानं

कृती - वरी तांदळाचं पीठ , साखर , तूप , मीठ आणि खोबरं , एकत्र करुन लागेल तेवढं दूध घालून भाकरीपेक्षा पातळ मळून घ्या. केळीच्या पानाच्या उभट लहान तुकड्यावर तूप लावून त्यावर लांबट आकारात पीठ थापून घ्या. त्यावर पुन्हा केळीच्या पानाचं आवरण द्या. तव्यावर पुन्हा एकदा केळीच्या पानाचं आवरण देऊन भाजून घ्या. वरुन झाकण ठेवा. वाफ आली की , पानगी उलटवून पुन्हा वाफ येऊ द्या. साजूक तूपाबरोबर पान खायला द्या

साहित्य - अर्धी वाटी साबुदाणा , दोन वाटी नारळ , साखऱ , साजूक तूप , वेलची पावडर

कृती - साबूदाणा दोन-अडीच तास भिजवून ठेवावा. खोब-याच्या प्रमाणात साखर मोजून त्यात घाला. नारळाचं पाणी घालून ढवळा. जाड बुडाच्या पातेल्यात एक टे. स्पून साजूक तूप गरम करावं. त्यात वरील मिश्रण घालून ढवळून घ्या. त्या मिश्रणात वेलची पावडर घाला. मिश्रणाचा गोळा होऊ लागला व ढवळण्यास जड वाटू लागले की पातेलं गॅसवरुन उतरवावं. त्यानंतर त्या मिश्रणाचे लाडू वळा.

साहित्य- दोन वाटी शिंगाड्याचे पीठ , एक वाटी दाण्याचा कूट , मीठ , जिरे , आलं , चार टे. स्पून दही , दोन ओल्या मिरच्या , तूप , सोडा , ओलं खोबरं , हवी असल्यास कोथिंबीर

कृती - दोन वाटी पीठ , दही , पाणी घालून ढवळून सात-आठ तास भिजवून ठेवा. त्याआधी त्या मिश्रणात मिरच्या , आल्याचा तुकडा आणि जिरं वाटून घालावं. दोन टे. स्पून तूप घालून ढवळून घ्या. थोडासा सोडा घालून पुन्हा ढवळा. तूप लावलेल्या थाळ्यात पीठ ओतून कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात वाफवून घ्या. थंड झाल्यावर ओले खोबरं घाला.

साहित्य - व-याचे तांदूळ , कोमट पाणी , मीठ

कृती - तांदूळ मिक्सरमधून वाटून पीठ करुन घ्या. चवीपुरतं मीठ घालून कोमट पाण्याने भिजवा व नेहमीप्रमाणे व-याचे कोरडे पीठ वापरुन भाकरी करा.

गरमागरम भाकरी उपवासाच्या बटाट्याच्या , रताळ्याच्या भाजीबरोबर किंवा खोब-याच्या आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर वाढा.

साहित्य - दोन वाटी शिंगाड्याचे पीठ , एक वाटी दही , एक वाटी तूप , दोन वाटी दूध , दीड वाटी साखर , एक वाटी ओलं खोबरं , एक टे. स्पून ओल्या नारळाचे पातळ काप , पाऊण टी स्पून सोडा

कृती - शिंगाड्याच्या पीठात साखर , तूप , दूध , दही घालून एकत्र मिसळून चार-पाच तास ठेवा. केक करायच्यावेळी त्यामध्ये खोबरं , सोडा घालून एकत्र मिसळून चार-पाच तास ठेवा. केक करायच्यावेळी त्य़ामध्ये खोबरं आणि चिमूटभर सोडा घालून फेटून घ्या. त्यानंतर ओवनमध्ये हे मिश्रण ठेवा. ओवन नसल्यास एका थाळीला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण ओता. ती थाळी गरम तव्यावर ठेवा. त्यानंतर त्यावर आणखी एक तवा घट्ट ठेवा आणि केक भाजून घ्या

साहित्य- पाव किलो सुरण , चार-पाच हिरव्या मिरच्या , एक टी स्पून जिरं , ओलं खोबरं , पाव वाटी दाण्याचा कूट , तीन चार टी स्पून चिंचेचा कोळ , मीठ , साखर , तूप किंवा तेल.

कृती- सुरण किसून घ्या. पातेल्यात तूपाची फोडणी करुन त्यावर जिरं-मिरच्यांचे तुकडे घाला. सुरणाचा कीस , चिंचेचा कोळ , साखर आणि मीठ चवीप्रमाणे घालून परतून शिजू द्या. किस शिजून मोकळा व्हायला हवा. शेवटी दाण्याचा कूट आणि खोबरं घाला

संधी म्हणजे सकाळची "मुंबई लोकल"
हीला नेहमी सुटण्याआधीच पकडायचंय
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
तीला वेळेवर पकडायचंय
का तीच्यामागे धावत तिला पकडायचय

ध्येयाकडे जायला दिल्या नियतीने दोन लोकल
एक ’फ़ास्ट’ लोकल तर दुसरी ’स्लो’ लोकल
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
’फ़ास्ट’ लोकलने निराशेचे स्टेशन चुकवायचय
की स्लोने प्रत्येक स्टेशन वर थांबायचय

एक गेली तर दुसरी ही नक्कीच येणार पण
ती येईपर्यंत वाट ही पाहावी लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
हवं तिथे वेळेवर पोहोचायचय
की उशीरा पोहोचायचय

ही लोकल वेळेवर पकडलीत तर
आरामात खिडकीपाशी हवेशीर जागा मिळणार
हीला पकडायला उशीर केला तर
दरवाजावरच लटकावे लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
खिडकीपाशी आरामात हवा खात बसायचय की
बळजबरीने दरवाज्यावर लटकायचाय

या लोकलने प्रवास करताना
तुम्हाला कोणाच जागा नाही देणार
गर्दीतुन जागा स्वत:ची तुम्हालाच करावी लागणार
एखाद्या पुढच्या माणसाला डावलुनच पुढे जाव लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच

जन्माला आले रडत रडत
पाहिले दूध पीले रडत रडत
माझ्या आयुष्याची सुरवात झाली रडत रडत

शालेचा पहिला दिवस गेला रडत रडत
आजोबाचा मार खाउन केला अभ्यास रडत रडत
चौथी पास झाले ते पण रडत रडत

हायस्कूलला गेले खुप अभ्यास केला
पन दहावी पास झाले रडत रडत
कमी मार्क भेटले मग कॉलेजचे admission झाले रडत रडत

घरचे काम नाही केले का आईच बोलने खायचे
बाबान चे काम करून सुद्धा बोलने खायचे
बोलने खाउन ओरडा खाउन काम करायचे रडत रडत

सुन्दर असे जग त्यात रडके माझे जीवन
बस ठरवले मी हसत खेळत जीवन जगायचे
college चे दिवस मौज मजेत काढायचे

मला आयुष्यात मित्र आणि मैत्रीनीही भेटल्या
अभ्यास केला चांगले मार्क पन भेटले
खुप खुप रमले खुप खुप गमती जमती ही केल्या

पण कॉलेज संपले मित्र मैत्रिणी ची सोबत कमी झाली
त्या आठवणी काढून दिवस जाऊ लागला रडत रडत
मग परत घरचे काम करू लागले रडत रडत

अणि मग बाबानी मला मुलगा पहिला लग्नाला
मला नाही आवडला तरी पन माझा होकार सांगितला
नको नको बोलून सुद्धा लग्नाला उभी राहिले मी रडत रडत

कॉलेज ही सोडले अणि घर ही सोडले
कोवल्या वयात माझा झाला संसार सुरु
सासुरवाडी चा प्रवास झाला सुरु .........रडत रडत

सकाळी सकाळी ससुचा त्रास
दुपारी सासरे बुआंचा त्रास
अणि रात्रि नवराया चा त्रास
दिवस सगळे जात होते रडत रडत

आयुष्यात जन्माला आले आहे रडत रडत
निम्मे आयुष्य गेले आहे रडत रडत
पण पुढचे आयुष्य जाइल का माझे रडत रडत ???

पावसाची रिमझिम
झालीस तू ओली चिम्ब
काय तुझ्या मानि चाले
कधीतरी सांग - सांग

विजांचा कड्डकडाटट
ओढ़यांचा खलखलाट
ढगांचा गड्गडाट
तुझा तो घमघमाट

पावसाचं बरसने
अलगद सटकने
हळूच तुझे ते येने
अन लाजुन तुझे ते हासने


निसर्गाचा अलंकार
पक्ष्यांचा झंकार
नदीचा हूंकार
अन तुझा तो शृंगार .............!!



- अभिजित

काही आठवनितले क्षण माझ्या..........
तू गेलीस पण आठ्वन का ठेउन गेली आहेस
आठवून त्यांना मी इथे रक्तबमबाळ होतोए..........

========================================

============

अजूनही आठवत मला
तुझ पहाटेच रूप
दमट दमट वातावर्नात
वाटे निर्खाव खुप

अजूनही आठवते मला
तुझे झोपलेले डोळे
गार गार गारोठ्यात
जसे उन पड़े कोवळे

अजूनही आठवते मला
माझा स्पर्शाने तुझ शाहार्ण
उघडून डोळे हळूच
सूर्या सारखं उजाड़ण

अजूनही आठवते मला
तुला पुन्हा झोप यायची
मला राग येऊ नये म्हणुन
माझ्या बाहुत शिरायची

अजूनही आठवत मला
शिरल्यावर तुझ एकरूप होण
मी छेड काढ्ताच
मला घट्ट पकडून घेणं

अजूनही आठवत मला
तू जवळ आल्यावर मला झोप यायची
प्रेम डोळ्यात आणून मग
तू वाट बाघायचिस

आता पुढे मात्र आठवत नाही
झोपेचं डोळयांपुढे क़र्ज़ झालं होत्
तू तर जागीच होती न
येशीलका कधी संगयाला.... मग काय झालं होतं ???

म्हणतात तसं, आपलं डोकं फिरवतं
पहिलं प्रेम आपल्याला शिकवतं

कॉलेजच्या दिवसात
जूनच्या पहिल्या पावसात
आभ्यासाच्या त्रासात
कंटाळवाण्या गणिताच्या क्लासात

आपल्याला दिसते ती सुंदर तरूणी
पु. लं. च्या वर्णनातली ती सुबक ठेंगणी

हृदयाला प्रेम झाल्याचं पटतं
आपल्याला पावसात भिजल्यासारखं वाटतं

आपल्याला अभिमानाने मिरवतं
पहिलं प्रेम आपल्याला शिकवतं

आपण तिला रोज बघतो
दिवसातही तिच्या स्वप्नात जगतो
तिच्या प्रेमात ठार वेडे होतो

बोलण्याची हिम्मत करत नाही
ती आपल्याकडे बघतही नाही
आपलं जगणं तिला माहितच नाही

आपल्याला आपली जागा दाखवतं
पहिलं प्रेम आपल्याला शिकवतं

जेवणाच्या तासात
वडा-पावाच्या मंद वासात
तिच्या सहवासात

आपण दुसऱ्याच कुणालातरी पाहतो
तिथेच शुंभासारखे उभे राहतो

काहीतरी हरवल्यासारखं वाटतं
काहीतरी विसरल्यासारखं वाटतं
आपण चिखलात घसरल्यासारखं वाटतं

आपली चांगलीच जिरवतं

मित्रा तू फक्त हात दाखव
मीच तुला हात देईन
मित्रा तू फक्त जीव लाव
तूझ्यासाठी मीच जीव देईन.

