सुख दुःखाचे फेरे चुकवण्यासाठी
आपण राहावे जन्म भरचे योगी ,
जगताना फक्त सुखाची अपेक्षा करणारे
आपण सर्वच असतो अगदी वेडे भोगी .......

ईशान .

मी संत नसे, न वैरागी
प्रपंचाचा, एक भोगी..
लुटण्या आनंद सुखाचा
मनुष्य मात्र, न मी योगी..

-- संदेश

सारखच मिळालं सुख
तर मन कठोर होईल का?
आलेच मध्येच दुख
तर त्याला पचवता येईल का?


अभी

फुलाचे उमलणे कसे ,
नेहमीच नित्य नवे असते
तसे तुला माझ्याकडे येण्यास ,
काही न काही कारण हवे असते ...

मोगर्‍याच्या गजरा मला
तूझ्या ओंजळीत टाकायचाय...
नक्कि गंधाळते कोण?
हेच मला पहायचय..

-
मंदार

आजकाल माझे मन सतत ,
तुझेच चित्र साकारते
त्या चित्रात आपले भविष्य,
रेखाटायला मात्र ते अजून नाकारते ........
ईशान

निवडुंग तर नेहमी आशेवर असते..
त्यालाही कधी कधी जास्त पाण्याची गरज असते..
पाण्याविना जगताना तेही मनात रडत असते..
आणि मग तेच पाणी पिऊन आपले पोट भारत असते..
-प्राग..

आयुष्याच्या वाटेवर साथ तुझी असावी..जीवन-भरासाठी तुच माझी असावी..

तुझे ते प्रेम आणि तुझी ती काळजी, हे सर्व काही असावे फ़क्त माझ्याच साठी..

तुझा तो कोमल चेहरा मला पाहुन फुलावा,
आणि हातात हात घेउन सगळीकडे मिरवावा..

लाजत लाजत मिठीत माझ्या हळूच तु यावे..
आणि डोळ्यात तुझ्या बघता बघता मी बेहोश व्हावे..

तुझे ते गोड हसने मलाही हसवते..मात्र तु दुखात असताना मलाही रडावते..

तुझी नशीली नज़र घायल मला करते..
एक झलक पाहण्या साठी पुन्हा पुन्हा लवते..

तुझा तो बेभान स्पर्श हृदयाला भिडतो..
तुझ्या सहवासात मी स्वर्गच अनुभवतो..

झ्या आठवनीत माझा जीवच व्याकुल होतो..डोळे येतात भरून आणि श्वासच थांबतो...

तुझ्या विरहाची कल्पना मी करुच शकत नाही..
कारण!!!
तुझ्या शिवाय मी जगुच शकत नाही...

सोडुन मला एकटे जेव्हा तु जाशील..या शरीरातून प्राण तु नेशील..
पण जेव्हा आठवतील तुला सुखाचे ते दिवस,
मी नसेल सोबतीला आणि तु पण एकटी होशील....

महेश...

अंगणातल्या रातराणीला ...
फूलणे तसे नेहमीचे
निवडुंग माझा फुलला आणि ..
सांगून गेला बरेचसे ...

माणुस एकटाच जन्मतो अणि एकटाच मारतो,
कितीही प्रेम केल कुणी तरी बरोबर येत नस्त,
जर अस होत असत तर कसलीच नस्ती खंत,
आणि कधीच नस्ता एकांत. एकांत आणि फ़क्त एकांत.

निवडुंगाला सवय असते
एकट दुकट रहाण्याची
मृगजळ पाहुन मग
आपल्याशीच हसण्याची

मी नाही भेटलो तिला की ती भलतीच तापते
"मी कधी भेटनारच नाही तुला" म्हणते
पण समोर आल्यावर मात्र गालातल्या गलत हसते
कारण प्रेम तर ती सगळ्यात जास्त माझ्यावरच करते

मी नाही केला तिला call तर ती भडकते
"मी कधी बोलणारच तुझ्याशी" म्हणते
पण call च्या माझ्या चातक सारखी वाट पाहते
कारण प्रेम तर ती सगळ्यात जास्त माझ्यावरच करते

मी नाही केल chat तिच्याशी की ती संतापते
"मी online च येणार नाही" म्हणते
पण मधूनच online येऊन माझ status check करते
कारण प्रेम तर ती सगळ्यात जास्त माझ्यावरच करते

