सवय करुन घे माझ्याशिवाय जगण्याची
काय माहीत उद्या जगात असेन नसेन
आता दिसतोय इथं तुझ्यासमोर
उद्या कदाचीत कुठल्याश्या ता-यात दिसेन
जाईन उडुन कापरासारखा कदाचीत
माझ्यापाठी अस्तित्वाची खुण न उरेल
नको शोधुस कस्तुरीमृगासारखं मला
शोधुन थकशील पण माझा ठाव न लागेल
त्या आठवांच्या ओल्या दवबिंदुंप्रमाणे
कदाचीत माझे अस्तित्व असेल....
क्षणभंगुर..........
कसे सरतील दिवस तुझे
कश्या सरतील राती....
बावरशील ना ग कदाचीत तु.......
जेंव्हा माझा हात नसेल तुझ्या हाती
पण तरीही
तुला फक्त माझ्यासाठीच जगायचयं
मला हरवणा-या त्या नियतीसोबत
तुला लढायचयं
हसायचयं अन जिंकायचयं...
मी असेनच पाहात तुला
कुठल्याश्या ता-यातुन
करीन तेंव्हाही इच्छा पुर्ण तुझी
त्या आभाळाच्या कोंदणीतुन निखळुन.......
ओंकार(ओम)
Date 12-3-09

हृदयाने ऐका तुम्ही
कविता वाचतो मी

लिहिलेली कुणीतरी ही
शाईने वेदनेच्या
त्या उत्कट तरल क्षणाला
प्रतिभेच्या प्रेरणेच्या
शब्दांच्या खोल तळाशी
घेऊन बघा जातो मी

कविता वाचतो मी.

क्षण काही विसरून जाऊ
या व्यवहारी जगताचे
क्षण काही होऊन जाऊ
आपण सगळे कवितेचे
कवितेचा सुगंध थोडा
तुम्हाला वाटतो मी

कविता वाचतो मी.

तुषार जोशी, नागपूर

वाटते लिहाविशी

एक कविता छान,

शुभ्र आकाशात जशी

इंद्रधनुची कमान,

निर्मळ झार्यामध्ये

जसे खळाळते पाणी,

माझ्या कवितेची असावी

तशी मधाळ वाणी,

पहिल्या पावसानंतर दरवळतो

जसा मातीचा सुगंध,

कविता लिहिताना

मी व्हावे तैसेची धुंद,

पण काय झालय

मला काही कळतच नाही,

शब्द हल्ली मनामध्ये

फिरकतच नाहीत.

पण कधीतरी होईल

एक सुंदरशी पहाट,

त्या दिवशी बहरेल

ही शब्द्फुलांची बाग़,

त्या पहाटेची बघते

मी आतुरतेने वाट...................

-ट्विंकल देशपांडे.

मन माझ का आस वेड्यासारख वागत
तू सोडल त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा फिरत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
विसरल विसरल म्हणता , म्हणता मध्येच तुला मागत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
तू तोडलेल्या हृदयाच्या तुकाडयात तुला शोधत
वाहून वाहून सुजलेल्या दोल्यामाधुं तुला बघत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
बुजलेल्या वाटान वरुण पुन्हा पुन्हा फिरत
काय सांगू तुझ्या आठवनित किती खोल खोल शिरत
आठवून जून सार आज ही हळहळत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
समजावितो त्याला ही जिन्दगी आहे वेड्या
येथे हे आसेच घडणारच
आगि भोवती फिरणारे पतंग कधी ना कधी
आगीत पड़नारच
तरी ही ते पहिलेच पाढे पंचावन्न करत
मन माझ का आस वेड्यासारख वागत
========================गीत ツ ७/३/०९========================

ही सांज कोवळी
ये आज जवळी..
अनवाणी आठवांनी
ये कातरवेळी..॥

ही सांज कोवळी
ये आज जवळी..।

गंधमादित, परीमाळीत SS आठव साठव चाले
नयन बोले तुझे नाव, आसव आसव वाहे

मनात तुझिया
कसला हा खेळिया
तू स्वच्छंदी जलपरी
आज साद घातली

ही सांज कोवळी
ये आज जवळी..॥

हिरवाळीतून, जलदानीतून उत्सव उत्सव चाले,
मन माझे अलवार, तुझे जुने गीत गाते..

ये आज धावूनी
नियम मोडूनी
तू स्वामिनी ग माझी
तू मनमोहिनी..

ही सांज कोवळी
ये आज जवळी.. ॥

सांज वारा कातरवेळ
ज्योतीची तडफ़ड
मनातली घालमेळ
मी उभी इथे शांत
चेह-यावरची रेष ही न हलवता

कुठलास मुखवटा घालुन
डोळ्यांत येनार पाणी
पापण्यांतच जिरवुन
ग़ळ्यातला हुन्दका
असाच गळ्यात दाबुन
मी उभी इथे शांत
चेह-यावरची रेष ही न हलवता

इथे छाटले गेले परच माझे
उडनार तरी कशी??
रक्ताळलेली पाउले
वाट चालनार तरी कशी??
मी उभी इथे शांत
चेह-यावरची रेष ही न हलवता

भविष्य माझं ,माझ्या हातातही नाही
का कुणी वेसण धरलेल???
जीवनाच्या रथाच
का कुणी सारथी नाही??
मी उभी इथे शांत
चेह-यावरची रेष ही न हलवता
स्वाती १४.०३.०९

रस्ता जरी कठिन असला तरी त्याच्या पर्यंत जन्याशाठी मन अधीर असते
अणि तो भेटताच तो रस्ता फुलांचा गालीच वाटतो
जगण्याला मग एक नविन दिशा मिलते
हसताना मग गालात एक सुन्दर खली पड़ते
अणि त्या खलित त्याचे हसू असते
अणि मग जीवन सुन्दर होते

आसाच आहे मी सरळ चालताना ही धडपड़नारा
कोणी ही एकत नसेल तरी नव काही तरी गुणगुणनारा
आसाच आहे मी मनाप्रमाने जगणारा
वार्याला पकडत पकडत क्षितिज्यासाठी धावणारा
माहित नसते बर्याचदा काय मला मिळवायचय
इतकेच ठाम की देवाला स्मरणात ठेवून जगायच
आसाच आहे मी कट्यांपासून ही फुलांची आस ठेवणारा
आसाच आहे मी मनाप्रमाने जगणारा
बर्याच गोष्टी मी न ठरवता ही करतो
मी करतो म्हणन्यापेक्ष्या माझ्या बाबतीत त्या घडतात

का माहिती क पण कारण नसताना ही आनके नविन नाती जुळतात
वाईट वाटते खुप जेव्हा जुनी नाती तुटतात
तत्वांनसाठी नात्यांच्या त्या रेशीमगाठी सुटतात
आसाच आहे मी क्षणा क्षनाचे गणित करणारा
फेकून घड्य़ाळ मुक्त पाने निसर्गात रमणारा
आसाच आहे मी मनाप्रमाने जगणारा