दोस्ता असेल जर,थोडा वेळ तर,बोलू काही

शब्दांच्या या खेळानंतर, बोलू काही



उगी भांडणे, तप्त चांदणे, अबोल दुखणे

खुल्या दिलाने मिटवून अंतर, बोलू काही



तुझाच भास अन तुझाच ध्यास, अजाण त्रास

गुपीत याचे कळल्यानंतर, बोलू काही



क्षणात सागर, क्षणात घागर, कधी हे निर्झर

अवखळ मनीचे विचार सुंदर, बोलू काही



दुजा सांगणे, स्वतः पहाणे, फ़ुका बहाणे

घेउनी क्रुत्यातून प्रत्यंतर, बोलू काही



अनुभवांची, सुखदुःखांची, रंगपंचमी

रंगून होण्या मस्त कलंदर, बोलू काही



-प्रणव

इथे स्पर्श चांदण्यांचा मला पोळलेला

असा शब्द हा विषारी मधी घोळलेला

जगास पर्वा दिमाखातल्या काजव्यांची

जरी आमुचा असे सु्र्य झाकोळलेला

कळे न कुणा म्हणावे सखा जीवनाचा

पुन्हा एकदा स्मरे तु गळा घोटलेला

कुठे तुज आठवे ताटवा तो गुलाबी?

कुणा शब्द आठवे का कधी बोललेला?

उभा जन्म वेचला, भेटला न 'मुरारी'

जुना अपराध तो का पुन्हा भोवलेला?



- 'सकाळ' नितिनकुमार चोभे

कोकणांतून आली कैरी
त्याचा झाला आंबा,
प्राचीच्या नावाचा उखाणा घेते
थोडे तुम्ही थांबा.......

सकाळच्या किरणानी

तिला न्हालेल पहायचय,

केसातून घरन्गळणाऱ्या

बिन्दूना झेलू पहायचय।



केस् मोकळे सोड्लेल्या तिला

गोऱ्यापान् पठिवर

उन झेलताना पहायचय।



तिच्या ओठावरच हसू

दुरुनच प्यायचय,

पापण्याच्या झुल्यावर

खूप-खूप झुलायचय।



फ़क्त एकदाच.....

तिच्या समोर मला

सार् मोकळ करायचय,

ति भिजो वा ना भिजो

मनसोक्त बरसायचय

मनसोक्त बरसायचय......

आज ना ते मोकळं रान आहे

ना झाडावरलं ते शेवटचं पान आहे

एक झुळुक आत्ताच येऊन गेली

माझ्यातली उरली सुरली ओल पिऊन गेली



सुका जीव म्रूगजळामागे धावतो

धावतानाही किती डगमगतो, तडफडतो

एक शिकार तेव्हाच मरता मरता

आकाशात शेवटचे पंख फडफडतो



म्रूगजळाच्या ठिकाणी माझं प्रेत आहे

मातीतला रक्ताचा थेंब...जिवाचा आखरी संकेत आहे

आता नक्की पाऊस येईल, सर्व काही धूवुन जाईल

पुन्हा एक नवं पाऊल, कदाचित माझ्यावरंच छापुन जाईल



-अस्मित

मी पाहिले तुला

तु न् पाहिले मला,

चातकाने किती पाहिली वाट

चातकाने किती पाहिली वाट



कळया नुकत्याच उमललेल्या

पहाटेच्या दवाने न्हालेल्या,

तुज़्या ओन्जळित् हव्या होत्या खरया

पहिल्या मी सन्ध्याकाळि कोमेजलेल्या!



छोटासाच मी एक

खऴाऴता आहे झरा,

पारिजातक वाहण्याची होती आस

पाहिला मी रिक्त सडा!



सूर्यसुध्दा थाम्बलेला

चन्द्राच चान्दण प्यायला,

तुला खरच का वेळ नव्हता

मला दोन क्षण पहायला?

चुकीची शिक्षा व्हावी मला असे जर तुझ्या मनात नसते ...
तर मलाही का वाटेल असे ...
बरे झाले तू गेलिस ते ...

मनाला माझ्या वेड लावून गेलीस तू,

माझे सारे स्वप्न रंगवत गेलीस तू,

भावनाशी माझ्या खेळत गेलीस तू,

बर झाल आशी निघून गेलीस तू


Journey Towards


प्रेषक भानस (शुक्र।, ०१/०५/२००९ - १५:४२)

जिन्नस

एक वाटी मुगाची डाळ

तीन वाट्या मैदा

प्रत्यकी तीन चमचे तीळ व ओवा

प्रत्येकी चार चमचे धणेजिरे पूड, तिखट

दोन चमचे हिंग, एक चमचा हळद व चवीपुरते मीठ


तळण्याकरीता तेल


मार्गदर्शन

कुकरच्या भांड्यात मुगाची डाळ धुऊन घेऊन दोन वाट्या पाणी घालावे। मैदा कापडात घेऊन त्याची सैलसर पुरचुंडी बांधावी. कुकरमध्ये डाळ व मैदा ठेवून नेहमीप्रमाणे तीन शिट्ट्या कराव्या. वाफ कमी झाली की मैदा ताटात काढून घ्यावा. वाफवल्यामुळे मैद्याचे ढेकूळ तयार झालेले असेल ते फोडून पुन्हा पीठ करावे. मैदा गरम असतानाच केले की पटकन होते. संपूर्ण गुठळ्या मोडल्यावर उकडलेली मुगाची डाळ घालावी. (दोन वाट्या पाणी घातल्यामुळे जास्तीचे पाणी उरत नाही. जर पाणी जास्त असेल तर ते वेगळे काढून ठेवावे व लागेल तसे घालावे. ) मीठ, हिंग, हळद, धणेजिरे पूड, तिखट, ओवा व तीळ घालून मळावे. साधारण अर्धा तास ठेवावे. तळण्यासाठी पुरेसे तेल घेऊन प्रथम व्यवस्थित गरम करून घ्यावे नंतर मध्यम आच ठेवून नेहमीप्रमाणे चकल्या तळाव्यात. ह्या चकल्या अतिशय कुरकुरीत होतात व जराही तेल राहत नाही. पीठ भिजवताना त्यात मोहन किंवा साधे तेल अजिबात घालावे लागत नाही.


टीपा

जिथे चकलीची भाजणी सहजगत्या मिळत नाही किंवा आयत्या वेळी करायची लहर आल्यास पटकन करता येतात. आठ दिवस जरी राहिल्या तरीही तेल अजिबात गळत नाही. तीळ, ओवा, धणेजिरे पूड व तिखट हे थोडे जास्तच टाकावे म्हणजे भाजणीचा खमंगपणा येतो. हमखास कुरकुरीत होतात.