मी नाही केल मनासारख तिच्या की ती वैतागते
"दुसरी मुलगी बघ लग्नासाठी" म्हणते
"पण दीवाळीत साखरपुडा नि Feb
मध्ये लग्न अस आवर्जून सांगते"
कारण प्रेम तर ती सगळ्यात जास्त माझ्यावरच करते

-------संजीव
२६/०८/०९

तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
भीती नाही वाटली अंधाराची
अन अंधारात चालताना देखिल
ओढ़ होती प्रकाशाची.......
तुझ्या मैत्रीच्या सानिध्यात
पावलो पावली मिळाला विश्वास
अन मिळाला धीर संकटात .....
तुझी-माझी मैत्री बनली
एक फुलांचा नाजुक वेल
म्हणुन आपल्या मैत्रीचा
आहे अनोखा खेल......
पण तू हाथ धरलास
नि जिव माझा खुलुन आला
माझ्या आयुष्याच्या वृक्षावर
जणू गुलमोहरच खुलुन आला......
तूच शिखवलीस मला
जगण्याची खरी कला
म्हनुनच तुझ्या-माझ्या मैत्री साठी
लाख सलाम तुला.......

Manoti bhingarde

कोणी बघेल म्हणुन तू मला
स्वप्नात पत्र लिह्तोस
आणि पहाट होताच पत्रासहित
हसून निरोप घेतोस.....
मग..?
मग, माझ्या भावनांची नदी
मनातून ओसंडून वाहते
आणि.......
दिवस-दिवस मी तुझ्या
पत्रांची वाट पाहते......!!!

Manoti bhingarde 27.08.09

स्वप्नामाधे तुज्यासोबत
समुद्रावर फिरण होत
रोज मात्र तुझ्या विचारात
फ़क्त माझ झुरण होत.........
म्हणुनच....,
तुझ्या आठवणीनपेक्षा
मला तुझ स्वप्नच
खरतर बर वाटत
निदान....,
तू माझ्या बरोबर आहेस हे
काहि काळ तरी खर वाटत.............


Manoti bhingarde 27.08.09

काल मरून मी स्वर्गात गेलो
इंद्र नाराज होता, रंभा तर फारच चिडलेली
एकंदरीत चित्र चिंताग्रस्त
माझ्या कर्मकांडाची फ़ाईल स्वर्गात हि रखडलेली

इंद्र म्हणाला प्रेम करायचा प्रेम करायचा
म्हणून तू तिच्यावर किती रे प्रेम करायचा
तुला प्रेम वाटता वाटता
माझ्या प्रेमाचा स्टोक मलाच कमी पडायचा

ती तुझ्याकडे ढुंकून हि पाहत नसली तरी
तू तिच्यासाठी रात्रं-दिवस झुरायचास
तिने पायाने लवंडली तरी
प्रेमाची घागर तू परत काठोकाठ भरायचास

तिने तुझ्याकडे पाहिलं नसलं तरी
हि रंभा तुझ्या प्रेमाच दररोज live telecast पहायची
दयेलाही दया येईल असे तुझे प्रेम पाहून
हि रंभा ढसा ढसा रडायची

सौंदर्य नको अमरत्व नको
मी तुझ्या सारखा प्रेम करेल असा वरदान मागायची
शिका जरा त्याच्याकडून
असा वरून मलाच गाल फुगवून सांगायची

येवढ माझा नाव घेतला असतास तर
मी हि तुला पावलो असतो
तुझ्या प्रत्येक संकटात मदतीला
स्वताहून धावलो असतो

येऊ दे तिला वर एकदा
सरळ तिला नरकातच पाठवतो
बघतोच मग तिला
तू कसा नाही आठवतो

तसा म्हणताच बोललो
म्हणालो ती नरकात जाणार असेल
तर मलाही तिथेच पाठवशील
नरक हि मला तिथे स्वर्गाहून सुंदर भासेल

का म्हणून तिने
माझ्याकडे यायचं
तहानलेल्याने पाण्याकडे
का पाण्याने तहानालेल्याकडे जायचं ?

