कुणी हसले तेव्हा हसलो, कुणी रडले तेव्हा रडलो
मज अलिप्तपणे जगण्याचा, सल्लाही कळला नाही

कुणी मनास रुसवुन गेले, कुणी उगाच फसवून गेले
माझ्या स्वातंत्र्यावरचा मज, हल्लाही कळला नाही

मी प्रवहासह वाहिलो , चाकोरीत अडकून राहिलो
मज आर्त भावनांचा ह्या, कल्लाही कळला नाही

कधी उगाच अडलो नाही, कधी कुणास नडलो नाही
कुणी लुटून मज भरलेला, गल्लाही कळला नाही

मी पूजा सूर्याची केली, मी नमन धरेला केले
मज राम समजला नाही, अल्ला ही कळला नाही
हरवलेल आकाश ( आकाश बिरारी )१४ एप्रिल २००९

मी गीत गात होतो, 'नि:शब्द शांततेचे'
अकर्मण्यता ही 'नि:शब्द शांततेची'
पाहून हाक आली अत्यंत आर्ततेची संघर्षही जीवन आहे अहिंसाही शस्त्र आहे.
युद्ध कर, युद्ध कर, युद्ध कर

मी गीत गात होतो, 'मूक संवेदनेचे'
पलायनता ही 'मूक संवेदनेची'
पाहून हांक आली अंतरी आर्ततेची
सामर्थ्यही जीवन आहे, शब्द ही तलवार आहे
वार कर, वार कर, वार कर

मी गीत गात होतो, 'विश्रब्द भावनांचे'
मूढ़ता ही 'विश्रब्द भावनांची'
पाहून जाग आली अंतरी चेतनान्ची
समर्थही तूच आहे जीवन ही तूच आहे
विजयी भव, विजयी भव, विजयी भव

श्रीकांत कानडे १६ अप्रैल २००९

आज हसवायच म्हणशिल तर..
ते तितकसं सोप्प नाही.
वेदना रुतून राहीली आहे..
कुठे तरी..अशी मिटायची नाही..

आज उसवायच म्हणशिल तर..
ते तितकसं सोप्प नाही.
गाठ पडून गेली आहे.. कधी तरी..
अशी सुटायची नाही.

आज चकवायच म्हणशील तर..
ते तितकस सोप्प नाही.
भास गळून गेला आहे.. केव्हा तरी..
अशी भुलचढायची नाही.

आज उसकवायच म्हणशिल तर..
ते तितकस सोप्प नाही.
वेळ टळून गेली आहे.. कधी तरी..
अशी परतायची नाही.

===================
स्वाती फडणीस ..... १६-०४-२००९

आज हसवायच म्हणशिल तर..

ते तितकसं सोप्प नाही.

वेदना रुतून राहीली आहे..

कुठे तरी..अशी मिटायची नाही..



आज उसवायच म्हणशिल तर..

ते तितकसं सोप्प नाही.

गाठ पडून गेली आहे.. कधी तरी..

अशी सुटायची नाही.



आज चकवायच म्हणशील तर..

ते तितकस सोप्प नाही.

भास गळून गेला आहे.. केव्हा तरी..

अशी भुलचढायची नाही.



आज उसकवायच म्हणशिल तर..

ते तितकस सोप्प नाही.

वेळ टळून गेली आहे.. कधी तरी..

अशी परतायची नाही.



===================

स्वाती फडणीस ..... १६-०४-२००९