मित्रा तू फक्त हाक मार
मी नक्की हजर असेन
मित्रा तू फक्त नेहमी बोल
नाहीतर मी नक्की कोलमडेन.

मी चुकलो तरी एकदाच बघ
मीच स्वःताहुन माफी मागेन
तू चुकलास तरी एकदाच बघ
मीच तुला माफ करेन.

मित्रा तु फक्त गोड हस
सारे श्रम शमतील
मित्रा फक्त एक मिठी मार
सगळी दुःख विसरतील

मित्रा फक्त तुझ्या आधारावर
मी जीवन जगत असेन
मित्रा तू फक्त आठवण ठेव

पेट्रोल महागणार ...
माझ्याकडे गाडीच नाही .. मला काय त्याचे?

ओ.बी.सी. कोटा वाढणार ...
माझे शिक्षण झाले ... मला काय त्याचे?

जेसिका लालचा खुनी निर्दोष सुटला ...
जेसिका माझी कोणीच नव्हती ... मला काय त्याचे?

शेअर बाजार पडला ...
मी कुठे पैसे गुंतवले होते ... मला काय त्याचे?

हिंदू देवतांची विटंबना होतेय ...
मी धर्मांध नाही ... मला काय त्याचे?

२१ काश्मिरी पंडीतांची गोळ्या घालुन हत्या ...
मी काश्मीरी नाही ... मला काय त्याचे?

शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव येत नाही ...
मी तर नोकरदार आहे ... मला काय त्याचे?

सरकार भारताला विनाशाकडे घेऊन जातेय ...
आपल व्यवस्थीत चाललय ना ... मला काय त्याचे?

आई, शेजारच्या बाई "चोर चोर" ओरडताहेत ...
शु.. आपल्याकडे नाही ना आला चोर? ... मला काय त्याचे?

या पिढीने मला काय त्याचे म्हणत हात झटकायचे ...
पुढच्या पिढीसाठी निष्क्रीयतेचे बीज रोवायचे ...

मग ते विषारी वृक्ष फ़ोफ़ावलेले पहायचे ...
आमच्या वेळी "हे असे नव्हते" म्हणत नि:श्वास सोडायचे ...

मला काय त्याचे मला काय त्याचे ...
म्हणत म्हणत जगायचे ...

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर होईल जीवन अळणी

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं,
थेट जाउन बोलण्या पेक्शा इझी आणि बेटर असतं,
गोड गुलाबी थंडीतल गुलाबी स्वेटर असतं,
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनातल बटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे एक सॉंग असतं,
ज्यातल कंटेन्ट राईट आणि ग्रामर रॉंग असतं,
सुचत नाही तेंव्हा तुमच्या हार्ट मधलं पेन असतं,
आणि जेंव्हा सुचतं तेंव्हा नेमक खिचात पेन नसतं,
पटलं तर पप्पी आणि खटकल तर खेटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं,
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं,
शे की, शे की हातामधून थरथरणार वर्ड असतं,
नुकतचं पंख फ़ुटलेल क्युट क्युट बर्ड असतं,
होप फ़ुलं डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे ऍग्रीमेंन्ट असतं,
५० परसेंट सर्टनं आणि ५० परसेंट जजमेंन्ट असतं,
ऑपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं,
सगळा असतो थेट सौदा,काही सुध्दा लेंन्ड नसतं,
हार्ट देउन हार्ट घ्यायचं सरळ साध बार्टर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे एक ड्रीम असतं,
लाईफ़च्या पेस्ट्रीवरील स्वीट स्वीट क्रिम असतं...........

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे! अजुन वेळ

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा Reply

बाळु सकाळी न चुकता ८.२१ पकडणार
संध्याकाळी कसा बसा ६.५२ला लोंबकळणार
चुकुन विंडोसीट मिळताच बाळु धन्य होणार
तो बिचारा मध्यमवर्गीय तो असाच रहाणार

कधी सरकार कोसळणार
कधी शेअर बाजार वधारणार
बाळु मात्र निर्विकार रहाणार
सकाळी न चुकता ८.२१ पकडणार

माणुस हा मरणारच, कधी बाळुचंही कोणी मरणार
पराकाष्ठेने बाळु डोळ्यातुन दोन थेंब सांडणार
पोचवुन आल्यावर बादलीभर पाण्यात अंघोळ करणार
दुस-या दिवशी सकाळी ८.२१ पकडणार

श्रावणात घन निळा बरसणार
आजुबाजुला मोगराही फ़ुलणार
पिसारा फ़ुलवुन मोरही नाचणार
बाळु मात्र न चुकता ८.२१ पकडणार

दिवसभर ऑफ़िसात बाळु पाटया टाकणार
साहेबाच्या शिव्यादेखील मख्खपणे ऐकणार
घरातल्या कटकटींतही बाळु तटस्थ राहणार
सकाळी मात्र न चुकता ८.२१ पकडणार

कधीतरी बाळु म्हातारा होणार
निवृत हौउन निवांत आयुष्य जगणार
८.२१ च्या वेळेला थोडा अस्वस्थ होणार
८.२१ मात्र न चुकता बाळुशिवाय धावणार

चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...

अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्‍त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं

जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...

थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....

तुझ्याशी काय काय बोलायचं,
हे आधीच मनाशी ठरवून येते...
पण तू समोर आल्यावर मात्र,
सारं काही एका क्षणात विसरून जाते !

मनात साठवलेले शब्द,
तुला पाहिल्यावर मनातच राहतात...
मनातील भाव मग हळूच,
डोळ्यांमध्ये उतरतात !

सुरू होते मग नजरेची भाषा,
जी कळते फक्त तुला नि मला...
वाटते असेच हरवून जावे तुझ्या डोळ्यात,
विसरून साऱ्या जगाला !!!

एकच चहा, तो पण कटींग...
एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून...
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...
स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..
अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

महाराष्ट्रातील अठरा शक्तीपीठंापैकी विरारच्या जीवधन गडावरील या देवीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. गाईच्या रुपात प्रकट झालेल्या देवीने गडावरुन जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला जीवदानीचा डोंगर आणि तेथे वास्तव्य करणारी आदिमाता जीवदानी म्हणून प्रसिध्द झाली. पायथ्याशी गणेश मंदिर आहे. तिथून गडाची उंची नऊशे फूट असून एकूण चौदाशे पायऱ्या आहेत. मुख्य मंदिरात दगडातच गाभारा करुन तिथे मूतीर् बसवण्यात आली आहे. या परिसरात अनेक पांडवकालीन गुंफा आहेत. त्यात कालिकामाता , भैरवनाथ , बारोंडा देवीची मंदिरं आहेत. शेजारीच मानकुं ड नावाची पाण्याची कुंडं आहेत. डोंगरावरुन खाली उतरलं की पापडखिंड धरणाच्या निसर्गरम्य परिसरात जीवदानी देवीची बहीण बारोंडा देवी आणि महादेवाचं मंदिर आहे. आता फनिक्युलर रोप रेलचा प्रकल्प लवकरच पूर्ण होत असल्याने गडावर जाणे सोपे होईल.

एकदा लालबहादूर शास्त्रीजी नैनी येथे गेले होते. तेथे सरकारतर्फे एक औद्योगिक नगर वसविण्याचे
प्रयत्न चालू होते. तेथील पूर्वीपासून चालू असलेल्या कारखान्यांचे निरिक्षण करुन टबे बनविणार्‍या
कारखान्यालाही भेट देण्यासाठी ते तेथे गेले. त्या कारखान्याचे वैशिष्ट्य असं होतं की पॅकींगपर्यंतचे
काम मशीनवर असे. शास्त्रीजींना पूर्ण कारखाना दाखवल्यानंतर वर असलेल्या मोठ्या गच्चीवर
नेण्यात आले. तेथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी मऊ आसनांच्या खुर्च्यांची सोय केली होती.

बसण्यासाठी खाली एक मोठी सतरंजी घालून ठेवली होती. त्यावर सर्व कामगार
बसले होते. शास्त्रीजी तेथे पोहचताच सर्व उपस्थितांनी उभे राहून त्यांना अभिवादन
केले व स्वागतासाठी सर्व पुढे आले.

नंतर खाली बसले व शास्त्रीजींना त्यांच्या आसनाकडे घेऊन जाण्यासाठी कारखान्याचे
पदाधिकारी मागे वळले, तो काय ? त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ आली.
शास्त्रीजीनी चटकन काही कळायच्या आतच त्यांनी खुर्चीवर बसण्यास नकार दिला व
गंभीरपणे म्हणाले, मी या जनतेचा माणूस आहे. माझी खरी जागा येथेच आहे.
ती खुर्ची नाही !

पांडुरंगरावांना तीन मुली होत्या. सुस्वरुप, गृहकर्तव्यदक्ष अशा त्या मुलीमध्ये एकच व्यंग होते.
त्या तिघीही मुली बोबड्या होत्या. यांचे विवाह कसे होणार, या एकाच चिंतेने पांडुरंगला अस्वस्थ
केले होते. एकदा या तिघींना पाहायला तीन मुले येणार होती. म्हणून पांडुरंगने त्या तिघींना
ताकीद दिलेली होती की, पाहुण्यासमोर कुणीही बोलायचे नाही.

पाहुणे आले. चहा - फराळाचे पदार्थ दिले गेले. त्यांचा आस्वाद घेत वधूपरीक्षा सुरु झाली.
काहीतरी बोलायचे म्हणून त्या मुलांसोबत आलेले गृहस्थ म्हणाले, वा ! पदार्थ फारच छान
झालेत. तुमच्यापैकी कोणी केलेत हे ? यावर थोरली मुलगी लाजत - लाजत म्हणाली,
आईने केये नाईट, आमीट केये.

मुलगी तिच्यावर रागावून म्हणाली, अगो बाबांनी काय शांगिटले ? बोलायचे नाही म्हणून.
यावर मधली म्हणते कशी, ही बोबयी. तू पण बोबयी. पण मीच नाही बोबयी. तिघींच्या
संभाषणावरुन त्यांना बघायला आलेल्या वरमंडळींना त्यांच्या व्यंगाबाबतचे गुपित आपोआपच
समजले आणि त्यांनी ठरवलेले सर्वकाही उघडकीस आले. पांडुरंगाची तर त्रेधातिरपीट उडाली.
वर पक्षाच्या मंडळींनी तर आपोआपच काढता पाय घेतला.

भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक
वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.

टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या
वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही
त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः
पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.

तो
म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे
आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ?
तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो.
त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.

त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच
नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली.

मुंबादेवीच्या थोडं पुढे २२५ वर्षांपासूनचं महाकालीमातेचं काळबादेवी मंदिर प्रसिध्द आहे. साधारण तीनशे वर्षांपूवीर् रघुनाथ जोशी यांनी आझाद मैदान परिसरात या देवीची प्रतिष्ठापना केली होती. त्यांच्या निधनानंतर ब्रिटिशांनी तिचं स्थान हलवून काळबादेवी परिसरात आणलं. ही महाकालिमाता स्वयंभू आणि जागृत असून तिच्यासोबत महालक्ष्मी व सरस्वतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मांसाहारी नैवेद्य न चालणारी मंुबईतील ही एकमेव देवी. मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील अमावस्येला इथे मोठी जत्रा भरते.

महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या
विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात
जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुसर्‍या घंटेनंतर
येत असे त्याला दुसर्‍या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी
असली तरी ! गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत. दुसर्‍या घंटेनंतर
नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत. मग कोणालाही आत प्रवेश नसे.
एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला. दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना
पाहून घुटमळले. तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले, काय आपल्याला बापूजींकडून
शिक्षा घ्यायचीय का ? लवकर दरवाजा बंद करा . नियमाप्रमाणे गांधीजीं व्हरांड्यात उभे राहिले.

पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचवेळी तेथे हरिभाऊ उपाध्याय आले
व बापूजींना उभे पाहून म्हणाले, बापूजी, आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात ?
जेवणास उशिरा आल्यामुळे ही गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे.

पांडुरंग ' मनाची एकाग्रता कशी करावी ' या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी
भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे
गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे
आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट
आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना
विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा
आरसा बनवायचा आहे.' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल
का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले.
म्हणाले, मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी
काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

हं, खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही

इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...

कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?...

सुर्याची किरणे जेव्हा
पदतात या मातीवर
थरथरणार्‍या मातीचा
जीव होतो खालिवर

सुर्यची किरणे जेव्हा
तिला कवटाळू पाहतात
व्याकुळ प्रुथ्वीचे अधर
सुर्याला आतुरतात

वियोगाच्या या प्रखरतेनेच
तर आपण तगतो
प्रुथ्वीला स्पर्शण्याच्य प्रयत्नात
तर सुर्य प्रकाशतो

सुर्य-प्रुथ्वीची ही यारी
आहे आम्हा सर्वान्ना प्यारि
पण मनाला खन्त वाटुन राहते
अस्तवेळीच का त्यान्ना जवळीक मिळते

त्यान्च्या प्रेमाची फुले
अस्तासमिपच का फुलत जातात
उध्वस्थ प्रुथ्विचे अश्रु
सन्धिप्रकाशातच का विरुन जातात

-स्वप्निल

"खरं" माणूस होऊन बघावं….
आज म्हणलं "खरं" माणूस होऊन बघावं
दुसर्‍यांच्या दु:खाला समजून बघावं

कुणी वेदनेत दिसलं तर थांबून वीचारावं
दोन शब्दा प्रेमाचे अन् मायेचं मलम लावावं

कुणी दिसलं गरजू तर मदतीला जावं
आपला घास देऊन भुकेल्याचं पोट भरावं

कुणी दिसलं लाचार तर दुर्गेच रूप घ्यावं
वाट भरकटलेल्यांसाठी डोळ्यातील अंजन व्हावं

एखाद्या अनाथासाठी प्रेमाचा साथी व्हावं
म्हातार्‍या दुबळ्यांसाठी अधाराची काठी व्हावं

सगळे जण म्हणत फिरतात आम्ही माणूस माणूस
माणूसकीला शोभेल असं काय करतात कुणास ठाऊक

तुम्ही पण एक दिवस "खरं" माणूस होऊन जगा
शोधत असलेले सुख समाधान मिळतय की नाही बघा

तू जिवनात आहेस म्हणूनचं
तू जिवनात आहेस म्हणूनचं
तुझ्या प्रेमाने ओंजळ भरतो मी
तू रोज ओवाळतेस मला
कर्तव्यास रोज वरतो मी


तू जिवनात आहेस म्हणूनचं
माझ्या असण्याला एक कारण आहे
जगाच्या नजरेत किंमत नसली, तरी
तुझ्या डोळ्यात तेज असाधारण आहे


तू जिवनात आहेस म्हणूनचं
फुलपाखरा सारखं बागडणं होतं
अलगद तुझ्या मिठीत निसंकोच
तारुण्याच्या पापणीचं उघडणं होतं


तू जिवनात आहेस म्हणूनचं
एक आधार आहे बिलगून
वादळातही पहील्या पावसाच्या
सरी समजून जातो भिजून


तू जिवनात आहेस म्हणूनचं
अवचित हास्याला भेटतो
हास्याचे ते मुखवटे मग
दु:खाच्या चेहऱ्यावर लाटतो


तू जिवनात आहेस म्हणूनचं
वास्तवाचे निखारेही उब वाटतात
त्या उबाच्या छत्रछाये खाली
मला स्वप्नांचे शहारे भेटतात


तू जिवनात आहेस म्हणूनचं
माझा प्रत्येक क्षण मोहरतो
माझ्या अवती भवतीचा निवडूंग
प्राजक्ता सारखा बहरतो


तू जिवनात आहेस म्हणूनचं
जगण्याला एक दिशा आहे
बराचसा काळोख असला तरी
एक छोटीशी तिरीपच निशा आहे


तू जिवनात आहेस म्हणूनचं
ही झोपडी ही महाल आहे
ह्या महालात तुला माझ्या
हृदयाचा स्वर्ग बहाल आहे

इसापनीती लिहिणारा इसाप हा इसवीसनापूर्वी सहाव्या शतकात होऊन गेला. 'फ्रिजिआ' नावाच्या
देशातील आमोरियम या गावी तो जन्मला, त्याचे आईबाप गुलाम असल्यामुळे तो जन्मतःच
गुलाम होता. तो रूपाने अत्यंत कुरूप असून रंगाने काळा होता. त्यामुळे त्याला बघून बायका-मुले
घाबरत असत. त्या कारणाने त्याच्या मालकाने त्याला आपल्या घरात न ठेवता दूर शेतात
राखणीच्या कामास पाठवले.

एकदा आपल्या शेताची काय परिस्थिती आहे ती बघण्यासाठी मालक शेतावर गेला. तेव्हा त्याच्या
कुळांनी त्याला चांगले अंजीर भेट दिले. त्याने ते आपल्या नोकरांजवळ देऊन तो स्नान करावयास
गेला. ते पिकलेले अंजीर पाहून नोकराच्या तोंडास पाणी सुटले. त्यांनी मागला पुढला विचार न
करता ते सर्व खाऊन टाकले. पण नंतर मालक परत आल्यावर त्याला काय सांगायचे हा त्यांना
प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी संगनमत करुन इसापने अंजीर खाल्याचे सांगायचे ठरवले. त्याप्रमाणे
मालक परत येताच त्यांनी इसापला पुढे करून त्यानेच अंजीर खाल्ल्याचे सांगायचे. त्याबरोबर
मालक खूप संतापला. त्याने इसापला कडक शिक्षा करावयाचे ठरवले. त्यावर इसाप क्षणभर
शांत उभा राहिला. नंतर मालकाच्या पायावर लोटांगण घालून तो म्हणाला, 'मालक मी जर खरंच
अपराध केला अशी आपली खात्री पटली तर मला जरूर शिक्षा करा. पण त्यापूर्वी आपण जर
मला अर्ध्या तासाची मुदत दिलीत तर मी माझा निरपराधीपणा सिद्ध करून दाखवीन.


मालकाने त्याची विनंती मान्य केली. तेव्हा इसापने गरम पाण्यात मीठ टाकून तो ते प्याला.
नंतर घशात बोटे घालून ओकारी काढली. तेव्हा ओकलेल्या पदार्थात अंजीराचा मागमुसही नव्हता
ते पाहून मालकाला त्याच्या निरपराधीपणाबद्दल खात्री पटली. हे काम आपल्या लबाड नोकरांचेच
असले पाहिजे हे त्याच्या लक्षात आले. त्याने नोकरांना, इतरांनाही इसापचे अनुकरण करायला
सांगितले. तेव्हा आपले कृत्य उघडकीस येऊन आपली फजिती होणार असे दिसताच त्या लबाड
नोकरांनी आपला गुन्हा कबूल केला.


त्याप्रसंगी इसापने दाखवलेली समयसूचकता व चातुर्य पाहून मालक त्याच्यावर खूष झाला. त्याने
इसापला परत नेऊन आपल्या घरी ठेवले. पुढे एकदा मालकाला पैशाची फारच अडचण निर्माण
झाली तेव्हा नाइलाजाने त्याने इसापला एका गुलामांच्या व्यापार्‍याला विकले. तो व्यापारी
गुलामांच्या डोक्यावर मोठमोठे बोजे देऊन त्यांना गावोगाव हिंडवत असे. एक दिवस बोजे
उचलण्याची वेळ आली तेव्हा इतर गुलामांनी पटापट जे बोजे हलके होते ते उचलून घेतले.
पण त्यांच्या आधीच इसापने त्या सर्वांच्या जेवणाच्या साहित्याचा जड बोजा उचलून घेतला.
आधीच अशक्त असतांना त्याने सर्वात जड बोजा डोक्यावर घेतल्याबद्दल इतर गुलाम इसापला
हसू लागले. त्यावेळी इसाप काही बोलला नाही. उचललेला जड बोजा डोक्यावर घेउन तो कसाबसा
चालू लागला. पण दर दिवशी त्याच्या बोजातले खाण्याचे पदार्थ कमी कमी होऊ लागल्याने
मुक्कामावर पोहोचण्यापूर्वी त्याच्या डोक्यावर देण्यास काहीच शिल्लक राहिले नाही. इतरांचे बोजे
कायमच होते. ते पाहून सर्वांनी इसापच्या चातुर्याची फार तारीफ केली. त्यानंतर दरवेळी इसापनेच
जेवणाच्या साहित्याचा बोजा घ्यायचा असे मालकाने ठरवून टाकले.


काही दिवसांनी त्या मालकाला दोनतीन गुलाम विकण्याची वेळ आली. तेव्हा त्याने दोन चांगले
धट्टेकट्टे गुलाम आणि तिसरा अशक्त इसाप असे तीन गुलाम विकायला काढले. इसाप हा कुरूप
व अशक्त असल्यामुळे त्याला कोणी विकत घेणार नाही असे मालकाला वाटले. म्हणून त्याने
इसापला त्या दोघांच्यामध्ये उभे केले. त्याच्या अशक्तपणामुळे दुसर्‍या दोघांचा सशक्तपणा लोकांच्या
नजरेस येईल आणि ते दोन गुलाम तरी लवकर विकले जातील अशी मालकाची कल्पना होती.


थोड्या वेळाने झांथस नावाचा एक तत्त्ववेत्ता तेथे गुलाम विकत घेण्यासाठी आला. या तीन
गुलामांपैकी दोघे धट्टेकट्टे असलेले पाहून त्यांना झांथसने विचारले, 'अरे तुम्हाला काय काय
कामं येतात?' त्यावर त्या दोघांनी उत्तर दिले, 'आम्हाला सर्वकाही करता येतं !


तेव्हा झांथसने इसापकडे पाहून त्याला विनोदाने विचारले, 'अन्‌ तुला रे? तुला काय काय
करता येत?' त्यावर इसाप म्हणाला, 'माझ्या या सोबत्यांनीच सगळी कामं करून टाकल्यावर
माझ्यासाठी काय शिल्लक राहणार? तरी पण आपण जे काही काम मला द्याल ते मी मनापासून
करीन. निदान मला तुम्ही विकत घेतले तर मुलांना बाऊ दाखवून भीती घालण्यासाठी तुम्हाला
दुसर्‍या कशाची जरूरी पडणार नाही.'इसापचे चतुराईचे उत्तर ऐकून झांथस खूष झाला. तो गुणी
माणसांचा चाहता होता. त्याने ओळखले की, इसाप काही सामान्य नाही. तो फार हुशार आहे.
त्याने इसापला विकत घेऊन आपल्या घरी नेले.