मी साधारण मनुष्य, ती रुपाची राणी
मी साचलेलं पाण्याचं डबकं, ती झुळझुळ पाणी
मी खोबरेल तेल, ती अत्तरदाणी
मी हिमेश चा ऊऊऊऊ, ती लताची गाणी
मी खुरटे केस, ती लांब सडक वेणी
मी आरे च दुध, ती शुध्द लोणी

असा बोलताच इंद्राने चक्क हात जोडले
सकाळच्या पहिल्या गाडीने परत पृथ्वीतलावर धाडले
म्हणाला माझ्या संसाराला आग लावायचा तुझं काही तरी कपट आहे
सांगून सुधारणार नाही असा तू कुत्र्याचा शेपूट आहे

तू साधारण असलास तरी
तरी तुझं प्रेम असाधारण आहे
तिन्ही जगावर मात करेल
असा तुझ्याकडे कारण आहे


दीप २१/०८/२००९

डोळ्यात पाणी सुकवून टाकेल बघून तुला....
पण तुझ्यासमोर रडणार नाही ती
तुझ्यासाठी जगाशीही आता कधी लढणार नाही ती..
आता तू तो नाही न राहिलास....
मग ती हि ती नाही राहणार...
सोबतीला तुझ्या कधीच आता दिसणार नाही ती....
मागशील साथ जेव्हा लागेल गरज...
पण मायेने हात कधी हाती धरणार नाही ती..
धरलेला हात सोडून द्यायचास ना...
सुखात आपल्या विसरून जायचास ना
आता विसरायला...
आठवणीचतच नाही राहणार ती..
निघून जाईल अशी कि...
दूर गेल्यावर दिसेल...
पाठमोरी.....
गरज वाटेल सोबत भासेल...
पण हात नसेल...
बोल्याच असेल खूप काही..
पण ऐकायला कोणाला वेळ नसेल...
रडशील परत ये म्हणशील...
पण आता कधीच तुझ्यासाठी परत येणार नाही ती..
कधीच नाही...

गहिरे क्षण मनाच्या कोपऱ्यात..
तरळले पाणी तुझ्या डोळ्यात..
असे कसे आभाळाचे रितेपण..
होऊ दे मोकळे तुझे मन..

मनातून एक साद येई..
मला तुझी आठवण येई..
तुझे डोळे आस पाही..
क्षण क्षण मी जवळ येई..

अशीच प्रीत असते खुळी..
कसे उतरवू तुझ्या गळी..
गुंतून पडतो डोळ्यांच्या गहिराइत
शोधतो तेच क्षण त्याच मातीत..!!

-प्राग..
26/08/09

एक होता विदुषक
अगदी माझ्या सारखा
नेहमी सर्वांना हसवायचा
हसवणे त्याची कलाच होती
हास्याचा जणू तो निर्माता होता..
:
हसण्यात मग्न असायचे सर्व
इतरांना ते समजत नव्हते
हसवताना तो स्वतः मात्र
खोल विचारात हरवून जायचा
त्याची होणारी ती अवस्था
माझ्या पेक्षा वेगळी नव्हती...
:
हसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात
तो फक्त तिलाच शोधायचा
लपलेली असायची ती कुठेतरी
त्याला दिसायची सुद्धा ती हसताना
शेवटी तो त्याचा भासच असायचा
क्षणात ती अदृश्य व्हायची...
:
ती आपली कधीच होऊ शकत नाही
याची पुर्णतः जाणीव त्याला होतीच
त्याला याचे वाईट सुद्धा वाटायचे
तरी तो तिच्या वरच प्रेम करत राहिला
कदाचिद यालाच खरे प्रेम म्हणतात...
:
पण काय ते म्हणतात ना प्रेमा बद्दल..
खरे असेल तर ते एकदाच होते आयुष्यात
असेच काहीसे त्याचे नि माझे सुद्धा...
:
--हरिष मांडवकर
१८-०८-२००९

सुख-दुखाचा खेल जीवनभर चालणार....
सुखा बरोबर दुखही साजरे करा....
व्हा राजे खेलाचे...
दुखालाही नमते करा....

डोळे ते काळे काळे
ना बाण ना ते भाले
झाल्या जखमा कशा
मला मूळी ना कळाले

खूपते ही अशी भेट
बोचतो हा वारा भरारा
सये तूझा थंड अबोला
ग पेटवी रान सारा ..

