मला वेळ काढायचा होता,
client meeting ठरली होती,
आत्ता तर् चारच वाजलेले...
दिड-एक तासाची निश्चींती होती
खारे दाणे खात खात...
बागेत आलो...
खुर्चीवरची धूळ झटकत....
मस्त रेलून बसलो..

झोपाळे झुलत होते,
ताटवे फुलांचे फुलत होते...
पोरं खेळत, कानात वारं भरल्यागत,
इकडून तीकडे पळत होती
मझं मन ही पळायला लागलं....
एक - दोन-- तीन-- पाच---सात वर्ष मागे..
उसवू लागले आपसूकच..
जुन्या आठवणींचे धागे !

नाक्यावर उभे राहून आमचे जेव्हा टेबल पंखे व्ह्यायचे नां तेव्हा आम्ही सुटलेलं कॉलेज पहायचो ,
या टोकापासून त्या टोकापर्यंत ती जाइतो आम्ही फक्त पहातच रहायचो !
टोक एकदा शेवटचं यायचं , मग तिनं मागं फिरून पहायचं ,
गेल्याची खात्री झाली की आम्ही परत पहिल्या टोकाकडे टक लावून रहायचं !
नाक्याच्या त्या जागेवर माझा ठरलेला स्पॉट होता ,
अनेक ग्रुप यायचे अन् जायचे माझा दिव्याचा खाम्ब असायचा !
सीनियर आणि ज्युनिअर कॉलेजच्या वेळा मला त्या काळी पाठ होत्या ,
माझी सिगरेट आणि चहाची वेळ ठरलेला भट कधीच नाही चुकवयाचा !
बाबांची यायची ट्रेन प्रत्येकाला ठाउक होती त्यावेळी ,
माझी सिगरेट आपोआप दुसरयाच्या हातात सहज ठरवल्यागत जायची !
आई मात्र यायची भाजी खरेदीला चुकून कधीही वेळी अवेळी
अख्या ग्रुपची मला जपायला तारांबळ फक्त त्याच वेळी उडायची !
घातलेली जीन धुवून किती महीने झाले याची काही मोजदात नसायची ,
चुकून घातली नाही की मगच ती जीन पाण्यात जायची !
अधून मधून कॉलेजच्या कैन्टीनला आम्ही पण जायचो ,
टेबलाचे तबले कधी झाले हे न कळताच परत यायचो !
आज बायकोसोबत फिरताना माझा टेबल पंखा होत नाही ,
एक कटिंग मारतोस कां अशी हाक सुद्धा येत नाही !
कड़ेवरच्या छोकरीला त्रास होईल म्हणुन सिगरेट हातात धरत नाही !
हल्ली मुलींनी काका अशी हाक मारली तरी त्रास काहीच होत नाही !
दिवस जुने सरले होते , आठव सोबत उरले होते ,
प्रत्येक मित्र आता दुरूनच हात करतो !
ठाउक असते मलासुद्धा आता असेच वागायचे ,
उगाच कशाला जुन्या गोष्टींना उगाळत बसायचे !
ठाउक असते मलासुद्धा आता असेच वागायचे ,
उगाच कशाला जुन्या गोष्टींना उगाळत बसायचे !
प्र.............साद जोशी
पुणे
०५.०६.२००९

निजण्याआधी तुज्यावर कविता करायच्या
हे तर आता रोजचंच झालंय
आणि याची कितीही सवय झाली आहे असं म्हटलं
तरी प्रत्येक वेळेस लिहिताना मला भरून आलंय
मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही
कारण जिच्यासाठी मी त्या लिहितो
तिच्यापर्यंत त्या कधीच पोहोचत नाही
आणि मनाची परत घालमेल नको
म्हणून मी ही त्या परत वाचत नाही

तुला खरं वाटणार नाही
पण माझ्या कवितेचा प्रत्येक शब्द माझं काळीज जाळतो
तू माझ्या शब्दाकडे नीट पाहिलंस
तर तुलाही कळेल की
माझा प्रत्येक शब्द मूक अश्रू ढाळतो
माझ्या या कविता
मला कधीही न सुटलेलं कोडं आहे
अफाट दुखः दाबलय मनात
कवितेतून बाहेर आलेलं हे फक्त थोडं आहे
आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी
तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही
हे ऐकून अश्रूही आज बोलले
म्हणाले, मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो
तर आता तुला तेही पटत नाही
दीपक इंगळे
दिनांक : १०-०६-२००९

का असतो वारा अदृश्य?
समोरचं स्पष्ट दिसावं म्हणून?
की, मंद वारयाची झुलुक येताच.......
अलगत डोले मिटून मनातलं 'वादळ' उठावं म्हणुन?
का बधिर असते शांतता...?
अद्न्यात वासाची सफ़र करून
मन प्रसन्न व्हावं म्हणुन.....
की, भूतकालातील कटु आठवणी स्मरून
मन सून्न व्हावं म्हणुन?
का असतो थंडगार हिवाला ?
या आल्हाददायी वातावरणात
नाते संबंध घट्ट व्हावेत म्हणुन.....
की, 'कवेत घेणारं कुणीच नाही'
या एकाकी पणाची जाणीव व्हावी म्हणून?
का असतो ओलाचिम्ब पावसाला ?
स्रुष्टिचं हिरवंगार लेण पाहून
डोळ्यांची पारण फिटावित म्हणून.....
की, पावसाची धार नि डोळ्यांतले अश्रू
यांतला फरक कोणाला कलुच नये म्हणून?
का मूक असतात भावना?
समोरच्यानं नजरेतच ओलाखावं म्हणुन.....
की, या फसव्या अपेक्षेने
कायम अव्यक्तच रहावं म्हणुन?
का, स्वताचा रंग नाही पाण्याला?
ज्यात मिसलावं त्याचंच होउन जावं म्हणून.....
की, या उदाहारनातुनच
'स्त्री' जन्म कलावा म्हणून......?

मन एकटे एकटे
मन उदास उदास
होते माझे , तुझवीण
होते माझे , तुझवीण
होते माझे , तुझवीण

मन अकांत अकांत
करते माझे , तुझवीण
मन हुर हुर
हुरहुरते माझे , तुझवीण

मन ढसा ढसा रडते
अड़ते माझे , तुझवीण
मन एकटे एकटे
असते माझे , तुझवीण

मन बेधुंद बेधुंद
रहाते माझे , तुझवीण
मन क्षण क्षण
तरसते माझे , तुझवीण


गीत १३/४/०९

■════════■•◊◊◊•गीत•◊◊◊•■════════■
हस्याने तुझ्या बेहोश केले
होते जे कही ध्यानांत हिरावून नेले
काय बोलणार आता , काय करणार मी
हास्य तुझे प्रेमात पाडून गेले
■════════■•◊◊◊•गीत•◊◊◊•■════════■