घरी गेल्यावर झांथसला घरातल्या लोकांची थट्टा करण्याची लहर आली. त्याने इसापला बाहेर उभे
राहण्यास सांगितले. स्वतः घरात जाऊन त्याने घरातल्या माणसांना म्हटले, 'आज मी एक फार
सुंदर गुलाम विकत आणला आहे.'ते ऐकून सगळेजण मोठ्या आतुरतेने इसापला बघण्यासाठी
बाहेर आले. पण जेव्हा इसापचा काळा रंग अन्‌ त्याचे वेडेविद्रे रूप त्यांच्या नजरेस पडले तेव्हा
ते सगळेजण घाबरून पळत सुटले.


झांथसच्या घरी असतांना इसाप आपल्या अंगच्या चातुर्यामुळे प्रसिद्धीस आला. त्या काळातल्या
त्याच्या चातुर्याच्या अनेक कथा इसापनीतीमध्ये आल्या आहेत. पण त्यात न आलेल्या दोन गोष्टी
पुढे देत आहे.


एकदा झांथसचे आणि त्याच्या बायकोचे भांडण झाले. झांथसची बायको त्याच्याशी बोलेनाशी
झाली. तेव्हा झांथसने इसापला भांडण मिटवण्याचा उपाय विचारला त्यावर इसापने त्याला एक
युक्ती सांगितली.

त्याने सांगितल्याप्रमाणे जेवणाच्या वेळी झांथस इसापला म्हणाला, 'माझ्या खर्‍या हितचिंतक
आणि विश्वासू मित्राला घेऊन ये !' त्याबरोबर इसापने झांथसच्या कुत्र्याला समोर आणून
उभे केले. ते पाहून झांथसची बायको संतापली.

'मूर्खा', ती इसापवर ओरडली, 'याचं हित पाहणारा विश्वासू मित्र काय कुत्रा आहे?
अन्‍ मी कोणीच नाही का?'


इसाप शांतपणे म्हणाला, 'बाईसाहेब आपण जर मालकांच्या खर्‍या हितचिंतक स्नेही असता
तर एवढ्या तेवढया गोष्टीवरून त्यांच्याशी भांडून पंधरापंधरा दिवस अबोला धरला नसता !


ते ऐकून बायकोला आपली चूक कळून आली, त्यानंतर पुन्हा कधीच ती नवर्‍याशी भांडली नाही.
एकदा त्यांच्या गावात गावकर्‍यांची सभा भरली होती. तेवढ्यात एका गरुड पक्ष्याने गुलामाच्या
पायातला वाळा ऐन सभेच्या मध्यभागी आणुन टाकला. सर्वांना तो अपशकून वाटला. पण त्याचा
अर्थ काय ते उमगेना. झांथसच्या विद्वत्तेबद्दल सर्वांना आदर असल्याने त्यांनी झांथसला त्याचा
अर्थ विचारला. तेव्हा तोही विचारात पडला. शेवटी, 'उद्याला मी याचा अर्थ सांगतो.' असे म्हणून
तो घरी गेला.

घरी आल्यावर. इसापला त्याने घडलेली हकीगत सांगितली. आणि त्या घटनेचा अर्थ काय
असावा असे विचारले. त्यावर इसाप म्हणाला, 'आपण जर मला गुलामगिरीतून मुक्त कराल
सांगतो.'

झांथसने त्याची अट मान्य केली.तेव्हा इसापने त्याला सांगितले, 'कोणी तरी राजा आपल्या
गावावर चाल करून येत असून गावातील सर्व लोकांना गुलाम करण्याचा त्याचा हेतू आहे असा
त्या गरुडाच्या कृत्याचा अर्थ आहे. तरी सर्व गावकर्‍यांना सावध राहायला सांगा !'

झांथसने त्याप्रमाणे गावकर्‍यांना सांगितले.

थोड्याच दिवसात खरोखरच 'लिडिआ' देशाचा राजा क्रिसस याने झांथसच्या गावकर्‍यास निरोप
पाठवला की, 'तुम्ही मला मुकाट्याने अमुक एक रक्कम खंडणी म्हणून द्या नाहीतर मी स्वारी
करून तुमचा गाव लुटीन !'तेव्हा गावकरी फार काळजीत पडले. त्यांनी सभा भरवली. इसापची
गुलामगिरीतून सुटका झाल्यामुळे तोही सभेत एक नागरिक म्हणून उपस्थित होता.इसापने
गावकर्‍यांना सांगितले, 'मित्रहो ! खंडणी देऊन आपली मानहानी करून घेऊ नका !'यावेळी
जर आपण माघार घेऊन त्याची मागणी मान्य केली तर क्रिसस आपल्याला कायमच त्रास देत
राहील. त्यासाठी वेळ आल्यास त्याच्याशी दोन हात करण्याच्या तयारीत आपण राहून आपलं
स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्‍न करणं हाच मार्ग योग्य आहे असं मला वाटतं !'

त्या सभेत क्रिससचा वकीलही हजर होता. त्याने ही हकीगत क्रिससला सांगितली.

'इसाप जोपर्यंत तिथे आहे' वकील क्रिससला म्हणाला, 'तोपर्यंत तो गाव आपल्या हाती
लागणं अशक्य आहे !'

तेव्हा क्रिससने झांथसच्या गावकर्‍यांना निरोप पाठविला की, 'तुमच्या गावात इसाप नावाचा
जो गृहस्थ आहे त्याला माझ्याकडे पाठवून द्या.'तेव्हा खंडणीच्या ऐवजी इसापला पाठविण्याची
अट गावकर्‍यांना पसंत पडली. ते राजाची अट कबूल करण्याच्या विचारात असलेले पाहून इसापने
त्यांना एक गोष्ट सांगितली.

'जोपर्यंत मेंढयाच्या कळपाबरोबर कुत्रे आहेत तोपर्यंत मेंढ्या आपल्या हाती लागणार नाहीत हे
पाहून लांडगा मेंढ्यांकडे तह करायला आला. त्याने त्यांच्याकडे त्यांच्यावर हल्ला न करण्याच्या
बदल्यात कुत्र्याची मागणी केली. मेंढ्यांनी खूष होऊन त्याची मागणी मान्य केली. अन्‍ कुत्र्याचं
संरक्षण नाहीसं होताच लांडग्याने एका पाठोपाठ एक सर्व मेंढ्यांना मारून खाल्लं.'

ही गोष्ट ऐकून लोकांना आपली चूक कळून आली.

तरी इसाप पुढे त्यांना म्हणाला, 'असं असलं तरीही मी क्रिससच्या दरबारात जाणं हेच तुमच्या
हिताच आहे !

त्याप्रमाणे इसाप क्रिससच्या दरबारात गेला. तिथे त्याच्या चातुर्याची फार तारीफ झाली. तिथे
असतानाच त्याने इसापनीतीतल्या बहुतेक गोष्टी रचल्या. पुढे क्रिससच्या आज्ञेवरुन डेल्फी येथील
उपाध्यायांना दक्षिणा देण्यासाठी इसाप गेला असताना त्या उपाध्यायांचे वाईट वर्तन पाहून त्याने
'देणग्या घेण्याची तुमची लायकी नसल्याने मी तुम्हाला एक कवडीही देणार नाही !' असे त्यांना
स्पष्ट सांगितले. त्यावर चिडून जाऊन उपाध्यायांनी इसापवर हल्ला करून त्याला ठार केले.
त्यापूर्वी त्यांची समजूत घालण्यासाठी इसापने त्यांना पुष्कळ नीतिकथा सांगितल्या. पण त्यांचा
काही उपयोग झाला नाही.

मरताना इसापने उपाध्यायांना सांगितले,'तुम्हाला या दुष्कृत्याचं प्रायश्चित्त लवकरच भोगावं लागेल

त्याचे हे भविष्य लवकरच खरे झाले. डेल्फी येथील लोकांवर अनेक मोठमोठी संकटे येऊन; त्यांनी
इसापला मारून त्याच्याकडून घेतलेल्या पैशाच्या हजारपट दंड त्यांना भोगावा लागला.

इसापच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. त्याने लग्न केले होते. पण
त्यास संतती झाली नाही. पुढे त्याने एक मुलगा दत्तक घेतला. पण तो दुष्ट आणि कृतघ्न निघाला
असा उल्लेख एके ठिकाणी आला आहे.

इसापच्या मृत्युनंतर दोनशे वर्षांनी ग्रीसमधील अथेन्स शहरातील लोकांनी इसापचा एक उत्तम
पुतळा तयार करवून शहरातील प्रमुख चौकात उभारला.

इसापने रचलेल्या नीतीकथांमुळे तो जगभर प्रसिद्ध झाला. त्या गोष्टी त्याने जरी प्राण्यांवर रचल्या
तरी त्यातून त्याने माणसांना नीती शिकवली. जगात कसे वागावे हे शिकवले. पण असे असूनही
त्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक पद्धतीने रचल्या असल्याने त्यांना जागतिक
लोकप्रियता मिळाली. जगातील सर्व प्रमुख भाषांतून' इसापनीती' ची भाषांतरे झाली आहेत.






एका उद्योगपतीने आपल्या कारखान्यात उच्च तंत्रज्ञान घेऊन आलेल्या एका इंजिनीयरची नेमणूक केली.
त्याने आल्यावर महिन्याभरातच सार्‍या मशिन्स ठाकठीक केल्या. मशिन्सची काळजी कशी घ्यायची
याचेही प्रशिक्षण त्याने कामगारांना दिले. दोन - तीन महिने झाले. त्याला काही कामच नव्हते. तो
मालकाला भेटला. म्हणाला, सर ! मला तुम्ही मला फुकट पगार का देता ? सर्व मशिन्स
व्यवस्थित सुरु आहेत. आता मी नसलो, तरी कारखाना ठिक चालेल. मालक म्हणाले, ते सर्व ठिक
आहे. आज कारखान्यातली यंत्रं व्यवस्थित आहेत पण उद्या यातलं एखादं जरी मशिन बिघडलं, तरी
माझं लाखो रुपयांचं नुकसान होईल. त्यावेळी मी तुला कुठे शोधू ? म्हणूनच उद्या बिघडणार्‍या
मशिन्सच्या दुरुस्तीसाठी मी तुझी आजच व्यवस्था करुन ठेवली आहे. मी काय मूर्ख आहे, तुला
पैसा फुकट द्यायला

अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची घटना. रस्त्याच्या कडेने जात असताना लष्कराची गाडी अडचणीच्या
जागेत अडकली होती. आतील शिपाई उतरुन तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागले.
त्यांच्यावरचा अंमलदार फक्त हुकूम देत होता.

मदत केली असती तर गाडी नक्की निघाली असती पण तो होता साहेब ! फक्त हुकूम
देत उभे राहणेच त्याने पसंत केले. तेवढ्यात तिकडून एक गाडी आली.

गाडीतून एक सज्जन उतरला. त्याने सैनिकांना प्रत्यक्ष हातभार लावला. गाडी अडचणीतून
बाहेर पडली. दुसर्‍या गाडीतून आलेला तो सज्जन अंमलदार साहेबाला म्हणाला, पुन्हा गरज
पडली तर मला बोलवत जा आणि त्याने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आपला पत्ता
असलेले कार्ड बाहेर काढले व त्या अंमलदारला दिले.

त्याने
ते सहज म्हणून वाचले. त्याला दरदरुन घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो
सज्जन अमेरिकेचा सर्वेसर्वा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन होता.

चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत.
म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव
महाराज तर धर्माची,ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी
संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र
मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन
यांना विचारलेच,भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ?
आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?