निशब्द चांद नभीचा,
का बेभान चाफ़ा झाला
रूपड्यास म्हणे तूझ्या ग,
त्यांचाच रंग आला

प्रीये सोड ना अबोला
बघ फ़ुलेना गूलाब वेडा
रागवशी तू अशी का
चालेना काळजाचा ठोका

जाम ही झाला बावरा
प्यालाशी तो का भांडला
आस तव स्पर्शाची त्यास
बघ ओठांवरी तो थांबला

मंदार(साद मनाची)
२६-०८-०९

किती जण आपल्या नशिबाला दोष देतात
कर्तुत्वा कडे स्वतःच्या किती जण पाहतात?

अमिताभच्या घरात जन्मलो असतो ,तर अभिषेक झालो असतो
पण याच देशात खानांचा शाहरुख पण राहतो

गावाला जातांना आपण त्याच गावच ticket घेतो
आयुष्याची गाडी आपण बिना destination सोडून देतो ||goal||


सुंदर पोरगी,सुंदर ड्रेस चपला खराब एवढाच पाहतात
इतके गुण असताना आपल्याला दुर्गुणच का दिसतात? ||attitude||

बद्कान मध्ये राहून गरुड स्वतःला बदक समजतात
सगळ काही ठरते तुम्ही स्वतः स्वतःला काय समजता? ||self esteem||

कोवळ्या वयात शारीरिक आकर्षणाला प्रेम समजतात
वाईट मित्रान मूळे दारूच्या सवयी लागतात ||discipline||

नीट वापरा आयुष्यात हे चार तंत्र
हाच आहे "यशाचा गुरुमंत्र"

राजेश जोशी २६\८\२००९

चिरंजीव निहारिका औक्षवंत हो !

माझी सोनू निहारिका | जणू छोटीशी बाहुली |
माझ्या बिरार कुळाची | उमलती सदाफुली || १ ||

माझी सोनू निहारिका | तिचे टपोरे हो डोळे |
आहे मिश्किल जराशी | दावी मुखी भाव भोळे || २ ||

माझी सोनू निहारिका | तिचे छान छान झगे |
राघू, मैना, भू भू, मनी | त्याच्यावरी तिचे सगे || ३ ||

माझी, सोनू निहारिका | तिचा साहेबी रुबाब |
जरासुद्धा न चालतो | थोडा रुमाल ख़राब || ४ ||

माझी सोनू निहारिका | तिचे गुब्बे गुब्बे गाल |
थोड़े जरी रागावता | नाकाचा हो शेंडा लाल || ५ ||

माझी सोनू निहारिका | तिचे सखे चिऊ, काऊ |
मला म्हणे, "त्यांच्या सवे | चला उडायला जाऊ" || ६ ||

माझी सोनू निहारिका | कधी होते माझी बाई |
थोड़े जरी मी चुकता | शिक्षा देई घाई घाई || ७ ||

माझी सोनू निहारिका | जणू तारका चांदणी |
मोठी होता चमकेल | विश्वाच्या या नाभांगणी || ८ ||

माझी सोनू निहारिका | ठेवी हात कटेवरी |
आणि म्हणे, " आई, बाबा | विठू आला तुम्हा घरी," || ९ ||

माझी सोनू निहारिका | करी हाताची बासरी |
पू पू ऐसे म्हणताना | मूर्त पहावी हासरी || १० ||

माझी सोनू निहारिका | कधी खेळते भोंडला |
फेर धरुनी ती म्हणे | "कसा हत्तीला कोंडला || ११ ||

माझी सोनू निहारिका | कधी कधी होते राजा |
बसुनिया माझ्या पाठी | वाजविते बँडबाजा || १२ ||

माझी सोनू निहारिका | किती तिच्या सांगू खोड्या ?
नव्या को-या कागदाच्या | करावया लावी होड्या || १३ ||

माझी सोनू निहारिका | कधी खोटं खोटं रडे |
कङेवरी घेता मात्र | खुदकन हसू पड़े || १४ ||

माझी सोनू निहारिका | ए बी सी डी गिरविते |
दटाऊनी मज म्हणे | "तुम्हांलाही शिकविते" || १५ ||

माझी सोनू निहारिका | कधी स्वतःशीच लाजे |
तिचा नखरा असा की | तिचा तिलाच विराजे || १६ ||

