भेट अशी की...

भेट अशी की जिला पालवी

कधीच फुटली नाही

कोर शशीची घनपटलातून

कधीच सुटली नाही

मिठीविना कर रितेच राहिले

दिठीही फुलली नाही

ओठांमधली अदीम ऊर्मी

तशीच मिटली राही

युगायुगांचा निरोप होता

तोही कळला नाही

समीप येऊनी स्वर संवादी

राग न् जुळला काही

खंत नसे पण एक दिलासा

राहे हृदयी भरूनी

अलौकिकाची अशी पालखी

गेली दारावरूनी

- 'कुसुमाग्रज' - 'पाथेय' काव्यसंग्रहातून

2 comments

Asha Joglekar said... @ May 19, 2009 at 3:38 AM

कुसुमाग्रजांची ही कविता वाचायला दिल्या बद्दल आभार. सुरेखच.

Anonymous said... @ August 3, 2010 at 5:37 PM

mahiti pahije tyanchi

Post a Comment