म्हणाले, ' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे
माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ
विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे
समजून घ्यायला मला आवडते.

आधुनिक संत म्हणून ज्यांना संबोधण्यात येते ते आचार्य विनोबा भावे यांच्या संदर्भातील एक गोष्ट
अशी की, आपले म्हणणे दुसर्‍यांना न दुखवता मोठ्या खुबीने आचरणाने पटवून देण्यात त्यांचा
हातखंडा होता. एके दिवशी असाच एक माणूस त्यांच्याकडे आला व पश्चात्तापदग्ध होऊन म्हणाला,
महाराज दारु काही मला सोडायलाच तयार नाही. मला माहिती आहे की ती सवय वाईट आहे.
मला ती सवय सोडायची आहे पण काय करु ? आचार्य शांतपणे म्हणाले, असं कर, तू उद्या
मला याचवेळी येऊन भेट व बाहेरुनच हाक मार. मी मग येऊन सांगेन काय ते ! दुसर्‍या
दिवशी तो माणूस ठरल्याप्रमाणे आला पण त्याला कळेना की बाहेरुनच का हाक मारायची ?
पण आचार्यांची आज्ञा म्हणून अधिक विचार न करता त्याने बाहेरुनच हाक मारुन स्वतः
आल्याचे सांगितले. तोच आतून आचार्यांचा आवाज आला, होय रे, मी बाहेर येऊ पाहतोय,
पण हा खांबच मला सोडायला तयार नाही. तो माणूस चक्रावून गेला. ही काय भानगड
आहे ? आचार्य माझी गंमत तर करत नाहीत ? असा विचार करुन त्यांनी आत कुतूहलाने
डोकावून पाहिले. तो त्याला हसूच आवरेना. घरातील खांबाला विनोबाजी घट्ट पकडून बसले
होते व तो खांब मला सोडत नाही म्हणून तक्रार करत होते. तो माणूस हात जोडून म्हणाला,
विनोबाजी आपणच खांबावर चढून त्याला धरले आहे व तो खांब सोडत नाही, हे कसे ?
हे ऐकूण स्मितहास्य करत खाली उतरले व त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाले,
ज्याप्रमाणे मी या खांबाला धरुन ठेवले होते तसेच तू ही दारुला पकडून ठेवले आहेस.
दारुने तुला नाही पकडले. जेव्हा तू दारु सोडायचे ठरवशील तेव्हा आपोआप दारु पिच्छा सोडेल.
हे ऐकून त्या माणसाचे डोळे उघडले व त्यांनी विनोबाजींच्या पायावर डोके ठेवून दारु सोडण्याचा
निश्चय केला.

आयुर्वेदाचे प्रणेते महर्षी चरक औषधी वनस्पतींच्या शोधात आपल्या शिष्यासह रानावनांत, जंगलात च
दर्‍या डोंगरावरुन हिंडत चालले होते. चालता चालता अचानक त्यांची दृष्टी समोर हिरव्यागार शेतात
उगवलेल्या एका सुंदर फुलाकडे गेली. आजपर्यंत त्यांनी असे आगळेवेगळे अनुपमेय सुंदर फूल कधी
पाहिलेच नव्हते. त्यांना फूल स्वतःजवळ हवेसे वाटू लागले. पण संस्कारामुळे मन तसे करण्यास
धजावत नव्हते. मनात चलबिचल होत होती. त्यांची ही अवस्था शिष्याच्या लक्षात आली. शिष्य
त्यामना विनम्रपणे म्हणाला, गुरुवर्य आपली आज्ञा झाली तर ते फूल मी आपल्या सेवेस
अर्पण करु ?

महर्षी चरक म्हणाले, वत्सा ! त्या फुलाची मला निश्चितच गरज आहे. पण या शेताच्या
मालकाच्या परवानगीशिवाय ते घेणे म्हणजे चोरी करणे ठरेल. महर्षीच्या या उच्च आदर्शवाद
व नैतिकतेपुढे शिष्यांनी मान खाली घातली.


ते पुढे म्हणाले, शिष्यांनो, नैतिक जीवन व राजाज्ञा यात कोणतेच साम्य नाही. जर त्याने
आपल्या प्रजाजनांची संपत्ती स्वच्छंदपणे व मनमानी करुन स्वतःकरता वापरली तर नैतिकतेचा
आदर्श तो काय राहणार ? यानंतर महर्षी आपल्या शिष्यांसह तेथून तीन मैल अंतरावरील त्या
शेतकर्‍याच्या घरी पायी गेले व त्याची परवानगी घेऊनच त्यांनी ते फूल तोडले.




त्या काळात सर आशुतोष मुखर्जी कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलपती तर होते शिवाय कलकत्त्याच्या उच्च
न्यायालयात न्यायाधिशही होते. त्यांचा साधेपणा, हुशारी, रोखठोकपणा व आदर्श व्यक्तिमत्त्वाने
प्रभावित होऊन इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार परदेशी जाण्याची
सर्व तयारी त्यांनी केली पण शेवटच्या क्षणी त्यांच्या आईने काही कारणांमुळे त्यांना इंग्लंडला न
जाण्यास सांगितले. आईची आज्ञा शिरसावंद्य मानून एवढ्या चांगल्या संधीकडे त्यांनी पाठ फिरवली
व सरकारला कळविले की, माझ्या आईला मी परदेशी जावे, असे वाटत नाही. त्यामुळे मला
माझा प्रवास नाईलाजाने रद्द करावा लागत आहे. त्यावेळचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन हे पत्र पाहून
अतिशय संतापला व म्हणाला, एका सामान्य भारतीयाची सरकारचा आदेश डावलण्याची
हिंमत कशी झाली ? त्याने सर आशुतोष मुखर्जी यांना बोलावले व म्हणाला, जा,
आपल्या आईला जाऊन सांगा की भारताचा व्हाईसरॉय तुमच्या मुलाला परदेशी जाण्याची
आज्ञा देत आहे. त्यावेळी व्हाईसरॉयची आज्ञा न मानणे म्हणजे स्वतःवर संकट ओढवून
घेण्यासारखे होते, पण आईच्या आज्ञेपुढे त्यांना कर्झनच्या आज्ञेची किंमत शून्य होती.
ते आपल्या निश्चयापासून जराही विचलीत झाले नाहीत व गंभीर चेहर्‍याने व धाडसाने म्हणाले,
महाशय, मी माझ्या आईच्या आज्ञेचे उल्लंघन करु शकत नाही. जगात आईच्या आज्ञेशिवाय
कोणाचीही आज्ञा श्रेष्ठ मानत नाही. आमची परंपरा व संस्कृती आईला देवता म्हणून मानते
व अशा देवीची आज्ञा माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी मोडू शकत नाही. तेव्हा यासंबंधी
कृपया आपण मला अधिक काहीही सांगू नका ! हा विषय माझ्या दृष्टीने संपला आहे.
त्यांची मातृभक्ती पाहून कर्झन आश्चर्यचकित झाला व त्यांना प्रेमाने आलिंगन दिले.

ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली. मानव नावाचा अदभूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप
त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने सार्‍या देवतांना बोलाविले व विचारले,
माणसाला तयार करुन मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास हाका ऐकून घ्याव्या लागतात.
सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला
शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करु ? कोठे लपू ? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा ?
या प्रश्नानंतर ईश्वराला त्या सार्‍या देवतांनी अनेक जागा सुचविल्या. पण ईश्वराला वाटले काहीही करुन
माणूस तेथे पोहचणारच. म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला !
त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले होते की,
तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला.

राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्‍या शेतकर्‍यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले.
अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील,
आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांच्या रांगेत जाऊन
ते उभे राहिले.त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते.
आपले महाराज शूर आहेत. दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही.

महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली.
महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज !
आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज !
बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात.
खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले.

न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय.
मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार
आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे.
त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ
नकोस.तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक.
माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.

जगदविख्यात शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांच्या प्रयोगशाळेला १९१४ मध्ये आग लागली.
या आगीत त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रे, यंत्रसामग्री जळून खाक झाली.
या आगीची वार्ता समजताच त्यांचा मुलगा चार्ल्स एडिसन त्यांना भेटायला,
धावत आला तेव्हा थॉमस एडिसन त्याला म्हणाले, अरे पाहत काय उभा राहिलास ?
चटकन बोलावून आण. असे दृश्य पुन्हा पाहायला मिळणार नाही.
दुसर्‍या दिवशी आपल्या आशा - आकांक्षांची आणि स्वप्नांची झालेली ती राखरांगोळी पाहताना ते म्हणाले,
सारी सामुग्री नष्ट होण्याचे खूप फायदे झाले. त्यामुळे माझ्या चुकाही जळून खाक झाल्या.
आता मी नव्या जोमाने कामाला सुरुवात करु शकेन. एका अर्थी ही परमेश्वराची कृपाच म्हणायची.

देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला देशमुखांनी भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करुन डॉक्टर म्हणाले,
साहेब,येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत.'
देशमुखांनी उत्सुकतेने खिडकीतून आत तर त्यांना तेथे कोणीही दिसेना.
तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले,साहेब,
ते सर्व वेडे खोलीतच आहेत.पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत,
अशी कल्पना करुन विमान दुरुस्त करत असतील.सामान्य माणसेही असेच कल्पनांचे,
मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत.
परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते,तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.

ही घटना आहे लखनौमधील ! त्यावेळी महाकवी निराला अमीनाबाद पार्कच्या पुढील मोहल्यात राहात होते. एक दिवशी ते असेच चालले
होते. समोर एक टांगेवाला प्रवाशांची वाट पाहत उभा होता. निरालाजींनी त्याला नीट न्याहाळले व विचारले, परवा तूच मला हजरतगंजहून
घेऊन आला होतास ना ? तो म्हणाला, होय हुजूर ! माझ्याकडून काही चूक झाली होती का ? निरालाजी सहज म्हणाले, अजिबात नाही.
परवा माझ्याजवळ फक्त दोन आणेच होते. तूला आणखी पैसे द्यायला गेले दोन दिवस मी तुला शोधत आहे. हे पैसे ठेव तुझ्याजवळ !
पांच रुपयांची नोट पाहून तो टांगेवाला चांगलाच उखडला.

निरालाजी म्हणाले, अरे रागावू नको. मी चांगल्या भावनने हे पैसे तुला देत आहे. परवा तुझा मुलगा फाटक्या तुटक्या वस्त्रात धावत
तुझ्याकडे येऊन एक पैसा मागत होता, पण तोही तू देऊ शकत नव्हतास. ती तुझी असहाय्यता मी विसरु शकलो नाही. म्हणून हे पैसे
ठेवून घे व त्या निरागस मुलाचे मन मोडू नकोस. त्या टांगेवाल्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्याने निरालाजींची क्षमा मागितली.


अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करुन थकलेला एक तरुण विवेकानंदांजवळ आला नि म्हणाला, '' स्वामीजी तासन् तास बंद खोलीत
बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही.'' त्यावर स्वामीजी म्हणाले, '' सर्वात प्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव.
आपल्या जवळपास राहणार्‍या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर.'' यावर त्या तरुणाने त्यांना, '' एखाद्या
रोग्यासी सेवा करताना मीज आजारी पडलो तर ?'' असा प्रश्न विचारला. विवेकानंद म्हणाले, '' तुझ्या या शंकेमुळे मला असे वाटते की,
प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसते. म्हणूनच तुला शांती लाभत नाही. शुभकार्याला उशीर लावू नये तसेच
त्यातील उणिवाही शोधू नयेत.हाच मनःशांती मिळविण्याचा जवळचा मार्ग आहे.