माझी सोनू निहारिका | आहे उत्तम गुणाची |
तुम्ही तरी सांगा बरे | सर येईल कुणाची ? || १७ ||

माझी सोनू निहारिका | राती जेव्हां येई खळी |
माऊलीच्या कुशीमध्ये | झोपी जाते सोनकळी || १८ ||

माझी सोनू निहारिका | गायत्रीचे हे वासरू |
गुणगौरव गाताना | कसे स्वतःला आवरू ? || १९ ||

माझी सोनू निहारिका | तिचे विशाल आकाश |
ज्ञानवंत ऐसी होवो | शत् सुर्याचा प्रकाश || २० ||

रचना : उपेंद्र चिंचोरे

Email : chinchoreupendra@yahoo.com

समस्येचा गाळ पण
ऊन पडल्यावर कडक होतो............
अशाच गाळाची मूर्ती बनवून
एक दर्मिळ मूर्तिकार घडतो............

अभिनंदन

काही गोष्टिंच असच असत
मनात अठवनिंच जाळ असत
त्यात काहींना विसरायच असत
पण विसरण मात्र जमत नसत

आमच्या आयुष्यातून त्यांना जायचच असत
आणि त्यांच्या आठवणीना आम्हाला छळआयाच असत

आठवण येताच ,
डोळे झाले ओले ,
झुळूक वाऱ्याची,
कानी काही बोले |

डोळे ते काळे काळे
ना बाण ना ते भाले
झाल्या जखमा कशा
मला मूळी ना कळाले

बेभान नशीले ते प्याले
कसे मनात उतरू आले
न पीताच चढली नशा
असे जाम ते मज मिळाले

शब्दांशी शब्द ते जुळले
संगीतात वाहते झाले
अनामिक दर्द ल्यालो
गीत मौनातून ते आले

मंदार (साद मनाची)
२६-०८-०९

बस टॉप वर आज मी
पुनः तुला पहिल ...
सुन्दर ते रूप तुझे
डोळ्यां मध्येच राहिल....
वारया संगे उडनारे ते
तुझे सोनेरी केस
लावून गेले रुदयात माझ्या
तुला भेटण्याची रेस .......
घातला होतास मोहक असा
गुलाबी पंजाबी ड्रेस ...
चेहर्या वर्ती दिसत होते
मी बघतोय याचे स्ट्रेस ..............
बघून तुला सर्व
मन विसरले होते
बाइक असताना देखिल
बस टॉप वर खुट्मलले होते ...
डोळ्यांच्या कोण्यातुन हलूंच
बघत होतीस
माझी नज़र भिड्ताच
वर वर फिरवत होतीस
माहित होते मला
तुही सर्व विसरली होती
बस समोरून गेली तरी
तशीच उभी होती
अभिनंदन १२-०८-०९

रात्र सरून गेली होती..
पहाट जाली होती..
तरीही मी जागाच
कारण आठवण तुझी आली होती

@ शशांक

आटली सर्व आसवे
तुटली सर्व नाती
तरीही हे शेवटचे शब्द
फ़क्त तुझ्यासाठी...
@ शशांक

नव्हे वर्षांत
भेटली नाहीस तू
कुठे आहेस तू ?
तुला शोधण्याचा
खूप केला मी प्रयत्न
पण व्यर्थ ठरले
माझे सारेच यत्न
नव्हता तुझा पत्ता
यास्तव सुटलेला धीर
तरीही तू भेटशील
म्हणून होते मी अधीर
पूर्वी कशी अवचित
भेटली होतीस मला
वाटले तशीच तश्शीच
भेटशील आताही मला
कुठे कुठे शोधले तुला
सुखात , दु:खात
निराशेत , उत्साहात
गावात , शहरात
अंधारात , चांदण्यात
दिवसा , रात्रि
रानात , वनात
पावसात , नव्हे उन्हातही
पावसात , नव्हे उन्हातही
कुठे तुझा थांग
कुठे आहेस तू ?
आता तरी सांग.
कुठे आहेस तू ?
कुठे आहेस तू ?
प्राणसखी " कविते "
कुठे आहेस तू ?
-----संगीता सावंत. कोथरुड.पुणे.
४१२००८.

