आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

ती मुलगी होती की जादू , हेच नाही कधी कळले
नजरेतून सुटलेले तीर तिच्या , हृदय माझे चिरत गेले
एकांतातील तिचं बोलण , जेव्हा कानांमध्ये गुंजत
दिवस-रात्रीचा माझ्या चैनच हिरावून नेत
कधी तिचं हसण , कधी लटक रागावण
कधी लाजून तिचं माझ्या मिठीत सामावण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

होत कधी असंही , जेव्हा आठवण तिची येते
नजरेतील भाव तिच्या , डोळ्यात माझ्या साठवून जाते
आठवणीने तिच्या , मनाला वेदना अशा होतात
शरीरातून जणू प्राणच माझे घेऊन जातात
आपल्याच धुंदीत चालण , अचानक घाबरून थांबण
कधी फुलांची माला बनून , गळ्यात माझ्या पडण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

कधीतरी मला तीच रडवेल , स्वप्नातही नव्हत वाटलेलं
दु:खावर माझ्या हसताना , आभाळ होत फाटलेल
हृदय जिला मी अर्पण केलं , दगडाचं तिचं काळीज असेल
देवदूत समजलो ज्याला , तोच माझा खुनी असेल
तिचं ते रुसण , मी तिला समजावण
निघुनी गेला तो जमाना , होऊनी एकाच क्षण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!


..............वैभव आलीम (०३/११/१०)

0 comments

Post a Comment