एका फकिराला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला
त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत ? त्या व्यक्तीने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत.
फकिराला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरुन एक राजबिंडा तरुण आला.
त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून फकिराने विचारले, हेच का ते भगवान ? ती व्यक्ती म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे
राम आहेत. त्यांना मानणारे लोक त्यांच्यामागून जात आहेत... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर... सर्वजण येऊन गेले. भगवानांची वाट
पाहता पाहता मध्यरात्र झाली. सारे लोक कंटाळून निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन एक म्हातारा एकटाच आला. फकिराने
त्याला विचारले, आपणच भगवान ? म्हातारा म्हणाला, हो. फकिराने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही ? डोळ्यात अश्रू
आणत तो म्हातारा म्हणाला, सारे राम, महावीर, बुद्ध, येशूबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही, तोच माझ्याबरोबर येऊ शकतो.

गजा काकू म्हणजे ठेवल्या नावाला वजनानिशी जागणारी बाई! काकूंची दृष्टी अलौकिक, गजाआडच्या सृष्टीचा अंदाज घेणारी.

"बाल्कन्यांवर भारी नजर या बाईची, नवीन साडी आणून वाळत घालायची खोटी..यांना कळलंच!" इति नवरत्ने.

"इतनीभी बुरी नहीं है गजाजी।" इति सोनी. (सोनींना सोसायटी आणि सोसायटीला सोनी नवख्या होत्या त्या काळापासूनची त्यांची गजाकाकू ही मैत्रिण. त्यामुळे तसा त्यांचा काकूंबाबतीत सॉफ्ट कॉर्नर होता.)

"मामींचं नाक काय तीक्ष्ण आहे हो..परवा मी हे टूरवर जाणार म्हणून कडबोळ्या करायला घेतल्या, आपसूक बातमी लागल्यासारख्या ह्या आल्या..म्हणे शिल्पे खमंग वास येतोय बाल्कनीतून. आज काय निलेशराव स्पेशल वाटतं..., मग रेसिपी लिहून घेउन, चार टेस्ट करण्यासाठी म्हणून घेउन गेल्या. खूप छान झाल्यायत म्हणाल्या." शिल्पा-निलेश सोसा.तलं नवदाम्पत्य..शिल्पा त्यांना आवर्जून मामी म्हणते.(अजूनही).

"सुनंदे, मेले डोळे आहेत की फुंकणी? जाळ काढशील बघता बघता..." इति बेळगावची म्हातारी. तिला एकटीलाच फक्त काकूंना अशा प्रकारे बोलण्याची सवलत होती. त्यामागचं गुपित-गोटाकडून कळलेलं कारण म्हणजे..बेळगावच्या उत्तरेला का पश्चिमेला पाच कि.मी. अंतरावर गजाकाकूंच्या मावसाआजीचं गाव..,दोन्ही घरात पूजा सांगायला येणारा भटजी एकच. त्यामुळेच हे एरवी विळ्या-भोपळ्याचं वाटणारं सख्य सलगी टिकवून होतं. काकूंना 'सुनंदेssssssss' अशी हाक मारणारीही एकटी म्हातारीच.

गजाकाकूंचं खरं नाव ’सौ.सुनंदा चौगुले.’ गजू काकांची सख्खी बायको...म्हणून ती गजा काकू.

आता ’गजेंद्र’चं आधी गज्या आणि मग गज्जू असं उकारान्ती बारसं केलं ते सोसा.तल्या पोरासोरांनीच. ते बच्चेकंपनीत एकदम फेमस. स्वभावाने इतका प्रेमळ माणूस अख्ख्या आळीत नसावा. कानिटकर आजोबा गमतीने काकांच्या तुळतुळीत टकलाकडे निर्देश करुन डोळे मिचकावत म्हणायचे..

"या सगळ्या उकारान्ती कोंब फुटलेल्या नारळाचं पाणी बाकी गोड असतं कायम." ;)

पण गज्जू काकांच्या या प्रेमळ स्वभावाबाबत कुणी काकूंसमोर भरभरुन बोलायचा अवकाश त्या फणका-याने म्हणत.,

"चौगुलेंचा संसार सांभाळणं काही वाटतं तेवढं सोप्पं काम नाही...हम्म..बाहेरच्या जगासाठी प्रेम उतू जाईल पण घरात साधा कौतुकाचा शब्द नाही."

असं म्हणता काकूंच्या चेह-यावर हिटलरच्या बायकोची अगतिकता फिकी पाडतील असे आविर्भाव दाटून येत. वास्तविक पाहता हिटलर आणि काकांची वंशावळ प्रयत्न करुनही जोडणं अशक्य!

"असतो हो एखादीचा हिटलर वेगळा आणि असतं त्याचं प्रेम जगावेगळं..तुम्ही नका मनाला लावून घेउ एवढं." कानिटकर म्हणजे कानिटकर :) कानिटकरांचे ’वन लाईनर्स’ ज्याम खसखस पिकवायचे. त्यांच्या स्मार्ट लाईनर्स ना बॅकग्राउंड मुजिक द्यायला पाहिजे असं आद्याला राहून राहून वाटे.

तशा भरारी पथकात ऍडमिशन घेतल्यासारखं आद्याचं माईंड भलतंच उडया मारायचं कल्पकतेत, उत्साहात...अगदी सगळीकडे. पण त्याच्या भरारी पथकाचा गाईड नवरत्ने असल्यामुळे त्याला उगीच अधूनमधून पंख छाटलेल्या पाखरासारखं वाटत राही.

तशी एरवी नवरत्ने म्हणजे ’रत्नांची खाणच! पण वेळीच कदर केली नाही तर अशा रत्नांचं तेज फिकं पडतं. हा माणूस सुरक्षा दलातच खरं तर भरती व्हायचा..पण छ्या!!!

नवरत्नेंच्या फेमस डबल लॉक सिस्टीमबद्दल त्यांची दोन महिन्यांनी येणारी बोहारीण सोडली तर सगळ्या गावाला ठाउक.
म्हणजे सोसायटीतल्या मुलांनीही चोर-पोलीस खेळताना नवरत्नेंच्या घरी चोर म्हणून घुसणं बंद केलं होतं.

"ए लत्नेंच्या दालातून कूsssक्क नाही कलायचं..चोल कुठला...दबल लॉत आहे ना त्यांच्याकडे." कानिटकरांची नात..
एवढा बोलबाला केल्यावर चोराची काय बिशाद त्यांचं डबल लॉक तोडून आत यायची.

"ते तुमच्या डबल लॉकची साली काय भानगड आहे हो रत्ने?"

आरेच्च्या!! खेटेंना सांगायचं राहिलंच की...नरत्नेंना उगीच ओशाळल्यासारखं झालं....ऍडव्हान्स पे केल्यामुळे गडबड झाली बहुतेक, असा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला.

तीन सोसायटयांमध्ये दुधाच्या पिशव्या टाकणारे ’कृष्ण-सुदामा दूध सप्लायर्स’चे मालक ’अभिराम खेटे’. वास्तविक नवरत्नेंच्या गॅलरीच्या मागच्या अंगाला लागून असणा-या दुसर्‍या सोसायटीत राहणा-या शहांच्या घरी दूध टाकणा-या पोर्‍याने खेटेंना नवरत्नेंच्या पॉप्युलर डबल लॉकची बातमी पुरवली. आणि बाल्कनीतल्या दुधाच्या पिशव्यांच्या वाढत्या चोर्‍यांनी मेटाकुटीला आलेले खेटे एकदा चौकशी करायला आले.

"आधी हे असले सिक्युरिटी वगैरे भानगडींवर विचार करायची गरजच नव्हती हो,..."

यावर नवरत्नेंनी प्रश्नार्थक चेहरा केल्यावर खेटे पुढे म्हणाले,

"हां म्हणजे तेव्हा आपल्या घराच्या पाठीमागे चावकेचं घर होतं ना......"
खालच्या बाजूने मिशीला यू टर्न देत देत खेटे पुढे उद्गारले..,

"आता चावके म्हणजे आपला मुं. पो चा माणूस, ...त्यामुळे चोर, भुरटा सालं कुणाचीही यायची डेअरींग नव्हती. आपल्या घराच्यामागचा ’वालच’ जळला चावकेचा ना, आपण बिनधास्त होतो. आपणच काय सगळी सोसायटीच निर्धास्त झोपायची म्हणा.
हा वाल काय प्रकार आहे असा प्रश्न रत्नेंना पडायच्या आत तिथे बसलेल्या आद्याने शंकानिरसन केलं....

"काका, वॉल म्हणजे भिंत म्हणायचंय त्यांना. "
"पण काय हो, म्हणून काय तुमची ती ’तटबंदी’ काय....." आद्याने खि: खी करुन विचारलं. त्यावर दोन मिनिटं स्तब्धतेत गेली. मग डिशमधला चिवडा उचलत खेटेंनी जोर्रात ज्योक कळल्याच्या आविर्भावात खॉ खॉ केलंन.

खेटेंच्या सोसायटीचं नाव ’तटबंदी’ का आहे या कोडयाची उकल झाल्याने खरं तर आद्याने खुशीत येउन विनोद मारला पण खेटे आणि नवरत्नेंसारखे प्रेक्षक असल्याने त्याचा मूड गेला आणि परत कानाची भोकरं बुजवून त्याने गाण्यांवर कॉन्सन्ट्रेट केलं. खरं तर तो वैतागला होता. त्याची फेव्हरिट आर.जे दोन दिवसापासून गायब होती. त्यात नवरत्नेंनी त्याला सोसायटीच्या कामात गुंतवून ठेवलं होतं.

आद्याच्या एक्स्प्लनेशनवर
"अच्छा!!...." म्हणून नवरत्नेंनी पुढे कंटिन्यू करण्याचा इशारा खेटयांना दिला. नवरत्नेंना सुरक्षा, सिक्युरिटी, कायदे याप्रकरणी खास इंटरेस्ट असे नेहमी. त्यांच्यासारख्या माणसाला निव्वळ उंचीच्या कारणावरुन डिसक्वालिफाय करुन सिक्युरिटी बोर्डाने एक उत्तम वाय, झेड दर्जाची सिक्युरीटी पुरवू शकणारा माणूस गमावला होता.
"तर त्यामुळे..........."खेटयांनी परत सुरुवात केली,

"म्हणजे बघा...या चावकेमुळे काय प्रॉब्लेम नव्हता...पण तो मोजून चार महिने, चार दिवसांपूर्वी रिटायर झाला.(खेटेंचा महिन्याचा हिशेब पक्का असतो..बिलात कधी पंचवीस पैशाचीही गडबड होत नाही.)
तर हा रुम रेन्टवर देउन त्याच्या मढ आयलंडच्या बंगलीत रहायला गेला.,आणि तेव्हापासून सांगतो...चोरांचा हा सुळसुळाट.
जसे चोर खरंच चावकेंच्या वाड्यातून बाहेर पडण्याची वाट बघत होते असं काहीसं वर्णन करुन खेटेंनी गोष्टीला शिवकालीन आभास आणला. त्यांच्या चिरेबंदी वाडयाची तटबंदी धोक्यात असल्याचं जाणवेल इतकं खरं चित्र काही काळ त्यांनी उभं केलं. मध्येच एखादा टर्न इंटरेस्टींग वाटून आद्या आणि प्रामाणिक श्रोत्यासारखे नवरत्ने आलटून पालटून ऐकण्यात दंग झाले.