खुप आधीची गोष्ट आहे
तू माझ्या क्लास मध्ये होतीस
नाव गाव पत्ता माहित नव्हतं
पण दिसायला मात्र सुन्दर होतीस
love at first site वर माझा विश्वास नाही
पण मी तुला किती वेळा पहायचो हे मीही कधी मोजलं नाही
हलू हलू क्लास मध्ये माझी attendance वाढू लागली
नजर माझी फल्यावर कमी आणि तुझ्यावर जास्त खिलू लागली
पुढे जायचे यायचे रस्ते बदलले
कॉलेजचे lectures तुझ्या गल्लीच्या नाक्यावर कटु लागले
तुझिही नजर माझ्यावर होती .....होती मात्र संशयाची
बाकि सगळ ठीक चालू होतं पण हिम्मत होत नव्हती बोलायची
संशयाच रूपांतर पुढे गैरसमजुतित झाल होतं
माझ्या सारख्या टपोऱ्याच प्रेम तुला कधी कलालच नव्हतं
धाडस नसताना प्रेम केल होत मी
काही पावलं काय पूर्ण आयुष्याची दिशाच चुकलो होतो मी
काय करू शकत होतो मी ..तुझ्या नावाच्या चार कविता लिहिण्या शिवाय
तुला समजावणारं कोणीही नव्हत माझ्या ह्या डोळ्यांशिवाय
डोळ्यांची भाषा तुला कधी कलालीच नाही
तू माझी कधीच ...कधीच होवू शकली नाहीस
कुठलाही पाउस मला नंतर भिजवू शकला नाही
की कुठलेही वादळ माझे अश्रु सुकवु शकले नाही
कसा जगलो आहे मलाच माहिती आहे
एक एक क्षण तुझ्या अथावानिने छलले आहे
क्षण पुढे जातात ...पण मन कुठेतरी मागेच राहिलेले असतं
काहीतरी ...काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करत असतं
माझही मन अजुन त्याच क्लासमध्ये आहे
अजुनही तुझ्या त्या गोड चेहऱ्याकड़े बघत आहे
---सौरभ

विझून गेल्या सगळ्या आशा
आकांक्षाही मग मावळल्या
तिमिर हा दाटे चोहिकडे
तरीही ,सांजवात मी लाविते
सखी ,सांजवात मी लाविते
मनात काहूर माजलेले
धुमसती विझले निखारे
फुलती या नयनी अंगारे
तरीही , अखंड प्रज्वलते
सखी, सांजवात मी लाविते
वारा वाहे असा सैरावैरा
सागरही आहे खवळला
भीषण वादळ घोंगावते
तरीही , निरंजन तेवते
सखी, सांजवात मी लाविते
आता कशाशी नुरले नाते
एकले येणे एकले जाणे
धूसर धूसर चित्र सारे
तरीही , वाट पुढे सारते
सखी, सांजवात मी लाविते
------संगीता सावंत कोथरुड,पुणे.
------५८२००९.

सामान्यांचा जीव अजुनही घुसमटतोय
उच्च्भ्रुंच्या फ़क्त मेनबत्या जलतायत
सामान्यांचे जीव ट्रेन आणि रस्त्यात जाणारे
महागडे जीव फ़क्त ताजवाल्यांचे .....
महागड्या चाकातुन ........उतरनारे सेलेब्रिटी
तिथून चालत ......मेनबत्या जाळन्यासाठी
उद्वेग कशाचा .....???
मानस मेल्याचा ...???....की ताज जळल्याचा .......???
की आता वर्षभर पार्ट्या होणार नाहीत याचा....???
आपणही असतो यांच्या बरोबर ....... N Series घेउन फोटो काढत॥!!
१० आले ९ मेले...
१०० राजकारणी आले आणि एकही मेला नाही.........?
आता तर भाषणही संपली॥
लोकांचा प्रक्षोभ तर कधीचाच गाडला गेलाय
प्रत्यक्ष कृती ऐवजी नव्या शपथविध्या होतील॥
नव्या तिजोरया भरतील...... नव्या मंत्र्यांच्या ......!!!
भ्याड आहोत आपण...
लाचाऱ्यागत मदतीची भिक घेणारे....!!
स्वताचाच आक्रोश ऐकून कानावर हात ठेवणारे...!!

