माझी नोकरी माला सोडावी लागली कारण?
माला सांगण्यात आल की चेन्नैला जा, आधी ज़रा विरोध केला पण तयार झालो जाण्यासाठी परन्तु माला काय विचारण्यात आल माहीत आहे? माला तमिल येत का? कारण तिकडे हिंदी, इंग्रजी बोलत नाही आणि मला भाषा येत आसेल तर मी तिकडे जाऊ शकतो.
सांगायच एकाच, माला नोकरी सोडावी लागली......
परन्तु महाराष्ट्रात बाहेरून येणार्या लोकांना हा प्रश्न विचला जातो का? की तुम्हाला मराठी बोलता येते का? नाही .......
राज साहेब खर बोलतात, सगले प्रान्त आपापली भाषा घट्टा धरून बसले आहेत, आपण मुर्खपणा करतो आहोत, ह्याची आपल्या येणार्या मराठी पिढीला किम्मत मोजावी लागणार. मराठी भाषा येत्या २० ते ५० वर्षात मरण पावणार, भाषा संपली म्हणजे संस्कृति संपली, मराठी धर्म संपला.

आज आपण आपल्या राज्यात उपेक्षित आहोत परन्तु ते जाणवत नाही पण लवकरच सर्व मराठी जनतेला नक्कीच जाणवेल, आज माला ह्याचा अनुभव झालाय, राग येतो पण काही करू शकत नाही. आई भवानी ह्या साठी सगल्या मराठी जनतेला कधी एकत्र आणेल तिलाच माहीत.

जय महाराष्ट्र!!!!!!

0 comments

Post a Comment