"खेटेंची गोष्ट संशयाच्या मार्गाने पुढे सरकली आणि चोर दुसरा तिसरा कुणी नसून त्यांच्याशी धंद्यात रायव्हलरी असणा-या ’सुकेतु डेअरी’ वाल्याचा बोकाच असावा,अशा निष्कर्षाप्रत ते पोहोचले.

"च्या मारी बोका...?" आश्चर्य मिश्रित संशयाने आद्याने विचारलं.

"काहीतरीच काय खेटे,..पण कुठला ’मिल्क बिझनेसमॅन’ बोका ठेवीलच कशाला?"..नवरत्नेंना ह्या ना त्या कारणाने हुशार पदव्या सुचत.

" हा काय त्याचा स्वत:चा बोका नाय..." खेटे.

"मग??" कधी नव्हे ते आद्या आणि रत्नेंचे सूर एकत्र जुळले.

"हा त्याच्या पणज्याने इंग्लंडहून आणलेला गिफ्टेड बोका आहे...काय साधासुधा नाय. स्वत:च्या घरी चोरी जन्मात करायचा नाय तो."

"ब्रिटिश कुठले....स्वत: गेले पण इथे बोके सोडून गेले." नवरत्ने उद्वेगजनक संतापाने म्हणाले.
"ते काही नाही...असल्या बोक्यांच्या आयातीवरच बंदी घातली पाहिजे सरकारने...आज एक आणलाय उद्या त्याची पिल्लावळ होईल..मग वाढलेल्या संख्येने भारतात पाय रोवून बसतील." संतापात त्यांना आपल्याला बोक्यासारखे पंजे नसल्याचं दु:ख झालं.
बोक्यांच्या जातीबद्दल, संभाव्य धोक्यांबद्दल अजून काही चर्चा झाल्या....आणि मग नवरत्नेंकडून डबल लॉकची माहिती घेउन खेटे गनिमी कावा वगैरे रचल्याच्या आवेशात निघून गेले.

आपल्या डबल कोट सिक्युरिटीचं वाढतं महत्त्व पाहून रत्ने मनातल्या मनात खुश झाले. तिथून सुटका झाल्यावर आद्या थेट बाल्कनीत जाउन बसला. त्याच्या भरारी घेणा-या मनाला उभारी देणारी त्याची एकमेव जिवलग गॅलरी. गॅलरीतून समोर उभ्या राहणा-या टॉवरमधल्या फ्लॅट घेण्याची स्वप्नं रंगवणं हा त्याचा टाईमपास!

’बाल्कनी’ म्हणजे बाल्कनी ! बैठ्या सोसायटयांमधल्या घरकर्‍यांचा जीव की प्राण, म्हणजे जीव गेला तरी प्राण बाल्कनीत शिल्लक असं काहीसं बाल्कनी उर्फ गॅलरीचं पूर्वीचं ग्लॅमर. त्यातली मानाच्या गणपतीसारखी ’मानाची गॅलरी’ म्हणजे ’डी’च्या रुमची गॅलरी. ऐसपैस, मोकळीढाकळी सेम सोसायटीतल्या बायकांसारखी.
तशी सोसायटीतल्या प्रत्येक घराला बाल्कनी, पण ती पुढे-मागे असण्यातली गोम फक्त सोसायटीकरांनाच ठाउक. हाउसफुल्ल शो चं तिकीट काढताना नाटक आणि सिनेमा यातली गल्लत बराच काळ चुटपुट लावू शकते तशीच जागा घेताना बाल्कनी पुढे-मागे असण्याचं महत्त्व लक्षात घेतलं नाही तर आयुष्यभराची खंत गॅलरीत पुरून जगावं लागतं.

बाल्कनीच्या घराचं प्रेस्टीज फार...म्हणजे ’विवाह नोंदणी कार्यालयाने ’मुलगा स्वतंत्र नाही पण राहत्या घराच्या बेडरुम सेपरेट’ अशी’ आकर्षक’ ऍड द्यावी तसं सोसायटीकरांनी उपवर मुलीच्या पित्याला ’आमची ’डी’ची रुम, विथ अटॅच्ड बाल्कनी/बाल्कनी अटॅच्ड’ असं सांगून उपकृत करावं. गॅलरीवर लोकांचं असं प्रेम!! एवढं की शेलाटेंसारख्या अभिमानी मध्यमवर्गीय माणसाने संपूर्ण आयुष्यच गॅलरीत ’संगणकी शिकवण्या’ घेत वेचलं.

तर सांगायची गोष्ट ही की माणसांमुळे घराला घरपण येतं तसं ’गॅलरी’मुळे त्याला ग्लॅमर येतं. असा ’सोसायटयांमधल्या मध्यमवर्गीयांचा’ एक समज ! पण मध्यमवर्गीय म्हणजे असे तसे ’कॉन्ट्रीब्युशन काढण्याच्या वेळी ’मध्यमवर्गीय आव’ आणणारे उच्च-मध्यमवर्गीय नव्हे बरं!!( मध्यमवर्गीयांमध्ये मध्यम, उच्च, कॉन्ट्रीब्युशनच्या लेव्हलचे असे काही प्रकार आहेत, जसे मिरच्यांमध्ये झोंबण्याच्या श्रेणीनुसार भोपळी मिरची, पोपटी मिरची, हिरवी, ठेंगणी, बेडकी मिरची, इत्यादी.)

तर हाडाचे मध्यमवर्गीय म्हणजे शेलाटे! हा गृहस्थ भारी कमिटेड माणूस! लग्नाआधी न कंटाळता प्रियकराने प्रेयसीची वाट पहावी तसा हा रोज बशीची न चुकता थांब्याच्या थोडं अलीकडे रांग लावून वाट पाहतो. आणि बशीनेच घरी जातो.. तीनचाकीचा त्यांना भयंकर तिटकारा.

आम्ही सोसायटी सोडल्यानंतरही शेलाटे बर्‍याचदा थांब्यावर दिसतात, एका हातात फळांची पिशवी, दुसर्‍या खांद्याला बॅग! अशी शेलाटेंची स्वारी रोज घर ते बस अशा वार्‍या करताना हमखास दिसते. ते पाहून मध्यमवर्गीय माणूस अजून संपलेला नाही याची हमी मिळावी.
त्यांचं बाल्कनीकडे मनापासून ओढा, म्हणजे त्यांनी फावल्या वेळात शिकवण्या लावल्यापासून अधिकच!
असा बाल्कनीचा दुहेरी ( कदाचित आतापर्यंत तिहेरी*) असा उपयोग करणारे शेलाटे पाहिले की टाकाउपासून टिकाउ ची संकल्पना शेलाटयांइतकीच जुनी असावी असं वाटावं. त्यांच्याविषयी आणि अर्थात त्यांच्या अर्थार्जन करणा-या गॅलरीबद्दल अलीकडेच बोलताना आमचे तिकडून इकडे स्थायिक झालेले तरीही गॅलरीकरच असणारे शेजारी कौतुकाने म्हणाले, ’शेलाटयांना त्यांच्या जिद्दीनेच तारलं हो!!’ तर असे हे शेलाटे .................सॉरी ’गॅलरीप्रेमी शेलाटे’.

त्यांची बायको सौ. शेलाटे वहिनी किंवा सुहासची आई...अशी त्यांची ओळख. एकमेव सौज्ज्वळ काकू. त्यांच्या अंगणातल्या माडाला नारळ लागले तेव्हा हौसेने काही ठराविक घरातच वाटायला आलेल्या. (वास्तविक अशा गोष्टी ठराविक घरांपुरत्याच मर्यादित रहात नाहीत.) ’हे आमच्या गॅलरीसमोरच्या अंगणातले नारळ’ असं दोन-तीनदा म्हणाल्या. म्हणजे खरं तर ही बाई अशी गॅलरीला पुढे करणा-यातली नाही मग सतत आपलं गॅलरीपुढच्या अंगणात’ चा धोशा का.....असा प्रश्न पडावा. मग थोडया वेळाने गजाकाकूंचा प्रेझेन्स लक्षात घ्यावा.

म्हणजे शेलाटेंनी गॅलरीचं नाव घेतलं की गजाकाकूंच्या चेह-यावर ’बिब्बा घालून कुपथ्य झाल्यावर तडकल्यासारखे भाव! त्यांच्या बागेत न उगवलेल्या मिरच्या झोंबून यांचा नाकाचा शेंडा लालेलाल! (जातिवंत बेडगी मिरचीसारखा).
त्याला कारणही बाकी तसंच!.....त्यांच्या गॅलरीच्या ’भिंतीला भिंत’ लावून टेकलेल्या मागच्या आळीतल्या मुणगेंनी त्यांचं घरावर माडी बांधली( विभू म्हणतो ’माडी इझ सो बॅकवर्ड...कॉल इट वन प्लस वन’...मी मान डोलावली.) तेव्हापासून गजाकाकूंच्या बाल्कनीचं स्वातंत्र्य गेलं. हवा, पाणी, बातम्या सगळंच बंद!!
तेव्हापासून त्यांची हवा, पाण्याविना घुसमट अशी शेलाटेंच्या बाल्कनीवर निघते.
तेव्हापासनं त्यांची घारट नजर आपल्या बाल्कनीला लागू नये म्हणून शेलाटे काकूंनी त्यांच्या बाल्कनीसमोरच्या बागेत लिंबू, मिरच्या लावल्या....तरीही ओव्हरप्रोटेक्शन म्हणून निवडुंगही!


---------क्रमश:

एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले.
तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे.
म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्‍याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले,
'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?
सांगितले, 'मी मुंबईचा?'<
पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे'
आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले,
'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'
मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले.
त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.

तात्पर्य - खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच.

एकदा एका मेंढ्यांच्या कळपातून एक कोकरू मागे राहिले होते. ते पाहून एक लांडगा त्याच्या पाठीमागे लागला.
याच्या हातून आपण सुटत नाही असे लक्षात येताच कोकरू लांडग्याला हसत म्हणाले,
'अरे, तू मला ठार मारणार हे मला माहितच आहे पण निदान आनंदानं तरी मरावं असं मला वाटतं.
तेव्हा तू जर मुरली मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल.' ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला.
त्याने आपली मुरली वाजविण्यास प्रारंभ केला. मुरलीच्या सुरावर कोकरू नाचू लागले. मुरलीचा आवाज ऐकताच जवळच
असलेले कुत्रे धावत आले.त्याला पाहताच लांडगा घाबरून पळू लागला. पळता पळता तो मनाशीच म्हणाला,
'आपला धंदा सोडून भलत्याच धंद्यात पडल्याने असं झालं.
खाटकाचा धंदा सोडून मी वाजंत्र्याचं काम करीत बसलो हा माझा केवढा मूर्खपणा !'


तात्पर्य - नादी मनुष्याला, चतुर लोक सहज फसवू शकतात.

आमचा विभू म्हणजे अगदी छोटं छोटं गोरंपान बाळ होतं तेव्हा...

त्याला मांडीवर घेउन गप्पा चालल्या होत्या आमच्या, म्हणजे त्याला फक्त ही ही हु हु, आणि फारतर फार जोरात रडता येत होतं, आणि मला एखाददुसरी अंगाई म्हणता(ऐकवेल इतपत गोड आणि गायला सुरु करायचा अवकाश फार काळ अंत न बघता त्याला पटकन गुडुप्प झोप येईल अशी) येत होती.