जगण्यापेक्षा मरनाच सोप्प जालय म्हननारे आपण
मुंबई स्पिरिटच्या नावाखाली घरून निघताना मुलांच्या तोंडाकड़े शेवटच पाहतोय अस पाहणारे आपण
धन्यवाद सहाव्या मजल्यावर बसलेल्या त्या मंत्र्यांचे
बाकि काही नाही निदान मरण तरी स्वस्त करणारे.....!!

शेवटी पुन्हा असेच जीव जाणार
पुन्हा अश्याच मेन्बत्या जळणार
सोन्याचा धुर निघनाऱ्या या जमिनितुन
आता फ़क्त रक्ताचे पाट मुरनार...!!!!
-----सागर

हसऱ्या मुखवट्यात फिरताना आरास दिव्यांची भवति..
सडा फुलांचा अन हास्याची कारंजे दारी उडत होती ..
उतरवाच मुखवटा तो ..चित्र रात्रीपारी मावळले ..
पाणी पडले त्या चित्रावर जसे दिवे तेथले सारे हळूच विझले ..
दिसले दुख तिला...पण तेव्हा कोणीच जवळी न्हवत ....
एकटीच आणि सोबत एका मंद दिव्याची वातच तेवढी तेवत ..
वातही ती जणू शोभेची बाहुली ..देखाव्याला बसलेली ....
विझली नसली तरीही ....फिकीर सोडून सारी शांत निझलेली ..
अंधार फक्त स्तब्ध बघत होता ..निष्पाप बाळासारखा कदाचित जाणून बुजून ..
जणू आयुष्यभराचे ऋण करतोय त्या तोरयाने वाऱ्याला अडवून मंद उजेड ठेऊन ..

चार भिंतीतल्या दार खिडक्या पण दूर निघून गेलेल्या ...
आत आणून तसच टाकून रस्ता सांगण्यास विसरलेल्या ...

या सर्वांमध्ये एकटीच ती....
मुखवट्याचे आणि चेहऱ्याचे आज खरे सत्य कळले ..
पण का ..अजून नाही मनाने या मुखवट्याला नाकारले ...

का अजून मन शोधताय सत्य आणि स्वप्नांची सांगड ...
ठावून असून कि ते सूर्य चंद्रापरी एकत्र येणंच अवघड ...
प्राजक्ता
१०-८-०९

पुरे पुरे हा बहाणा
सोड राग जीवघेणा
गडे , तुझा हा अबोला
आता मला साहवेना
गोड प्रेमळ शब्दांची
नित्य बरसात व्हावी
आणि तुझ्या लोचनांत
माझी प्रतिमा दिसावी
खोटा खोटा रुसवा
बघ क्षणात निवेल
तव प्रेमाच्या सिंचने
प्रितवेल बहरेल

पुर्वेचि केशरलाली
कशी पसरली गाली
तुझ्या मुग्ध हसण्याने
खूण प्रितीची पटली
------संगीता सावंत कोथरुड , पुणे.
------८८२००९.

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दरी
चार मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना, ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई

येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी

- यशवंत

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं .............
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो......
सावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतं …….
रणरणत्या उन्हात सावलीसाठी एक झाड आपणच आपलं शोधायचं असतं …..
नावेला किनाऱ्यावर आणण्यासाठी कोणी पुढे येत नसतं ..........
वादळात नावेला वाचवण्यासाठी आपणच आपलं नावाडी व्हायचं असतं ...............
पाण्याच्या थेंबाना मोल सहज येत नसतं.........
निसटत्या पानावर थांबून दवबिंदूनी आपणच आपला अनमोल ठरायचं असतं.......


पांढऱ्या रंगाला सौंदर्य असंच प्राप्त होत नसतं ...........
त्यासाठी त्याने पाण्याआड जाऊन इंद्रधनू म्हणून उमटायचा असतं.......

आयुष्य दिलं आहे म्हणून जगायचं नसतं........
आपल्यातलाच आपलं शोधून आयुष्याला घडवायचा असतं.....................

का जळले दीप ज्योती प्रकाशताना
का जळल्या ज्योती अंधार लोपताना

हे लावले तरू माझ्याच अंगणात

वारा ईथेच का वाही उदासवाणा

हासू नका कुणी उपहास भासतो

हे भाव ना खरे मी खुद्द हासताना

....रसप....

०५ ऑगस्ट २००९

Type rest of post here