|
0
comments
]
सावळ्याचा मना ध्यास होता,
दूर जातोच तो,आस होता...
संचिताचे जरी भोग सारे,
साद देईल तो, दास होता....
जिद्द झाली पुरी भेटण्याची
सावळ्याचा मनी वास होता...
बासुरीने मना धुंद केले
सूर ओठातला, ख़ास होता....
शोधले मी तरी सापडेना,
तोच श्वासातला ,श्वास होता...
....अरविंद
|
0
comments
]
अहं ठेचला गेला.. की,
उफाळतो तो ...... राग..!
राग वांझोटा असला.. की,
होतं ते ...... दु:ख..!
दुःख रिचवावं लागलं.. की,
येते ती ...... लाचारी..!
लाचारी मान्य केली.. की,
येते ती .. कृतिहीनता...... मृत अवस्था..!
जिवंत मुडद्यांना वास्तवाच्या झळा लागल्या.. की,
येतं ते.. भान..!
भानावर असलेल्याने.. केलेली कृती,
म्हणजे स्वाभिमान......!!!
स्व अभिमान.
स्वाती फडणीस ................... २१-०६-२००९
|
1 comments
]
संपला संपला हा उन्हाळा
जणू अग्निच्याच ज्वाळा
शांत झाली धरणी माता
पिउन ग गार वारा
निळ्या ऐवजी काळे मेघ
दिसू लागले गगनात
अग्नी ऐवजी जलधारा
पडू लागल्या धरणीवर
नटली ही धरणीमाता
हिरवा शालू नेसून
आनंद देई सर्वांना
आपल्या हिरवाईतून
-मैत्रेयी
|
0
comments
]
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
एकामेकांना भॆट्ण्य़ाची दोघानाही आस आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
Type rest of post here
|
0
comments
]
कैफात त्या बुडालो
होतो कसा कळेना ,
होती नशा तुझ्या त्या
नजरेत जराजराशी . . .
मिटताच पापण्या का
दिसते मला सदा तू ?
का आठवात माझ्या
असते जराजराशी . . . ?
एकांत आसवांनी
माझा सजून जातो ,
डोळ्यांमधून माझ्या
तू सांडते जराजराशी .
भेटीत आपुल्या त्या
का ओढ होती युगांची ?
थांबलीस तू ही जाताना
तेव्हा जराजराशी . .
- मंगेश