त्याचा बोलण्यासाठी प्रयत्न मात्र सुरु झाला होता. काहीतरी बघून खुद्कन हसण्याचेही खेळ चालले होते. अचानक त्याच्या तोंडून बोबडी हाक ऐकली....आणि दोन सेकंद कानांवर विश्वासच बसेना. तश्शीच टुण्णकन उडी मारुन धावत आईला सांगायला गेले.

"आई, विभूने हाक मारली ती ही माझं नाव घेउन, hehhe ’आई’ म्हटलंच नाही आधी त्याने..टुकटुक..मज्जा."

आईलाही ऐकून गंमत वाटली होती. आम्ही म्हणजे काय आसमंतातच....कुणी अभ्यास बिभ्यास न करता डॉक्टरेट दिल्यासारखा आनंद झाला होता. आपण काय म्हटलं हे त्याला कळण्याची सोयच नव्हती. तो आपला मस्त सतरंजीचं एक टोक तोंडात पकडून माझ्याकडे पाहून हसत होता.

यानंतर एक आठ नउ वर्षांनी.....

.

.

.

.

आमची नेहमीसारखीच उतास जाईल इतकी वादावादी ऐकून आई वैतागली होती.

"काय चाललंय तुमच्या दोघांचं?...घर म्हणजे कुस्तीचा आखाडा आहे का...वगैरे वगैरे.."

"आई, मी त्याला सोडणार नाहीये. त्याने माझ्या नावाची वाट लावलीये. ह्याने आयुष्यात सर्वप्रथम माझंच नाव घेतलं होतं का असा प्रश्न पडलाय मला."

खरंच....त्याने आश्चर्याने विचारलं.

"हो..."मी ऐटीत कॉलर ताठ केली.

"ओह.......मग चल शहाणी पिझ्झा हटचा पिझ्झा लागू" ;)

"ए शहाणा कुठला......"

इयत्ता चौथी : स्कॉलरशीपची परीक्षा देउन आल्यावर

"आई, गणपती कोणत्या महिन्यात येतात?"

"भाद्रपद...का? आपण काय लिहून आलात?"

"श्रावण..."

बाजूला बसलेल्या मला हसू आवरेना.

"ए हसू नको....मी विचार केला गणपती येतात तेव्हा पाउस असतो आनि इलोक्युशनमध्ये परवा श्रावणावरच बोललो,त्यात होतं पाउस पडतो म्हणून, दिलं ठोकून.."

"शाब्बास, मेरे इंग्लिश के पाप्पड...काय पण लॉजिक आहे. चुकून बाहेर सांगू नको आई मराठी शाळेत शिकवते म्हणून." :D

"..........."

तो इंग्लिश मिडीयममध्ये असल्याने त्याचं मराठी सणवार, महिने या आणि एकंदरीतच सगळ्या पार्श्वभूमीवर टोमणे मारण्याची एकही संधी मी सोडत नाही.

इयत्ता आठवी

"ताई, गेस वॉट..."

"काय?"

"मी ज्ञानपीठची एक्झाम दिली होती ना.."

"त्याचं काय?’

"मी महाराष्ट्रातून पहिला आलो."

तो संपूर्ण दिवसभर धम्माल केली..आणि संध्याकाळी त्याला कोपर्‍यात घेउन विचारलं,

"आर यू शुअर? तो पेपर मराठीचाच होता? कारण मला अजूनही श्रावणातले गणपतीच आठवतायत. ;)"

त्याला वेगवेगळ्या फेजमधून जाताना अनुभवणं ही खरी मजेशीर गोष्ट असते, तो एक माझाही अनुभवच असतो. अलीकडेच त्याने विचारलं,

"तुला देव प्रसन्न झालाच तर काय मागशील?"

"तू काय मागशील?"( प्रश्नावर प्रतिप्रश्न करण्याची मोठ्या माणसांची खोड मलाही लागलीये)

"यू सी, मला फेडररसारखं व्हायचंय...................."

त्याची लांबलचक यादी ऐकून मला माझीच शाळा आठवली. त्यावेळीही अशीच ’व्हॉट विल यू डू इफ..’ च्या उत्तरादाखल एक मोठी लिस्ट केली होती.

"सांग न...काय मागशील?"

"अं.......सोचना पडेगा..बरं झालं आठवण केलीस ते, नवीन यादी करावी लागेल."

मनातल्या मनात प्रत्येक मोठया झालेल्या माणसाला म्हणावंसं वाटतं तसंच ’अशा निरागस स्वप्नं दाखवणा-‍या वयातून लवकर बाहेर येउ नकोस’ एवढंच मागावंसं वाटतं .

आज लाफ्टर क्लबमधे दोन पाहूणे आले होते. ते सगळ्यांना वेगवेगळ्या व्यायामाचे प्रात्यक्षीक देवू लागले. सुरवातीला तर त्यांनी काही योगाच्या प्रकाराचे प्रात्यक्षीक दिले . मर्कटासन, हलासन... इत्यादी. त्यातले शवासन लोकांना सगळ्यात जास्त आवडलेले दिसले. मग त्यांनी पवनमुक्तासन शिकवलं.... काही लोकांनी पवनमुक्तासनाला त्याच्या नावारुपाप्रमाणे खरं करुन दाखविलं.... मी तर म्हणतो की पवनमुक्तासनाच्या नंतर लागलीच अनुलोम विलोम घ्यायला पाहिजे. म्हणजे पवनमुक्तासनानंतर वेगळं नाक दाबायला नको.

वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनाच्या प्रात्यक्षीका नंतर त्यातल्या एकाने गळ्यात पाय अडकविण्याचा प्रकार करुन दाखविला. तो प्रकार करतांना तो जोर जोराने ओरडत होता. ते त्याचं ओरडनं त्या योगासनाचा भाग नसुन खरोखरच त्याचे पाय त्याच्या मानेत अडकले होते हे आम्हाला मागावून जेव्हा त्याच्या साथीदाराने त्याचे पाय काढण्यासाठी त्याला मदत केली तेव्हा कळले.

सगळे प्रात्यक्षिकं करतांना ते लोक मधे मधे उत्सुकतेने पार्कच्या गेटकडे कुणाची तरी वाट पाहत आहेत असे बघत होते. ते असे का पहात आहेत हे आम्हाला नंतर कळले. नंतर त्यांनी शाळेत घेतात तसे पी.टी.सारखे वार्मीग एक्सरसाईजेस घेतले. उजवा हात वर करा... त्यांनी निर्देश दिला... आता उजवा हात नक्की कोणता हे बघण्यासाठी मिश्राजींनी बाजुच्याकडे पाहिले. तो त्याच्या बाजुच्याकडे पाहत होता. तिथे पांडेजी उभे होते. त्यांनी जेवण्याची ऍक्शन करुन बघीतली आणि पटकन आपला उजवा हात वर केला. आता जर त्यांनी डावा हात वर करा असा जर निर्देश दिला तर पांडेजी कोणती ऍक्शन करुन बघतील याची कल्पना ना केलेली बरी.

ते डेमोस्ट्रेशन देणारे मधे मधे पार्कच्या दरवाजाकडे का पाहत आहेत हे आम्हाला प्रेसवाले आल्यानंतर कळले. ते प्रेसवाले आल्यानंतर तर आम्ही एका बाजुला राहालो आणि ते डेमोस्ट्रेशन देणारे कॅमेऱ्याकडे बघुन निर्देश देवू लागले. अच्छा म्हणजे ही त्यांची डिप्लोमसी होती. मी पुन्हा डिप्लोमसीबद्दल विचार करु लागलो. आज डिप्लोमसी चा फैलाव एखाद्या रोगासारखा एवढ्या वेगाने कसा काय होत आहे? एखाद्या कॉलेजात डिप्लोमा इन डिप्लोमसी असा एखादा कोर्स तर चालवल्या जात नाही ना?

विचार करता करता एक्सरसाईज केव्हा संपलं काही कळलंच नाही. मी घरी जायला निघालो. पुन्हा माझ्यासोबत तो आधीचा जो मला रस्त्यात भेटला होता तो येवू लागला. अजुनही तो आमच्या मघाच्या प्रगतिविषयीच्या गप्पांवरच अडकलेला होता.

"" आज मानवाने एवढी प्रगती केली तरी तुम्ही त्याला प्रगती मानत नाही असे मघा म्हणाला होतात..?' तो म्हणाला.

"" हो '' मी म्हणालो.

"" पण का?'' त्याने विचारले.

""बघा आज माणसावर अशी वेळ आली आहे की तो कुणाशी मोकळेपणाने हसुसुध्दा शकत नाही.... अणि त्या हसण्याची कमतरता पुर्ण करण्यासाठी त्याला अश्या लाफ्टरक्लबमध्ये जावून वेड्यांसारखं खोटं खोटं हसावं लागतं ... याला काय तुम्ही प्रगती म्हणणार... मी तर म्हणतो की यापेक्षा जास्त कोणती अहोगती नाही ...'' मी आवेशाने म्हणालो.

आम्ही पार्कच्या बाहेर येवून घरी जाण्यासाठी निघालो. तो माझ्यासोबतचा अजुनही शांत आणि विचारात मग्न दिसत होता. तो जरा जास्तच सिरीयस झालेला दिसत होता.

"" अहो जास्त सिरीयसली घेवू नका ... मी आपला असाच बोललो... बाय द वे तुमची कोणती बिल्डींग आहे ...''

मी गोष्ट बदलून त्याला विचारले. त्याने एका बिल्डीगकडे इशारा करीत म्हटले, "" ती बघा ती... फ्लॅट नं. सी202...''

""अच्छा तुम्ही त्या बिल्डींगमध्ये राहाता... मी बऱ्याच वेळा तिथे येत असतो... पुन्हा कधी आलो तर तुमच्याकडे जरुर येईन...'' मी म्हटलं.

"" याना ...जरुर या ...'' त्याने म्हटले आणि तो एका गलीत जाण्यासाठी वळला.

माझं विचारचक्र पुन्हा सुरु झालं. डिप्लोमसीच्या बाबतीत...

डिप्लोमसी ज्याच्यावर बितते त्याला भलेही ती आवडत नसावी पण डिप्लोमसी एक कला आहे. त्यात खुप दुरचा विचार करावा लागतो. आता बघाना जो माझ्या सोबत होता त्याला काय माहीत की मी एक एल. आय. सी. एजंट आहे म्हणून ... आणि आता त्याला मी जाळ्यात ओढणे सुरु केले आहे म्हणून.... तो तर या गोष्टीपासून पुर्णपणे अनभिज्ञ आहे की हळू हळू दोन तिन दिवसात मी त्याच्याकडून कमीत कमी एकतरी एल आय सीची पॉलीसी घेतल्याशिवाय त्याला सोडणार नाही.

कुणी डिप्लोमसीला कला म्हणतो तर कुणाला, विशेषत: ज्यांच्यावर ती बितते त्यांना त्याचा तेवढाच तिटकारा असतो. पण हेही तेवढंच खरं आहे की देवही माणसासोबत मोठ्या चतुराईने डिप्लोमसी करतो. कारण देवाने कुणाला कमी तर कुणाला जास्त दिलं. तरीही त्याचे भक्त तेवढ्याच भक्तीभावाने त्याची पुजा करतात. देवासारखी डिप्लोमसी कदाचित कुणीही करु शकणार नाही. किंवा त्याच्यासारखी डिप्लोमसी केल्यावरच कदाचित काही माणसांनाही देव म्हटल्या जात असावं ...

- समाप्त -